स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)
अंतर्गत लातूर जिल्ह्याचा प्रगतीचा
जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा
लातूर दि.06:- निलंगा नगर परिषद व शिरुर
अनंतपाळ नगर पंचायतीस जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी भेट देवून स्वच्छ महाराष्ट्र
अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाचा आढावा घेतला व प्रत्यक्ष स्थळ पहाणी करुन याबाबत
देण्यात आलेले उद्दिष्ट शिघ्रगतीने मुदतीत पुर्ण करण्याबाबत संबंधित मुख्याधिकारी व
पदाधिकारी यांना सुचना दिल्या.
तसेच नगर परिषद अंतर्गत प्रभाग निहाय जास्तीत जास्त कमी वेळेत
हगंणदारी मुक्त होणा-या प्रभागास शासनामार्फत रुपये 10 लाख बक्षीस स्वरुपात देण्यात
येणार आहेत. दिनांक 1 मे 2017 पासून शासनाने जी शहरे हगणंदारी मुक्त होणार नाहीत अशा
शहरांना विकास निधी उपलब्ध करुन दिला जाणार नाही
असे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकास निधीही
रोखुन धरण्यात येणार आहे व यापुढे नागरीकांना रेशनकार्डावरील धान्य व तसेच कोणत्याही
शासकीय लाभ शौचालय नसल्यास दिले जाणार नाहीत
जिल्हाधिकारी पोले यांनी स्पष्ट केले आहे.


नगर परिषद निलंगा दिनांक 15 एप्रिल 2017 रोजी व सर्व पाच नगर
पंचायती हे दिनांक 30 एप्रिल 2017 पर्यंत हगंणदारी मुक्त करण्याचे नियोजित करण्यात
आलेले असून शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
नगर परिषद,नगर पंचायतीतील सर्व अध्यक्ष , उपाध्यक्ष, समिती अध्यक्ष, सर्व सदस्य , मुख्याधिकारी
व अधिकारी कर्मचारी व पोलीस प्रशासन लातूर जिल्हा 100 टक्के हगंणदारी मुक्त करण्याचे
अथक प्रयत्न करण्यात येत आहेत.
*****
Comments
Post a Comment