मंडल रेल प्रबंधक अजयकुमार दुबे यांच्याकडून
जलदुतच्या 101 व्या फेरीचे स्वागत
लातूर, दि.30: मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
लातूर शहरातील भीषण पाणी टंचाईच्या परिस्थितीवर उपाय योजना म्हणून मिरज येथून रेल्वेने
पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक 12 एप्रिल 2016 पासून लातूर शहराला
रेल्वेने पाणी पुरवठा सुरु झाला. आज दिनांक 30 जुलै 2016 रोजी सकाळी जलदुत या रेल्वेची
101 वी फेरी लातूर रेल्वे स्थानकात आल्यानंतर सोलापूर विभागाचे मंडल रेल प्रबंधक अजयकुमार
दुबे या जलदुतचे स्वागत केले.
यावेळी विभागीय
वाणीज्य प्रबंधक अशोक उपाध्याय, रेल्वे अभियंता रविंद्र सिंग, मध्य रेल्वेचे क्षेत्रीय
सल्लागर समितीचे सदस्य शिवाजीराव नरहरे, निजाम शेख, रेल्वे सोलापूर चे ए.ओ.एम. शिवराज
मानसपुरे, ॲड. व्ही. व्ही. उगले आदिसह सर्व समिती सदस्य व रेल्वेचे अधिकारी उपस्थित
होते.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामार्फत जलदुत रेल्वेवर
आधारित तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे विमोचन मंडल रेल प्रबंधक अजयकुमार दुबे व मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले.
*****
Comments
Post a Comment