Posts

Showing posts from October, 2016
Image
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रम समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यत पोहोचला पाहीजे -          जिल्ह्याधिकारी पांडुरंग पोले          लातूर,दि.14: सन 2001 च्या लोकसंख्येनुसार लातूर जिल्ह्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण 918 इतके होते. परंतु 2011 च्या लोकसंख्येनुसार हे प्रमाण कमी होऊन 889 पर्यंत आलेले आहे. तरि लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मुला-मुलींच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी शासनाने दिलेला बेटी बचाओ बेटी  पढाओ कार्यक्रम समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले.               जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पोले मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.व बा.) श्री. केकान, पोलीस उपअधिक्षक (गृह) रमेश कंतेवार, शिक्षणाधिकारी (मा.) गणपत मोरे, महिला व बालविकास अधिकारी बी. एच. निपाणीकर याच्यासह इतर समिती सदस्य उपस्थित होते.                 जिल्हाधिकारी श्री. पोले म्
Image
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी          लातूर,दि. 10: कृषि व पणन राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांनी औसा तालुक्यातील तोंडाळी व रेणापूर तालुक्यातील दहेली गावांमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली.                यावेळी माजी आमदार पाशा पटेल, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, कृषि उपसंचालक श्री. सरोदे, प्र. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय पाटील, औसा तहसिलदार अहिल्या गाठाळ, गट विकास अधिकारी श्री. भालके, रेणापूरचे तालुका कृषि अधिकारी बी. व्ही. वीर यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.                यावेळी श्री. खोत यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांच्या भेटी घेऊन एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगितले. तसेच तोंडाळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नवीन इमारतीकरिता प्रस्ताव तयार करुन त्याकरिता पाठपुरावा करण्याचे निर्देश गट विकास अधिका-यांना दिले. तसेच तोंडाळीचा ग्रामीण रस्ता त्वरित करण्याची सूचना ही त्यांनी केली. तोंडाळी गावाच्या पुर्नवस
Image
प्रत्येक नुकसानग्रस्त शेतक-याला पिक विम्याचा लाभ मिळाला पाहीजे                                     -          कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत          लातूर,दि. 10: जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तरि महसूल व कृषि विभागाने प्रत्येक नुकसानग्रस्त शेतक-याला पिक विम्याचा लाभ मिळाला पाहीजे याकरिता परस्परांत समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश कृषि व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांनी दिले.              शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित शेती पिकांच्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत कृषि राज्यमंत्री श्री. खोत बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे, माजी आमदार पाशा पटेल, कृषि सहसंचालक अशोक किरनाळ्ळी, कृषि उपसंचालक श्री. सरोदे, प्र. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय  पाटील, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे यांच्यासह कृषि विभाग व विमा कंपन्यांचे इतर अधिकारी उपस्थित होते.              कृषि राज्यमंत्री खोत म्हणाले की, महसूल व कृषि
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडनुक अधिसुचना 10 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार          लातूर,दि. 09: राज्यातील 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका-2017 निवडणूक विभाग, निर्वाचक गणांची रचना व आरक्षणाची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिनांक 18 ऑगस्ट 2016 रोजी कार्यक्रम देण्यात आला आहे. त्या कार्यक्रमानुसार :- (1) सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर 2016 रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसुचना निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचना आरक्षणासह जिल्हाधिकारी लातूर यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. (2) जिल्हा परिषद, लातूर यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे (3) तहसिलदार अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, लातूर, औसा, निलंगा यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे (4) पंचायत समिती अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, लातूर, औसा, निलंगा याच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे (5) जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेत स्थळ www
Image
राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये 85 लाख 53 हजार रक्कमेची 310 प्रकरणे तडजोडीने निकाली                    लातूर,दि.08: जिल्हयातील विविध  न्यायालयामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये  85 लाख 53 हजार 449 रक्कमेची दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावा व कलम 138 एन. आय. ॲक्ट, एम. व्ही. ॲक्ट स्वरुपाची 310 प्रकरणे  तडजोडीने  निकाली  काढण्यात  आली.             जिल्हा न्यायालयात आयोजित लोकअदालतीचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांचे हस्ते करण्यात आले.  यावेळी  जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी, एस. एस. कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. के. चौदंते, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. बालाजी  पांचाळ, जिल्हा सरकारी वकील ॲड. एस. व्ही  देशपांडे  हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना न्या. व्ही. डी. डोंगरे  पुढे  म्हणाले  की, आपण जरी न्यायाधीश, वकील, अधिकारी असलो तरी आपण ग्रामीण भागातून व शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात  घेवून  जास्तीत  जास्त  प्रकरणे तडजोडीने  मिटविण्यासाठी सामुहिक प्रयत्न  करण्याची  गरज
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी संबंधित बँकेकडे अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 7 : लातूर जिल्हयात दिनांक  15 जून 2016 ते 30 जूलै 2016 या कालावधीमध्ये खरीप हंगामात एकूण 6 लाख 17 हजार 812 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सोयाबीन काढणीच्या वेळेस सप्टेंबर अखेर अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने या वर्षी पुर्वीची राष्ट्रीय पिकविमा  योजना बंद करून राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केलेली आहे. या  योजनेतील  मार्गदर्शक सुचनानुसार अतिवृष्टी, पावसातील खंड, नापिकी व किड लागून पिकांची झालेली नुकसान भरपाईसाठी पिक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या उत्पादनाच्या सरासरी आकडेवारीच्या आधारावर निश्चित  करण्यात  येणार  आहे. जिल्हयात  पिक  कापणी  प्रयोगाची  मंडळ निहाय पथके तयार करुन संबंधित इफको टोकियो  जनरल  इन्सुरन्स  कंपनी  व  कृषी  विभागास सुचना देण्यात आल्या आहेत. पिक कापणी प्रयोगाचे वेळापत्रक    www.latur.nic .in    या संकेत  स्थळावर  प्रसिध्द  करण्यात  आले  आहे. प्रधानमंत्री  पिक  विमा  योजनेअंतर्गत कापणी पिकाच
                              नागरिकांनी साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी                          जिल्हा परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन             लातूर,दि.6: पावसाळयात गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, विषमज्वर, हगवण व अतीसार अशा साथीच्या आजाराचा सामना नागरिकांना करावा लागतो. यासाठी मागील काळात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाच्या  माध्यमातून विशेष मोहिम राबविल्यामुळे जिल्ह्यात जलजन्य आजार उदभवले नाहीत, असे माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे. सध्या जिल्हयात परतीच्या पावसामूळे नदी, नाले, ओढे यांना पुर आलेला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे उद्रभव स्थाने दुषीत होण्याची शक्यता गृहीत धरून सर्व पाणी स्त्रोतांचे पुनश्च क्लोरीनवॉश करण्याची मोहीम राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी,लातूर यांनी जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता समितीच्या बैठकीत आदेशीत केले आहे. संभाव्य नागरिकांना होणाऱ्या आजारावर मात करता येऊ शकेल. यासाठी नागरिकांनी पिण्याचे पाणी निर्जतूक करून वापरावे, यासाठी पिण्याचे पाणी दुहेरी कपडयाने गाळुन घ्यावे, पिण्या
जिल्ह्यातील शेतक-यांनी शेती औजारांसाठी कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा             लातूर, दि.3: शेतीमध्ये मजुरीवर होणा-या खर्चात बचत करणे व मशागतीची कामे वेळेवर, जलदगतीने करण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून कृषि यांत्रिकीकरण उपअभियान ही योजना सन 2016-17 मध्ये लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कुटुंबातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटूंबातील शेतकरी व शेतकरी गटातील सभासदास प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी तात्काळ संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रतापसिंह कदम यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.           या अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, अल्प, अत्यल्प भु-धारक, महिला शेतक-यांना कमाल एक लाख पंचवीस हजार रुपये व इतर लाभार्थ्याना एक लाख रुपये अनुदान आहे. तसेच पॉवर टिलरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, अल्प, अत्यल्प भु-धारक, महिला शेतक-यांना कमाल रु. 75 हजार व इतर लाभार्थ्यांना कमाल रु. 60 हजार अनुदान आहे.  तथापि
Image
जिल्ह्यात पूरात अडकलेल्या 36 व्यक्तींची सुटका, मदत व बचावकार्यासाठी प्रशासन सज्ज ·          एन.डी.आर.एफ. चे पथक रात्री सव्वा एक वाजता दाखल ·          एन.डी.आर.एफ पथकाकडून 18 व्यक्तींची सुटका ·          नदीकाठच्या 1 हजार 265 नागरिकांचे स्थलांतरण ·          पूरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यु ·          चार ठिकाणी स्थलांतरीत नागरिकांसाठी शिबीरे लातूर,दि. 02 : जिल्ह्यात दिनांक 01 ऑक्टोबर 2016 रोजी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 36 व्यक्ती अडकलेल्या होत्या. त्यामधून स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत 18 व्यक्तींची सुखरुप सुटका करण्यात आली होती. परंतु मावलगाव ता. अहमदपूर व सेलु जवळगा ता. रेणापूर येथील भीषण पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन पुणे येथील एन.डी.आर.एफ. चे शोध व बचाव पथकास बोलाविण्यात आले. या पथकाने 18 व्यक्तींची सुटका केली आहे. तरि जिल्हा प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आपत्ती नियंत्रणासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली आहे. मावलगाव ता. अहमदपूर येथे पाण्याचा येवा अधिक आल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन गावांतील 10 लोक पू
Image
विक्रीकर विभागाने शेवटच्या घटकांपर्यंत करांची माहिती पोहचवावी                                                        - ना. संभाजी पाटील -निलंगेकर          लातूर,दि. 01: राज्याच्या एकूण कर महसूलात विक्रीकर विभागाचा वाटा जवळपास 60 टक्के आहे. तसेच विक्रीकर जमा करण्यासाठी विभागाने अद्यावत यंत्रणांचा वापर सुरु केलेला आहे. परंतु समाजातील अनेकांना करांविषयी माहिती नसते. तरि विक्रीकर विभागाने शेवटच्या घटकांपर्यंत करांची माहिती पोहचविण्याचे आवाहन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.                जिल्हाधिकारी कार्यलयाच्या सभागृहात आयोजित विक्रीकर दिन सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, महापौर दिपक सुळ, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, विक्रीकर उपायुक्त जी. एस. गवंडी, उपजिल्हाधिकारी प्रदीप मरवाळे याच्यासह विक्रीकर विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कर भरणा करणारे व्यापारी उपस्थित होते.           श्री. निलंगेकर म्हणाले की, राज्य शासन शासकीय योजनांची अंमलबजावणी वेगळ्या पध्दतीन
Image
आरोग्य विभागाने स्तन कर्करोग तपासणी मोहिम प्रभावीपणे राबवावी                                            - कामगारमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर         लातूर,दि. 01: राज्यात सर्वत्र 1 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत विनाशुल्क स्तन कर्करोग तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. तरि आरोग्य विभागाने सदरच्या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्हयाच्या तळागळातील महिलांपर्यंत लाभ पोहचवावा तसेच  कर्करोग निदान झाल्यास पुढील आरोग्य उपचार पध्दतीचा त्यांना वेळेत सेवा देण्याचे निर्देश कामगार व कौशल्य विकास मंत्री श्री. संभाजी पाटील - निलंगेकर यांनी दिले.             शासकीय वैदयकीय  महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आयोजित विनाशुल्क स्तन कर्करोग तपासणी मोहिमेच्या उदघाटनप्रसंगी कामगारमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनिल गायकवाड, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला शिंदे यांच्यासह महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी  कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.            श्री. निलंगेकर पुढे म्हणाले की, विनाशुल्क स्तन कर्करोग तपास
Image
कामगारमंत्री निलंगेकर यांच्याकडून मसलगा व पेठ येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी          लातूर,दि. 01: निलंगा तालूक्यातील मसलगा व लातूर तालू्‌क्यातील पेठ गावांतील अतिवृष्टीने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी कामगार व कौशल्य विकासमंत्री श्री.संभाजी पाटील- निलंगेकर यांनी करून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश दिले.                कामगारमंत्री निलंगेकर म्हणाले की, अतिवृष्टीने सोयाबीन, उडीद पिकांचे जवळपास शंभर टक्के नुकसान झालेले आहे.तरि कृषि व महसूल विभागाने जिल्हयातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी वेळेत पुर्ण  करावी.तसेच पंचनामे करत असताना एकही अतिवृष्टीने  बाधित झालेला शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.          जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम,उपविभागीय कृषि अधिकारी आर.टी.मोरे निलंगा तहसिलदार विक्रम देशमुख अदि मसलगा येथील पाहणीच्या प्रसंगी उपस्थित होते. तर पेठ येथे खासदार सुनिल गायकवाड,आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, जि