जिल्ह्यात पूरात अडकलेल्या
36 व्यक्तींची सुटका, मदत व बचावकार्यासाठी प्रशासन सज्ज
·
एन.डी.आर.एफ. चे पथक रात्री सव्वा एक वाजता दाखल
·
एन.डी.आर.एफ पथकाकडून 18 व्यक्तींची सुटका
·
नदीकाठच्या 1 हजार 265 नागरिकांचे स्थलांतरण
·
पूरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यु
·
चार ठिकाणी स्थलांतरीत नागरिकांसाठी शिबीरे
लातूर,दि.02: जिल्ह्यात दिनांक
01 ऑक्टोबर 2016 रोजी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 36 व्यक्ती
अडकलेल्या होत्या. त्यामधून स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत 18 व्यक्तींची सुखरुप सुटका
करण्यात आली होती. परंतु मावलगाव ता. अहमदपूर व सेलु जवळगा ता. रेणापूर येथील भीषण
पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन पुणे येथील एन.डी.आर.एफ. चे शोध व बचाव पथकास बोलाविण्यात
आले. या पथकाने 18 व्यक्तींची सुटका केली आहे. तरि जिल्हा प्रशासन पूर परिस्थितीवर
लक्ष ठेवून आपत्ती नियंत्रणासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले
यांनी दिली आहे.

सेलु जवळगा ता. रेणापूर येथील पूरात सात व्यक्ती अडकलेल्या होत्या. या सर्व
व्यक्तीची सुटका एन.डी.आर.एफ. पथकाने पहाटे 4.00 वाजता केली. तसेच रेणा नदीवर अडकलेल्या
एका व्यक्तीची सुटका ही या पथकाकडुन करण्यात आलेली असून सदरील पथकाने पूरात अडकलेल्या
18 व्यक्तींची सुखरुप सुटका केलेली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली
आहे.
जळकोट तालुक्यातील बेलसांगवी गावाला पूराचा वेढा पडल्याने गावांतील सुमारे
200 लोक अडकले होते. तरि प्रशासनाच्या शोध व बचाव पथकाने त्या सर्व लोकांना सुखरुप
गावाबाहेर काढून लाळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरित केले. त्याप्रमाणेच
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील पूरात अडकलेल्या पाच व्यक्तींची सुटका प्रशासनाने स्थानिक
लोकांच्या मदतीने केली. तसेच प्रशासनाने रेणानदीवरील पुलावर अडकलेल्या तीन नागरिकांची
सुटका स्थानिकंच्या मदतीने केलेली आहे.

इमर्जन्सी लाईटींग
टॉवर :- मावलगाव ता. अहमदपूर व सेलू जवळगा ता. रेणापूर या दोन गावात पूरात अडकलेल्या
व्यक्तींना सुखरुप सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यक्ती अडकलेल्या ठिकाणच्या परिसरात
इमर्जन्सी लाईटींग टॉवर उभे केलेले होते. या टॉवरच्या लाईटींगचा प्रकाश 1 किलो मीटरच्या
परिसरात पडला जाऊन बचावासाठी येणा-या एन.डी.आर.एफ. पथकाला त्यामुळे मदत मिळाली.

एका व्यक्तीचा
मृत्यु :- अहमदपूर तालुक्यातील सावरगाव थोट येथील बालाजी गोविंद पांचाळ हा 20 वर्षीय
तरुण पूराच्या पाण्यात वाहून गेला. या तरुणाचा मृतदेह एन.डी.आर.एफ. चया शोध व बचाव
पथकाने आज शोधून काढला.
बंद पडलेले रस्ते
पुर्ववत :- काल पूरपरिस्थितीमुळे
वाहतुकीस बंद करण्यात आलेला नांदेड-लातूर, खोराळा-रेणापूर, पाणगाव-रेणापूर, माटेगाव-रेणापूर,
खलंग्री- रेणापूर हे सर्व रस्ते पूराचे पाणी ओसरल्याने वाहतुकीस पुर्ववत करण्यात आलेले
आहेत.
बाधित तलाव :- अतिवृष्टी व पूरामुळे कारेपूर वनविभागाचा तलाव, मंगरुळ ता. जळकोट येथील
पाझर तलाव क्र-5, वाढवणा खु., मोरताळवाडी व किनी ये ता. उदगीर येथील प्रत्येकी 1 या
प्रमाणे 3 व एकूण 5 पाझर तलाव बाधित झालेले आहेत.

समन्वय :- जिल्हाधिकारी
पांडुरंग पोले याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणच्या माध्यमातून सर्व शासकीय विभागांशी योग्य समन्वय ठेवत असून पूर परिस्थितीचा
अंदाज घेऊन प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज आहे. तसेच पूराच्या पाण्याविषयी नदीकाठावरील
सर्व गावांना व तेथील नागरिकांना वेळोवेळी माहिती दिली जात आहे. तसेच गर
जेनुसार बचाव कार्य ही केले जात आहे. या पूरपरिस्थितीमध्ये जिल्ह्याच्या सर्व तालुक्यास्तरीय यंत्रणा सतर्क असून पूरात अडकलेल्या लोकांना वेळीच मदत पोहोचविली जात आहे.
नदीकाठावरील गावांना
सतर्कतेचा इशारा :- मांजरा व तावरजा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात
येत असल्याने नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
****
Comments
Post a Comment