मराठी भाषेची अस्मिता संवर्धनाची
जबाबदारी सर्वांनी जपायला हवी
                                              -प्राचार्य.डॉ. सिद्राम डोंगरजे
*मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे कवयित्री शैलेजा कारंडे यांच्या हस्ते उद्घाटन
*विविध सामाजीक, राजकीय,माय माऊली, रान, मैत्री व इतर वास्तववादी विषय व समस्यावरील कवितांचे सादरीकरण
लातूर, दि 27:- आजच्या स्पर्धेच्या  युगात मराठी भाषेवर इतर भाषेचे सावट येऊ लागल्याने आपली मराठी  मातृभाषा लुप्त होऊ लागली आहे. तेव्हा मराठी मातृभाषेची अस्मिता संवर्धनाची जबाबदारी सर्वानी जपायला हवी,  असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांनी केले.
विभागीय, जिल्हा माहिती कार्यालय,श्री. महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे, कवयीत्री सौ.शैलजा कारंडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. राजाभाऊ होळकुंदे, प्रा. शिवप्रकाश डोंगरे ,जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सिद्राम डोगरगे म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात आमची मातृभाषा मराठीवर इतर भाषेचे सावट येऊ लागल्याने मराठी भाषा फक्त लुप्त होऊ लागली आहे. यासाठी  आपण सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन करुन मराठी भाषेची अस्मिता स्वीकारण्याची गरज आहे, असे  प्रतिपादन करुन मराठी भाषेमधील तत्वज्ञान सर्वांनी घ्यावे असे आवाहन केले.
श्री. यशवंत भंडारे म्हणाले की, कुसुमाग्रज यांच्याशी माझा प्रत्यक्ष संवाद झाला असून त्यांच्याकडून बरेचसे शिकावयास मिळाले आहे. मराठी भाषेची अवस्था वाईट नाही तर आपल्या अकलनाची  अवस्था वाईट झाली आहे. भाषेचा जन्म 70 हजार वर्षातील आहे. खानाखुनातून माणूस भाषा शिकत गेला आहे. प्राण्यामध्ये आपापसात एकमेकांशी आवाजातून संवाद साधला जातो. हाव भावातून भाषेची निर्मिती झाली आहे. मराठी भाषेचे पांग फेडायचे असेल तर सर्वांनी मराठी भाषेत बोलले पाहिजे असे आवाहन ही त्यांनी केले.
मराठी भाषेमध्ये प्रचंड लिखान झाले आहे पण आपण आपल्या घरात मराठी भाषा बोलत नाहीत. कोणत्याही भाषेत शिक्षण घ्या पण आपली मातृभाषा मराठी भाषेला विसरु नका असे सांगून मराठी भाषाही टिकली पाहिजे, नाही तर टिकवलीच पाहिजे, असे अग्रही प्रतिपादनही  श्री. भंडारे यांनी केले.
सुप्रसिध्द कवयीत्री सौ. शैलजा कारंडे म्हणाल्या की, वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची आभाळा ऐवढी उंची आहे. लिखान हे मरत नाही प्रत्येकाने लिखान करावे तसेच प्रत्येक वेळी छाती ठोकपणे बोलले पाहिजे. कोणत्याही भाषेला बारमाही दिवस नाहीत. कुणब्याच्या लेकरांनी आपण मस्तीत जगा व आपल्या मराठी मातृभाषेवर प्रेम करा असे संदेश देऊन सर्वांना क्षणभरासाठी का होईना माझी माय…. ही कवीता सादर करुन सर्वांना प्रोत्साहीत केले.
यावेळी बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी स्व:हस्तअक्षरात लिहलेल्या अस्मिता भिंतीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिंनीना जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  जिल्हा वार्षिेक योजना सन 2019-20 विशेष घटक योजना अंतर्गत्‍ प्रस्तूत केलेल्या दिनदर्शिंका, भित्तीपत्रीके, घडीपत्रिकांचे यावेळी वितरण करण्यात आले. तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्य मासीकाच्या  मराठी भाषा  विशेषांक मान्यवर व विद्यार्थ्यांना भेट स्वरुपात देण्यात आला. यावेळी मराठी भाषेतील काव्यवाचन व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित बसवेश्वर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी ,विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

                                                     *****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु