‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरु राहणार
‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर
सुरु राहणार
लातूर
, दि.27 ( जिमाका ) :
राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" संचाचे वितरण २२
मार्च २०२३ पासून सुरु झाले असून पुढील एक महिनाभर सुरु राहणार आहे, असे अन्न,
नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले
आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय
अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर
विभागातील वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी)
शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी
सणांनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १
किलो साखर व १ लिटर खाद्यतेल या ४ शिधा जिन्नसांचा समावेश असलेला "आनंदाचा
शिधा" संच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये
घेण्यात आला आहे. त्यानुसार काही जिल्ह्यांत वितरण सुरू झाले आहे.
यापूर्वी सन २०२२ मधील दिवाळी सणानिमित्त माहे
ऑक्टोबर २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना
"आनंदाचा शिध" संचाचे वितरण करण्यात आले होते, असे अन्न व नागरी पुरवठा
व ग्राहक संरक्षण विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
****
Comments
Post a Comment