वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले सांत्वन
लातूर, दि. 18 (जिमाका) : चाकूर
तालुक्यातील तीर्थवाडी येथील शेतकरी नागभूषण विश्वनाथ पाटील यांचा 17 मार्च रोजी
वीज कोसळल्याने मृत्यू झाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज पाटील कुटुंबियांची
भेट घेवून त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
प्रशिक्षणार्थी तहसीलदार निलेश होणमोरे, नायब
तहसीलदार रोहन काळे, नगरसेवक नितीन रेड्डी, गणेश हाके यांच्यासह विविध विभागांचे
अधिकारी यावेळी उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment