खरीप हंगाम २०२४ मध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी ई-केवायसी २५ मार्चपर्यंत करुन घ्यावी
खरीप हंगाम २०२४ मध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी
ई-केवायसी २५ मार्चपर्यंत करुन घ्यावी
लातूर,दि.19: खरीप हंगाम २०२४ मध्ये माहे जून ते आक्टोबर २०२४ या कालावधीत लातूर जिल्हयात अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून ४६६ कोटी ४० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी वाटपाची कार्यवाही डीबीटी प्रणालीमार्फत सुरु आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ५०५ लाभार्थी मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले असून त्यापैकी ३ लाख ५० हजार ३७३ लाभार्थ्यांना ३८७ कोटी ३४ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच २४ हजार ३८२ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी न केल्याने रक्कम २१ कोटी ७७ लाख रुपये इतका निधी वितरीत करणे शिल्लक आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामार्फत ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतक-यांची गावनिहाय यादी संबंधित गावच्या ग्रामपंचायतीचे ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच याबाबत दवंडी व वर्तमानपत्रात प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना ईकेवायसी पूर्ण करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालय किंवा ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे संपर्क साधून व्हीके नंबर प्राप्त करुन घेऊन नजीकचे आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सुविधा केंद्र (सीएससी) येथे जाऊन ई-केवायसी २५ मार्च २०२५ पूर्वी पूर्ण करुन घ्यावी. संबंधित शेतकरी यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच शासनाकडून डीबीटीपर्यंत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.
तरी जे शेतकरी मदतीसाठी पात्र आहेत व अद्याप पर्यंत ई-केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी मुदतीत ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामाफत करण्यात येत आहे.
****
Comments
Post a Comment