
सर्व नागरिकांनी महा-अवयव दान अभियानात सहभागी व्हावे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले लातूर,दि.30: राज्य शासन दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत राज्यात सर्वत्र महा-अवयवदान अभियान राबवित आहे. सर्व नागरिकांमध्ये अवयव दानाविषयी जनजागृती करुन इतर गरजू लोकांना आपल्या अवयव दानामूळे नवजीवन मिळू शकते याची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे तरी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महाअवयव दान अभियानात सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे. यावेळी खासदार सुनील गायकवाड ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ए.डी. शिंदे, उप अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, डॉ. मंगला शिंदे, प्राध्यापक डॉ. एस.जी. देशपांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपक कोकणे जिल्हा शल्य चिकीत्सक श्री. डॉ. दुधाळ तसेच वैद्यकीय महाविद्या...