नागरिकांनी टंचाईवर कायमस्वरुपी
मात करण्यासाठी जलपुर्नभरण अभियानात सहभागी व्हावे
-कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर
लातूर
दि.15:- जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती पुन्हा उदभवू नये म्हणून प्रशासनामार्फत जलपुर्नभरण
अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून आज पर्यंत 3 हजार नागरिकांनी या अभियानाच्या
माध्यमातून इमारतीच्या छतावर रुफ वॉटर हार्वेस्टींग
करुन विंधन विहरींचे जलपुर्नभरन केलेले आहे. परंतु या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत
जास्त नागरिकांनी सक्रीय सहभागी होवून टंचाईच्या परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करावी,
असे आवाहन कामगार, कौशल्य विकास, भुकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांनी केले.
लातूर
जिल्हयाने लोकसहभागातून गाळ काढणे मोहिमेत एक नवीन पॅटर्न निर्माण केलेला असून याअंतर्गत
67 लक्ष घन मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. तसेच
शासकीय यंत्रणा, लोकसहभाग व लोकप्रतिनिधी निधी मधुन नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे
214 किमी इतके कामे झाली असून मुख्यमंत्री
सहाय्यता निधीतून ही खोलीकणाची कामे सुरु असल्याचे श्री. निलंगेकर यांनी म्हटले.
टंचाईच्या
परिस्थितीमध्ये प्रशासनाने 359 टॅंकरद्वारे
पाणीपुरवठा करुन 1 हजार 348 विहीरींचे अधिग्रहण तसेच 167 नवीन विंधन विहिर यासह टंचाईवरील
विविध उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन नागरिकांना दिलासा दिला. त्याप्रमाणेच
सन 2015-16 च्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत 336 कोटी रुपयांचे व पीक विमा योजनेचे 604 कोटी रुपयांचे अनुदान शेतक-यांच्या बॅंक खात्यावर जमा केलेले आहेत, असे
श्री निलंगेकर यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिक, दुर्बल घटकांतील नागरिक
व पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबासाठी
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही एक नवसंजीवन देणारी योजना ठरली आहे. जिल्हयातील
सर्व गरजू रुग्णांनी व शेतकरी बांधवांनी शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेचा
लाभ घ्यावा. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत नागरिकांनी
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी यावेळी केले.
प्रारंभी
कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त
मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर श्री. निलंगेकर यांनी परेड कमांडर पोलीस उप अधीक्षक विकास नाईक यांच्या
समवेत पोलीस दल, गृहरक्षक दल, स्काऊट गाईड दल
संचलनाची पाहणी केली.
यावेळी महात्मागांधी
तंटामुक्त अभियान, आपत्ती व्यवस्थापन बाबत जागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ, जलयुक्त शिवार
अभियान, पाणी वाचवा धोरण, व्यवसाय निहाय नवीन उपकरणे, स्वच्छ भारत अभियान, रोहयो अंतर्गत
कामाची माहिती, आदि चित्ररथ या संचलनात सहभागी झालेले होते. तसेच सरस्वती विद्यालय
व गोदावरी लाहोटी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले तर सदानंद
माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम व झांझच्या कवायती सादर केल्या.
यावेळी कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक,
लोकप्रतिनिधी, पत्रकार,अधिकारी व कर्मचारी, नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.या समारंभाचे सुत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले.
****
Comments
Post a Comment