शेतक-यानी खरीप हंगाम पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

लातूर,दि.10: चालू खरिप हंगामात लातूर जिल्ह्यात कडधान्य, गळीतधान्य,तृणधान्य व ऊस पिकासाठी पंचायत समिती पातळीवर, जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर पिकस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सदर पिकस्पर्धेत शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी खरिप हंगाम पिकासाठी 15 ऑगस्ट 2016 ही शेवटची तारिख आहे. सदर स्पर्धेत सहभागी होऊ ईच्छुणाया शेतक-यांनी प्रवेश फिसची रक्कम 15 ऑगस्ट 20106 पुर्वी चलनानी भरुन विहीत नमुन्यातील  प्रवेश अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी अथवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी सदर पिकस्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मोहिम अधिकारी महेश क्षीरसागर, कृषि विकास अधिकारी बी.एस.रणदिवे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम यांनी प्रशिधी पत्रकान्वये केले आहे.
 सदर पिकस्पर्धेत पंचायत समिती पातळीवरील स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणा-या शेतक-यास अनुक्रमे 2500/-, 1500/- व 1000/- रुपये, जिल्हापातळीवरील स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणा-या शेतक-यास  अनुक्रमे 5000/-, 3000/, व 2000 रुपये व राज्य पातळीवर स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय शेतक-यास अनुक्रमे 10000/-,7000/-,5000/- रुपये बक्षीस व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रवेश फिस सर्वसाधारण गटासाठी पंचायत समिती पातळीसाठी 20 रुपये , जिल्हा पातळीसाठी 40 रुपये तर राज्य पातळीसाठी 60 रुपये राहील.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु