पुनर्रचित फळपिक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
पुनर्रचित फळपिक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. 16: मृग बहार 2025-26 मध्ये लातूर जिल्ह्यात डाळींब, सिताफळ आणि चिकू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविली जाणार आहे. ही योजना बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पुणे यांच्यामार्फत कार्यान्वित होईल. शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत हवामान केंद्रांवर नोंदविलेल्या माहितीनुसार सहभागी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.
अधिसूचित फळपिके आणि महसूल मंडळे
- डाळींब: किनगाव, अहमदपूर, खंडाळी, नागलगाव, हेर, औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकुंड, भादा, चाकूर, नळेगाव, वडवळ ना., निलंगा, औराद शहाजानी, कारेपूर, पानगाव.
- चिकू: अहमदपूर.
- सिताफळ: शिरूर ताजबंद, उजनी, बेलकुंड, आष्टा, औराद शहाजानी, रेणापूर, पळशी, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर, हरंगूळ बू., कन्हेरी, मुरुड बु.
विमा संरक्षित रक्कम आणि हप्ता
- डाळींब: ₹1,60,000 (हप्ता ₹8,000)
- चिकू, सिताफळ: प्रत्येकी ₹70,000 (हप्ता ₹3,500)
अर्जाची अंतिम मुदत
- डाळींब: 14 जुलै 2025
- चिकू: 30 जून 2024
- सिताफळ: 31 जुलै 2025
अर्ज प्रक्रिया
कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेत घोषणापत्र आणि अर्ज सादर करावा. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करावी. अर्जासोबत आधार कार्ड, सातबारा, 8 (अ) उतारा, फळबागेचा Geo-Tagging फोटो, भाडेपट्टा करार (आवश्यक असल्यास), आणि बँक पासबुक प्रत सादर करणे बंधनकारक आहे. अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र तातडीने काढण्याचे आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी टोल-फ्री क्रमांक 1800 209 5959 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment