कन्यादान योजनेसाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे प्रस्ताव मागवले

 कन्यादान योजनेसाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे प्रस्ताव मागवले

लातूरदि. १० (जिमाका): छत्रपती संभाजीनगर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या योजनेचा उद्देश विवाहातील अनुचित प्रथा रोखणे आणि सहभागी दाम्पत्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.

प्रस्ताव विहित नमुन्यातील अर्जासह (कार्यालयात उपलब्ध) सादर करावेत. संस्थांनी विवाहाचे ठिकाणतारीख आणि वर-वधूंच्या सत्यप्रत अर्जासह प्रस्ताव पाठवावेत. अर्जाचा नमुना शासकीय सुट्टी वगळता कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही.

योजनेची अंमलबजावणीकालावधी आणि लक्षांक बदल करण्याबाबतचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पछत्रपती संभाजीनगर यांच्याकडे राखीव आहेतअसे प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी कळवले.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन