औद्योगिक घटकांनी स्थानिक उमेवारांना नोकरीत प्राधान्य द्यावे

 

औद्योगिक घटकांनी स्थानिक उमेवारांना नोकरीत प्राधान्य द्यावे

लातूर, दि. 27 (जिमाका) :   महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय दिनांक 17 नोव्हेंबर, 2008 अन्वये औद्योकिग विकासाच्या लाभामध्ये स्थानिक जनतेला योग्य वाटा मिळावा, या उद्देशाने जिल्ह्यातील औद्योगिक घटकामध्ये पर्यवेक्षकीय श्रेणीत किमान 50 टक्के व पर्यवेक्षकीय व इतर श्रेणीत किमान 80 टक्के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घेण्याबाबत आदेशित केले आहे.

लातूर जिल्ह्यातील सर्व उद्योग घटक, सेवा उद्योग घटक व इतर सर्व आस्थापना यांनी वरील शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देवून शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन न करता बाहेरील लोकांना रोजगार दिल्यास, त्यांच्या विरुध्द योग्य ती तरी सर्व उद्योग घटक, सेवा उद्योग घटक व इतर सर्व आस्थापनांनी या शासन निणयानुसार कार्यवाही करावी, असे जिल्हा उद्योग मित्र समिती तथा सदस्य सचिव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन