खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी स्पर्धा इच्छुक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन
खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी स्पर्धा इच्छुक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन * -जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी* * लातूर,दि.24,(जिमाका):-* रब्बी हंगामात घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता खरीप 2022 हंगामातही शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. भात , ज्वारी , बाजरी , मका , नाचणी(रागी) , तूर , सोयाबीन , भूईमुग ब सुर्यफुल इ. पिकांसाठी 31 ऑगस्टपूर्वी इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्...