Posts

Showing posts from 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विशेष मुलाखत

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विशेष मुलाखत लातूर, दि. ७ (जिमाका) : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सविस्तर माहिती देणारी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत १२ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत (रविवार, दि. १६ ऑगस्ट वगळून) दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दि. 7 : शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद (ता.06) कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आत्मा व कृषी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. हवामान बदल, एल-निनो परिस्थिती आणि हवामानानुसार शेती व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मनीषा बांगर होत्या. सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिगंबर पेरके व विस्तार विद्वेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सूर्यवंशी यांनी बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट केल्या.कीटकशास्त्रज्ञ डॉ. दयानंद मोरे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. विजय भामरे यांनी मित्र कीटकांचे महत्त्व व जैविक नियंत्रणाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र, मांजरा येथील डॉ. पी. एच. उलेमाले यांनी फलोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान व बागायती पिकांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्रीकृष्ण शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी हवामान-स्मार्ट व संशोधनाधारि...

लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती; १८ ऑगस्टला मुलाखत

लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती; १८ ऑगस्टला मुलाखत लातूर, दि. ७ :- लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत सैनिक मुला-मुलींचे वसतिगृह व विश्रामगृहासाठी विविध अशासकीय पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा तसेच इतर पात्र नागरिकांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अर्ज व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. ३१,८७५) तसेच सहायक वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. २४,८७५) उपलब्ध आहेत. स्वयंपाकी (महिला) पदासाठी ५ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १४,१०६), चौकीदार पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. २१,१५९), सफाई कामगार पदासाठी ३ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १३,२७१) आणि माळी पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १३,२७१) भरण्यात येणार आहेत. ***

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू लातूर, दि. ७ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांची २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ वसतिगृहे कार्यरत आहेत. लातूर शहरात मुलांचे ६ व मुलींचे ४ वसतिगृहे आहेत. औसा, निलंगा, उदगीर, देवणी, चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे व मुलींचे एक वसतिगृह आहे. अहमदपूर येथे मुलांचे दोन व मुलींचे दोन, तर रेणापूर येथे मुलांचे एक व जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह कार्यरत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, अ...

उच्च शिक्षणासाठी वसतिगृह प्रवेशास अर्ज सुरू

उच्च शिक्षणासाठी वसतिगृह प्रवेशास अर्ज सुरू लातूर, दि. ६ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ७ ते ३१ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. जिल्ह्यात मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० क्षमतेची दोन वसतिगृहे कार्यरत आहेत. येथे निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याची मोफत सुविधा उपलब्ध आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असावे. बारावीनंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. शिक्षण संस्थेच्या शहरात विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा. वेळापत्रकानुसार अर्ज स्वीकृती ७ ते ३१ ऑगस्ट, छाननी १ ते ७ सप्टेंबर होणार आहे. पहिली निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत १८ सप्टेंबर आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी दुसरी यादी २१ सप्टेंबरला प्रसिद्ध हो...

जय हिंद साधन केंद्राची १५ वी वार्षिक सभा उत्साहात

जय हिंद साधन केंद्राची १५ वी वार्षिक सभा उत्साहात लातूर, दि. ७ : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत स्थापन जय हिंद लोकसंचालित साधन केंद्राची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महादेव पार्वती मंगल कार्यालय येथे उत्साहात झाली. सभेत महिला सक्षमीकरण, बचत गटांची प्रगती आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. सभेस माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे, कोमल भारती, बालग्रामचे नंदा पितांबर, डॉ. प्रभावती वाडकर, भरत काळे, उद्धव तेलंग, नगरसेवक दत्ता सुरवसे, गजानन साळुंके आदी उपस्थित होते. आरोग्य सहायक उद्धव तेलंग यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार व ‘आभा’ कार्डाबाबत माहिती दिली. नंदा पितांबर यांनी ग्रामीण बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे सांगितले. भरत काळे यांनी महिलांनी कर्जाचा योग्य वापर उद्योग-व्यवसायासाठी करावा, असे प्रतिपादन केले. डॉ. प्रभावती वाडकर यांनी महिला धोरणामुळे झालेल्या स...

तृतीय पंथीयांसाठी आरोग्य शिबीर व जनजागृती

तृतीय पंथीयांसाठी आरोग्य शिबीर व जनजागृती लातूर, दि. 7 : तृतीयपंथीयांच्या आरोग्य तपासणी व हक्कांविषयी जनजागृतीसाठी एकदिवसीय कार्यशाळा लातूर येथे पार पडली. सहायक आयुक्त समाज कल्याण, लातूर आणि सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय भवन, आडत लाईन येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानी उमेश सानवणे होते. अधीक्षक आर. व्ही. सुरकुटलावार, एस. डी. सराफ, एन. डी. शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या समस्या, हक्क व अधिकारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या अध्यक्षा सानवी जेठवाणी यांनी कार्यक्रमात सविस्तर मार्गदर्शन केले. प्रादेशिक उपायुक्त उमेश सानवणे यांनी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती दिली. तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले. तसेच transgender.dosje.gov.in या पोर्टलवर नोंदणी न केलेल्यांनी आवश्यक कागदपत्रे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात जमा करा...

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू लातूर, दि. 5 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यासाठीची 2026-27 ची अर्ज प्रक्रिया महाडीबीटी 2.0 पोर्टलवर सुरू झाल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यादव गायकवाड यांनी सांगितले. नववी व दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्रपुरस्कृत), साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. पालक व सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन...

जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांचे व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांचे व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन • नशा मुक्त भारत अभियानाचा १८ ऑगस्ट रोजी वर्धापन दिन लातूर, दिनांक 05 (जिमाका) : नशा मुक्त भारत अभियानाच्या (NMBA) सहाव्या वर्धापनदिनानिमित्त १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये व शासकीय, अनुदानित वसतिगृहांमधील विद्यार्थी यांनी राष्ट्रीय व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. कर्मचारी व नागरिकांनी नशा मुक्ती मित्र नोंदणी https://nashamukt.dosje.gov.in/nasha-mukti-mitr या लिंकवरून करावी. केंद्र सरकारच्या https://nashamukt.dosje.gov.in/epledge या अधिकृत संकेतस्थळावरून 'e-Pledge' घेऊन अभियानात सक्रीय सहभागी होत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. व्यसनमुक्तीसाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांक १४४४६ चा देखील प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ***

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ; प्रवासी वाहन चालकांनी मंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ; प्रवासी वाहन चालकांनी मंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन लातूर, दि. 5 (जिमाका) : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाचे सदस्य होण्यास सर्व प्रकारचे प्रवासी वाहन चालक पात्र आहेत. प्रवासी वाहन चालकांनी मोठ्या संख्येने मंडळाचे सदस्य व्हावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे. टॅक्सी, कॅब, ॲप-आधारित (ओला, उबर), पर्यटन वाहने, इतर सर्व प्रवासी वाहने चालविणारे चालक मंडळाचे सदस्य होऊ शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिकृत संकेतस्थळ ananddighekalyankarimandal.org वर ऑनलाइन नोंदणी करूनही सदस्यत्व प्राप्त करून घेता येईल, असेही चव्हाण यांनी कळवले आहे. ****

भूजल संवर्धनासाठी माहितीचा प्रभावी वापर करावा - अपर जिल्हाधिकारी करमकर

Image
वृत्त क्र. : 549 भूजल संवर्धनासाठी माहितीचा प्रभावी वापर करावा - अपर जिल्हाधिकारी करमकर  भूजल माहिती व जलभृत नकाशांकनावर कार्यशाळा लातूर, दि. 4 : केंद्रीय भूजल बोर्डाने भूजल माहितीच्या प्रसारासाठी, डेटा पोर्टल्सची उत्तम निर्मिती केली आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय नियोजन, जलसंपदा व्यवस्थापन आणि भूजल संवर्धनासाठी संबंधित विभागांनी या माहितीचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी केले. केंद्रीय भूजल बोर्ड (सीजीडब्ल्यूबी), मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे "सीजीडब्ल्यूबीच्या भूजल माहितीचा तसेच जलभृत (Aquifer) नकाशांकन अभ्यासांचा प्रसार व उपयोग" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रीमती करमरकर होत्या. कार्यशाळेस भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, मृद व जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, पाणलोट विकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघु पाटबंधारे विभाग, कृषी विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस केंद्रीय भूजल बोर्डाच...

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या उपस्थितीत सेवाभावी अन्नदान उपक्रम

Image
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या उपस्थितीत सेवाभावी अन्नदान उपक्रम लातूर, दि. 4 : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सेवाभावी अन्नदान उपक्रमाचे आयोजन लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. श्री. भारुका आणि त्यांच्या पत्नी सौ. उमा भारुका यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात लातूर मुख्यालयातील न्यायाधीशांच्या अर्धांगिनींचाही सहभाग होता. शेकडो गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सन्मानपूर्वक भोजनाचे वाटप करण्यात आले. रुग्णालयात दीर्घकाळ उपचारासाठी थांबणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मान्यवरांनी भोजन वाटपाबरोबरच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी धर्मादाय सहआयुक्त विद्याधर मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर,...

आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती

आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दि. ३ (जिमाका) : आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४ विषयक जनजागृती कार्यक्रम पार पडला. जिल्हा वकील संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती ए. आर. निळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या विधी सल्लागार श्रीमती ए. आर. मेकले, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार जाधव आणि ॲड. स्नेहा शिणगारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतात स्त्रीला माता आणि शक्तीस्वरूप मानले जात असताना स्त्रीभ्रूणहत्येसारख्या घटना घडणे ही दुर्दैवी बाब आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रय...

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्ट अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्ट अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू लातूर, दि. 3 (जिमाका) : राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फतखरीप हंगाम 2026-27साठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यंदापासून प्रथमच अर्ज प्रक्रिया स्वतंत्रऑनलाइन पोर्टलद्वारेराबविण्यात येणार आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत10 ऑगस्ट 2026आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.inसंकेतस्थळावरील'पीक स्पर्धा नोंदणी'टॅबवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीदिलीप जाधवयांनी केले आहे. पीकस्पर्धेअंतर्गत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या11 खरीप पिकांचासमावेश करण्यात आला आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन स्तरांवर होणार आहे. तालुकास्तरावरील उत्पादकतेच्या आधारे पुढील स्तरासाठी विजेत्यांची निवड केली जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर ...

मत्स्यपालकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण उत्साहात

मत्स्यपालकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण उत्साहात लातूर, दि. ३ (जिमाका) : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मत्स्यपालकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, कौशल्य विकास आणि जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने"आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक जाळी व बोटी आणि मत्स्य हाताळणी व विपणन"या विषयावरील एकदिवसीय जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर तथा दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र व मत्स्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी, पीएमएमएसवाय प्रकल्पधारक मत्स्यशेतकरी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बेल्लाळे होते. प्राणीशास्त्र व मत्स्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवी सोळुंके, शासनाच्या मत्स्यव्यवसायविभागाच्यासहाय्यक आयुक्त तेजस्विनी करळे यांनी आ...

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात 2 हजार रोपांचे वृक्षारोपणलातूर, दि. 3 : येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)रंगरूट प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपमहानिरीक्षक तथा प्राचार्य अमीरुल हसन अंसारीयांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. याउपक्रमाअंतर्गत सुमारे 2 हजार रोपांची लागवड करण्यात आली. लागवड करण्यात आलेल्या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींची फळझाडे, सावली देणारी वृक्षतसेच औषधी वनस्पतींचा समावेश होता.यावेळी उपस्थित अधिकारी आणि जवान प्रशिक्षार्थींना मार्गदर्शनकरताना अमीरुल हसन अंसारी म्हणाले, “आपण केवळ राष्ट्राच्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर पर्यावरणाच्यासंरक्षणासाठीही कटिबद्ध आहोत. आज लावलेली झाडे भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरतील.” या कार्यक्रमाला कमांडंट पारसनाथ, राजपत्रित अधिकारी, जवान तसेच सुमारे 1 हजार 700प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यानेवृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेतली.यापूर्वीही सीआरपीएफ आरटीसी, लातूरतर्फे कॅम्प परिसर आणिआजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आह...

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू लातूर, दि. ३ : जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून ही परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. लातूर जिल्ह्यातील २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र आहेत. उमेदवाराची जन्मतारीख १ मे २०१५ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत असणे आवश्यक आहे. इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे. ***

समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील लातूर, दि. ३१ : समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एका छताखाली उपलब्ध होत असून यामुळे सर्वसामान्य जनतेचे वेळेची बचत व आर्थिक बचत असल्याचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. अहमदपूर येथे संत सावतामाळी मंगल कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे होत्या. लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, लातूर जिल्हा परिषद सभापती उत्तम माने, अहमदपूरच्या तहसीलदार उज्वला पांगारकर, चाकूरचे तहसिलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, अहमदपूर पंचायत समिती सभापती सुरज पाटील, अहमदपूरच्या उपसभापती अयोध्या केंद्रे, चाकूरचे उपसभापती चाकूर भुजंगराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे, प्रतीक्षा गुट्टे, अश्विन नागराळे, रंजना चाटे, उ...

अहमदपूर येथे ३१ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अहमदपूर येथे ३१ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन लातूर, दि. ३० : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात २२ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहमदपूर येथील सावता माळी मंगल कार्यालय येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड हे राहतील. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाजकल्याण सभापती उत्तम माने, जिल्हा परिषद सदस्य ॲड. अजिंक्य देशमुख, इंजि. प्रफुलचंद्र गुंडरे, शितल खोमणे, अश्विन नागराळे, रंजना चाटे, प्रतीक्षा गुट्टे, भानुदास पोटे, अमर पाटील, उषा सोनकांबळे तसेच अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, चाकूर पंचायत समितीच्या सभापती जयश्री नागरगोजे, अहमदपूरचे नगरा...

लातूर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणुकीसाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणुकीसाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ३० : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अर्जदारांसाठी अर्जाचा नमुना संबंधित तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध असून या क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असणाऱ्या प्रमाणपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. या व्यवस्थापकीय समितीवर शासनामार्फत विविध अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील गोशाळा किंवा पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचे अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशन केलेल्या दोन व्यक्ती, तसेच जिल्ह्यात मानवहितकारक व प्राणी कल्याणासाठी कार्यरत असणारे पाच ते सहा कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्राणी कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या पात्र संस्था, कार्यकर्...

लातूर येथे 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' अंतर्गत पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक उत्साहात

लातूर येथे 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' अंतर्गत पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक उत्साहात लातूर, दि. ३०: जिल्हा रेशीम कार्यालय येथे केंद्रीय रेशीम बोर्ड अंतर्गत 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' या उपक्रमाची पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक मंगळवारी झाली. या बैठकीसाठी केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ डॉ. बाबुलाल सायनी यांनी तुती लागवड व कीटक संगोपन करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल तांत्रिक मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी सांगितले की, शेतीला जोडधंदा म्हणून 'सिल्क व मिल्क' (रेशीम आणि दुग्ध व्यवसाय) केल्यास प्रति एकरी उत्पादनात मोठी वाढ होते. या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी वेगळे चारा पीक घेण्याची गरज भासत नाही. रेशीम कीटकांनी खाऊन उरलेला तुतीचा पाला हा प्रथिनांचा भरपूर मोठा स्त्रोत आहे. हा पाला जनावरांना खाऊ घातल्यास दुधाचे प्रमाण वाढते, दुधाचे फॅट चांगले बसते आणि जनावरांची तब्येतही उत्तम राहते, असे त्यांनी सांगितले...

लातूरच्या ५ शेतकऱ्यांना मिळणार परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लातूरच्या ५ शेतकऱ्यांना मिळणार परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन लातूर, दि. ३० (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांमधील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती व्हावी, तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी आणि कृषीमाल प्रक्रिया यांबाबत अद्ययावत ज्ञान अवगत करता यावे यासाठी कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे योजना सन २०२६-२७ राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत परदेशातील शेती तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा वापर राज्यातील शेतकरी स्वतःच्या शेतीमध्ये करू शकतील, तसेच संबंधित देशांतील शेतकऱ्यांशी थेट चर्चा, क्षेत्रीय भेटी व विविध कृषी संस्थांना भेटी देऊन शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी मार्गदर्शक सूचनेनुसार चालू वर्षात युरोप आणि चीन या देशांची निवड करण्यात आली असून लातूर जिल्ह्यासाठी एकूण ५ शेतकऱ्यांचे भौतिक लक्षांक प्राप्त झाले आहे. प्राप्त लक्षांकानुसार १ महिला शेतकरी, १ केंद्र किंवा राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्का...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. ३० : (जिमाका): जिल्ह्यात ३० जुलै २०२६ रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये उदगीर तालुक्यात सर्वाधिक ३८.३ मिलीमीटर, तर औसा तालुक्यात सर्वात कमी ५.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिलीमीटरमध्ये) पुढीलप्रमाणे आहे: लातूर - १४.१, औसा - ५.५, अहमदपूर - २०.१, निलंगा - ८.९, उदगीर - ३८.३, चाकूर - २४.३, रेणापूर - २३.४, देवणी - २८.९, शिरूर अनंतपाळ - २३.१ आणि जळकोट - २५.८ मिलीमीटर. ****

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारासाठी पात्र उद्योग, निर्यातदार, व्यापारी संस्था व सेवा निर्यातदारांनी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारासाठी पात्र उद्योग, निर्यातदार, व्यापारी संस्था व सेवा निर्यातदारांनी अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ योजनेंतर्गत सन 2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार या पुरस्कारांचा उद्देश महाराष्ट्रातील उत्कृष्ट निर्यातदारांना रोख पारितोषिक व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन त्यांच्या निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणे हा आहे. राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाने सन 2024-2025 व 2025-2026 या वर्षांसाठी राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगातील उत्पादक निर्यातदार, व्यापारी निर्यातदार, सेवा निर्यातदार, महिला, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उत्पादन निर्यातदार, ओडीओपी तथा जीआय निर्यातदार तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांतील पात्र निर्यातदारांकडून अर्ज मागविले आहेत. यावर्षी विविध क्षेत्रातील एकूण 66 पुरस्कार प्रदान करण्यात येणा...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाविषयक १ ऑगस्ट रोजी लातूर येथे विशेष कार्यशाळा

वृत्त क्र. : 528 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाविषयक १ ऑगस्ट रोजी लातूर येथे विशेष कार्यशाळा लातूर, दि. २९ (जिमाका): शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज भरलेल्या व विहीत मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ लाभ वितरीत करण्याच्या दृष्टीने, तसेच सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी महाआयटी पोर्टलवर नवीन वसतिगृह प्रवेश अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी येत्या शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात ही कार्यशाळा होणार असून, पात्र व अडचणी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण, लातूरचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ***

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात मत्स्यव्यवसाय योजनांची जनजागृती; एनएफडीपी प्रमाणपत्रांचे वाटप

Image
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात मत्स्यव्यवसाय योजनांची जनजागृती; एनएफडीपी प्रमाणपत्रांचे वाटप लातूर, दि. २९ (जिमाका): राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मंगळवारी लातूर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये या योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिकांना राष्ट्रीय मत्स्यव्यावसायिक डिजिटल प्लॅटफॉर्म (एनएफडीपी) अंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना एनएफडीपी प्रमाणपत्रांचे अधिकृत वितरण करण्यात आले, ज्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, केसीसी (केसीसी) सुविधा, विमा संरक्षण तसेच डिजिटल ओळख प्राप्त होण्यास मदत होणार आहे. तसेच कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा मिशन (सीएमएमएसआय) अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘ऑल-इन-वन’ योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. याद्वारे मत्स्यबीज उत्पादन, म...

जुने कर्ज माफ, अन् एका दिवसातच मिळणार नवे पीक कर्ज !

Image
विशेष लेख -4 जुने कर्ज माफ, अन् एका दिवसातच मिळणार नवे पीक कर्ज ! निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळं मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. या दुष्टचक्रातून बळीराजाला कायमचे बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'राबवण्यास सुरुवात केली आहे. 25 जुलै रोजी या योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे.राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी या योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीबाबत सविस्तर सांगितले आहे. या योजनेत केवळ कर्जमाफीच नाही, तर शेतकऱ्याला तत्काळ पुन्हा उभे करण्याची मोठी ताकद आहे. पहिल्या टप्प्यातील यादीत मराठवाडा विभागातील जवळपास सहा लाखांहून अधिक शेतकरी पात्र झाले आहेत. योजनेची सर्वात जमेची बाजू: अवघ्या एका दिवसात नवीन कर्ज! एरवी कोणतीही कर्जमाफी झाली, तरी नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांचा 'कुलिंग ऑफ पिरियड' (Cooling-off Period) असतो. यासाठी बँका अनेक महिने किंवा चक्क एक वर्ष वाट पाहायला लावतात. प...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ३० जुलै रोजी कवळखेड येथे आयोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ३० जुलै रोजी कवळखेड येथे आयोजन लातूर, दि. २९ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर आणि उदगीर तालुक्यातील कवळखेद येथील गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा ३० जुलै, २०२६ रोजी सकाळी १० वाजता जी.एस.पी.एम. कॅम्पस, बोधन नगर, जळकोट रोड, कवळखेड, ता. उदगीर, जि. लातूर येथे होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असून, त्यामध्ये बारावी, बी.फार्म, डी.फार्म, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.सी.ए., आय.टी.आय., डिप्लोमा, बी.ई. तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता मूळ शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम (बायोडाटा) आणि पासपोर्ट फोटोच्या तीन प्रतींसह मुलाखतीसाठी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ल...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यात 29 जुलै 2026 रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी 14.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये उदगीर तालुक्यात सर्वाधिक 46.3 मिलीमीटर, तर निलंगा तालुक्यात सर्वात कमी 3.0 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे : लातूर- 5.4, औसा- 5.3, अहमदपूर 20.3, निलंगा3, उदगीर-46.3, चाकूर- 16.3, रेणापूर- 6.6, देवणी- 8.3, शिरूर अनंतपाळ- 7 आणि जळकोट- 43.2 मिलीमीटर. ****

आधार प्रमाणीकरणाची सुविधा पूर्ण मोफत; शेतकऱ्यांकडून शुल्क आकारल्यास कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

आधार प्रमाणीकरणाची सुविधा पूर्ण मोफत; शेतकऱ्यांकडून शुल्क आकारल्यास कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. २८ (जिमाका) : राज्य शासनाच्या २ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र किंवा व्हीएलई यांनी शेतकऱ्यांकडून या कामासाठी कसलेही शुल्क आकारू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. तसेच असे शुल्क आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा तसे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याचा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. योजनेच्या पात्र यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या आपल...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी लातूर शहरातील पार्वती मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या समाधान शिबिराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समाधान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, लातूरचे उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, विरोधी पक्षनेते देविदास काळे, जिल्हा परिषद गट नेत्या आशाताई भिसे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नसीम पटेल, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदा...

शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी तालुका व महानगरपालिकास्तरीय स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन

शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी तालुका व महानगरपालिकास्तरीय स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन लातूर, दि. २७ (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व लातूर महानगरपालिका लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२०२७ या वर्षातील शालेय तालुकास्तर, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर क्रीडा स्पर्धांच्या आयोजन नियोजनासाठी स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार अहमदपूर तालुक्याची बैठक ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालय येथे, चाकूर तालुक्याची बैठक ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता चापोली येथील संजीवनी विद्यालय येथे, जळकोट तालुक्याची बैठक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जळकोट येथील महात्मा फुले महाविद्यालय येथे, तर देवणी व उदगीर या दोन्ही तालुक्यांसाठी ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता उदगिरी महाविद्यालय येथे बैठक पार पडणार आहे. तसेच निलंगा व शिरूर अनंतपाळ या दोन्ही तालुक्यांसाठी ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय येथे, औसा तालुक्यासाठी ५ ऑ...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी लातूर, दि. २७ (जिमाका) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर २८ जुलै, २०२६ या कालावधीत सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीत घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी लातूरचे जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय अन्य पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित प्रवेश करण्यास तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास व शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, दुकाने, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बुथ आणि ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय प...

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन लातूर, दि. २७ : सन २०२६-२७ या वर्षापासून राज्य शासनाने खरीप हंगामापासून सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे आणि फार्मर आयडी उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही योजना अधिसूचित महसूल मंडळात अधिसूचित केलेल्या पिकांसाठीच लागू असणार असून, ती कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक आहे. लातूर जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत केली जात आहे. या योजनेअंतर्गत विविध पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तरावर विमा संरक्षण आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी ६२ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रक्कमेसाठी शेतकऱ्यांना १ हजार २५० रुपये हप्ता भरावा लागेल. कापूस पिकासाठी ६...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: लातूर जिल्ह्यातील ५४,४२६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Image
शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन लातूर, दि. २५: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ४२६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. सर्व पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 'ॲग्रीस्टॅक'वर नोंदणी करून 'आधार प्रमाणीकरण' प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात २२ जुलै रोजी जाहीर झालेल्या यादीत लातूर जिल्ह्यातील २ गावांमधील १३३ पात्र शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ८९२ गावांमधील ५४ हजार २९३ पात्र शेतकऱ्यांची यादी शेतकरी सभासदांच्या विशिष्ट क्रमांकासहित जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५ हजार २३१, तर राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे १९ हजार १९५ अशा एकूण ५४ हजार ४२६ पात्र...

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे.

Image
राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आशा-आकांक्षांना नवी उमेद देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी सविस्तर माहिती देणारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने शासनाने शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार कमी करून त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यासाठी सक्षम करणे, आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत दि. २७ व २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून; तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये ही व...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर, दि. २३ : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३३ शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा, एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भोसले यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लातूर जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांच्यासह संबंधित अ...

लातूर येथे २७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर

लातूर येथे २७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर • महसूल सेवा, आरोग्य शिबीर, विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी लातूर, दि. २३ : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभरात २२ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी लातूर येथील पार्वती मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवा 'एक खिडकी प्रणाली'द्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार असून, यामध्ये सातबारा व फेरफार दुरुस्ती, डिजिटल सातबारा सेवा, विविध प्रकारची दाखले व प्रमाणपत्रे वितरण, महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, फार्मर आयडी, महिलांचे नाव अधिकार अभिलेखात समाविष्ट करणे, पात्र निव...

महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०२६ ची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी; लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती

महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०२६ ची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी; लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती लातूर, दि. २३ : राज्य शासनाच्या गृह (परिवहन) विभागाद्वारे १६ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) (पहिली सुधारणा) नियम, २०२६ राज्यभरात लागू करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात या नवीन नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे. नवीन नियमावलीनुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्कूल बसचे किमान भाडेदर आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (आरटीए) निश्चित केले जाणार असून प्रत्यक्ष दर हे निश्चित दरापेक्षा १० टक्के कमी किंवा जास्त राहू शकतील. तसेच शाळांमधील शालेय परिवहन समितीने दर तिमाहीला पालक व वाहतूकदारांची बैठक घेऊन त्याचा अहवाल जिल्हा स्कूल बस समितीस सादर करणे बंधनकारक आहे. स्कूल बसमधील चालक, महिला सहवर्ती व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक शाळा व्यवस्थापन किंवा वाहनधारकाकडून लेखी पत्राद्वार...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 8.8 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 8.8 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यात 22 जुलै 2026 रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी 8.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक 12 मिलीमीटर, तर निलंगा तालुक्यात सर्वात कमी 3.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे : लातूर- 12, औसा- 9.8, अहमदपूर- 11.3, निलंगा- 3.8, उदगीर-9, चाकूर- 8.3, रेणापूर- 8.3, देवणी- 8.4, शिरूर अनंतपाळ- 11.03 आणि जळकोट- 8.5 मिलीमीटर. ****

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. २० (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता विविध योजनांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे. समान निधी योजनेअंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असून, इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने दिला जात असल्याने त्याकरिता स्वतंत्र प्रस्ताव पाठवू नयेत. असमान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री व फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये तर इमारत बांधकामासाठी १० ते १५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. याशिवाय ज्ञान कोपरा विकासासाठी २.५० लाख रुपये, आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपय...

एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरु; वाहनांच्या पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविले

एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरु; वाहनांच्या पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविले लातूर, दि. २० (जिमाका) : १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून, २०२६ पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आता १ जुलै, २०२६ पासून एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. अशा वाहनांचे पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांना एचएसआरपी पाटी बसविणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल, २०१९ पूर्वीच्या वाहनांना पाटी बसविण्यासाठी ३० जून, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत पाटी न बसविलेल्या वाहनांचे हस्तांतरण, पत्ता बदलणे, कर्जबोजा चढविणे यांसारख्या सेवांवर आधीच निर्बंध लादण्यात आले होते. यापुढे एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूत...