Posts

लातूर तालुक्यातील ममदापूर येथे १७ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

लातूर तालुक्यातील ममदापूर येथे १७ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर लातूर, दि. १५ : महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता मौजे ममदापूर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर मंगल कार्यालय, ममदापूर पाटी या ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिरला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे. या समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारले जाणार असून त्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना विविध सेवा व सुविधा एकाच ठिकाणी पुरविल्या जातील. यामध्ये प्रामुख्याने पंचायत समितीमार्फत घरकुल, जनावरांसाठी गोठा व विहीर योजनांची माहिती दिली जाईल. कृषी विभागाद्वारे ॲग्रीस्टॅक, फार्मर आयडी, पी.एम. विकास योजना, बी-बियाणे व खतांबाबत मार्गदर्शन केले जाईल. भूमी अभिलेख विभागामार्फत 'क' पत्रक, नकाशे व जमीन मोजणी अर्जांचे वाटप होईल, तर आरोग्य विभागाकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करून आयुष्यमान...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त* *राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त* राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन लातूर, दि. 15 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 14 ते 20 एप्रिल, 2026 या कालावधीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मुल्ये, सामाजिक न्याय, समता व बंधुता या विषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. स्पर्धेत सहभागी हूण्यासाठी https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 या लिंकवर निबंध अपलोड करावेत, असे आवाहन लातूर येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी औताडे पी. जे. आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गिरीश महामुनी यांनी केले आहे. गट - 1 साठी आयटीआय, डिप्लोमा, बायफोकल, एसीव्हीसी विद्यार्थ्यांसाठी शब्दमर्यादा 500 ते 800 शब्द असणार आहे. गट -2 साठी पुरुष, महिलांसाठी खुला गट शब्दमर्यादा 800 ते 1200 शब्द असणार आहे. या दोन्ही गटांसाठी 14 ते 20 एप्रिल, 2026 या कालावधीमध्ये निबंध सादरीकरण निबंध पीडीएफ (हस्तलिखीत किंवा टंकलेखित) स्वरुपात सोबत दिलेल्या लिं...

लातूर येथे ज्येष्ठ नागरिक जनजागृती कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावा उत्साहात

Image
लातूर येथे ज्येष्ठ नागरिक जनजागृती कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावा उत्साहात लातूर, दि. १३ : सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लातूर येथील वेद प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नागरिक जनजागृती कार्यशाळा, तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर उपस्थित होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या विविध कायदेविषयक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. कायद्याची माहिती असल्यास ज्येष्ठ नागरिक आपले जीवन अधिक सुरक्षित आणि स्वाभिमानाने जगू शकतात, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी मंचावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडी, आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाशजी घादगीने यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाशजी घादगीने लिखित ...

लातूर जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत सामाजिक समता सप्ताह; विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहीम

लातूर जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत सामाजिक समता सप्ताह; विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहीम लातूर, दि. १३: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर कार्यालयामार्फत १ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील तसेच सन २०२६-२७ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे संकलित केली जाणार आहेत. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तालुका व महाविद्यालयनिहाय संख्यात्मक माहिती 'समान संधी केंद्राच्या' माध्यमातून महाविद्यालय तसेच जिल्हा स्तरावर गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामाजिक समता सप्ताहादरम्यान सीईटी (CET) देणारे विद्यार्थी आणि डिप्लोमा तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घे...

लातूर पाटबंधारे विभागामार्फत १५ एप्रिलपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा

लातूर पाटबंधारे विभागामार्फत १५ एप्रिलपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा लातूर, दि. १३ : लातूर पाटबंधारे विभागामार्फत १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपत्तीचे योग्य नियोजन करणे आणि लाभधारकांमध्ये या कार्यक्रमांची माहिती देऊन जागृती निर्माण करणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेची सुरुवात १५ एप्रिल रोजी होणार आहे. या पंधरवडा कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार असून, १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, तर १७ एप्रिल रोजी 'स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय' आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगविषयक उपक्रम राबविला जाणार आहे. १८ एप्रिल रोजी शेतकरी व पाणी वापर संस्थांशी संवाद साधला जाईल आणि १९ एप्रिल रोजी 'जागतिक महिला शेतकरी वर्ष' निमित्त विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान भूसंपादन व पुनर्वसनाच्या अडचणी सोडविणे, कालवा संयुक्त पाहणी, धरण व कालवा स्वच्छता अभियान, नदी प्...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल लातूर जिल्ह्यातील मद्यविक्री बंद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल लातूर जिल्ह्यातील मद्यविक्री बंद लातूर, दि. 13 : जिल्ह्यात 14 एप्रिल, 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमूद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे. *****

लेक लाडकी योजना: मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

विशेष लेख लेक लाडकी योजना: मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, त्यांचा सन्मान वाढावा आणि त्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना १ एप्रिल २०२३ पासून कार्यान्वित केली आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून मुलींच्या सक्षमीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा एक भक्कम आधार ठरत आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील १० हजार २६ मुलींना या योजनेचा लाभ मजूर करण्यात आला आहे. राज्यातील स्त्री जन्मदर वाढविणे आणि मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्राथमिक ध्येय आहे. यासोबतच ग्रामीण व शहरी भागातील बालविवाहाची प्रथा रोखणे, मुलींच्या मृत्यूदरात घट करणे आणि त्यांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणे यावर राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणे हा या योजनेचा व्यापक दृष्टिकोन आहे. १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीला लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जातो. एका कुटुंबातील पहिल्या दोन मुलीं...