*रेशीम शेती ही ग्रामीण समृद्धीची नवी चळवळ व्हावी-उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ* · नांदगाव येथे रेशीम शेतकरी व रीलर्स मेळावा उत्साहात संपन्न
सुधारित *रेशीम शेती ही ग्रामीण समृद्धीची नवी चळवळ व्हावी-उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ* · नांदगाव येथे रेशीम शेतकरी व रीलर्स मेळावा उत्साहात संपन्न लातूर, दि. 13 : शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन गावांची प्रगती व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच भूमिकेतून लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 'रेशीम शेती क्लस्टर' उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी सांगितले. धारवाड केंद्रीय रेशीम मंडळाच्यावतीने लातूर तालुक्यातील नांदगाव येथील कौसल्या सिल्क रीलिंग (जयराम मठ) येथे आयोजित “आधुनिक तंत्रज्ञान, समृद्ध रेशीम उद्योग” या विषयावरील रेशीम शेतकरी व रीलर्स मेळाव्यामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला लातूरचे रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट, धारवाड केंद्रीय रेशीम मंडळाचे डॉ. विराज सोमकुंवर, 'पोखरा' योजनेचे तंत्र अधिकारी जयसिंग जगधने, सेवानिवृत्त अधिकारी नरसिंग बावगे, रेणापूर पंचायत समितीचे उपसभापती शरद दरेकर, कौसल्या सिल्क रीलिंगचे संच...