Posts

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन लातूर दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांच्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर हे यावेळी महसूल विषयक, कौटुंबिक वादविवाद संदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी, त्यावर योग्य ते कायदेविषयक मार्गदर्शन व आवश्यक ती मदत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित यांनी लातूर जिल्हा सैनिक कार्यालय येथे आवश्यक त्या कागदपत्रासोबत उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. *****

सुरक्षित इंटरनेट दिन विशेष... ऑनलाईन सुरक्षिततेसाठी घ्या खबरदारी !

सुरक्षित इंटरनेट दिन विशेष... ऑनलाईन सुरक्षिततेसाठी घ्या खबरदारी ! सुरक्षित इंटरनेट दिन हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो. या दिनाचा उद्देश विशेषतः मुले व तरुणांमध्ये इंटरनेटचा सुरक्षित, जबाबदार आणि सकारात्मक वापर करण्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. तसेच, दरवर्षी उद्भवणाऱ्या नवीन ऑनलाईन समस्या व सध्याच्या सायबर सुरक्षेशी संबंधित आव्हानांबाबत समाजामध्ये जागरूकता वाढविणे हा देखील या दिनाचा महत्त्वाचा हेतू आहे. शासकीय कामकाजात सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व लक्षात घेता, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी), जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या वतीने “सिक्युअर युवर अकाऊन्टस” ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश सर्व शासकीय कार्यालये, बँका, खाजगी संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या ऑनलाईन खात्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हा आहे. सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स : १) इंटरनेट सुरक्षेसाठी टिप्स : केवळ विश्वसनीय व अधिकृत संकेतस्थळेच वापरा; कोणताही दुवा (Link) उघडण्यापूर्वी त्याची खात्री करा. HTTPS अ...

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; मतमोजणीला सकाळी दहापासून होणार सुरुवात

Image
 _लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६_ लातूर , दि. ०८ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ झालेल्या मतदानात लातूर जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार २३५ मतदारांनी म्हणजेच ६३.७९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ उमेदवार, तर दहा पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्येक तालुकास्तरावर सकाळी १० पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.   जिल्ह्यात मतदान यंत्रावरील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी १४२ टेबल लावण्यात आले आहेत. लातूर येथे २०, अहमदपूरमध्ये १४, उदगीर येथे १४, निलंगा येथे २०, औसा येथे १८, रेणापूर येथे १६, देवणी येथे १२, शिरूर अनंतपाळ येथे ८, चाकूर येथे १० आणि जळकोट येथे १० टेबलवर ईव्हीएम मतमोजणी होईल. यासोबतच टपाली मतपत्रिका मोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यात १ हजार २९१ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.   ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण · मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश · जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात · मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण · मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश · जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात · मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका लातूर, दि. ०६ : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व मतदान पथके आज संबंधित तालुका स्तरावरून रवाना झाली. तसेच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने आवश्यक सज्जता केली आहे. जिल्ह्यात एकूण ५९ जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी २४२ उमेदवार निवडणू...

लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकावून ठेवलेल्या वाहनांचा होणार लिलाव

लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकावून ठेवलेल्या वाहनांचा होणार लिलाव लातूर, दि. ०६ : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोटार वाहन कर जमीन महसूल आदी थकबाकीमुळे अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेची (वाहनांची) विक्री लिलाव प्रक्रियेद्वारे होणार आहे. हा लिलाव १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १२ ते दुपारी ३ वाजेदरम्यान ऑनलाइन पद्धतीने पार पडेल. लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन धारकांना थकबाकी भरण्याची संधी दिल्यानंतरही वाहने सोडविली न गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी, लिलावाच्या अटी व शर्ती तसेच इतर तपशील https://www.eauction.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे मद्यविक्री राहणार बंद

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे मद्यविक्री राहणार बंद लातूर, दि. 06 : लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १० पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक २०२६ कार्यक्रमानुसार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान व ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मतदानापूर्वीचा संपूर्ण दिवस म्हणजे ६ फेब्रुवारी २०२६, मतदानाचा संपूर्ण दिवस म्हणजे ७ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्र वगळून संपूर्ण लातूर जिल्हा अबकारी अनुज्ञप्त्या (मद्य दुकाने) बंद राहतील. याशिवाय, मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, लातूर जिल्ह्यातील मतमोजणीचे ठिकाणी मद्यविक्री अनुज्ञप्त्याही बंद राहतील. एफएल-२, एफएलबीआर-२, एफएल-३, एफएल-४, एफएलबीआर-११ तसेच ताडी अनुज्ञप्ती इत्यादी सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९ व म...

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. 6 : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता बारावी) 10 फेब्रुवारी, 2026 ते 11 मार्च, 2026 या कालावधीत 152 परीक्षा केंद्रावर व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) 20 फेब्रुवारी, 2026 ते दि. 18 मार्च, 2026 या कालावधीत 252 परीक्षा केंद्रावर पार पाडली जाणार आहे. या सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये या परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्या...