Posts

‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’मधील प्रथम दहा विजेत्यांचा होणार सन्मान

‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’मधील प्रथम दहा विजेत्यांचा होणार सन्मान • जलसंधारण दिनानामित्त आयोजित उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन • सहभागासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करणे गरजेचे लातूर, दि. २० : जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथे ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता लातूर जिल्हा परिषद प्रांगणातून या महा वॉकेथॉनला सुरुवात असून तीन किलोमीटर वॉकेथॉनमध्ये विजेत्या ठरणाऱ्या प्रथम दहा जणांचा वॉकेथॉनच्या समारोपप्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, युवक-युवती, खेळाडू, महिलांनी क्यूआर कोडद्वारे नोंदणी या वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जल...

विभागीय आयुक्त जी. श्रीकांतयांचा लातूर येथे शुक्रवारी जनसंवाद उपक्रम;नागरिकांची निवेदने स्वीकारणार 

विभागीय आयुक्त जी. श्रीकांतयांचा लातूर येथे शुक्रवारी जनसंवाद उपक्रम;नागरिकांची निवेदने स्वीकारणार  लातूर, दि. २० : छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी.श्रीकांत हे २१ व २२ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात जनसंवाद कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले आहे. या जनसंवाद कार्यक्रमात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे लातूर जिल्ह्यातीलनागरिकांशी संवाद साधून त्यांची निवेदने स्वीकारणार आहेत. तरी नागरिकांनी या उपक्रमातसहभागी होण्याचे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. **** 

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया -संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया -संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधारआहे. बदलते हवामानआणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्ष...

जलसंधारण दिन विशेष 'महा वॉकेथॉन' आणि जल संवर्धनाचा संकल्प

Image
जलसंधारण दिन विशेष 'महा वॉकेथॉन' आणि जल संवर्धनाचा संकल्प मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेला लातूर जिल्हा. जिल्ह्यासाठी 'पाणी' हा विषय महत्त्वाचा. गेल्या काही दशकांत आपण भूजल पातळीतील घट अनुभवली. जमिनीखालील जलस्तराचा अभ्यास केल्यास प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने २१ ऑगस्ट हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केला आहे, जो लातूरच्या जलचळवळीला नवी दिशा देणारा ठरणारा आहे, यावर आधारित हा विशेष लेख. जलसाधनेचा महामहोत्सव माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा मूलमंत्र देऊन राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी केली. त्यांच्या गौरवार्थ २१ ऑगस्ट हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होत आहे. लातूर जिल्ह्यात या दिवशी आयोजित होणारी 'महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर' ही केवळ एक रॅली नाही, ती आपल्या पाण्यासाठी केलेली एक प्रतिज्ञा आहे. "माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील ...

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे

खतांची आगाऊ बुकिंग आता एफएफएस प्रणालीद्वारे लातूर, दि. 19 (जिमाका) : शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खते वेळेत व आवश्यक प्रमाणात उपलब्ध व्हावीत, यासाठी लातूर जिल्ह्यात पुढील काही दिवसांत फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल (FFS) ई-प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना खतांची आगाऊ बुकिंग करता येणार असून, त्यामुळे रांगा व गर्दी टाळून उपलब्धतेनुसार खताची खरेदी करता येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली. सध्या रासायनिक खतांची विक्री कृषी सेवा केंद्रांमार्फत ई-पॉस मशीनद्वारे केली जाते. नव्या FFS प्रणालीमुळे खत बुकिंगची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे. अशी असेल प्रक्रिया प्रथम महाराष्ट्र राज्याची निवड करून आधारद्वारे पडताळणी करावी. आधार ओटीपी आणि ई-केवायसीद्वारे ओळख निश्चित करावी. यासाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) किंवा सातबारा आवश्यक असेल. यानंतर पिकाची आणि आवश्यक खताची निवड करावी. युरिया, डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आदी उपलब्ध खतांमधून निवड करता येईल....

‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Image
‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड · जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वॉकेथॉन लातूर, दि. १९ : : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून २१ ऑगस्ट रोजी 'जलसंधारण दिन' साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथे ‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, तरुण, विद्यार्थी, एनसीसी व एनएसएसचे स्वयंसेवक, क्रीडापटू, डॉक्टर्स, उद्योजक, व्यावसायिक, महिला आणि सर्व स्वयंसेवी संस्थांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युर टुमारो’ ही या वॉकेथॉनची मुख्य संकल्पना असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा मोलाचा संदेश घेऊन सर्वजण एकत्र चालणार आहेत. ही वॉकेथॉ...

बीएच सिरिज वाहनांचा थकीत कर भरणा करावा उदगीर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांचे आवाहन

बीएच सिरिज वाहनांचा थकीत कर भरणा करावा उदगीर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांचे आवाहन लातूर, दि. १९ (जिमाका) : भारत (बीएच) सिरिजमध्ये नोंदणी झालेल्या वाहनधारकांनी वाहनाचा थकीत कर विहित मुदतीत भरावा, असे आवाहन उदगीर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५१ (ब) अन्वये बीएच (भारत) सिरिजमध्ये वाहन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वारंवार बदली होणारे केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी, केंद्र व राज्य सार्वजनिक उपक्रम तसेच काही शासकीय संस्थांतील कर्मचारी आणि चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्ये अथवा केंद्रशासित प्रदेशांत कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांतील पात्र कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येतो. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५१ (बी) (३) नुसार बीएच सिरिज वाहनांचा कर आकारला जातो. या वाहनांचा १५ वर्षांचा कर एकत्रित न भरता दोन वर्षांच्या...