Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विशेष मुलाखत

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विशेष मुलाखत लातूर, दि. ७ (जिमाका) : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सविस्तर माहिती देणारी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत १२ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत (रविवार, दि. १६ ऑगस्ट वगळून) दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दि. 7 : शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद (ता.06) कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आत्मा व कृषी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. हवामान बदल, एल-निनो परिस्थिती आणि हवामानानुसार शेती व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मनीषा बांगर होत्या. सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिगंबर पेरके व विस्तार विद्वेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सूर्यवंशी यांनी बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट केल्या.कीटकशास्त्रज्ञ डॉ. दयानंद मोरे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. विजय भामरे यांनी मित्र कीटकांचे महत्त्व व जैविक नियंत्रणाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र, मांजरा येथील डॉ. पी. एच. उलेमाले यांनी फलोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान व बागायती पिकांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्रीकृष्ण शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी हवामान-स्मार्ट व संशोधनाधारि...

लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती; १८ ऑगस्टला मुलाखत

लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती; १८ ऑगस्टला मुलाखत लातूर, दि. ७ :- लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत सैनिक मुला-मुलींचे वसतिगृह व विश्रामगृहासाठी विविध अशासकीय पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा तसेच इतर पात्र नागरिकांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अर्ज व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. ३१,८७५) तसेच सहायक वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. २४,८७५) उपलब्ध आहेत. स्वयंपाकी (महिला) पदासाठी ५ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १४,१०६), चौकीदार पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. २१,१५९), सफाई कामगार पदासाठी ३ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १३,२७१) आणि माळी पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १३,२७१) भरण्यात येणार आहेत. ***

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू लातूर, दि. ७ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांची २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ वसतिगृहे कार्यरत आहेत. लातूर शहरात मुलांचे ६ व मुलींचे ४ वसतिगृहे आहेत. औसा, निलंगा, उदगीर, देवणी, चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे व मुलींचे एक वसतिगृह आहे. अहमदपूर येथे मुलांचे दोन व मुलींचे दोन, तर रेणापूर येथे मुलांचे एक व जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह कार्यरत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, अ...

उच्च शिक्षणासाठी वसतिगृह प्रवेशास अर्ज सुरू

उच्च शिक्षणासाठी वसतिगृह प्रवेशास अर्ज सुरू लातूर, दि. ६ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ७ ते ३१ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. जिल्ह्यात मुला-मुलींसाठी प्रत्येकी १०० क्षमतेची दोन वसतिगृहे कार्यरत आहेत. येथे निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याची मोफत सुविधा उपलब्ध आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असावे. बारावीनंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. शिक्षण संस्थेच्या शहरात विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा. वेळापत्रकानुसार अर्ज स्वीकृती ७ ते ३१ ऑगस्ट, छाननी १ ते ७ सप्टेंबर होणार आहे. पहिली निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत १८ सप्टेंबर आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी दुसरी यादी २१ सप्टेंबरला प्रसिद्ध हो...

जय हिंद साधन केंद्राची १५ वी वार्षिक सभा उत्साहात

जय हिंद साधन केंद्राची १५ वी वार्षिक सभा उत्साहात लातूर, दि. ७ : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत स्थापन जय हिंद लोकसंचालित साधन केंद्राची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महादेव पार्वती मंगल कार्यालय येथे उत्साहात झाली. सभेत महिला सक्षमीकरण, बचत गटांची प्रगती आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. सभेस माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे, कोमल भारती, बालग्रामचे नंदा पितांबर, डॉ. प्रभावती वाडकर, भरत काळे, उद्धव तेलंग, नगरसेवक दत्ता सुरवसे, गजानन साळुंके आदी उपस्थित होते. आरोग्य सहायक उद्धव तेलंग यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार व ‘आभा’ कार्डाबाबत माहिती दिली. नंदा पितांबर यांनी ग्रामीण बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे सांगितले. भरत काळे यांनी महिलांनी कर्जाचा योग्य वापर उद्योग-व्यवसायासाठी करावा, असे प्रतिपादन केले. डॉ. प्रभावती वाडकर यांनी महिला धोरणामुळे झालेल्या स...

तृतीय पंथीयांसाठी आरोग्य शिबीर व जनजागृती

तृतीय पंथीयांसाठी आरोग्य शिबीर व जनजागृती लातूर, दि. 7 : तृतीयपंथीयांच्या आरोग्य तपासणी व हक्कांविषयी जनजागृतीसाठी एकदिवसीय कार्यशाळा लातूर येथे पार पडली. सहायक आयुक्त समाज कल्याण, लातूर आणि सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय भवन, आडत लाईन येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आयोजन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानी उमेश सानवणे होते. अधीक्षक आर. व्ही. सुरकुटलावार, एस. डी. सराफ, एन. डी. शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या समस्या, हक्क व अधिकारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या अध्यक्षा सानवी जेठवाणी यांनी कार्यक्रमात सविस्तर मार्गदर्शन केले. प्रादेशिक उपायुक्त उमेश सानवणे यांनी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती दिली. तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले. तसेच transgender.dosje.gov.in या पोर्टलवर नोंदणी न केलेल्यांनी आवश्यक कागदपत्रे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात जमा करा...