Posts

अहमदपूर येथे ३१ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अहमदपूर येथे ३१ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन लातूर, दि. ३० : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात २२ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहमदपूर येथील सावता माळी मंगल कार्यालय येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड हे राहतील. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाजकल्याण सभापती उत्तम माने, जिल्हा परिषद सदस्य ॲड. अजिंक्य देशमुख, इंजि. प्रफुलचंद्र गुंडरे, शितल खोमणे, अश्विन नागराळे, रंजना चाटे, प्रतीक्षा गुट्टे, भानुदास पोटे, अमर पाटील, उषा सोनकांबळे तसेच अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, चाकूर पंचायत समितीच्या सभापती जयश्री नागरगोजे, अहमदपूरचे नगरा...

लातूर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणुकीसाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीवर अशासकीय सदस्यांची नेमणुकीसाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ३० : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अर्जदारांसाठी अर्जाचा नमुना संबंधित तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध असून या क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असणाऱ्या प्रमाणपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. या व्यवस्थापकीय समितीवर शासनामार्फत विविध अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील गोशाळा किंवा पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचे अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशन केलेल्या दोन व्यक्ती, तसेच जिल्ह्यात मानवहितकारक व प्राणी कल्याणासाठी कार्यरत असणारे पाच ते सहा कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्राणी कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या पात्र संस्था, कार्यकर्...

लातूर येथे 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' अंतर्गत पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक उत्साहात

लातूर येथे 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' अंतर्गत पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक उत्साहात लातूर, दि. ३०: जिल्हा रेशीम कार्यालय येथे केंद्रीय रेशीम बोर्ड अंतर्गत 'मेरा रेशम, मेरा अभिमान - २' या उपक्रमाची पहिली रेशीम भागधारकांची सल्लामसलत बैठक मंगळवारी झाली. या बैठकीसाठी केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ डॉ. बाबुलाल सायनी यांनी तुती लागवड व कीटक संगोपन करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल तांत्रिक मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी सांगितले की, शेतीला जोडधंदा म्हणून 'सिल्क व मिल्क' (रेशीम आणि दुग्ध व्यवसाय) केल्यास प्रति एकरी उत्पादनात मोठी वाढ होते. या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी वेगळे चारा पीक घेण्याची गरज भासत नाही. रेशीम कीटकांनी खाऊन उरलेला तुतीचा पाला हा प्रथिनांचा भरपूर मोठा स्त्रोत आहे. हा पाला जनावरांना खाऊ घातल्यास दुधाचे प्रमाण वाढते, दुधाचे फॅट चांगले बसते आणि जनावरांची तब्येतही उत्तम राहते, असे त्यांनी सांगितले...

लातूरच्या ५ शेतकऱ्यांना मिळणार परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लातूरच्या ५ शेतकऱ्यांना मिळणार परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी; १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन लातूर, दि. ३० (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांमधील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती व्हावी, तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी आणि कृषीमाल प्रक्रिया यांबाबत अद्ययावत ज्ञान अवगत करता यावे यासाठी कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे योजना सन २०२६-२७ राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत परदेशातील शेती तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा वापर राज्यातील शेतकरी स्वतःच्या शेतीमध्ये करू शकतील, तसेच संबंधित देशांतील शेतकऱ्यांशी थेट चर्चा, क्षेत्रीय भेटी व विविध कृषी संस्थांना भेटी देऊन शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी मार्गदर्शक सूचनेनुसार चालू वर्षात युरोप आणि चीन या देशांची निवड करण्यात आली असून लातूर जिल्ह्यासाठी एकूण ५ शेतकऱ्यांचे भौतिक लक्षांक प्राप्त झाले आहे. प्राप्त लक्षांकानुसार १ महिला शेतकरी, १ केंद्र किंवा राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्का...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. ३० : (जिमाका): जिल्ह्यात ३० जुलै २०२६ रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये उदगीर तालुक्यात सर्वाधिक ३८.३ मिलीमीटर, तर औसा तालुक्यात सर्वात कमी ५.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिलीमीटरमध्ये) पुढीलप्रमाणे आहे: लातूर - १४.१, औसा - ५.५, अहमदपूर - २०.१, निलंगा - ८.९, उदगीर - ३८.३, चाकूर - २४.३, रेणापूर - २३.४, देवणी - २८.९, शिरूर अनंतपाळ - २३.१ आणि जळकोट - २५.८ मिलीमीटर. ****

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारासाठी पात्र उद्योग, निर्यातदार, व्यापारी संस्था व सेवा निर्यातदारांनी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारासाठी पात्र उद्योग, निर्यातदार, व्यापारी संस्था व सेवा निर्यातदारांनी अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ योजनेंतर्गत सन 2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार या पुरस्कारांचा उद्देश महाराष्ट्रातील उत्कृष्ट निर्यातदारांना रोख पारितोषिक व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन त्यांच्या निर्यात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणे हा आहे. राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाने सन 2024-2025 व 2025-2026 या वर्षांसाठी राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगातील उत्पादक निर्यातदार, व्यापारी निर्यातदार, सेवा निर्यातदार, महिला, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उत्पादन निर्यातदार, ओडीओपी तथा जीआय निर्यातदार तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांतील पात्र निर्यातदारांकडून अर्ज मागविले आहेत. यावर्षी विविध क्षेत्रातील एकूण 66 पुरस्कार प्रदान करण्यात येणा...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाविषयक १ ऑगस्ट रोजी लातूर येथे विशेष कार्यशाळा

वृत्त क्र. : 528 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाविषयक १ ऑगस्ट रोजी लातूर येथे विशेष कार्यशाळा लातूर, दि. २९ (जिमाका): शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज भरलेल्या व विहीत मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ लाभ वितरीत करण्याच्या दृष्टीने, तसेच सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी महाआयटी पोर्टलवर नवीन वसतिगृह प्रवेश अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी येत्या शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात ही कार्यशाळा होणार असून, पात्र व अडचणी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण, लातूरचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ***