जलसंधारण दिन विशेष 'महा वॉकेथॉन' आणि जल संवर्धनाचा संकल्प
जलसंधारण दिन विशेष 'महा वॉकेथॉन' आणि जल संवर्धनाचा संकल्प मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेला लातूर जिल्हा. जिल्ह्यासाठी 'पाणी' हा विषय महत्त्वाचा. गेल्या काही दशकांत आपण भूजल पातळीतील घट अनुभवली. जमिनीखालील जलस्तराचा अभ्यास केल्यास प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने २१ ऑगस्ट हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केला आहे, जो लातूरच्या जलचळवळीला नवी दिशा देणारा ठरणारा आहे, यावर आधारित हा विशेष लेख. जलसाधनेचा महामहोत्सव माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा मूलमंत्र देऊन राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी केली. त्यांच्या गौरवार्थ २१ ऑगस्ट हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होत आहे. लातूर जिल्ह्यात या दिवशी आयोजित होणारी 'महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर' ही केवळ एक रॅली नाही, ती आपल्या पाण्यासाठी केलेली एक प्रतिज्ञा आहे. "माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील ...