Posts

आधार प्रमाणीकरणाची सुविधा पूर्ण मोफत; शेतकऱ्यांकडून शुल्क आकारल्यास कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

आधार प्रमाणीकरणाची सुविधा पूर्ण मोफत; शेतकऱ्यांकडून शुल्क आकारल्यास कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. २८ (जिमाका) : राज्य शासनाच्या २ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र किंवा व्हीएलई यांनी शेतकऱ्यांकडून या कामासाठी कसलेही शुल्क आकारू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. तसेच असे शुल्क आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा तसे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याचा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. योजनेच्या पात्र यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या आपल...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी लातूर शहरातील पार्वती मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या समाधान शिबिराला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समाधान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, लातूरचे उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, विरोधी पक्षनेते देविदास काळे, जिल्हा परिषद गट नेत्या आशाताई भिसे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नसीम पटेल, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदा...

शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी तालुका व महानगरपालिकास्तरीय स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन

शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी तालुका व महानगरपालिकास्तरीय स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन लातूर, दि. २७ (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व लातूर महानगरपालिका लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२०२७ या वर्षातील शालेय तालुकास्तर, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर क्रीडा स्पर्धांच्या आयोजन नियोजनासाठी स्पर्धापूर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार अहमदपूर तालुक्याची बैठक ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालय येथे, चाकूर तालुक्याची बैठक ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता चापोली येथील संजीवनी विद्यालय येथे, जळकोट तालुक्याची बैठक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जळकोट येथील महात्मा फुले महाविद्यालय येथे, तर देवणी व उदगीर या दोन्ही तालुक्यांसाठी ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता उदगिरी महाविद्यालय येथे बैठक पार पडणार आहे. तसेच निलंगा व शिरूर अनंतपाळ या दोन्ही तालुक्यांसाठी ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय येथे, औसा तालुक्यासाठी ५ ऑ...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी लातूर, दि. २७ (जिमाका) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर २८ जुलै, २०२६ या कालावधीत सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीत घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी लातूरचे जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय अन्य पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित प्रवेश करण्यास तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास व शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, दुकाने, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बुथ आणि ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय प...

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन लातूर, दि. २७ : सन २०२६-२७ या वर्षापासून राज्य शासनाने खरीप हंगामापासून सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे आणि फार्मर आयडी उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही योजना अधिसूचित महसूल मंडळात अधिसूचित केलेल्या पिकांसाठीच लागू असणार असून, ती कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक आहे. लातूर जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत केली जात आहे. या योजनेअंतर्गत विविध पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तरावर विमा संरक्षण आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी ६२ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रक्कमेसाठी शेतकऱ्यांना १ हजार २५० रुपये हप्ता भरावा लागेल. कापूस पिकासाठी ६...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: लातूर जिल्ह्यातील ५४,४२६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Image
शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन लातूर, दि. २५: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ४२६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. सर्व पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 'ॲग्रीस्टॅक'वर नोंदणी करून 'आधार प्रमाणीकरण' प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात २२ जुलै रोजी जाहीर झालेल्या यादीत लातूर जिल्ह्यातील २ गावांमधील १३३ पात्र शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ८९२ गावांमधील ५४ हजार २९३ पात्र शेतकऱ्यांची यादी शेतकरी सभासदांच्या विशिष्ट क्रमांकासहित जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५ हजार २३१, तर राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे १९ हजार १९५ अशा एकूण ५४ हजार ४२६ पात्र...

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे.

Image
राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आशा-आकांक्षांना नवी उमेद देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी सविस्तर माहिती देणारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने शासनाने शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार कमी करून त्यांना नव्या उमेदीने शेती करण्यासाठी सक्षम करणे, आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत दि. २७ व २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून; तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये ही व...