Posts

लातूर येथे २४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

लातूर येथे २४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद लातूर, दि. १७ (जिमाका) : उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिकांची जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे २४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हातील गुंतवणूक वाढवणे व नव उद्योजकांना आकर्षित करणे, जिल्हयातील गुंतवणूकदार आणि व्यवसायीकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, लातूर जिल्हा विकासासाठी केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नवउद्योजकांसोबत व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करुन, नव उद्योजकांना एमओयु वितरीत करण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील नव उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं.पी-५, एम.आय.डी.सी.लातूर येथे आपल्या नव उद्योग, व्यवसायाची माहिती देण्याचे आवाहन उप आयुक्त (उद्योग व सेवा) आवाहन लातूर येथील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक उद्योग अधिकारी (मो.क्र. ७३९७८३०५८८) यांच्याशी संपर्क साधावा. ****

ाश्वत विकासासाठी जलसंवर्धनाची लोकचळवळ

Image
विशेष लेख शाश्वत विकासासाठी जलसंवर्धनाची लोकचळवळ महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्याबाबत जनमानसात जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने यंदा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सेक्युअर टुमारो' अर्थात माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा ही या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जलसंधारणाच्या या कार्याला सर्वसमावेशक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या बदलत्या हवामानामुळे अनियमित पर्जन्यमान आणि भूजल पातळीतील घट यांमुळे जलसुरक्षेचे आव्हान गंभीर बनले आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यासारख्या भागातील सरासरी पर्जन्यमानाची अनिश्चितत...

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली नाट्यगृहाच्या कामाची पाहणी

Image
लातूर, दि. १५ : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृह इमारतीच्या कामाची पाहणी केली. तसेच उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता दिपक टेकाळे, उपअभियंता राजेंद्र बिराजदार यावेळी उपस्थित होते. नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी निविदा प्रक्रिया तत्काळ करून लवकरात लवकर कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी. नाट्यगृहाची क्षमता वाढविणे, अद्ययावत सोयी सुविधांची निर्मिती यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी निधी दिला जाईल. मात्र, लातूरच्या नाट्य परंपरेला आणि वैभवला साजेसे अद्ययावत, आधुनिक नाट्यगृहाचे काम व्हावे, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.

लातूरला जलसुरक्षित, सक्षम जिल्हा बनविणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
\ ·           भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण लातूर , दि. १५ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला जलसुरक्षित आणि अधिक सक्षम बनविण्याचा संकल्प पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या , तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले. या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील , लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे , जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड , पोलीस अधीक्षक अमोल तांबे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना , महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह लोकप्रतिनिधी , वरिष्ठ अधिकारी , स्वातंत्र्यसैनिक , माजी सैनिक , शहीद जवानांचे कुटुंबीय , पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 19 ऑगस्ट रोजी निलंगा येथे आयोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 19 ऑगस्ट रोजी निलंगा येथे आयोजन लातूर, दि. 14 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर आणि निलंगा येथील शहीद चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा 19 ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी १० वाजता निलंगा येथील शहीद चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असून, त्यामध्ये बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.अय. डिप्लोमा (सर्व ट्रेड) तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी 19 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मूळ शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम (बायोडाटा) आणि पासपोर्ट फोटोच्या तीन प्रतींसह मुलाखतीसाठी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. लातूर जिल्ह्यातील जास्...

नशामुक्त भारत अभियान : व्यसनमुक्त भविष्यासाठी सामूहिक संकल्प

नशामुक्त भारत अभियान : व्यसनमुक्त भविष्यासाठी सामूहिक संकल्प 'नशामुक्त भारत अभियाना'ला अधिक गती देण्यासाठी आणि समाजात सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण देशात 'National Pledge Against Drug Abuse' (अमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय शपथ) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद करणारा हा विशेष लेख. 'नशामुक्त भारत अभियान' (NMBA) ही केवळ एक योजना किंवा मोहीम नाही, तर ती आपल्या देशाच्या सुरक्षित आणि उज्वल भविष्याची पायाभरणी आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून आपल्या युवा पिढीला बाहेर काढणे आणि देशाला सक्षम बनवणे, हा या अभियानाचा मुख्य धोरणात्मक हेतू. केंद्र आणि राज्य सरकारे या मोहिमेद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे प्रयत्न करत आहेत. जेव्हा आपला समाज आणि विशेषतः तरुण पिढी व्यसनमुक्त असते, तेव्हाच देशाची खरी प्रगती शक्य होते. म्हणूनच, हे अभियान राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.गेल्या पाच-सहा वर्षांतील या अभि...

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

विशेष लेख : माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत माती आणि पाणी या दोन नैसर्गिक संसाधनांचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध या दोन्ही घटकांशी आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणे ही काळाची गरज आहे. याच विचारातून राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे. दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यासमोरील दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून सोडविता येणार नाही, हे ओळखले. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे, तो जमिनीत मुरविणे आणि स्थानिक पातळीवरील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, या भूमिकेतून त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा...