Posts

लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन

लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन लातूर, दि. २० : खरीप २०२६ हंगामाच्या अनुषंगाने शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या कार्यालयातील गुण नियंत्रण कक्षात नितीन सोनटक्के यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली असून, कोणत्याही तक्रारीसाठी अथवा माहितीसाठी त्यांच्याशी ८२७५४८७४०० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. या कक्षाच्या कामकाजासाठी तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) बी. बी. मुंडे (भ्रमणध्वनी क्र. ७८२१८३०९०७) आणि विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए. एन. तिडके (भ्रमणध्वनी क्र. ९६०४८८३०८५) हे समन्वयक म्हणून कार्यरत राहतील. शेतकरी, वितरक किंवा विक्रेते यांना कृषी निविष्ठांच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास अथवा तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी या कक्षाशी किंवा कृषी विभागाच्या १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत करण...

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन; शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात खरीप २०२६ साठी ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन; शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन लातूर, दि. २० : खरीप २०२६ हंगामात लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदी करताना येणाऱ्या अडचणी व गुणवत्तेबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर १ आणि तालुकास्तरावर १० असे एकूण ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे गुणनियंत्रण निरीक्षक नियमितपणे विक्री केंद्रांची तपासणी करत आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली. खरेदी दरम्यान किंवा हंगाम संपेपर्यंत निविष्ठांच्या दर्जाबाबत संशय आल्यास शेतकरी संबंधित तालुक्याच्या तक्रार निवारण कक्षाकडे धाव घेऊ शकतात. तक्रार करताना शेतकऱ्यांनी लेखी अर्जासोबत खरेदीची पक्की पावती, सातबारा उतारा ही कागदपत्रे जोडणे आवश्यक असून त्यावर स्वतःचा पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. याशिवाय, तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडेही त...

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७५ हजार टनांहून अधिक खत साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी साठवणुकीची घाई न करण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७५ हजार टनांहून अधिक खत साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी साठवणुकीची घाई न करण्याचे आवाहन लातूर, दि. २० : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आगामी खरीप हंगामासाठी सर्व प्रकारची रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची खत टंचाई नसल्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये एकूण ७५ हजार १६७ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असून, यामध्ये ३८ हजार ४४४ टन संयुक्त खते, १६ हजार ८२ टन सिंगल सुपर फॉस्फेट, ११ हजार ४३६ टन युरिया, ८ हजार ३११ टन डीएपी आणि ८९४ टन एमओपी खताचा समावेश आहे. हवामान खात्याने यंदा मान्सूनवर 'एल निनो'चा परिणाम होऊन पावसाची अनिश्चितता वर्तविली असल्याने, शेतकऱ्यांनी खतांची आगाऊ खरेदी करून साठवणूक करण्याची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. तालुकानिहाय उपलब्धतेमध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक २९३६ टन युरिया व १८२४ टन डीएपी साठा असून, अहमदपूर (युरिया १५६२, डीएपी ९४२), निलंगा (युरिया १४७३, डीएपी १३४५), औसा (युरिया १३९८, डीएपी ५७०) आणि उदगीर (युरिया ७२६, डीएपी ७३०) या ...

लातूर जिल्ह्यात सीईटी परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्ह्यात सीईटी परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २०: जिल्ह्यात दि. २१ ते २६ एप्रिल, २०२६ या कालावधीत एमबीए, एमएमएस सीईटी आणि एमएचटी सीईटी २०२६ या सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ उपकेंद्रांवर ही परीक्षा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, या काळात केंद्रावर परीक्षार्थींची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. २१ ते २६ एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्य...

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून इ. ५ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थिनी विना अडथळा शिक्षण घेऊ शकणार आहेत.

Image
 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

 

लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
  लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन ·          रुग्णालय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही   लातूर , दि. १८ : लातूरकरांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न मूर्त स्वरूपात येत असून काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज १०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन होत असले तरी याठिकाणी ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिली.   लातूर शहरातील नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते. यावेळी विधानपरिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे , लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील , आमदार...