Posts

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 18 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 18 ऑगस्ट, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 1 सप्टेंबर, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्...

जलसंधारण दिना’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ मध्ये मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत

जलसंधारण दिना’ निमित्त ‘जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ मध्ये मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत मुंबई, दि. १७ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून त्यांच्या जयंतीदिनी, २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारणाच्या कामांना व्यापक लोकसहभागाची जोड देत जलसुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विशेष मुलाखतीचे मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण करण्यात येणार आहे. याचबरोबर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून २०, २१ आणि २२ ऑगस्ट २०२६ रो...

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त निलंगा येथे विविध जनजागृतीपर उपक्रम

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त निलंगा येथे विविध जनजागृतीपर उपक्रम लातूर, दि. 14 (जिमाका): दरवर्षीप्रमाणे 12 ऑगस्ट रोजी जगभर आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा केला जातो. युवा वर्ग हा एचआयव्ही, एड्स संदर्भात अधिक संवेदशिल असून त्यानिमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही, एड्ससंदर्भात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. युवा वर्ग सृजनशिल असल्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यात जागृजी निर्माण व्हावी. याकरिता आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त जिलहा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर , उपजिल्हा रुग्णालय निलंगा व महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी.फार्मसी इन्स्ट्यिुट निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी इन्स्ट्यिुट निलंगा येथे नुकतीच (१२ ऑगस्ट, 2026) रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रॅली, रेड रन स्पर्धा व प्रश्न मंजूषा स्पर्धांचे आयेाजन करण्यात आले होते. लातूर येथील जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजाता पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. आनंद कलमे,डॉ. विश्वेश कुल...

ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

Image
ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन लातूर, दि. 14 (जिमाका): महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मुंबई कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एचआयव्ही, एड्स इन्टेसीफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे, विविध तपासण्या व उपचाराकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर व ग्रामीण रुग्णालय मुरुडच्यावतीने आज विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजाता पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजाभाऊ गलांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा , डॉ. आनंद कलमे यांच्या नेतृत्वाखाली विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजाभाऊ गलांडे , जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकूचे बिपीनचंद्र बोर्ड, डॉ. सचिन गोबाडे, डॉ. संदिप पुरी, डॉ. आरती भारती, डॉ. संदिप मंत्रे, डॉ. अविनाश ठो...

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा लातूर, दि. १७ (जिमाका) : लातूर येथील केंद्रीय रिजर्व पुलिस बल रंगरुट प्रशिक्षण केंद्र येथे 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती व उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व अधिकारी, जवान व प्रशिक्षणार्थी यांच्या मनात देशाप्रती अभिमान व समर्पणाची भावना दिसून आली. समारंभाचे प्रमुख पाहूणे केंद्रीय रिजर्व पुलिस बल रंगरुट प्रशिक्षण केंद्राचे उपमहानिरीक्षक, प्राचार्य अमीरुल हसन अंसारी होते. यावळी इतर राजपत्रित अधिकारी, अधिनस्त अधिकार, जवान तसेच सुमारे 1 हजार 700 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहण समारंभाने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला आणि उपस्थित सर्व जवांनानी एकत्रितपणे राष्ट्रगान गायले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक महत्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सेनानींच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाची आठवण करुन देतो तसेच देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्या...

विशेष लेख जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र

विशेष लेख जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र            पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हीच आजच्या महाराष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच यंदा २१ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जलसंधारण दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकसहभागाची नवी सुरुवात ठरली पाहिजे.             महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २१ ऑगस्टला दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामागे जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचे स्मरण आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. या दिवशी जलपूजन, विविध जलसंधारण कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, श्रमदान, जनजागृती, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर राज्यात जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्या...

लातूर येथे २४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद

लातूर येथे २४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद लातूर, दि. १७ (जिमाका) : उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिकांची जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे २४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हातील गुंतवणूक वाढवणे व नव उद्योजकांना आकर्षित करणे, जिल्हयातील गुंतवणूकदार आणि व्यवसायीकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, लातूर जिल्हा विकासासाठी केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नवउद्योजकांसोबत व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करुन, नव उद्योजकांना एमओयु वितरीत करण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील नव उद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं.पी-५, एम.आय.डी.सी.लातूर येथे आपल्या नव उद्योग, व्यवसायाची माहिती देण्याचे आवाहन उप आयुक्त (उद्योग व सेवा) आवाहन लातूर येथील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक उद्योग अधिकारी (मो.क्र. ७३९७८३०५८८) यांच्याशी संपर्क साधावा. ****