Posts

‘युआयडीएआय’च्या नवीन आधार सेवा केंद्राचे लातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

‘युआयडीएआय’च्या नवीन आधार सेवा केंद्राचे लातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन लातूर, दि. ११ : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (युआयडीएआय) मुंबई प्रादेशिक कार्यालयामार्फत लातूर येथे सुरू करण्यात आलेल्या नवीन अद्ययावत आधार सेवा केंद्राचे उद्घाटन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्तेवाड यांच्या हस्ते झाले. नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा पुरवण्याच्या दृष्टीने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. हे आधार सेवा केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील आर्वीकर कॉम्प्लेक्स येथे स्थित असून आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी, ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि घटनास्थळीच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यास युआयडीएआय मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक मंदार जेवरे आणि सेवा प्रदाता कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या केंद्रात नागरिकांच्या सोयीसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सोय आणि सुलभ टॉयलेट सुविधा उ...

लातूर विभागात 61,216 खात्यांना 462.81 कोटींचा लाभ : नानासाहेब चव्हाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

लातूर विभागात 61,216 खात्यांना 462.81 कोटींचा लाभ : नानासाहेब चव्हाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लातूर, दि. 10 :- “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026” अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव व बीड या चार जिल्ह्यांतील 61 हजार 216 कर्जखात्यांना एकूण 462 कोटी 81 लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला असल्याची माहिती सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली. यामध्ये लातूर जिल्ह्यात 22 हजार 963 खात्यांना 159.95 कोटी, नांदेडमध्ये 12 हजार 929 खात्यांना 106.24 कोटी, धाराशिवमध्ये 12 हजार 214 खात्यांना 105.86 कोटी तर बीड जिल्ह्यात 13 हजार 110 खात्यांना 90.74 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. राज्यस्तरावर 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,028 कोटी रुपये थेट जमा झाले असून, मराठवाडा विभागात एकूण 1 लाख 30 हजार 934 खात्यांना 932.60 कोटींचा लाभ वितरित झाला आहे. राज्यातील 53 बँकांनी सुमारे 32 लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी 16.96 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली असून 6 ऑगस्ट अखेर 12.10 लाख खात्यांचे आधार प्रमाणीक...

वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्जाची संधी

वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्जाची संधी लातूर, दि. 10:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणीमुळे अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी स्थानिक वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. जिल्ह्यात मुलांचे १४ व मुलींचे १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. लातूर शहरात मुलांचे ६ व मुलींचे ४ वसतिगृह आहेत. औसा, निलंगा, उदगीर, देवणी, चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह आहे. अहमदपूर येथे मुलांचे दोन व मुलींचे दोन, रेणापूर येथे मुलांचे एक आणि जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह कार्यरत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालय वर्गाची प्रवेश निवड यादी प्रसिद्ध झाली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू असून अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. मागील वर्षी अंतिम वर्षात शिकणारे व स्वाधार योजने...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विशेष मुलाखत

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर विशेष मुलाखत लातूर, दि. ७ (जिमाका) : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सविस्तर माहिती देणारी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होईल. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत १२ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत (रविवार, दि. १६ ऑगस्ट वगळून) दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दि. 7 : शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद (ता.06) कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आत्मा व कृषी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. हवामान बदल, एल-निनो परिस्थिती आणि हवामानानुसार शेती व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मनीषा बांगर होत्या. सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिगंबर पेरके व विस्तार विद्वेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सूर्यवंशी यांनी बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट केल्या.कीटकशास्त्रज्ञ डॉ. दयानंद मोरे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. विजय भामरे यांनी मित्र कीटकांचे महत्त्व व जैविक नियंत्रणाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र, मांजरा येथील डॉ. पी. एच. उलेमाले यांनी फलोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान व बागायती पिकांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्रीकृष्ण शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी हवामान-स्मार्ट व संशोधनाधारि...

लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती; १८ ऑगस्टला मुलाखत

लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती; १८ ऑगस्टला मुलाखत लातूर, दि. ७ :- लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत सैनिक मुला-मुलींचे वसतिगृह व विश्रामगृहासाठी विविध अशासकीय पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा तसेच इतर पात्र नागरिकांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अर्ज व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. ३१,८७५) तसेच सहायक वसतिगृह अधीक्षक पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. २४,८७५) उपलब्ध आहेत. स्वयंपाकी (महिला) पदासाठी ५ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १४,१०६), चौकीदार पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. २१,१५९), सफाई कामगार पदासाठी ३ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १३,२७१) आणि माळी पदासाठी २ जागा (प्रत्येकी प्रतिमाह मानधन रु. १३,२७१) भरण्यात येणार आहेत. ***

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू लातूर, दि. ७ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांची २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ वसतिगृहे कार्यरत आहेत. लातूर शहरात मुलांचे ६ व मुलींचे ४ वसतिगृहे आहेत. औसा, निलंगा, उदगीर, देवणी, चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे व मुलींचे एक वसतिगृह आहे. अहमदपूर येथे मुलांचे दोन व मुलींचे दोन, तर रेणापूर येथे मुलांचे एक व जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह कार्यरत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, अ...