Posts

भूजल संवर्धनासाठी माहितीचा प्रभावी वापर करावा - अपर जिल्हाधिकारी करमकर

Image
वृत्त क्र. : 549 भूजल संवर्धनासाठी माहितीचा प्रभावी वापर करावा - अपर जिल्हाधिकारी करमकर  भूजल माहिती व जलभृत नकाशांकनावर कार्यशाळा लातूर, दि. 4 : केंद्रीय भूजल बोर्डाने भूजल माहितीच्या प्रसारासाठी, डेटा पोर्टल्सची उत्तम निर्मिती केली आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय नियोजन, जलसंपदा व्यवस्थापन आणि भूजल संवर्धनासाठी संबंधित विभागांनी या माहितीचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी केले. केंद्रीय भूजल बोर्ड (सीजीडब्ल्यूबी), मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे "सीजीडब्ल्यूबीच्या भूजल माहितीचा तसेच जलभृत (Aquifer) नकाशांकन अभ्यासांचा प्रसार व उपयोग" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रीमती करमरकर होत्या. कार्यशाळेस भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, मृद व जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, पाणलोट विकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघु पाटबंधारे विभाग, कृषी विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस केंद्रीय भूजल बोर्डाच...

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या उपस्थितीत सेवाभावी अन्नदान उपक्रम

Image
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या उपस्थितीत सेवाभावी अन्नदान उपक्रम लातूर, दि. 4 : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सेवाभावी अन्नदान उपक्रमाचे आयोजन लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. श्री. भारुका आणि त्यांच्या पत्नी सौ. उमा भारुका यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात लातूर मुख्यालयातील न्यायाधीशांच्या अर्धांगिनींचाही सहभाग होता. शेकडो गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सन्मानपूर्वक भोजनाचे वाटप करण्यात आले. रुग्णालयात दीर्घकाळ उपचारासाठी थांबणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मान्यवरांनी भोजन वाटपाबरोबरच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी धर्मादाय सहआयुक्त विद्याधर मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर,...

आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती

आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दि. ३ (जिमाका) : आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४ विषयक जनजागृती कार्यक्रम पार पडला. जिल्हा वकील संघाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती ए. आर. निळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या विधी सल्लागार श्रीमती ए. आर. मेकले, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार जाधव आणि ॲड. स्नेहा शिणगारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतात स्त्रीला माता आणि शक्तीस्वरूप मानले जात असताना स्त्रीभ्रूणहत्येसारख्या घटना घडणे ही दुर्दैवी बाब आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रय...

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्ट अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्ट अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू लातूर, दि. 3 (जिमाका) : राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फतखरीप हंगाम 2026-27साठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यंदापासून प्रथमच अर्ज प्रक्रिया स्वतंत्रऑनलाइन पोर्टलद्वारेराबविण्यात येणार आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत10 ऑगस्ट 2026आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.inसंकेतस्थळावरील'पीक स्पर्धा नोंदणी'टॅबवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीदिलीप जाधवयांनी केले आहे. पीकस्पर्धेअंतर्गत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या11 खरीप पिकांचासमावेश करण्यात आला आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन स्तरांवर होणार आहे. तालुकास्तरावरील उत्पादकतेच्या आधारे पुढील स्तरासाठी विजेत्यांची निवड केली जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर ...

मत्स्यपालकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण उत्साहात

मत्स्यपालकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण उत्साहात लातूर, दि. ३ (जिमाका) : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मत्स्यपालकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, कौशल्य विकास आणि जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने"आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक जाळी व बोटी आणि मत्स्य हाताळणी व विपणन"या विषयावरील एकदिवसीय जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर तथा दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र व मत्स्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी, पीएमएमएसवाय प्रकल्पधारक मत्स्यशेतकरी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बेल्लाळे होते. प्राणीशास्त्र व मत्स्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवी सोळुंके, शासनाच्या मत्स्यव्यवसायविभागाच्यासहाय्यक आयुक्त तेजस्विनी करळे यांनी आ...

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात 2 हजार रोपांचे वृक्षारोपणलातूर, दि. 3 : येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)रंगरूट प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपमहानिरीक्षक तथा प्राचार्य अमीरुल हसन अंसारीयांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. याउपक्रमाअंतर्गत सुमारे 2 हजार रोपांची लागवड करण्यात आली. लागवड करण्यात आलेल्या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींची फळझाडे, सावली देणारी वृक्षतसेच औषधी वनस्पतींचा समावेश होता.यावेळी उपस्थित अधिकारी आणि जवान प्रशिक्षार्थींना मार्गदर्शनकरताना अमीरुल हसन अंसारी म्हणाले, “आपण केवळ राष्ट्राच्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर पर्यावरणाच्यासंरक्षणासाठीही कटिबद्ध आहोत. आज लावलेली झाडे भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरतील.” या कार्यक्रमाला कमांडंट पारसनाथ, राजपत्रित अधिकारी, जवान तसेच सुमारे 1 हजार 700प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यानेवृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेतली.यापूर्वीही सीआरपीएफ आरटीसी, लातूरतर्फे कॅम्प परिसर आणिआजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आह...

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू लातूर, दि. ३ : जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून ही परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. लातूर जिल्ह्यातील २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र आहेत. उमेदवाराची जन्मतारीख १ मे २०१५ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत असणे आवश्यक आहे. इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे. ***