प्रशासन समजून घ्या...जबाबदार नागरिक बना! अमृत संवाद सेतू उपक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांचे मार्गदर्शन
प्रशासन समजून घ्या...जबाबदार नागरिक बना! अमृत संवाद सेतू उपक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांचे मार्गदर्शन लातूर, दि. ११ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने लातूर येथे आयोजित 'अमृत संवाद सेतू' उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची रचना, विविध विभागांचे कार्य, शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती, अर्ज व निवेदन लेखन, पाठपुरावा प्रक्रिया, ऑनलाइन शासकीय सेवा तसेच जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावयाच्या कर्तव्यांविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लातूर येथील जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रशासनाची रचना, शासकीय कार्यालयांचे कार्य, शासनाशी प्रभावी संवाद कसा साधावा, नागरिकांनी आपले अधिकार व कर्तव्ये कशी पार पाडावीत. तसेच जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका कशी बजावावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांनी विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यानंतर अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळ...