Posts

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ४ मे रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ४ मे रोजी आयोजन लातूर, दि. ३० (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मे महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन ४ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘मॅपिंग’ मोहीम; लातूर तालुक्यातील मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘मॅपिंग’ मोहीम; लातूर तालुक्यातील मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन · २५ एप्रिलपासून बीएलओ देत आहेत घरोघरी भेट · सन २००२ च्या मतदार यादीशी होणार पडताळणी लातूर, दि. ३० (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अधिक पारदर्शक आणि निर्दोष करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत २००२ च्या मतदार यादीशी सर्व मतदारांचे मॅपिंग (पडताळणी) करणे अनिवार्य असून, लातूर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर २५ एप्रिल २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपलब्ध आहेत. मॅपिंग प्रक्रियेचे स्वरूप दुबार आणि तिबार मतदारांचा शोध घेण्यासाठी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही मतदारांची पडताळणी केली जात आहे. मतदारांनी त्यांच्याकडील मतदार ओळखपत्र दाखविल्यानंतर बीएलओ २००२ मधील मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक या आधारावर मॅपिंग करणार आहेत. ज्या मतदारांची नोंद २००२ नंतरची आहे, अशा मतदारांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारावर केली जाईल. बीएलओंची उपलब्धता एप्रिल पासून दररो...

लातूर जिल्ह्यातील 'नीट' परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्ह्यातील 'नीट' परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २९ (जिमाका): राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत आयोजित 'नीट युजी' परीक्षा येत्या ३ मे, २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत लातूर जिल्ह्यातील लातूर आणि निलंगा तालुक्यातील एकूण ३४ उपकेंद्रांवर पार पडणार असून, या परीक्षा कालावधीत केंद्रांच्या परिसरात होणारी संभाव्य गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेवून जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित जमण्यास, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक ही माध्यमे ३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले ...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग १ मे रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग १ मे रोजी बंद राहणार लातूर, दि. २९ : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. तसेच शनिवार, २ मे २०२६ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. ****

एसटी महामंडळाच्या लातूर विभागात प्रवासी राजा, कामगार पालक दिन उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर

एसटी महामंडळाच्या लातूर विभागात प्रवासी राजा, कामगार पालक दिन उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर लातूर, दि. २९ (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात 'प्रवासी राजा दिन' आणि 'कामगार पालक दिन' आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, लातूर विभागातील आगारांसाठी या उपक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लातूर विभागातील या दौऱ्याची सुरुवात २९ एप्रिल २०२६ रोजी उदगीर आगारातून होणार असून त्यानंतर ६ मे रोजी लातूर, १३ मे रोजी औसा, २० मे रोजी अहमदपूर आणि ३ जून २०२६ रोजी निलंगा आगार येथे या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत 'प्रवासी राजा दिन' आयोजित केला जाईल, ज्यामध्ये प्रवासी, विविध प्रवासी संघटना, शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी आपल्या बस सेवेसंबंधीच्या तक्रारी आणि सूचना लेखी स्वरूपात मांडू शकतील. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत 'कामगार पालक दिन' साजरा करण्यात ...

वाढत्या तापमानामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन

वाढत्या तापमानामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन लातूर, दि. २९ : सध्या वातावरणातील बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. उष्णतेची लाट म्हणजे काय? हवामान खात्याच्या निकषानुसार, एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्या भागात 'उष्णतेची लाट' आली असे संबोधले जाते. उन्हाळ्याच्या काळात 'सन बर्न', 'हिट क्रॅम्प्स' (स्नायूंना गोळे येणे), 'हिट एक्झोर्शन' (प्रचंड थकवा) आणि 'हिट स्ट्रोक' (उष्माघात) यांसारखे आजार उद्भवू शकतात. उष्माघाताचा सर्वाधिक धोका कोणाला? उन्हात कष्टाची कामे करणारे मजूर व शेतकरी. वृ...

जनगणनेसाठी 'स्व-गणना' पोर्टल १ मे पासून होणार कार्यान्वित; घरबसल्या नोंदणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

जनगणनेसाठी 'स्व-गणना' पोर्टल १ मे पासून होणार कार्यान्वित; घरबसल्या नोंदणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वग...