अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू
अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ·तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू लातूर, दि. २६ : ज्याप्रमाणे निवडणुकांचे आयोजन महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे जनगणना ही प्रक्रिया देखील देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यमापन करणाऱ्या या प्रक्रियेतूनच देशाच्या विकासाचा खरा रोडमॅप तयार होतो. त्यामुळे जनगणनेच्या कामात सर्वांनी सजग राहून, अचूक नियोजन करावे आणि कोणतीही दिरंगाई करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले. भारताची जनगणना २०२७ अंतर्गत तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रशिक्षण सत्राला जनगणना संचालनालयाचे सहसंचालक रमेश भोसले, मिलिंद पाटील, लातूर महानगरपालिकेचे अतिरिक...