Posts

आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची !

आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ! : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम मुंबई : दि.१:आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरणसेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.  राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग...

'विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान'; २ जुलै रोजी लातूरमध्ये जिल्हास्तरीय शुभारंभ

'विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान'; २ जुलै रोजी लातूरमध्ये जिल्हास्तरीय शुभारंभ लातूर, दि. ३०: भारत सरकारद्वारे नव्याने मंजूर करण्यात आलेला 'विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान (ग्रामीण)' (व्हीबीजी-राम-जी) अधिनियम-२०२५ हा राज्यात १ जुलै २०२६ पासून सर्वत्र लागू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम' (मनरेगा) या कायद्याऐवजी आता हा नवीन अधिनियम अस्तित्वात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हॉलमध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्यासह बचत गटाच्या महिला सदस्य, योजनेचे लाभार्थी, कामगार युवक आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि त्यातून मिळणारे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पोस्टर्स, बॅनर्स आणि घडीपत...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले लातूर, दि. ३० : राज्य शासनाने राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ अंमलबजावणी आता अंतिम टप्यात आहे. या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार माहिती बँकेच्या शाखेत द्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा बॅकर्स समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी सर्व बँकांकडील पात्र शेतकऱ्यांची कर्ज खात्याची मा...

‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन’ अंमलबजावणीला १ जुलैपासून प्रारंभ

*विशेष वृत्त क्र. : 432* ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन’ अंमलबजावणीला १ जुलैपासून प्रारंभ लातूर, दि. ३० : केंद्र शासनाच्या विकसित भारत @2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत आणि समृद्ध व सक्षम ग्रामीण भारताच्या निर्मितीसाठी 'विकसित भारत - रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)' अर्थात 'RAM G अधिनियम, 2025' लागू करण्यात आला असून याद्वारे अकुशल शारीरिक काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आता प्रति आर्थिक वर्ष १२५ दिवसांच्या मजुरी-रोजगाराची वैधानिक हमी मिळणार आहे. या मिशनची अंमलबजावणी आज अर्थात १ जुलै २०२६ पासून सुरु होत आहे. या योजनेसाठी जिल्हाधिकारी हे जिल्हा कार्यक्रम समन्वयक, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सह कार्यक्रम समन्वयक असणार आहेत. या अधिनियमांतर्गत हाती घेण्यात येणारे सर्व प्रकल्प हे "विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा स्टॅक"चा भाग असतील, ज्यामध्ये प्रामुख्याने जलसुरक्षा व जलसंवर्धन, मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका आधारित पायाभूत सुविधा आणि आपत्ती प्रतिबंधक कामे अशा च...

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

*वृत्त क्र. : 432* लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. ३० : जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागामध्ये अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई लक्षात घेता, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे आणि खाजगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहाच्या कालावधीस ३१ जुलै २०२६ पर्यंत किंवा पुरेसा पाऊस होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावे व वाड्यांमध्ये स्थानिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या नियमांनुसार नागरी व ग्रामीण भागाकरिता शेवटचा पर्याय म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा मंजूर करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना आहेत, तर खाजगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहणास मान्यता देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : बळीराजाच्या स्वाभिमानाला नवे बळ!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : बळीराजाच्या स्वाभिमानाला नवे बळ! महाराष्ट्र ही संतांची, पुरोगामी विचारांची आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजाची भूमी आहे. राज्याची अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास आणि सामाजिक जीवनाची वीण ही शेती व शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांवर उभी आहे. निसर्गाची अनिश्चितता, अवकाळी पाऊस, दुष्काळ, बाजारभावातील चढ-उतार आणि वाढता उत्पादन खर्च अशा असंख्य संकटांचा सामना करत अन्नदाता आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतो. अशा या शेतकऱ्याला केवळ सहानुभूतीची नव्हे, तर आर्थिक स्थैर्य, विश्वास आणि शासनाच्या भक्कम पाठबळाची आवश्यकता असते. याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ जाहीर केली आहे. ही योजना केवळ कर्जमाफीची घोषणा नसून, शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला बळ देणारे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती देणारे आणि शेती क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारे एक ऐतिहासिक पाऊल आहे. महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै हा दिवस ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्व...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद

*वृत्त क्र. : 432* लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात 30 जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक 13 मिलीमीटर, तर जळकोट तालुक्यात सर्वात कमी 0.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- 13, औसा- 7.9, अहमदपूर- 1.1, निलंगा- 3, उदगीर- 4, चाकूर- 2.8, रेणापूर- 3.3, देवणी- 6.1, शिरूर अनंतपाळ- 2.3 आणि जळकोट- 0.3 मिलीमीटर. ***