Posts

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. २० (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता विविध योजनांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे. समान निधी योजनेअंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात असून, इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने दिला जात असल्याने त्याकरिता स्वतंत्र प्रस्ताव पाठवू नयेत. असमान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री व फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये तर इमारत बांधकामासाठी १० ते १५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. याशिवाय ज्ञान कोपरा विकासासाठी २.५० लाख रुपये, आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपय...

एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरु; वाहनांच्या पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविले

एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरु; वाहनांच्या पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविले लातूर, दि. २० (जिमाका) : १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून, २०२६ पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आता १ जुलै, २०२६ पासून एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. अशा वाहनांचे पुनर्नोंदणीसह सर्व कामकाज थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांना एचएसआरपी पाटी बसविणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल, २०१९ पूर्वीच्या वाहनांना पाटी बसविण्यासाठी ३० जून, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत पाटी न बसविलेल्या वाहनांचे हस्तांतरण, पत्ता बदलणे, कर्जबोजा चढविणे यांसारख्या सेवांवर आधीच निर्बंध लादण्यात आले होते. यापुढे एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूत...

लातूर जिल्ह्यात २२ जुलैपासून विधानसभा मतदारसंघनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन

Image
लातूर, दि. २० (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये २२ जुलै, २०२६ पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतच्या तारखा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिबीराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी स्वीकारणे, विविध प्रमाणपत्रे वाटप करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनेतंर्गत लाभ मंजूर करणे, ई-केवायसी करणे, नवीन व दुय्यम डिजिटल शिधापत्रिका देणे, पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे, फार्मर आयडी देणे, डिजिटल सातबारा वाटप करणे, विमुक्त भटक्या जाती-जमातींसाठी प्रमाणपत्रे वाटप करणे, आभा कार्ड वाटप करणे, मोजणी विषयक अर्ज स्वीकारणे व मोजणी शीट (क-प्रत) वाटप करणे तसेच आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावत करणे यांसारख्या विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या म्हणजेच आरोग्य, कृषी, जिल्हा परिषद, भूमी अभिलेख आणि नगरपालिका प्रशासन विभागाच्या योजनां...

नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील · अहमदपूर येथे महसूल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे भूमीपूजन लातूर, दि. २०: सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज यांसारख्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याकरिता विविध विकासकामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. अहमदपूर येथे १५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, नगराध्यक्ष ॲड. स्वप्नील व्हत्ते, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता सुग्रीव केंद्रे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, उपविभागीय अभियंता सूरज गौंड, दिलीप देशमुख, बाबासाहेब कांबळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना क...

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर लातूर, दि. १७ : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि आगामी काळात मुदत संपणाऱ्या एकूण ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी कळविले आहे. या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करताना १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरण्यात यावी, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत. या कार्यक्रमानुसार शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांना आपल्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी शुक्रवार, २४ जुलै २०२६ ते बुधवार, २...

दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. १७ (जिमाका) : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिले जाणारे 'दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६' जाहीर करण्यात आले असून या राष्ट्रीय पुरस्कारांतर्गत प्रामुख्याने 'सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन', 'श्रेष्ठ दिव्यांगजन' आणि 'श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बाल/बालिका' या तीन श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याने लातूर जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करताना संबंधित दिव्यांग व्यक्तीने किंवा संस्थेने केलेल्या उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती पुराव्यांसह नमूद करणे आवश्यक आहे. त्यासोबत यु.डी.आय.डी. कार्ड किंवा अधिकृत दिव्यांग प्रम...

ातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 17 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी सायली ठाकूर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 19 जुलै, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 2 ऑगस्ट, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, मोठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्ह...