Posts

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 19 ऑगस्ट रोजी निलंगा येथे आयोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 19 ऑगस्ट रोजी निलंगा येथे आयोजन लातूर, दि. 14 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर आणि निलंगा येथील शहीद चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा 19 ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी १० वाजता निलंगा येथील शहीद चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असून, त्यामध्ये बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.अय. डिप्लोमा (सर्व ट्रेड) तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार आहे. तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी 19 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मूळ शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम (बायोडाटा) आणि पासपोर्ट फोटोच्या तीन प्रतींसह मुलाखतीसाठी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे. लातूर जिल्ह्यातील जास्...

नशामुक्त भारत अभियान : व्यसनमुक्त भविष्यासाठी सामूहिक संकल्प

नशामुक्त भारत अभियान : व्यसनमुक्त भविष्यासाठी सामूहिक संकल्प 'नशामुक्त भारत अभियाना'ला अधिक गती देण्यासाठी आणि समाजात सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण देशात 'National Pledge Against Drug Abuse' (अमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय शपथ) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद करणारा हा विशेष लेख. 'नशामुक्त भारत अभियान' (NMBA) ही केवळ एक योजना किंवा मोहीम नाही, तर ती आपल्या देशाच्या सुरक्षित आणि उज्वल भविष्याची पायाभरणी आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून आपल्या युवा पिढीला बाहेर काढणे आणि देशाला सक्षम बनवणे, हा या अभियानाचा मुख्य धोरणात्मक हेतू. केंद्र आणि राज्य सरकारे या मोहिमेद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे प्रयत्न करत आहेत. जेव्हा आपला समाज आणि विशेषतः तरुण पिढी व्यसनमुक्त असते, तेव्हाच देशाची खरी प्रगती शक्य होते. म्हणूनच, हे अभियान राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे.गेल्या पाच-सहा वर्षांतील या अभि...

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा

विशेष लेख : माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत माती आणि पाणी या दोन नैसर्गिक संसाधनांचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध या दोन्ही घटकांशी आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणे ही काळाची गरज आहे. याच विचारातून राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे. दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यासमोरील दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून सोडविता येणार नाही, हे ओळखले. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे, तो जमिनीत मुरविणे आणि स्थानिक पातळीवरील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, या भूमिकेतून त्यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा...

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य 'तिरंगा रॅली' चे आयोजन

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य 'तिरंगा रॅली' चे आयोजन लातूर, दि. १४ (जिमाका): स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रामार्फत सुमारे १०० मोटरसायकलींसह भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली रंगरूट प्रशिक्षण केंद्र येथून सुरू होऊन खंडापूर, गंगापूर आणि चिंचोलीराववाडी गावातून मार्गक्रमण करत उत्साहात पार पडली. रंगरूट प्रशिक्षण केंद्राचे उपमहानिरीक्षक तथा प्राचार्य अमीरुल हसन अंसारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी केंद्राचे इतर राजपत्रित अधिकारी, अधीनस्थ अधिकारी तसेच जवान व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने आणि उत्साहाने उपस्थित होते. रॅली दरम्यान मार्गावरील विविध शाळा तसेच गावांमध्ये तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात आले. खंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. कदम, गंगापूर येथील मुख्याध्यापक रोहन कोळी, सह्याद्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत जाधव आणि चिंचोलीराववाडी येथील हनुमान विद्यालयाचे मुख्याध...

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 15 ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 15 ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहण लातूर, दि. 15 (जिमाका) : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी लातूर येथे दाखल होतील. शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम राहणार आहे. शनिवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.45 वाजता ते शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होईल. सकाळी 9.05 वाजता त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल. यानंतर सकाळी 9.45 वाजता ते शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील.सकाळी 10 वाजता विश्रामगृहात आगमन राखीव. सकाळी 10.45 वाजता ते लातूर येथील जुनी एमआयडीसीकडे प्रयाण करतील. सकाळी 11 ते 11.15 वाजत...

विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शनिवारी बंद

विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शनिवारी बंद लातूर, दि. १४ (जिमाका): भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी बंद राहणार आहे. तसेच रविवार, १६ ऑगस्ट, २०२६ रोजी नियमित वेळेप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहील. बाह्यरुग्ण विभाग शनिवारी बंद असला, तरी रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. *****

जनावरांच्या वाहतुकीत नियमांचे पालन बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड

जनावरांच्या वाहतुकीत नियमांचे पालन बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड लातूर, दि. १३ (जिमाका) : जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहनात केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार आवश्यक बदल करून वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडून विशेष परवाना घ्यावा. तसेच जनावरांच्या वाहतुकीसंदर्भातील कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले. जिल्हास्तरीय प्राणी क्लेषप्रतिबंधक समितीची बैठक डॉ. बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जनावरांच्या वाहतुकीबाबत विविध निर्देश देण्यात आले. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १२५ (ई)(२) नुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना प्रत्येक जनावरासाठी आवश्यक जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानुसार गायी व म्हशींसाठी प्रत्येकी २ चौ. मीटर, घोडे व गाढवांसाठी २.२४ चौ. मीटर, बकऱ्या व बोकडांसाठी ०.३० चौ. मीटर आणि डुकरांसाठी ०.६० चौ. मीटर जागा असणे आवश्यक आहे. वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकारी, भारतीय प्राणी कल्याण मंडळ, केंद्र शासनाने प्राधिकृत केलेले अधिकारी अथवा व्यक्ती किंवा प्राणी कल...