Posts

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा 31 मार्च रोजी लातूर जिल्हा दौरा

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा 31 मार्च रोजी लातूर जिल्हा दौरा लातूर दि. 30 : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मंगळवार, दिनांक 31 मार्च, 2026 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सभापती प्रा. शिंदे यांचे सकाळी 10.45 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. सकाळी 10.55 वाजता लातूर विमानतळ येथून शासकीय विश्रामगृह लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह लातूर येथे आगमन होईल व लातूर शहर जिल्हा भाजपच्यावतीने आयोजित स्वागत व सत्कार समारंभास उपस्थित राहतील. सकाळी 11.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथून विष्णूदास मंगल कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, अंबेजोगाई रोड, लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11.40 वाजता विष्णूदास मंगल कार्यालय येथे आगमन होईल व लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनगर समाजाच्या निवडून आलेल्या उमेदवारांचा तसेच नूतन राज्यसभा सदस्य रामराव वडकुते व केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परिक्षेत यश मिळविलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. सभापती प्...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 31 मार्च रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 31 मार्च रोजी बंद राहणार लातूर, दि. 30 : श्री महावीर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मंगळवार, 31 मार्च, 2026 रोजी बंद राहील. तसेच बुधवार, 1 एप्रिल, 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. *****

'मिशन लक्ष्यवेध' अंतर्गत लातूरमध्ये जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांचा शुभारंभ; १० एप्रिलपर्यंत अर्जांचे आवाहन

'मिशन लक्ष्यवेध' अंतर्गत लातूरमध्ये जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांचा शुभारंभ; १० एप्रिलपर्यंत अर्जांचे आवाहन लातूर, दि. २९ : राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने 'मिशन लक्ष्यवेध' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, या योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यासाठी ॲथलेटिक्स, कुस्ती, लॉन टेनिस आणि शूटिंग (नेमबाजी) या चार खेळांच्या अनिवासी जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या केंद्रांमध्ये प्रवेशासाठी पात्र खेळाडूंनी १० एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या निवडीसाठी ३१ डिसेंबर २०२६ रोजी २१ वर्षांखालील वय असलेले मुले व मुली पात्र असतील. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि पालकांचे संमती पत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच, शासकीय मान्यताप्राप्त डॉक्टरने ...

लातूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून चार विशेष डिजिटल शेती शाळा; कृषी विभाग व पाणी फाउंडेशनचा पुढाकार

लातूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून चार विशेष डिजिटल शेती शाळा; कृषी विभाग व पाणी फाउंडेशनचा पुढाकार लातूर, दि. ३०: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) अभियान स्वरूपात राबवण्यात येणाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपक्रमांतर्गत, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिल २०२६ मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने हे प्रशिक्षण पार पडणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान ३० ते ४० शेतकऱ्यांनी यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. पाणी फाउंडेशनद्वारे संचलित ही डिजिटल शेती शाळा एक प्रगत ऑनलाईन व्यासपीठ असून, याद्वारे तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना पीकनिहाय शास्त्रोक्त मार्गदर्शन झूम (Zoom) आणि युट्युब (YouTube) च्या माध्यमातून दिले जाणार आहे. या उपक्रमात कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, तसेच कृषी ताई व कृषी सखी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. गावनिहाय नियोजन करून एका मध्यवर्ती ठिकाणी शेतकऱ्यांनी ए...

विशेष लेख : ई-प्रशासनाचा 'लातूर पॅटर्न': आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने प्रशासन गतिमान !

              महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ३० मे २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये , राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ‘ १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा ’ कार्यक्रम अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वरूपात कार्यान्वित करण्यात आला. शासकीय कामकाज अधिक पारदर्शक , गतिमान , तंत्रज्ञानाधिष्ठित आणि प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकाभिमुख करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी करत , राज्यातील पहिल्या पाच उत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये स्थान पटकाविले आहे. लातूर जिल्ह्याने तंत्रज्ञानाचा वापर केवळ कार्यालयीन कामकाजापुरता मर्यादित न ठेवता तो थेट जनसामान्यांना जलद सेवा देण्यासाठी केला. या विशेष कामगिरीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (२८ मार्च) जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान करण्यात आला.     ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान

Image
  ·          १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाची उत्कृष्ट कामगिरी           लातूर , दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील पहिल्या पाच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थान पटकावले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सन्मान करण्यात आला.               यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील प्रशासनिक कार्यालयांसाठी १५० दिवसांचा विशेष ई-प्रशासन कृती आराखडा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये प्रशासन अधिक पारदर्शक , गतिमान , तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नागरिकाभिमुख करण्याचा हा उपक्रमाचा मुख्य ...

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ·तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू लातूर, दि. २६ : ज्याप्रमाणे निवडणुकांचे आयोजन महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे जनगणना ही प्रक्रिया देखील देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यमापन करणाऱ्या या प्रक्रियेतूनच देशाच्या विकासाचा खरा रोडमॅप तयार होतो. त्यामुळे जनगणनेच्या कामात सर्वांनी सजग राहून, अचूक नियोजन करावे आणि कोणतीही दिरंगाई करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले. भारताची जनगणना २०२७ अंतर्गत तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रशिक्षण सत्राला जनगणना संचालनालयाचे सहसंचालक रमेश भोसले, मिलिंद पाटील, लातूर महानगरपालिकेचे अतिरिक...