Posts

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण लातूर, दि. २३ : जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जळकोट तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जळकोट तालुक्यातील २ गावे आणि १ वाडी अशा एकूण ३ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवले जात असल्यामुळे सुमारे ३,३१० नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी शासनाचे २ टँकर कार्यरत असून त्यांच्या दररोज एकूण ४ फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रामुख्याने जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा - वाघमारी तांडा आणि गव्हाण येथे टँकर मंजूर करण्यात आले आहेत. टँकर व्यतिरिक्त जिल्ह्या...

युवक-युवतींनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

युवक-युवतींनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन लातूर, दि. २३ (जिमाका): राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-२०१९ अंतर्गत राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सृजनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुक्ष्म व लघु उपक्रमांना विशेष चालना दिली जात आहे. या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडून बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर अर्जदाराच्या जात प्रवर्ग आणि उद्योग क्षेत्रानुसार १५ ते ३५ टक्के अनुदान दिले जाते, ज्यामध्ये सेवा उद्योग, उत्पादन उद्योग तसेच कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, एकाच नाममुद्रेवर (ब्रँड) आधारित संघटित साखळी विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र, कुक्कुट ...

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 11 जून रोजी प्रस्तावित; नव उद्योजकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 11 जून रोजी प्रस्तावित; नव उद्योजकांनी नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. 23 (जिमाका): उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी 11 जून २०२6 रोजी लातूर येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी नव उद्योजकांनी लातूर जिल्हा उद्योग केंद्र लातूर येथे आपल्या नव उद्योग तथा व्यवसायाची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी केले आहे. या परिषदेचा उद्देश जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवणे, नवउद्योजकांना आकर्षित करणे आणि गुंतवणूकदार-व्यवसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि लातूर जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू बनवून जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देणे हा आहे. या परिषदेमध्ये नव उद्योजकांसोबत सामंजस्य करार होऊन त्यांना एमआययू वितरित केले जाणार आहेत. *****

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात 'वैरण विकास योजना' सुरू

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात 'वैरण विकास योजना' सुरू • चारा बियाण्यांसाठी १०० टक्के अनुदान • २८ मे पर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन लातूर, दि. २० (जिमाका): हवामान विभागाने यंदाच्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रामुख्याने प्रभावामुळे पावसाचे असमान वितरण, कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली असून या पार्श्वभूमीवर भविष्यात पशुखाद्य व हिरव्या चाऱ्याची गंभीर टंचाई निर्माण होवू शकते. ही संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील पशुपालकांनी आतापासूनच नियोजन करुन चारा उत्पादन वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत “वैरण विकास योजना – चारा उत्पादक कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पात्र पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर संकरीत मका व ज्वारी बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करावे आ...

२२ मे रोजीचे लातूर येथील दिव्यांग तपासणी शिबीर स्थगित; 'युडीआयडी' पोर्टल तात्पुरते बंद राहणार

२२ मे रोजीचे लातूर येथील दिव्यांग तपासणी शिबीर स्थगित; 'युडीआयडी' पोर्टल तात्पुरते बंद राहणार लातूर, दि. २० : युआयडी पोर्टलवरील सूचनेनुसार एनएसजी क्लाऊड सर्व्हर अपग्रेडेशनच्या कामामुळे २१ ते २४ मे २०२६ या कालावधीत 'युडीआयडी' पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. या तांत्रिक कारणास्तव, शुक्रवारी म्हणजेच २२ मे २०२६ रोजी लातूर शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये, यासाठी त्या दिवशीचे दिव्यांग तपासणी शिबीर स्थगित करण्यात आले आहे. पोर्टल बंद असल्याने २२ मे रोजी दिव्यांग बांधवांनी तपासणी शिबीरासाठी येऊ नये, असे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. संबंधित दिव्यांग व्यक्तींनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. *****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मे पर्यंत अंतिम मुदत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मे पर्यंत अंतिम मुदत लातूर, दि. २० : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांना या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० मे २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही जागांअभावी किंवा अन्य कारणांमुळे प्रवेश मिळवू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक असलेली रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या कालावधीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी महा-आयटी पोर्टलवर नवीन किंवा नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत, परंतु ज्यांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, त्यांचे अर्ज...

पाणी पुरवठा व जल जीवन मिशनच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा

पाणी पुरवठा व जल जीवन मिशनच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा लातूर, दि. २० : जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनसह पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा घेतला. या योजनांच्या कामांसह पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण, पुनर्भरण आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छताचे उपमुख्य कार्यकारी मोहन अभंगे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास प्राधिकरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या योजनांना गती द्यावी. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. पाणी पुरवठा योजनांचे जलस्रोत कायमस्वरूपी कार्यरत राहण्यासाठी या योजनांच्या जलस्रोतांचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास...