ाश्वत विकासासाठी जलसंवर्धनाची लोकचळवळ
विशेष लेख शाश्वत विकासासाठी जलसंवर्धनाची लोकचळवळ महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्याबाबत जनमानसात जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने यंदा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सेक्युअर टुमारो' अर्थात माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा ही या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जलसंधारणाच्या या कार्याला सर्वसमावेशक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या बदलत्या हवामानामुळे अनियमित पर्जन्यमान आणि भूजल पातळीतील घट यांमुळे जलसुरक्षेचे आव्हान गंभीर बनले आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यासारख्या भागातील सरासरी पर्जन्यमानाची अनिश्चितत...