भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत · पात्र विद्यार्थ्यांनी महा-आयटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत लातूर, दि. १६: अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्जांच्या नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज महाआयटी पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन लातूर येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार या योजनेत सुधारणा करण्यात आल्या आहेत. सन २०१७ पासून सुरू असलेल्या या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना आणि अटी-शर्ती शासनाच्या स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून, सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध आहे. शासकीय निर्णयातील सर्व अटी व शर्तींच्या अनुषंगाने, ज्या पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ मध...