आधार प्रमाणीकरणाची सुविधा पूर्ण मोफत; शेतकऱ्यांकडून शुल्क आकारल्यास कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
आधार प्रमाणीकरणाची सुविधा पूर्ण मोफत; शेतकऱ्यांकडून शुल्क आकारल्यास कारवाई - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. २८ (जिमाका) : राज्य शासनाच्या २ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र किंवा व्हीएलई यांनी शेतकऱ्यांकडून या कामासाठी कसलेही शुल्क आकारू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. तसेच असे शुल्क आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा तसे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याचा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. योजनेच्या पात्र यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या आपल...