लातूर जिल्ह्यात कृषी अवजार बँक स्थापनेसाठी नोंदणीकृत संस्थांकडून २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
लातूर जिल्ह्यात कृषी अवजार बँक स्थापनेसाठी नोंदणीकृत संस्थांकडून २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. २५: ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (व्ही.एस.टी.एफ.) आणि सर दोराबाजी टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त भागीदारीतून, तसेच लातूर जिल्हा कृषी विभाग यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील आकांक्षित व शेतकरी आत्महत्याप्रवण भागात ग्रामीण उपजीविका बळकट करण्यासाठी कृषी अवजार बँकांची स्थापना करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत औसा तालुक्यातील किल्लारी, लामजना, चलबुर्गा, अशिव, कवळी, जवळगा पोमादेवी, मंगरूळ, दापेगाव, बानेगाव, उत्का, पारधेवाडी; जळकोट तालुक्यातील चेरा, हावरगा, होकरना, शेलदरा, उमरदरा, उमारगा रेतु, येलदरा; तसेच अहमदपूर तालुक्यातील मावलगाव, अंधोरी, हगदळ, रुद्दा, सुनेगाव सेंद्री, धसवाडी, लेंदेगाव, नांदूराखुर्द, सोरा, तळेगाव आणि येस्तार या निवडक गावांमध्ये एकूण ३ कृषी अवजार बँका स्थापन करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभाग, आत्मा, उमेद (एमएसआरएलएम), माविम किंवा इतर शासकीय विभागांकडे नोंदणीकृत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी/एफपीओ), शेतकरी गट, बचतगटांचे ग...