Posts

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात 'वैरण विकास योजना' सुरू

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात 'वैरण विकास योजना' सुरू • चारा बियाण्यांसाठी १०० टक्के अनुदान • २८ मे पर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन लातूर, दि. २० (जिमाका): हवामान विभागाने यंदाच्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रामुख्याने प्रभावामुळे पावसाचे असमान वितरण, कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली असून या पार्श्वभूमीवर भविष्यात पशुखाद्य व हिरव्या चाऱ्याची गंभीर टंचाई निर्माण होवू शकते. ही संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील पशुपालकांनी आतापासूनच नियोजन करुन चारा उत्पादन वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत “वैरण विकास योजना – चारा उत्पादक कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पात्र पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर संकरीत मका व ज्वारी बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करावे आ...

२२ मे रोजीचे लातूर येथील दिव्यांग तपासणी शिबीर स्थगित; 'युडीआयडी' पोर्टल तात्पुरते बंद राहणार

२२ मे रोजीचे लातूर येथील दिव्यांग तपासणी शिबीर स्थगित; 'युडीआयडी' पोर्टल तात्पुरते बंद राहणार लातूर, दि. २० : युआयडी पोर्टलवरील सूचनेनुसार एनएसजी क्लाऊड सर्व्हर अपग्रेडेशनच्या कामामुळे २१ ते २४ मे २०२६ या कालावधीत 'युडीआयडी' पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. या तांत्रिक कारणास्तव, शुक्रवारी म्हणजेच २२ मे २०२६ रोजी लातूर शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये, यासाठी त्या दिवशीचे दिव्यांग तपासणी शिबीर स्थगित करण्यात आले आहे. पोर्टल बंद असल्याने २२ मे रोजी दिव्यांग बांधवांनी तपासणी शिबीरासाठी येऊ नये, असे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. संबंधित दिव्यांग व्यक्तींनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. *****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मे पर्यंत अंतिम मुदत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मे पर्यंत अंतिम मुदत लातूर, दि. २० : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांना या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० मे २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही जागांअभावी किंवा अन्य कारणांमुळे प्रवेश मिळवू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक असलेली रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या कालावधीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी महा-आयटी पोर्टलवर नवीन किंवा नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत, परंतु ज्यांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, त्यांचे अर्ज...

पाणी पुरवठा व जल जीवन मिशनच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा

पाणी पुरवठा व जल जीवन मिशनच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा लातूर, दि. २० : जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनसह पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा घेतला. या योजनांच्या कामांसह पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण, पुनर्भरण आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छताचे उपमुख्य कार्यकारी मोहन अभंगे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास प्राधिकरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या योजनांना गती द्यावी. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. पाणी पुरवठा योजनांचे जलस्रोत कायमस्वरूपी कार्यरत राहण्यासाठी या योजनांच्या जलस्रोतांचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास...

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी

  उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर ; १८ जून रोजी मतदान , तर २२ जूनला होणार मतमोजणी   लातूर, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ पर्यंत असून उमेदवारी अर्जांची छाननी २ जून २०२६ रोजी केली जाईल , तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.   यानंतर गुरुवार , १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोमवार , २२ जून २०२६ रोजी मतमोजणी केली जाईल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचे...

रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे

  औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद ;   रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे ' अन्न व औषध प्रशासन ' विभागाचे आवाहन   लातूर , दि. १८ : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आगामी बुधवार , २० मे २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून , या बंदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील रुग्णांची व नागरिकांची औषधांविना गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खबरदारीचे आवाहन केले आहे . लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पत्रान्वये या संपामध्ये संघटनेच्या सभासदांनी सहभागी होऊ नये , अशी विनंती प्रशासनामार्फत १४ मे २०२६ रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे . मात्र , खबरदारीचा उपाय म्हणून ज्या रुग्णांना नियमित औषधोपचारांची आवश्यकता आहे , अशा रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी बंदच्या कालावधीत होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवावीत , असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड यांनी केले आहे .   या बंदच्या कालावधीत जर एखाद्या गरजू रुग्णाला तातडीने औषध उपलब्ध झाले नाह...

खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधुमित्र पुरस्कार लातूरच्या ज्ञानेश्वर मलीले यांना जाहीर

  छत्रपती संभाजीनगर येथे   20   मे   2026   रोजी होणार पुरस्कारांचे वितरण लातूर ,   दि.   18 :   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिले जाणारे   2026   सालचे   ‘ मधुमित्र ’   व   ‘ मधु-सखी ’   पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलीले ,   छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल ,   बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहिर झाले आहे त.   याशिवाय निवड समितीने ठाण्याचे चंद्रकांत तरे ,   पुण्याचे संजय मारणे ,   कोल्हापूरचे दयावान पाटील आणि जळगावचे विद्यानंद आहिरे यांची विशेष सन्मानासाठी निवड केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी दिली.   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या   ‘ मधाचे गाव ’   तसेच जागतिक मधमाशी दिनाच्या   निमित्ताने योजलेला   ‘ मधु मित्र   –   मधु सखी पुरस्कार ’   तसेच मंडळाच्या विविध कार्याविषयीची सभापती साठे यांनी द...