Posts

बीज भांडवल योजनेचा तृतीयपंथीयांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Image
बीज भांडवल योजनेचा तृतीयपंथीयांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. १५ : तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत बीज भांडवल योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी तृतीयपंथीयांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणाद्वारे शाश्वत रोजगार निर्माण करणे तसेच त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास साधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, लघुउद्योग व सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी हे बीज भांडवल दिले जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिका...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा

  ·           शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा   मुंबई, दि. १४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निकष सुधारणेमुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून , नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. कर्जमाफीतील या सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच पावसाळी अधिवेशनात घोषणा केली होती , त्यानुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ' पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ' ही ऐतिहासिक योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेविषयी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना...

लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार

Image
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार लातूर, दिनांक 14 (विमाका) : शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा पदभार विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथे सुनिल कच्छवे यांनी आज स्वीकारला. पदभार स्वीकारुन त्यांनी विभागीय माहिती कार्यालय, आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. विभागाच्यावतीने सहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी लातूरचे प्र.जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, सहायक अधीक्षक अशोक माळगे, वरिष्ठ लिपिक मनिषा कुरूलकर, कनिष्ठ लिपिक कैलास लांडगे, शिपाई अशोक बोर्डे, शेख कलीम आदी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाने 08 जुलै 2026 रोजी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक (माहिती), गट अ (वरिष्ठ) पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीने त्यांची सरळसेवेने नियुक्ती केली आहे. ***

९० टक्के अनुदानावर मिळणार ठिबक आणि तुषार सिंचन • महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

९० टक्के अनुदानावर मिळणार ठिबक आणि तुषार सिंचन • महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. १४ : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक) सन २०२६-२०२७ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ठिबक व तुषार सिंचन योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या कल्याणकारी योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक तसेच बहुभूधारक अशा दोन्ही गटांतील पात्र शेतकऱ्यांना विविध उपयोजनांच्या माध्यमातून एकत्रितपणे एकूण ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून २५ टक्के पूरक अनुदान आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योज...

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. १४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज आणि तत्सम १२ पोटजातींमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सन २०२६ मध्ये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी २८ जुलै २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. मातंग, मांग, मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी आणि मादिगा या १२ पोटजातींमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेले आणि सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पात्र असतील. अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमात सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक असून, निधीच्या उपलब्धतेनुसार गुणानुक्रमे ३ ते ५ विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल. इच्छुक पात्र विद्य...

लातूर जिल्ह्यात १५ ते ३० जुलै दरम्यान शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण

लातूर जिल्ह्यात १५ ते ३० जुलै दरम्यान शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण लातूर, दि. १४ (जिमाका) : शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १५ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाची मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले. विशेषतः शाळाबाह्य राहणाऱ्या बालकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणा संदर्भाने जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा सदस्य सचिव प्रमोद पवार, महिला व बालविकास अधिकारी शेख जे. एस., ‘डाएट’चे प्राचार्य मारुती सलगर उपस्थित होते. तालुकास्तर, केंद्र स्तर आणि गावस्तरावर शाळाबाह्य सर्वेक्षणाची मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. ग्रा...

नवतंत्रज्ञानाचा प्रसार व प्रशिक्षणातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य – जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड • लातूरमध्ये पशुवैद्यकांसाठी विभागीय तांत्रिक चर्चासत्र

वृत्त क्र. : 476 नवतंत्रज्ञानाचा प्रसार व प्रशिक्षणातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य – जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड • लातूरमध्ये पशुवैद्यकांसाठी विभागीय तांत्रिक चर्चासत्र लातूर, दि. १४ (जिमाका) : दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांपर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचविणारे विस्तार शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, पशुसंवर्धन विभाग आणि एमएसडी पशु आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भविष्योन्मुख पशुवैद्यकीय सेवा : उदयोन्मुख तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती आणि शाश्वत पशुधन आरोग्य’ या विषयावर पशुवैद्यकांसाठी विभागीय तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बिडवई, वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, ज्येष्ठ पशुवैद्यक शास्त्रज्ञ तथा माफसूचे माजी विस्...