Posts

जिद्दीच्या वारशातून लातूर जिल्ह्याचा विकास साधूया-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
  ·          महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी लातूर येथे राष्ट्रध्वज वंदन समारंभ उत्साहात   लातूर, दि. ०१ : भूकंपाच्या संकटाने हादरलेल्या लातूर जिल्ह्याने अत्यंत जिद्दीने स्वतःला पुन्हा उभे केले आणि आपली क्षमता सिद्ध केली. तोच जिद्दीचा वारसा पुढे नेत , आपण राज्याच्या विकास प्रक्रियेत लातूरचे नाव अग्रभागी नेऊया आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया , असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे केले.   महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभात पालकमंत्री श्री. भोसले बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील , प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना , पोलीस अधीक्षक अमोल तांबे , लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी , कर्मचारी , पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व जिल्हावासीयांना महाराष्ट्र दिन , काम...

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्तेशुक्रवारी पोलीस मुख्यालय प्रांगणात होणारराष्ट्रध्वज वंदन     

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्तेशुक्रवारी पोलीस मुख्यालय प्रांगणात होणारराष्ट्रध्वज वंदन        लातूर, दि. ३० : महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्रीशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. या मुख्यशासकीय समारंभाचे आयोजन बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणावर करण्यात आलेआहे.याप्रसंगीराष्ट्रध्वज वंदन आणि भव्य संचलन (परेड) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लातूरजिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्व नागरिकांनी राष्ट्रीय किंवा समारंभीय पोषाख परिधान करावा. तसेच, सर्व निमंत्रितांनी सोहळासुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी आसनस्थ व्हावे, असे आवाहनही जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे.राष्ट्रध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता होईल. या समारंभात सर्वांना सहभागीहोता यावे, यासाठी इतर कार्यालये किंवा संस्थांनी १ मेरोजी सकाळी ७.१५ ते ९ या वेळेत राष्ट्रध्वजवंदन किंवा इतर कोणतेही शासकीय समारंभआयोजित करू नयेत, असे...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ४ मे रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ४ मे रोजी आयोजन लातूर, दि. ३० (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मे महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन ४ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘मॅपिंग’ मोहीम; लातूर तालुक्यातील मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘मॅपिंग’ मोहीम; लातूर तालुक्यातील मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन · २५ एप्रिलपासून बीएलओ देत आहेत घरोघरी भेट · सन २००२ च्या मतदार यादीशी होणार पडताळणी लातूर, दि. ३० (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अधिक पारदर्शक आणि निर्दोष करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत २००२ च्या मतदार यादीशी सर्व मतदारांचे मॅपिंग (पडताळणी) करणे अनिवार्य असून, लातूर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर २५ एप्रिल २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपलब्ध आहेत. मॅपिंग प्रक्रियेचे स्वरूप दुबार आणि तिबार मतदारांचा शोध घेण्यासाठी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही मतदारांची पडताळणी केली जात आहे. मतदारांनी त्यांच्याकडील मतदार ओळखपत्र दाखविल्यानंतर बीएलओ २००२ मधील मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक या आधारावर मॅपिंग करणार आहेत. ज्या मतदारांची नोंद २००२ नंतरची आहे, अशा मतदारांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारावर केली जाईल. बीएलओंची उपलब्धता एप्रिल पासून दररो...

लातूर जिल्ह्यातील 'नीट' परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्ह्यातील 'नीट' परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २९ (जिमाका): राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत आयोजित 'नीट युजी' परीक्षा येत्या ३ मे, २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत लातूर जिल्ह्यातील लातूर आणि निलंगा तालुक्यातील एकूण ३४ उपकेंद्रांवर पार पडणार असून, या परीक्षा कालावधीत केंद्रांच्या परिसरात होणारी संभाव्य गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेवून जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित जमण्यास, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक ही माध्यमे ३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले ...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग १ मे रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग १ मे रोजी बंद राहणार लातूर, दि. २९ : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बंद राहील. तसेच शनिवार, २ मे २०२६ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. ****

एसटी महामंडळाच्या लातूर विभागात प्रवासी राजा, कामगार पालक दिन उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर

एसटी महामंडळाच्या लातूर विभागात प्रवासी राजा, कामगार पालक दिन उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर लातूर, दि. २९ (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात 'प्रवासी राजा दिन' आणि 'कामगार पालक दिन' आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, लातूर विभागातील आगारांसाठी या उपक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लातूर विभागातील या दौऱ्याची सुरुवात २९ एप्रिल २०२६ रोजी उदगीर आगारातून होणार असून त्यानंतर ६ मे रोजी लातूर, १३ मे रोजी औसा, २० मे रोजी अहमदपूर आणि ३ जून २०२६ रोजी निलंगा आगार येथे या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या वेळापत्रकानुसार प्रत्येक आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत 'प्रवासी राजा दिन' आयोजित केला जाईल, ज्यामध्ये प्रवासी, विविध प्रवासी संघटना, शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी आपल्या बस सेवेसंबंधीच्या तक्रारी आणि सूचना लेखी स्वरूपात मांडू शकतील. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत 'कामगार पालक दिन' साजरा करण्यात ...