Posts

जनगणनेसाठी 'स्व-गणना' पोर्टल १ मे पासून होणार कार्यान्वित; घरबसल्या नोंदणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

जनगणनेसाठी 'स्व-गणना' पोर्टल १ मे पासून होणार कार्यान्वित; घरबसल्या नोंदणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वग...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता १० मे पूर्वी करण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता १० मे पूर्वी करण्याचे आवाहन लातूर, दि. २८ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी २०१७ पासून राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत २६ डिसेंबर २०२६ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या असून, या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत लातूर कार्यालयाच्या लॉगिनवरून ६८१ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर (सेंट बॅक) पाठविण्यात आले आहेत. या संदर्भात संबंधित विद्यार्थ्यांना वेळोवेळी दूरध्वनीद्वारे संदेश पाठवून व थेट संपर्क साधून त्रुटी दूर करण्याबाबत सूचित करण्यात आले असून, २८ एप्रिल २०२६ रोजी देखील पुन्हा एकदा संदेश पाठवण्यात आला आहे. हे अर्ज विद्यार्थ्यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याने त्यावर कार्यालयीन स्तरावरून कार्यवाही करणे शक्य नाही, त्यामुळे या अर्जांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांचे अर्...

उष्णतेच्या लाटेची तीव्रता लक्षात घेवून ‘नीट’ परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

उष्णतेच्या लाटेची तीव्रता लक्षात घेवून ‘नीट’ परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. २८: लातूर जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रांवर आगामी ३ मे २०२६ रोजी नीट युजी २०२६ परीक्षा पार पडणार असून, सुमारे १६ हजार ३०० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सज्जता आणि उपाययोजना ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध पावले उचलली जात आहेत. वाढत्या उष्णतेचा विचार करता प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. या पथकांकडे उष्माघातावरील उपचारासाठी आवश्यक औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, तसेच वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांसाठी सावलीची व्यवस्था आणि दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, शहरात विद्यार्थी आणि प...

नांदेड येथे ३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड येथे ३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन लातूर, दि. २७ : महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक व सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनवून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथील श्री शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर येथे भव्य ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध महामंडळांच्या कर्ज योजना, प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जातील त्रुटी कशा टाळाव्यात, यावर सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. या विशेष सोहळ्यात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल...

लातूर येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तपोलीस मुख्यालय प्रांगणात होणार राष्ट्रध्वज वंदन  

लातूर येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तपोलीस मुख्यालय प्रांगणात होणार राष्ट्रध्वज वंदन   लातूर, दि. २७ : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. या मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणावर करण्यात आले आहे.याप्रसंगी राष्ट्रध्वज वंदन आणि भव्य संचलन (परेड) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी राष्ट्रीय किंवा समारंभीय पोषाख परिधान करावा. तसेच, सर्व निमंत्रितांनी सोहळा सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी आसनस्थ व्हावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता होईल. या समारंभात सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी इतर कार्यालये किंवा संस्थांनी १ मे रोजी सकाळी ७.१५ ते ९ या वेळेत राष्ट्रध्वजवंदन किंवा इतर कोणतेही शासकीय समारंभ आयोजित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. एखा...

लातूर येथे २ ते ११ मे दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर; १६ खेळांच्या प्रशिक्षणाची खेळाडूंना संधी

लातूर येथे २ ते ११ मे दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर; १६ खेळांच्या प्रशिक्षणाची खेळाडूंना संधी लातूर, दि. २७ (जिमाका): जिल्हा क्रीडा कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी २ ते ११ मे २०२६ या कालावधीत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे होणाऱ्या या शिबिरात क्रिकेट, खो-खो, कुस्ती, ॲथलेटिक्स, रायफल शूटिंग, लॉन टेनिस, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कराटे, स्केटिंग, योगा आणि बास्केटबॉल अशा एकूण १६ क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंढे (भ्रमणध्वनी क्र. ८२७५२७३९१७) किंवा क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर (भ्रमणध्वनी क्र. ९४२०२९२१५५) यांच्याशी संपर्क साधावा. *****

'मधुमित्र' व 'मधुसखी' पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; २० मे रोजी पुण्यात होणार गौरव

'मधुमित्र' व 'मधुसखी' पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; २० मे रोजी पुण्यात होणार गौरव लातूर, दि. २७ (जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ सालासाठी 'मधुमित्र' आणि 'मधुसखी' पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व या क्षेत्रातील मधपाळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून मंडळाने हा उपक्रम सुरू केला असून, यात मधमाशीपालनात दीर्घकाळ यशस्वीपणे काम करणाऱ्या मधपाळांचा सन्मान केला जातो. या पुरस्कार योजनेत प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये आणि तृतीय ५ हजार रुपये अशा स्वरूपाचे तीन पुरस्कार दिले जाणार असून, यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. या पुरस्कारांचे अर्ज प्रत्येक जिल्ह्याच्या खादी मंडळाच्या कार्यालयात किंवा मंडळाच्या www.mskvib.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. २० मे २०२६ रोजी 'जागतिक मधमाशी दिना'च्या औचित्य...