Posts

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी 'बेनिफिशरी सत्यापन ॲप'द्वारे डिजीटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी 'बेनिफिशरी सत्यापन ॲप'द्वारे डिजीटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. २९ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ७ मे, २०२६ च्या शासन निर्णयानुसार, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता हयात प्रमाणपत्र (डिजीटल लाईफ सर्टिफिकेट) ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व विशेष सहाय्य योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी आपले डिजीटल हयात प्रमाणपत्र विहित पद्धतीने सादर करावे, असे आवाहन लातूर तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. मोबाईल किंवा सेतू केंद्रावरून सुविधा उपलब्ध लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करणे सोपे जावे यासाठी 'बेनिफिशरी सत्यापन ॲप' विकसित करण्यात आले आहे. लाभार्थी हे प्रमाणपत्र स्वतःच्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या मोबाईलवरून या ॲपचा वापर करून सादर करू शकतात. तसेच ज्यांना मोबाईलवर ही प्रक्रिया करणे शक्य नाही, त्यांनी जवळच्या सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ...

जात प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

जात प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लातूर, दि. २९ : महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० आणि विविध शासन निर्णयामधील तरतुदींनुसार पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात लातूर, औसा-रेणापूर, निलंगा, अहमदपूर आणि उदगीर अशा पाच उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येते. नागरिकांनी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच जात प्रमाणपत्र ऑनलाईन पोर्टलवरून काढताना काही अडचणी किंवा समस्या येत असल्यास, अथवा कोणतीही फसवणूक होत असल्यास नागरिकांनी त्याबाबतची तक्रार प्रशासनाच्या ०२३८२-२२०२०० या दूरध्वनी क्रमांकावर करावी, असे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. *****

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 20 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 20 मे, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 3 जून, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अ...

लातूर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; 'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक

लातूर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; 'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक लातूर, दि. २७ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये लातूर शहरात मुलांचे ६ तर मुलींचे ४ वसतिगृह; औसा, निलंगा, उदगीर, देवणी व चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १; अहमदपूर येथे मुलांचे २ व मुलींचे २; तर रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. या प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यात इयत्ता आठवी व अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर व्यावसायिक पदवी, पदविका (डिप्लोमा) प्रथम वर्षात आणि पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश अर्ज ...

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी; लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी; लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार, ३१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आयोजित करण्यात आली असून, या परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लातूर शहरातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये शहरातील ९ परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये पार पडणार असून हे आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ०८.०० वाजेपासून ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी परीक्षार्थीं व्यतिरिक्त ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीं...

आचारसंहितेमुळे १ जून रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित

आचारसंहितेमुळे १ जून रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित लातूर, ३० मे (जिमाका): लातूर जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे आगामी सोमवार, १ जून २०२६ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती लातूरचे प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) गणेश पवार यांनी दिली आहे. ****

बकरी ईदनिमित्त २८ मे रोजी शासकीय रुग्णालयांची 'ओपीडी' बंद

बकरी ईदनिमित्त २८ मे रोजी शासकीय रुग्णालयांची 'ओपीडी' बंद लातूर, दि. २६ : काही दिनदर्शिकांमध्ये बुधवार, २७ मे २०२६ रोजी बकरी ईदची सुट्टी दर्शवण्यात आली असली, तरी महाराष्ट्र शासनाने बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी गुरुवार, २८ मे २०२६ रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, २८ मे २०२६ रोजी बंद राहील. शासकीय रुग्णालयांचा बाह्यरुग्ण विभाग बुधवार, २७ मे २०२६ रोजी नियमित वेळेप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहील, तर गुरुवार, २८ मे रोजी सुट्टी असल्याकारणाने पूर्णपणे बंद राहणार आहे. शासकीय रुग्णालयातील ओपीडी विभाग गुरुवारी बंद असला, तरी रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी कळविले आहे. ****