Posts

२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे दोन दिवसांत निकाली

Image
२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे दोन दिवसांत निकाली लातूर, दि. १५ : एका तलाठ्याच्या चुकीमुळे सातबारा उताऱ्यावर २६ वर्षांपूर्वी झालेली चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्धाला लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या संवेदनशीलतेमुळे अखेर न्याय मिळाला आहे. वयोवृद्ध शेतकरी प्रभाकर प्रयाग यांचा काही वर्षांपासून रेंगाळलेला सातबारा दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ दोन दिवसांत मार्गी लावला. लातूर येथील रहिवासी प्रभाकर विनायकराव प्रयाग (वय ८५) यांची खोपेगाव शिवारात वडिलोपार्जित जमीन आहे. २६ वर्षांपूर्वी वासनगाव तलावाच्या कालव्यासाठी या परिसरातील जमीन संपादित करण्यात आली होती. हा कालवा वास्तविक प्रभाकर प्रयाग यांच्या भावाच्या शेतातून गेला होता. मात्र, तत्कालीन तलाठ्याच्या नजरचुकीमुळे श्री. प्रयाग यांच्याही सातबाऱ्यावर '६ आर' जमीन संपादित झाल्याची नोंद करण्यात आली. ही चुकीची नोंद काढण्यासाठी श्री. प्रयाग मागील काही वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागत होते, मात्र हा तांत्रिक पेच सुटत नव्हता. य...

रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा;रासायनिक खतांसाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन

रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा;रासायनिक खतांसाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. १५ : पश्चिम आशियाई देशांतील सद्यस्थिती आणि जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र व राज्य शासनाने कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. त्यानुसार रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक, जैविक आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनानुसार, राज्य शासनाने कृषी विभागामार्फत विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असून, जागतिक बाजारपेठेतील खतांच्या उपलब्धतेवरही परिणाम होत आहे. ही परिस्थिती विचारात घेता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. यामुळे केवळ जमिनीची सुपीकता टिकणार नाही, तर उत्पादन खर्च कमी होऊन विषमुक्त अन्ननिर्मितीला चालना मिळेल. ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन भ...

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम · लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण

Image
सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम · लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण लातूर, दि. १५ : आपत्कालीन परिस्थितीत विविध शासकीय विभागांमधील समन्वय आणि तत्परता तपासण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडच्या वतीने लातूर येथे 'सीएनजी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन' विषयावर भव्य संयुक्त प्रात्यक्षिकाचे (मॉक ड्रील) आयोजन करण्यात आले होते. संभाव्य गॅस गळती आणि आग दुर्घटनेच्या वेळी आपत्कालीन यंत्रणा कशा प्रकारे कार्य करतात, याचे यशस्वी सादरीकरण यावेळी करण्यात आले. या रंगीत तालमीमध्ये एका सीएनजी वाहनाला गॅस गळतीमुळे आग लागल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महानगरपालिका अग्निशमन दल आणि पोलीस वाहतूक शाखा या यंत्रणांना त्वरित पाचारण करण्यात आले. घटनेनंतर काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीची वैद्यकीय मदत देऊन रुग...

लातूर जिल्ह्यात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम; २०.३६ लाख मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

लातूर , दि १४ :   भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ' विशेष सखोल पुनरिक्षण ' ( एसआयआर ) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून या मोहिमेंतर्गत लातूर जिल्ह्यातील सुमारे २० लाख ३६ हजार मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.   *बीएलओच्या प्रत्यक्ष घरांना भेटी*   महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात लातूर जिल्ह्यातील सुमारे २० लाख ३६ हजार मतदारांच्या तपशिलाची खातरजमा २ हजार १४२ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत   करण्यात येणार आहे.   हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले ' बूथ लेव्हल एजंट्स ' ( बीएलए ) त्यांना सहकार्य करणार आहेत.   *जनगणनेच्या कामाशी सांगड*   सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्...

‘एल-निनो’मुळे उद्भवणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
‘एल-निनो’मुळे उद्भवणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले • जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक • बियाणे, खते वितरणात सुसूत्रता ठेवावी लातूर, दि. १४ : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो'चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक सज्जता ठेवावी. तसेच शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे व खत वापर याविषयी योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. खरीप हंगाम पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषद आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह पशुसंवर्धन विभाग, अग्रणी बँक, आत्मा, वन आदी विभागा...

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी लातूर, दि. 14 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक आणि नवयुवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे 15 जून, 2026 ते 28 ऑगस्ट, 2026 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 67 आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थींनी 14 जून, 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रावर हजर रहावे. या कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजन सुविधा पुरविल्या जाणार आहेत. लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 9 जून, 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण पुणे यांच्या संकेतस्थळावरून (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून) सीडीएस-67 कोर्सचे प्रवेशपत्र आणि त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट भरून सोबत...

मच्छिमारांना साधनांच्या खरेदीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान

मच्छिमारांना साधनांच्या खरेदीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान लातूर, दि. १४ : मच्छिमारीसाठी लागणाऱ्या साधनांच्या किमतीत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याने, गरीब मच्छिमारांना आपला व्यवसाय किफायतशीरपणे करता यावा, या उद्देशाने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सहकारी संस्थांच्या सभासदांना आणि वैयक्तिक क्रियाशील मच्छिमारांना मासेमारी साधनांच्या खरेदीवर अनुदान दिले जाणार असून, लातूर येथील मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी यासाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. या योजनेमध्ये तयार मासेमारी जाळीसाठी २४ हजार रुपये प्रकल्प किंमत निश्चित करण्यात आली असून, ३० किलो जाळीसाठी अर्थसहाय्य दिले जाईल. तसेच नौका खरेदीसाठी लाकडी नौकेकरिता ६० हजार, स्टील नौकेसाठी ३० हजार, तर फायबर नौकेसाठी १ लाख २० हजार रुपयांची प्रकल्प मर्यादा ठरवण्यात आली असून, यामध्ये राखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के आणि अराखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के शासकीय अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच...