लातूर जिल्ह्यातशस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 4 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 4 जून, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 18 जून, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अग...
Posts
लातूरमध्ये ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ मोहिमेचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
लातूरमध्ये ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ मोहिमेचे आयोजन लातूर, दि. ३ (जिमाका) : भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाद्वारे ‘खेलो इंडिया’ योजनेच्या ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत रविवार, ७ जून २०२६ रोजी लातूर शहरात ‘संडे ऑन सायकल’ या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये तंदुरुस्ती व नियमित व्यायामाचे महत्त्व रुजवण्यासाठी तसेच लठ्ठपणाशी लढण्यासाठी आयोजित केलेल्या या सायकल रॅलीचा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरू होऊन राजीव गांधी चौक, वाडा हॉटेल, पी.व्ही.आर. चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल असा निश्चित करण्यात आला आहे. तरी या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी, नागरिक, सायकलिंग क्लब, शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि खेळाडूंनी ७ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या उपक्रमासाठी https://fitindia.gov.in/world-bicycle-day या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. *****
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत मूल्यसाखळी भागीदार निवडीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रस्ताव आमंत्रित
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत मूल्यसाखळी भागीदार निवडीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रस्ताव आमंत्रित लातूर, दि. ०३ : जिल्ह्यातील सोयाबीन, करडई, तीळ, भुईमूग आणि सूर्यफूल या प्रमुख तेलबिया पिकांच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत पीकनिहाय मूल्य साखळी भागीदार म्हणून पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर जिल्हा तेलबिया समितीमार्फत निवडल्या जाणाऱ्या या भागीदार संस्थांना अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण देणे, प्रमाणित बियाणे वितरण करणे, शेतकरी शेतीशाळा चालवणे, मूल्यसाखळी समूहातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे माती परीक्षण करणे आणि 'कृषी मॅपर' पोर्टलवर लाभार्थ्यांची अचूक माहिती भरणे यांसारखे महत्त्वपूर्ण घटक व उपक्रम राबवावे लागणार आहेत. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक कंपन्या किंवा संस्था कंपनी कायदा अथवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक असून, संबंधित तालुक्यात काम करण्याचा त्यांना किमान ३ वर्षांचा अनुभव असावा म्हणजेच त्यांची नोंदणी माहे मार्च २०२३ पूर्वीची असणे बंधनकारक आहे. यासो...
जागतिक पर्यावरण दिनी लातूर जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेसह स्वच्छता अभियानाचे आयोजन • जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
जागतिक पर्यावरण दिनी लातूर जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेसह स्वच्छता अभियानाचे आयोजन • जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचे आवाहन लातूर, दि. २ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येत्या ५ जून २०२६ रोजी लातूर जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेसोबतच स्वच्छता अभियानही राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये शासकीय यंत्रणांसोबतच स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला लातूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपवन संरक्षक अमितराज जाधव, सहायक वनसंरक्षक मदन क्षीरसागर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहन अभंगे यांच्यासह सर्व ...
लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचयतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
- Get link
- X
- Other Apps
लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचयतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर लातूर, दि. 2 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाच्या 26 मे, 2026 च्या आदेशन्वये सन 2024 व2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मितग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रमघोषित केला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर, अहमदपूर,जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, निलंगा, औसा या तालुक्यातील एकूण 414ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार सोमवार, 8 जून, 2026 रोजीविशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. शुकवार, 12 जून, 2026 रोजी विशेष ग्रामसभाबोलावून, तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली,आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचामागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचामागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित होईल. बुधवार, 17 जून,2026 रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला जिल्हाधिकारी यांनी मान्यता ...
लातूर येथे ‘अमृत’ संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी आज ‘उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमा’चे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
लातूर येथे ‘अमृत’ संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी आज ‘उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमा’चे आयोजन लातूर, दि. ०१ : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ मार्फत राबविण्यात येत असलेल्या अमृत पर्यटन उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी मंगळवार, २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अमृत लातूर जिल्हा कार्यालय, पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प, विद्यानगर, लातूर-४१३५१२ येथे होणार आहे. ‘अमृत पर्यटन’ हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी आणि पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने आणि पर्यटन व्यवसायांना नवीन बाजारपेठ व संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पर्यटन क्षेत्र हे सध्या देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्...
जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ
- Get link
- X
- Other Apps
जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ · १ जुलैपासून 'वायुवेग पथका'द्वारे होणार कडक कायदेशीर कारवाई लातूर, दि. ०१ : जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी यापूर्वी दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु अद्यापही राज्यातील अनेक वाहनांवर एचएसआरपी प्लेट्स बसवल्या नसल्याचे आढळून आल्यामुळे प्रशासनाने आता या जुन्या वाहनांना क्रमांक पाटी बसविण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतिम मुदतीनंतर, म्हणजेच ०१ जुलै २०२६ पासून एचएसआरपी प्लेट न बसविणाऱ्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर 'वायुवेग पथकाद्वारे' कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, मात्र ज्या वाहन मालकांनी ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट घेतली आहे, अशा वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयीन परिपत्रकानुसार, एचएसआरपी प्लेट न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण आणि वित्त बोजा चढविणे किंवा उतरव...