Posts

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू; ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

वृत्त क्र. : 463 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू; ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ९ (जिमाका) : जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या आणि ज्यांचा जन्म १ मे २०१५ ते ३१ जुलै २०१७ या दरम्यान झाला आहे, अशा पात्र विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी http://navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज मुदतीत सादर करावेत, असे आवाहन लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार

‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया; पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५ हजार रुपये मानधन मुंबई, दि. ८ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपये मानधन प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी दि. १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाची दिलेली प्रेरणा जपत, आयुष्यभर कला आणि साहित्य क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना आर्थिक आधार व सन्मान मिळावा, या उद्देश...

विशेष लेख : राज्य शासनाची कर्जमुक्ती : शाश्वत कृषी विकासाचे धोरण

Image
शेती ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढ-उतार आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत केवळ तात्पुरता दिलासा देणे पुरेसे नसून शेतकरी पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, उत्पादनक्षम बनेल आणि भविष्यात कर्जाच्या दुष्टचक्रात अडकणार नाही, अशी दीर्घकालीन व्यवस्था उभी करणे आवश्यक ठरते. याच व्यापक दृष्टिकोनातून राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी आणि सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शाश्वत कृषी विकासाच्या व्यापक धोरणाचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिली जात आहे. कर्जमुक्तीचा मूलभूत उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे हा असला, तरी त्यामागील व्यापक विचार अधिक महत्त्वाचा आहे. कर्जमुक्त झालेला शेतकरी पुन्हा पतपुरवठ्यास पात्र होतो. नव्याने पीककर्ज उपलब्ध झाल्य...

भूकंपादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती करावी -जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

भूकंपादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती करावी -जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड • हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांचा आढावा • नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन लातूर, दि. ०९ : भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, काय करावे याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तसेच सर्व शासकीय विभागांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिल्या. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय यंत्रणांचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यावेळी उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे चार ...

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची लातूर जिल्ह्यात विशेष अंमलबजावणी; अर्ज करण्याचे आवाहन

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची लातूर जिल्ह्यात विशेष अंमलबजावणी; अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ०६ : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी लातूर जिल्ह्यात १९ जून २०२६ ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही योजना ऑगस्ट २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आली असून, याद्वारे पीक काढणीनंतरची कृषी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या २ कोटींपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत, तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्...

लातूर तालुक्यात 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम सुरू; मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन

लातूर तालुक्यात 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम सुरू; मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन लातूर, दि. ०६ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारयादी अद्ययावत करण्याची मोहीम लातूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत सन २००२ च्या मतदार यादीशी सर्व मतदारांचे मॅपिंग म्हणजेच पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग होणार नाही, त्यांना पुढील काळात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमोर सुनावणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. ही संभाव्य प्रक्रिया टाळण्यासाठी मतदारांनी तातडीने आपले मतदार मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या मोहिमेसाठी लातूर तालुक्यातील सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व पर्यवेक्षक यांना मतदारांचे मॅपिंग करणे, अस्पष्ट फोटो गोळा करून ते अद्ययावत करणे आणि डीएसई नोंदींची पडताळणी करणे या कामांसाठी ०१ जुलै २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. हे अधिकार...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ४४ हजार ६९९ कर्जखात्यांची माहिती अपलोड

Image
लातूर, दि. ०४  : थकीत कर्जदार शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही योजना जाहीर केली आहे. लातूर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी आणि गतीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून पात्र कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही संबंधित बँकांमार्फत सुरु आहे. या अंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ४४ हजार ६९९ कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.                                                 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जाणार आहे. यापूर्वीच्या 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'चे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची थकबाकी २ लाख रु...