Posts

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर लातूर, दि. १७ : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि आगामी काळात मुदत संपणाऱ्या एकूण ४१४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी कळविले आहे. या निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करताना १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरण्यात यावी, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत. या कार्यक्रमानुसार शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांना आपल्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी शुक्रवार, २४ जुलै २०२६ ते बुधवार, २...

दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

दिव्यांग सशक्तीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. १७ (जिमाका) : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिले जाणारे 'दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६' जाहीर करण्यात आले असून या राष्ट्रीय पुरस्कारांतर्गत प्रामुख्याने 'सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन', 'श्रेष्ठ दिव्यांगजन' आणि 'श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बाल/बालिका' या तीन श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याने लातूर जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करताना संबंधित दिव्यांग व्यक्तीने किंवा संस्थेने केलेल्या उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती पुराव्यांसह नमूद करणे आवश्यक आहे. त्यासोबत यु.डी.आय.डी. कार्ड किंवा अधिकृत दिव्यांग प्रम...

ातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 17 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी सायली ठाकूर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 19 जुलै, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 2 ऑगस्ट, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, मोठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्ह...

लातूरमध्ये २१ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूरमध्ये २१ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा लातूर, दि. १७ (जिमाका) : केंद्र शासनाच्या नॅशनल करिअर सर्व्हिस प्रकल्पाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २१ जुलै, २०२६ रोजी सकाळी १० वाजता औसा रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या शासकीय तंत्र प्रशाला केंद्रात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात अनेक नामांकित आस्थापना आणि खाजगी क्षेत्रातील उद्योजक सहभागी होऊन उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार असून यामध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, कोणत्याही शाखेचे पदवीधर व पदव्युत्तर पदवीधारक, तसेच आय.टी.आय. आणि डिप्लोमा उत्तीर्ण अशा विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी आणि नोकरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपली सर्व मूळ शैक्षण...

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लातूरमध्ये मतदार आणि बीएलओ मदत कक्षाची स्थापना

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लातूरमध्ये मतदार आणि बीएलओ मदत कक्षाची स्थापना लातूर, दि. १७ : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घोषित केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) – २०२६ कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या अचूकतेसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन विविध नमुने भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने २३४-लातूर ग्रामीण आणि २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदार व कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक आणि प्रशासकीय सहाय्यासाठी लातूर तहसील कार्यालय येथे मतदार मदत कक्ष व बीएलओ मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून ३० जुलै २०२६ पर्यंत हा कक्ष कार्यरत राहणार असून नायब तहसीलदार (संगायो) परमेश्वर कांबळे (मो. ९४२१४००२५१) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या मतदार मदत कक्षामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी ओंकार बोबले (मो. ९१४६७१५१२३) व अर्जुन कांबळे (मो...

युजीसी नेट परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

सुधारित युजीसी नेट परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी लातूर, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर १७ व १८ जुलै, २०२६ या कालावधीत सीएसआयआर युजीसी नेट परीक्षा जून, २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, ही परीक्षा सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ अशा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी लातूरचे जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय अन्य पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित प्रवेश करण्यास तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास व शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा कालावधीत केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, दुकाने, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बुथ आणि ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत पूर्णपणे बंद ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २२ जुलैपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत, ज्यामध्ये मुलांची १४ आणि मुलींची १२ वसतिगृहे समाविष्ट आहेत. यापैकी लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे असून औसा, निलंगा, उदगीर, देवणी आणि चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १ वसतिगृह सुरू आहे. तसेच अहमदपूर येथे मुलांची २ व मुलींची २, रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व शासकीय वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून, इच्छुक विद्यार्थी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या नवीन लिंकचा वापर करून आपले अर्ज भरू शकतात. जिल्ह्यात इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर-व्यावसायिक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) हे प्रवेश अर्ज भरता येतील. तसेच अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या (मधल्य...