Posts

प्रशासन समजून घ्या...जबाबदार नागरिक बना! अमृत संवाद सेतू उपक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांचे मार्गदर्शन

प्रशासन समजून घ्या...जबाबदार नागरिक बना! अमृत संवाद सेतू उपक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांचे मार्गदर्शन लातूर, दि. ११ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने लातूर येथे आयोजित 'अमृत संवाद सेतू' उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची रचना, विविध विभागांचे कार्य, शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती, अर्ज व निवेदन लेखन, पाठपुरावा प्रक्रिया, ऑनलाइन शासकीय सेवा तसेच जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावयाच्या कर्तव्यांविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लातूर येथील जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रशासनाची रचना, शासकीय कार्यालयांचे कार्य, शासनाशी प्रभावी संवाद कसा साधावा, नागरिकांनी आपले अधिकार व कर्तव्ये कशी पार पाडावीत. तसेच जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका कशी बजावावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांनी विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यानंतर अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळ...

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जळकोट येथे एकदिवसीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जळकोट येथे एकदिवसीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात लातूर, दि. ११ : राज्य शासनाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्या निर्देशानुसार लातूर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आणि जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, आधुनिक मत्स्यजाळी व बोटी, पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन, मत्स्य हाताळणी, विपणन आणि शीतसाखळी व्यवस्थापन या विषयावरील एकदिवसीय जनजागृती व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, मत्स्यपालकांमध्ये आधुनिक मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, कौशल्यवृद्धी करणे आणि वैज्ञानिक मत्स्यपालनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सोमनाथ आर. यादव उपस्थित होते. या कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील विविध...

अवैध मासेमारी टाळण्यासाठी सशुल्क परवाना घेणे बंधनकारक; लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

अवैध मासेमारी टाळण्यासाठी सशुल्क परवाना घेणे बंधनकारक; लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन लातूर, दि. ११ : मत्स्यव्यवसाय विभागाच्या ३ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार जळकोट तालुक्यातील डोंगरगाव तलावात विनापरवाना मासेमारी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. डोंगरगाव तलावात मासेमारी करावयाची असल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून रितसर सशुल्क मासेमारी परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भातील परवाना वाटपाची कार्यवाही १० ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत केली जाणार आहे. तलावात कोणतीही व्यक्ती विनापरवाना मासेमारी करताना आढळून आल्यास ही मासेमारी अवैध घोषित केली जाईल आणि संबंधितांवर रितसर शासकीय कार्यवाही केली जाईल, असे लातूर येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त तेजस्विनी प्र. करळे यांनी स्पष्ट केले आहे. ****

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स आणि कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्रास मान्यता • पात्र खेळाडूंनी १७ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स आणि कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्रास मान्यता • पात्र खेळाडूंनी १७ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ११ : राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी ॲथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. या केंद्रांमुळे राज्यातील तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी उच्च दर्जाचे निवासी प्रशिक्षण, सुविधा आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे प्रत्यक्ष किंवा dyd.syslatur@rediffmail.com या ई-मेलवर १७ ऑगस्ट, २०२६ पर्यंत सादर करावेत. पात्रता निकष: • वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०२६ रोजी २५ वर्षांखालील मुले व मुली • महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक (अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य) • ...

‘युआयडीएआय’च्या नवीन आधार सेवा केंद्राचे लातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

‘युआयडीएआय’च्या नवीन आधार सेवा केंद्राचे लातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन लातूर, दि. ११ : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (युआयडीएआय) मुंबई प्रादेशिक कार्यालयामार्फत लातूर येथे सुरू करण्यात आलेल्या नवीन अद्ययावत आधार सेवा केंद्राचे उद्घाटन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्तेवाड यांच्या हस्ते झाले. नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा पुरवण्याच्या दृष्टीने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. हे आधार सेवा केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील आर्वीकर कॉम्प्लेक्स येथे स्थित असून आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी, ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि घटनास्थळीच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यास युआयडीएआय मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक मंदार जेवरे आणि सेवा प्रदाता कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या केंद्रात नागरिकांच्या सोयीसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सोय आणि सुलभ टॉयलेट सुविधा उ...

लातूर विभागात 61,216 खात्यांना 462.81 कोटींचा लाभ : नानासाहेब चव्हाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

लातूर विभागात 61,216 खात्यांना 462.81 कोटींचा लाभ : नानासाहेब चव्हाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लातूर, दि. 10 :- “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026” अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव व बीड या चार जिल्ह्यांतील 61 हजार 216 कर्जखात्यांना एकूण 462 कोटी 81 लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला असल्याची माहिती सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली. यामध्ये लातूर जिल्ह्यात 22 हजार 963 खात्यांना 159.95 कोटी, नांदेडमध्ये 12 हजार 929 खात्यांना 106.24 कोटी, धाराशिवमध्ये 12 हजार 214 खात्यांना 105.86 कोटी तर बीड जिल्ह्यात 13 हजार 110 खात्यांना 90.74 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. राज्यस्तरावर 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,028 कोटी रुपये थेट जमा झाले असून, मराठवाडा विभागात एकूण 1 लाख 30 हजार 934 खात्यांना 932.60 कोटींचा लाभ वितरित झाला आहे. राज्यातील 53 बँकांनी सुमारे 32 लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी 16.96 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली असून 6 ऑगस्ट अखेर 12.10 लाख खात्यांचे आधार प्रमाणीक...

वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्जाची संधी

वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्जाची संधी लातूर, दि. 10:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणीमुळे अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी स्थानिक वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. जिल्ह्यात मुलांचे १४ व मुलींचे १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. लातूर शहरात मुलांचे ६ व मुलींचे ४ वसतिगृह आहेत. औसा, निलंगा, उदगीर, देवणी, चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह आहे. अहमदपूर येथे मुलांचे दोन व मुलींचे दोन, रेणापूर येथे मुलांचे एक आणि जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह कार्यरत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालय वर्गाची प्रवेश निवड यादी प्रसिद्ध झाली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू असून अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. मागील वर्षी अंतिम वर्षात शिकणारे व स्वाधार योजने...