Posts

'लोकसंवाद२०२६' या उपक्रमांतर्गत मुरुड येथे मार्गदर्शन

माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या 'लोकसंवाद२०२६' या उपक्रमांतर्गत #लातूर तालुक्यातील #मुरुड येथील महाराज गणेश मंडळ येथे नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा, उद्योग क्षेत्रातील संधी आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी खादी ग्रामोद्योग व उद्योग विभागांतर्गत मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि सवलतींची माहिती दिली. तसेच, मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ठोंबरे, आरोग्य मित्र धनंजय नवगिरे आणि गोविंद सुरवसे यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ​#गणेशोत्सव  ​#लोकसंवाद२०२६

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानाला लातूर जिल्ह्यात आनंदवाडी (गौर) येथून प्रारंभ

Image
 *माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम* लातूर, दि. १७ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथून या उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमात कृषि विभाग, जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे, उपकृषी अधिकारी सुनील घारोळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, आनंदवाडी (गौर) येथील संयुक्त गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश संजय चामे, उपाध्यक्ष ग्यानदेव गोपाळ चामे, सचिव रमण ज्ञानोबा चामे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत अर्थसहाय्य देत आहे. यामाध्यमातून मळणी यंत्रे, तेल घाणे यासारख्या शेतीशी नि...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत · पात्र विद्यार्थ्यांनी महा-आयटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत लातूर, दि. १६: अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्जांच्या नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज महाआयटी पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन लातूर येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार या योजनेत सुधारणा करण्यात आल्या आहेत. सन २०१७ पासून सुरू असलेल्या या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना आणि अटी-शर्ती शासनाच्या स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून, सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध आहे. शासकीय निर्णयातील सर्व अटी व शर्तींच्या अनुषंगाने, ज्या पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ मध...

लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालय लिपीक पदासाठी भरती

लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालय लिपीक पदासाठी भरती लातूर दि. १६ (जिमाका): जिल्ह्यातील माजी सैनिक यांनी  लातूर मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथे एका माजी सैनिक लिपीक पदावर तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवार हा माजी सैनिक असावा. माजी सैनिक लिपिकास प्राधान्य). उम्मेदवारांचे  वय हे माजी सैनिकासाठी ५८ वर्षापेक्षा कमी असावे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी आणि संगणकीय ज्ञान एमएससीआयटी (MSCIT) उत्तीर्ण असावे. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखन व मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान (लिहिणे व वाचणे) असणे गरजेचे आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा व शारीरिकदृष्ट्या सक्षम उम्मेदवारांची मेस्कोच्या नियमाप्रमाणे व मेस्कोच्या गरजेनुसार कार्य करण्याची तयारी असावी.    तरी या पदासाठी पात्र व इच्छूक माजी सैनिकांनी आपला अर्ज व सर्व मुळ कागदपत्रासह सोमवार, २१ सप्टेंबर,२०२६ रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कागद पत्र जमा करुन नाव नोंदणी करावी , असे लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी आवाहन केले आहे. ...

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयमयोजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत 

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयमयोजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत  लातूर, दि. १६  : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन २०२६-२७ साठी सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सरू केलेली आहे. प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  भोजन, निवास व निर्वाह भत्ता ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता ३८ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक सलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.या योजनेतर्गत अर्ज करण्याकरीता विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र अ...

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा •       वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा •       वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ  लातूर, दि. १६  : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य याची निःशुल्क व्यवस्था करण्यात येते. सन २०२६-२७ साठी रिक्त असलेल्या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र,  तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांन...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत, ज्यामध्ये मुलांची १४ आणि मुलींची १२ वसतिगृहे समाविष्ट आहेत. यापैकी लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे असून औसा, निलंगा, उदगीर, देवणी आणि चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १ वसतिगृह सुरू आहे. तसेच अहमदपूर येथे मुलांची २ व मुलींची २, रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व शासकीय वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून, इच्छुक विद्यार्थी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या नवीन लिंकचा वापर करून आपले अर्ज भरू शकतात. जिल्ह्यात इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर-व्यावसायिक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) हे प्रवेश अर्ज भरता येतील. तसेच अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या (म...