Posts

लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय क्रीडा स्पर्धा सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय क्रीडा स्पर्धा सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. ४ (जिमाका) : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश असलेल्या विविध स्तरावरील शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षापासून क्रीडा संचालनालय स्तरावरून विकसित करण्यात आलेल्या https://sports.maharashtra.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे शालेय क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक असणारी शाळांची नोंदणी, प्राथमिक प्रवेशिका, संलग्नता आणि प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात या शालेय क्रीडा स्पर्धांची सुरुवात सप्टेंबर २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रस्तावित करण्यात आली असल्याने, तत्पूर्वी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली सर्व आवश्यक माहिती भरून तसेच विहित ऑनलाईन शुल्क अदा करून नोंदणी प्रक्रिया प...

विशेष वृत्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे लातूर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना

विशेष वृत्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे लातूर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना लातूर, दि. ०४ (जिमाका): कृषि विभागामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (पीएमएफएमई) अंतर्गत लातूर जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीत आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील ४५५ अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांसाठी २८ कोटी ९७ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, लाभार्थ्यांना १० कोटी १७ लाख ५९ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला, स्वयं-सहायता गट, बेरोजगार युवक-युवती, सहकारी संस्था तसेच अन्य पात्र लाभार्थींना स्थानिक कृषि उत्पादनांवर आधारित सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असून, याद्वारे नाशवंत फळपिके, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य ...

लातूर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

लातूर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत लातूर, दि. ०४ (जिमाका): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये येत्या १२ सप्टेंबर, २०२६ रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. वेळ आणि पैशांची बचत करणाऱ्या या संधीचा लाभ घेऊन पक्षकार आणि विधीज्ञांनी १२ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपले वाद आपसी तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय भारुका, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. एन. गिरवलकर आणि लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष एस. डी. जाधव यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली व तडजोडीस पात्र असणारी विविध दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे, परक्राम्य संलेख अधिनियमातील कलम १३८ नुसार दाखल धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक विवाद, मोटार वाहन अपघात दाव्यांची प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, कामगार व औद्योगिक न्यायालय...

लातूर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १३ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’आयोजन

लातूर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १३ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’आयोजन लातूर, दि. ०४ (जिमाका): देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यभर एकाच दिवशी ५०० ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, तसेच शासन, उद्योग, आस्थापना आणि रोजगार इच्छुक युवक यांना एका सामायिक व्यासपीठावर आणणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी १३ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभामध्ये स्थानिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे तसेच इतर ठिकाणच्या नामांकित आस्थापना आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. या रोजगार महाकुंभामध्ये १० ...

सुसंस्कृत लातूरची ओळख जपूया, सामाजिक एकोपा वृद्धिंगत करूया -जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

सुसंस्कृत लातूरची ओळख जपूया, सामाजिक एकोपा वृद्धिंगत करूया -जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड • यंदाही लातूर जिल्ह्यात ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव • बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या ‘डीजे’वर पोलीस गुन्हे दाखल करणार लातूर, दि. ०४ : शांतताप्रिय आणि सुसंस्कृत जिल्हा अशी लातूरची सर्वत्र ओअख आहे, ही ओळख जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आगामी काळातील सर्व उत्सव सर्व जाती-धर्मीय बांधवांनी एकोप्याने साजरे करावेत. या उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. दयानंद सहभागृह येथे गोकुळाष्टमी, पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित लातूर जिल्हा शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मेघना आय. एन., उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसि...

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याविषयी शासकीय अधिकाऱ्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याविषयी शासकीय अधिकाऱ्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन लातूर, दि. ०४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ या विषयावर अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त उमेश सोनवणे, बार्टीचे प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, तज्ज्ञ व्याख्याते ॲड. भीमराव हटकर आणि विशेष सहायक सरकारी वकील ॲड. लक्ष्मण एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त उमेश सोनवणे म्हणाले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत नवीन दृष्टीकोन तयार होण्यास मदत होईल. या कायद्याची गरज, कायद्याच्या अंमलबजावणी...

लातूर तालुका ग्रामीण भागातील मंडप तपासणीसाठी पथके गठीत

लातूर तालुका ग्रामीण भागातील मंडप तपासणीसाठी पथके गठीत लातूर, दि. 3 (जिमाका): मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, समारंभप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीसाठी एका वर्षासाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. ही पथके लातूर तालुका ग्रामीण क्षेत्रातील ध्वनी प्रदुषण विषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याठी सण, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव समारंभ या सर्व प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणी करणार असल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली. लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशन (ग्रामीण) पथक क्रमांक 01 कार्यक्षेत्रासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पथकामध्ये पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी (दूरध्वनी क्र. 02382-246211) भ्रमणध्वनी क्र. 9764528222, ई-मेल आयडी pslaturrular@gmail.com), बाभळगावचे मंडळ अधिकारी सुनिल लाडके (भ्रमणध्वनी क्र. 8308376111, ई-मेल आयडी- ladkesd2801@gmail.com), बाभळगावचे तलाठी प्रशांत बिराजदार (भ्रमणध्वनी क्र. 9766010582, ई-मेल आयडी- laturtahsildar@gmail.com) . मुरुड पोलीस स्टेशन पथक क्रमांक 02 कार्य...