Posts

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजनेसाठी १७ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजनेसाठी १७ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. १३ (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ८ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून, हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. लातूर जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र बचत गटांकडून सन २०२६-२०२७ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र बचत गटांनी आपले अर्ज पूर्ण भरून येत्या १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन लातूर समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ****

सौर ऊर्जेच्या वापरास प्राधान्य देण्याची गरज- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Image
लातूर, दि. १३ : सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला कृषीपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध होत आहे. भविष्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेता सर्वांनीच सौर उर्जेच्या वापराला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथे केले. अहमदपूर येथे महावितरण कार्यालयामार्फत उभारण्यात आलेल्या १० एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचे तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या महावितरणच्या विविध विकासकामांचे लोकार्पण सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले उपस्थित होते. अहमदपूर शहर आणि तालुक्यात मागील कालखंडात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात होत्या. या समस्यांची दखल घेऊन त्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तालुक्यात वीज उपकेंद्रांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याकरिता शासन सर्व स्तरावर कटिबद्ध व प्रयत्नशील आहे. तसेच अहमदपूर बस स्थानकाला आता चार्जिंग स्टेशन उपलब्ध झाले असून, लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी पर्यावरणपूरक चार्जिंग बसेस दाखल होणार आहेत...

दिव्यांग बांधवांच्या अडचणी प्राधान्याने सोडवा - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Image
दिव्यांग बांधवांच्या अडचणी प्राधान्याने सोडवा - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दिनांक १३ (जिमाका): जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या व अडचणींचे प्राधान्याने निवारण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी आणि संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते राजू गायकवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक बसवराज पैके, विशेष शिक्षक व्यंकट लामजने यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्य...

लातूर येथे सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

Image
सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राज्याच्या प्रगतीत सहकार चळवळीचा मोठा हातभार - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर, दि. ११ : सहकार चळवळ ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. राज्यातील लाखो संसार सहकारामुळे उभे राहिले आहेत. बदलत्या काळानुसार सहकाराचे स्वरूप बदलत असून या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच, सहकार चळवळीने ग्रामीण भागासह संपूर्ण राज्याच्या प्रगतीला मोठा हातभार लावला आहे. सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्था व बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि सहकार विभागाच्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी ' सहकार संकुल ' उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. लातूर येथे सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील अध्यक्षतेखाली आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले . या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे ...

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
  राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ‘ ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे , अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था , सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रण , अमली पदार्थांविरोधातील कारवाई , पोलीस आधुनिकीकरण , जलसंपदा , कृषी आणि विविध विकासकामांबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहात दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , राष्ट्रीयकृत , व्यापारी , खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लो...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ शेतकऱ्यांना दिलासा आणि आर्थिक सक्षमतेसाठी बळ !

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ शेतकऱ्यांना दिलासा आणि आर्थिक सक्षमतेसाठी बळ ! बदलते हवामान, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांना नव्याने उभे करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेकडे नेणारी ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीचा, आत्मविश्वास वृद्धीचा आणि शेती व्यवसायाला अधिक सक्षम करण्याचा हा एक व्यापक प्रयत्न आहे. ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५६ लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याच्या इतिहासातील मोठ्या कर्जमुक्ती उपक्रमांपैकी ही एक योजना मानली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या दोन लाख रुप...

अहमदपूर येथे १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

अहमदपूर येथे १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा लातूर, दि. १० (जिमाका) : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि अहमदपूर येथील शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदपूर येथील नांदेड रोडवर असलेल्या शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा मेळावा पार पडणार असून यामध्ये अनेक नामांकित आस्थापना आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. या रोजगार मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, कोणत्याही शाखेचे पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आय.टी.आय. तसेच डिप्लोमा धारक उमेदवारांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असणार आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांन...