Posts

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 20 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 20 मे, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 3 जून, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अ...

लातूर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; 'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक

लातूर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; 'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक लातूर, दि. २७ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये लातूर शहरात मुलांचे ६ तर मुलींचे ४ वसतिगृह; औसा, निलंगा, उदगीर, देवणी व चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १; अहमदपूर येथे मुलांचे २ व मुलींचे २; तर रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंकचा वापर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. या प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यात इयत्ता आठवी व अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर व्यावसायिक पदवी, पदविका (डिप्लोमा) प्रथम वर्षात आणि पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश अर्ज ...

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी; लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी; लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार, ३१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आयोजित करण्यात आली असून, या परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लातूर शहरातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये शहरातील ९ परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये पार पडणार असून हे आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ०८.०० वाजेपासून ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी परीक्षार्थीं व्यतिरिक्त ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीं...

आचारसंहितेमुळे १ जून रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित

आचारसंहितेमुळे १ जून रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित लातूर, ३० मे (जिमाका): लातूर जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे आगामी सोमवार, १ जून २०२६ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती लातूरचे प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) गणेश पवार यांनी दिली आहे. ****

बकरी ईदनिमित्त २८ मे रोजी शासकीय रुग्णालयांची 'ओपीडी' बंद

बकरी ईदनिमित्त २८ मे रोजी शासकीय रुग्णालयांची 'ओपीडी' बंद लातूर, दि. २६ : काही दिनदर्शिकांमध्ये बुधवार, २७ मे २०२६ रोजी बकरी ईदची सुट्टी दर्शवण्यात आली असली, तरी महाराष्ट्र शासनाने बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी गुरुवार, २८ मे २०२६ रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, २८ मे २०२६ रोजी बंद राहील. शासकीय रुग्णालयांचा बाह्यरुग्ण विभाग बुधवार, २७ मे २०२६ रोजी नियमित वेळेप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहील, तर गुरुवार, २८ मे रोजी सुट्टी असल्याकारणाने पूर्णपणे बंद राहणार आहे. शासकीय रुग्णालयातील ओपीडी विभाग गुरुवारी बंद असला, तरी रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी कळविले आहे. ****

लातूर येथे निवृत्तीवेतनधारक आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी पेन्शन अदालत, कार्यशाळा उत्साहात

लातूर येथे निवृत्तीवेतनधारक आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी पेन्शन अदालत, कार्यशाळा उत्साहात महालेखाकार नागपूर व जिल्हा कोषागार कार्यालय लातूरचा संयुक्त उपक्रम लातूर, दि. २५ (जिमाका): जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महालेखाकार आणि लातूर जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डीपीडीसी हॉलमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नागपूर महालेखापाल कार्यालयाचे वरिष्ठ लेखाधिकारी मैथिली जगन्नाथन, सहायक लेखाधिकारी चेतनकुमार गुप्ता आणि लेखापाल समिर मीना यांनी उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांना निवृत्ती वेतन प्रकरणे (पेंशन पेपर्स) अत्यंत अचूकपणे कसे सादर करावेत, याबाबत सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच निवृत्तीवेतनधारकांना येणाऱ्या विविध अडचणी व समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांचे जागेवरच निराकरण केले. या बैठकीला लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिल्हा कोषागार अधिक...

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण लातूर, दि. २३ : जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जळकोट तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जळकोट तालुक्यातील २ गावे आणि १ वाडी अशा एकूण ३ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवले जात असल्यामुळे सुमारे ३,३१० नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी शासनाचे २ टँकर कार्यरत असून त्यांच्या दररोज एकूण ४ फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रामुख्याने जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा - वाघमारी तांडा आणि गव्हाण येथे टँकर मंजूर करण्यात आले आहेत. टँकर व्यतिरिक्त जिल्ह्या...