Posts

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० : माता आणि बालकांच्या सुदृढ भविष्याचा आधार

Image
  केंद्र शासनामार्फत महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी राबविण्यात येणारी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० ही अधिक व्यापक स्वरूपात राबविली जात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रसूतीदरम्यान आर्थिक पाठबळ देणे हा आहे. अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे गर्भवती महिलांना मजुरीसाठी किंवा कामावर जावे लागते , ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि बाळाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. ही ओढताण थांबवून महिलांना विश्रांती घेता यावी आणि त्यांना सकस आहार मिळावा , या हेतूने सरकार या योजनेद्वारे थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करते. सन २०२५-२६ आर्थिक वर्षात १० हजार ८२२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.   या सुधारित योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या अपत्यासाठी मिळणारा लाभ. पहिल्या प्रसूतीवेळी पात्र महिलेला दोन हप्त्यांमध्ये एकूण ५ हजार रुपयांची मदत दिली जाते. यामध्ये गर्भधारणेची लवकर नोंदणी आणि किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केल्यानंतर ३ हजार रुपये , तर बाळाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्य...

लातूर जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना; ३० एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

    लातूर, दि. २२ : अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीसाठी जिल्ह्यातील ३ नामवंत अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींकडून सदस्यत्वासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत  प्रस्ताव मागवण्यात आले आहेत . महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या १९ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार या जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे , आता ही समिती निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहे . या समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या आणि अल्पसंख्याकांसाठी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या जिल्ह्यातील नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव सर्व पुराव्यांसह सादर करणे आवश्यक आहे . हे प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती , नवीन जिल्हाधिकारी कार्यालय , बार्शी रोड , लातूर या कार्यालयात दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करायचे अस...

संभाव्य ‘एल निनो’मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Image
    • संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा ·          भूजल पुनर्भरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार   लातूर , दि. २२ ( जिमाका) : संभाव्य ‘एल निनो’मुळे आगामी मॉन्सून काळात पडणारा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा राहणार असून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यासोबतच आगामी पावसाळ्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या. जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी , लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव , निवासी उप जिल्हाधिकारी केशव नेटके , जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता...

सर्व प्रकारच्या आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

Image
    • जिल्ह्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा , • जुने पूल , तलावांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना • विभागांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे सादर करण्याच्या सूचना   लातूर , दि. २२ ( जिमाका) : मॉन्सून काळात उद्भवणाऱ्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावरील सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच सर्व विभागांनी आपली आपत्कालीन प्रतिसाद कार्यपद्धती (एसओपी) अद्ययावत करावी , अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिल्या. मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी , लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव , निवासी उप जिल्हाधिकारी केशव नेटके , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले , जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे , कार्यकारी अभियंता अमरसिंग पाटील , रोहित जगताप , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस...

'उमेद' अभियानातून लातूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट

Image
 

विशेष लेख : 'उमेद' अभियानातून लातूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट

Image
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच 'उमेद' अभियानाद्वारे लातूर जिल्ह्यामध्ये सन २०१८ पासून ग्रामीण विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. हे अभियान ग्रामीण भागातील गरीब, मागास, दिव्यांग, विधवा आणि अल्पभूधारक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारी चळवळ बनली आहे. महिलांना सक्षम संस्थांच्या माध्यमातून संघटित करून त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास करणे आणि त्यांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मूळ गाभा आहे. लातूर जिल्ह्याने 'उमेद' अभियानात उल्लेखनीय कामगिर केली असून, आतापर्यंत १ लाख ९४ हजार ८९२ महिलांना २० हजार २५० स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून अभियानाशी जोडण्यात आले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात ९६३ ग्रामसंघ, ५८ प्रभागसंघ आणि १७६ उत्पादक गटांचे एक भक्कम जाळे निर्माण करण्यात आले आहे. यामाध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीचा पाया रचला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'लखपती दीदी' या महत्त्वाकांक्षी अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून, महिलांना व्यवसाय निवडण्यापासून ते उत्पादनां...

लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन

लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन लातूर, दि. २० : खरीप २०२६ हंगामाच्या अनुषंगाने शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या कार्यालयातील गुण नियंत्रण कक्षात नितीन सोनटक्के यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली असून, कोणत्याही तक्रारीसाठी अथवा माहितीसाठी त्यांच्याशी ८२७५४८७४०० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. या कक्षाच्या कामकाजासाठी तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) बी. बी. मुंडे (भ्रमणध्वनी क्र. ७८२१८३०९०७) आणि विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए. एन. तिडके (भ्रमणध्वनी क्र. ९६०४८८३०८५) हे समन्वयक म्हणून कार्यरत राहतील. शेतकरी, वितरक किंवा विक्रेते यांना कृषी निविष्ठांच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास अथवा तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी या कक्षाशी किंवा कृषी विभागाच्या १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत करण...