Posts

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Image
सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष भक्तिपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, दि. ११ : “सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आजही दिमाखात उभे आहे, हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. गुजरात येथील सोमनाथ मंदिरांच्या पुनर्बांधणीस ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ मे रोजी प्रभास पाटण येथे विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा जागर घडवणारा सांस्कृतिक सोहळा ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्ष या विशेष भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत श्री धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते. यावेळी इलेक्ट्रानिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तथा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यपाल यांचे सचिव डॉ.प्रशांत ...

लातूर जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; २० मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. ११ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या सहा शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी गरजू विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये लातूर एमआयडीसी , लामजना (ता. औसा) , तोंडारपाटी (ता. उदगीर) आणि मरशिवणी (ता. अहमदपूर) येथे मुलांच्या शाळा , तर जाऊ (ता. निलंगा) आणि बावची (ता. रेणापूर) येथे मुलींच्या निवासी शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गासाठी मुख्यत्वे प्रवेश दिले जाणार असून , सातवी ते दहावीच्या वर्गांमधील रिक्त जागांवरही प्रवर्गानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्रवेशासाठी शासनाचे आरक्षणाचे नियम लागू असून , त्यात अनुसूचित जातीसाठी ८० टक्के , अनुसूचित जमाती १० टक्के , विमुक्त भटक्या जमाती ३ टक्के , विशेष मागास प्रवर्ग २ टक्के आणि दिव्यांग प्रवर्गासाठी ५ टक्के जागा राखीव आहेत. प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता ४० विद्यार्थी इतकी असू...

कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी; लातूर जिल्ह्यात ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ अंमलबजावणी सुरु

लातूर, दि. ११ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) शेतकऱ्यांना हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी लातूर जिल्ह्यात ' हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान ' ( सीआरटी ) प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ‘नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी , कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी’ हे ब्रीद घेऊन राबवल्या जाणाऱ्या या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. हवामानातील वाढती अनिश्चितता आणि ' एल निनो ' चा संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत करणे , हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक यांनी पत्राद्वारे सर्व सरपंच महोदयांना या अभियानाचे नेतृत्व करण्याबाबत आवाहन केले आहे. ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून हे अभियान गावागावांत पोहोचवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी रुंद व सरी वरंबे (बेड) तयार करणे , टोकन पद्धतीने लागवड , शून्य मशागत आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा , तसेच पेरणीपूर्वी बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया करण्यावर भर द्यावा. कीड नियंत्रणासाठ...

सोमनाथ स्वाभिमान पर्व

Image
  आज सोमनाथ हे भारताच्या संस्कृतीचे आणि वारशाचे प्रतीक म्हणून उभे राहिले असून, भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सामर्थ्याची ओळख जगाला करून देत आहे.

सोमनाथ ७५ वर्ष गौरवशाली वारशाची

Image
  सोमनाथ ७५ वर्ष गौरवशाली वारशाची… या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बना… कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्राचा सामूहिक जप, सोमनाथ संबंधित कथांचे कथन आदी उपक्रमांचा समावेश... दि. ८ ते ११ मे २०२६ श्री सोमनाथ मंदिर संकुल, प्रभास पाटण

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. 07 : जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र बी. प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी 2026 (एमबीए, पीसीबी व पीसीएम) ही परीक्षा एमबीए ग्रुपकरिता 9 मे, 2026 रोजी ऑनलाईन पध्दतीने लातूर जिल्ह्यातील 2 परीक्षा केंद्रावर, तसेच पीसीएम ग्रुपकरिता 12 ते 20 मे, 2026 ( दि. 16,17 व 18 मे , 2026 वगळून) या कालावधीत लातूर जिल्ह्यातील एकूण 14 परीक्षा केंद्रावर दोन सत्रामध्ये आयोजित केलेली आहे. या परीक्षा कालावधीमध्ये परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहूल कुमार मीना यांनी लागू केले आहेत.त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी परिक्षार्थी व्यतिरिक्त पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याह...

महाराजस्व अभियानांतर्गत ८ मे रोजी लातूरमध्ये समाधान शिबीर; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा

महाराजस्व अभियानांतर्गत ८ मे रोजी लातूरमध्ये समाधान शिबीर; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा लातूर, दि. ०७ : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत लातूर तालुक्यात लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनासाठी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेतील नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालयात या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लातूर महसूल मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे. लातूर तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये महसूल विभागामार्फत रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, वय, अधिवास आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर, शेतकरी दाखला, अल्पभूधारक दाखला. तसेच डिजिटल सातबारा (क्यूआर कोडयुक्त) उतारा वितरण, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि एक खिडकी योजनेअंतर्गत तत्काळ सेवा उपलब...