Posts

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला लातूर जिल्ह्यात सुरुवात;

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला लातूर जिल्ह्यात सुरुवात; • मार्च ते मे २०२६ दरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन लातूर, दि. ०२ : ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मार्च ते मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर विशेष एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश एकाच दिवसात नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. शिबिरांमध्ये उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवांमध्ये सातबारा अभिलेखातील चुका दुरुस्त करणे व डिजिटल सातबारा व आठ-अ उतारे तात्काळ पु...

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. २ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षातील देण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी १५ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्कारांकरिता अर्ज करण्यात येत आहे. त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरिता विहीत केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच पुरस्कारासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी गणना...

लातूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण

लातूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण लातूर, दि. २ : माहे एप्रिल २०२६ पासून सर्व वेतन देयके केवळ राज्य शासनाच्या नवीन सेवार्थ प्रणालीद्वारेच तयार करून ऑनलाइन पद्धतीने ई-हस्ताक्षरासह ई-देयक कोषागारात सादर करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. या नवीन प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १० मार्च २०२६ रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला माळा, डीपीडीसी हॉल, लातूर येथे दोन सत्रांत होणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी ११.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सर्व उपकोषागार कार्यालय स्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी, तर दुपारच्या सत्रात दुपारी ३.३० ते ५.०० वाजेपर्यंत कोषागार कार्यालय लातूर मुख्यालय स्तरावरील अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येईल. या प्रशिक्षणास सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच वेतन देयक संबंधित लेखा विषयक कामकाज पाहणारे अधिकारी व कर...

लातूर जिल्ह्यात ३ व ८ मार्च रोजी मद्यविक्री बंद

लातूर जिल्ह्यात ३ व ८ मार्च रोजी मद्यविक्री बंद लातूर, दि. ०२: जिल्ह्यात धुलीवंदन व रंगपंचमीनिमित्त ३ मार्च, २०२६ आणि ८ मार्च, २०२६ रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. ३ मार्च २०२६ धुलीवंदननिमित्त सायंकाळी ६ वाजेपर्यंत उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपुर तालुका व निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, तगरखेडा व शेळगी या गावातील मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच ८ मार्च २०२६ रोजी रंगपचंमीनिमित्त लातूर, औसा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, चाकूर व निलंगा तालुक्यातील (निलंगा तालुकयात औराद शहाजनी, तगरखेडा, शेळगी ही गावे वगळून) मद्यविक्री सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हे आदेश सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती यांना लागू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या अनुज्ञप्तीधारंकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा १९४९ व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक केशव राऊत यांनी कळविले आहे. ****

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग ३ मार्च रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग ३ मार्च रोजी बंद राहणार लातूर, दि. ०२ (जिमाका) : धुलीवंदननिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी बंद राहील. तसेच बुधवार, ४ मार्च २०२६ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास सुरु राहील. *

शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजली मुंबई, दि. २:- विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि, लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या  माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. वाघमारे यांचा इंग्रजी भाषा आणि साहित्यासह अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा गाढा अभ्यास होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अध्यापन आणि प्रशासन या अंगाने मोठा ठसा उमटवला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रभावी कार्य केले. विशेष म्हणजे त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भुषविले. या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी लातूर व्...

लातुरात महा विधी सेवा शिबीर, शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
    कायदेविषयक मदतीसोबतच शासनाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील- न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर   ·          विविध शासकीय योजनांचे वितरण; जनजजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी ·          विविध योजनांविषयी भव्य प्रदर्शनी; लातूरकरांनी नोंदविला सहभाग   लातूर, दि. २७ : सर्वसामान्य नागरिक, वंचित घटकांना त्यांच्या हक्क, अधिकारांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन करणे, त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासोबतच आता शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था पुढाकार घेत आहे. याचाच एक भाग म्हणून महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणणे, हा मूळ उद्देश असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा लातूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी सांगितले. तसेच लातूर येथे आयोजित महामेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबाब...