बीज भांडवल योजनेचा तृतीयपंथीयांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
बीज भांडवल योजनेचा तृतीयपंथीयांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. १५ : तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत बीज भांडवल योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी तृतीयपंथीयांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणाद्वारे शाश्वत रोजगार निर्माण करणे तसेच त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास साधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, लघुउद्योग व सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी हे बीज भांडवल दिले जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिका...