Posts

सबळ शेतकरी, समृद्ध महाराष्ट्र !

Image
विशेष लेख -3 दिनांक 03.07.2026 सबळ शेतकरी, समृद्ध महाराष्ट्र ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात व्यापक, तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशी योजना आहे. थकीत कर्जाचा डोंगर उपसल्यामुळे ५६ लाख शेतकरी पुन्हा एकदा बँकिंग प्रवाहाशी जोडले जातील, ज्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि बी-बियाणांसाठी पतपुरवठा उपलब्ध होईल. संपूर्ण कर्जमुक्ती, एकवेळ समझोता आणि नियमित परतफेड करणाऱ्यास प्रोत्साहनपर लाभांबाबत आपण यापूर्वीच्या लेखात समजून घेतलं. आज आपण या योजनेसाठी अपात्रताधारक कोण असतील, याबाबतही चर्चा करू. ही योजना केवळ एक कर्जमाफीची वा कर्जमुक्तीची घोषणा नाही, तर तंत्रज्ञानाची अचूक जोड देऊन राबवली जाणारी एक ऐतिहासिक मोहीम आहे. या पारदर्शक पद्धतीमुळे मध्यस्थांचा सुळसुळाट थांबेल आणि आर्थिक मदत थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल. आता गरज आहे ती फक्त एकाच गोष्टीची-शेतकऱ्यांनी जागरूक राहून आपले डिजिटल प्रमाणीकरण वेळेवर पूर्ण करण्याची ! तरच या ऐतिहा...

सी.आय.एस.एफ. मध्ये 'पॅरा मेडिकल स्टाफ'ची भरती; लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

सी.आय.एस.एफ. मध्ये 'पॅरा मेडिकल स्टाफ'ची भरती; लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन लातूर, दि. ०३ : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 'पॅरा मेडिकल स्टाफ' या तात्पुरत्या पदांच्या भरतीसाठी पात्र पुरुष आणि महिला भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत ए.एस.आय. (औषध विक्रेता) ची १८ पदे, ए.एस.आय. (एक्स-रे टेक्निशियन) चे १ पद आणि ए.एस.आय. (लॅब टेक्निशियन) च्या ५ पदांसह एकूण २४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या एकूण २४ पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी १५, ई.डब्लू.एस. साठी १, ओ.बी.सी. साठी ५, एस.सी. साठी २ आणि एस.टी. प्रवर्गासाठी १ पद राखीव असून, औषध विक्रेता पदांमध्ये २ जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही भरती सर्व पुरुष व महिला उमेदवारांसाठी खुली असून पात्र उमेदवारांना केवळ एकाच पदासाठी अर्ज करता येईल. लातूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आणि माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ७ जुलै २०२६ रो...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे मिळणार ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी

विशेष लेख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे मिळणार ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज हे केवळ एक आर्थिक सहाय्य नसून, ते शेतीच्या संपूर्ण उत्पादन चक्राला गती देणारे एक महत्त्वाचे साधन आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसह इतरही कारणांमुळे अनेकदा शेतकरी कर्जबाजारीपणाच्या चक्रात अडकतात. एकदा पीक कर्ज थकीत झाले की, त्या शेतकऱ्यांची पतक्षमता कमी होते आणि पुढील हंगामासाठी नवीन कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शेतीच्या अर्थकारणाची गती मंदावते. हीच बाब लक्षात घेऊन, राज्य शासनाने थकीत कर्जदार शेतकऱ्यांना पुन्हा बँकिंग व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकरी बांधवांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. पीक कर्ज थकीत झाल्यानंतर संबंधित कर्जखाते बँकिंग नियमांनुसार अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्ज मिळणे शक्य न झाल्याने, त्य...

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 3 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 4 जुलै, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 18 जुलै, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यत...

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 3 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 4 जुलै, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 18 जुलै, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यत...

खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यातंर्गत पीक स्पर्धेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

वृत्त क्र. : 453 दिनांक : 3 जुलै,2026 खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यातंर्गत पीक स्पर्धेकरिता अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ०३ (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यातंर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगामन सन २०२६ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफुल या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप पीक स्...

स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांनी ३१ जुलै पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

*वृत्त क्र. : 451* स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांनी ३१ जुलै पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ०३ (जिमाका) : केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांसाठी 'मार्जिन मनी योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी लातूर जिल्ह्यातील इच्छूक नवउद्योजक लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव ३१ जुलै २०२६ पूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. या योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना ९ मार्च २०२० रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आल्या असून, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांच्या निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या नवउद्योजकांनी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून, आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत समाज कल्याण कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. अंतिम मुदतीन...