Posts

ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर लातूर, दि. १० : ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना ऊर्जा मंत्रालयाचा ‘ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२४-२५’ जाहीर झाला आहे. जिल्ह्यात वीज बचतीबाबत जनजागृती करणे, शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवणे आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेऊन ऊर्जा मंत्रालयाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. या सन्मानामुळे लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने ऊर्जा बचतीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, शाश्वत ऊर्जा वापर, सौर ऊर्जेचा अवलंब आणि कार्यक्षम व्यवस्थापन यावर भर दिला. या कामगिरीसाठी कार्यालयाला ऊर्जा संवर्धन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे प्रशासकीय पातळीवर हरित ऊर्जेचे अनुकरणीय उदाहरण ठरले आहे. एनर्जी ऑडिट २०२२-२३ मध्ये दिलेल्या...

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

Image
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम लातूर दि. १० (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. पालकमंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल. त्यांतर दुपारी १ वाजता ते लातूर विमानतळाच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. दुपारी २ ते २.५० वाजेपर्यंत राखीव. दुपारी ३ वाजता लातूर एमआयडीसी येथील विवेकानंद कॅन्सर अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला पालकमंत्री श्री. भोसले भेट देतील. दुपारी ३.३० वाजता लातूर येथून औसाकडे प्रयाण करतील. दुपारी ४ वाजता औसा येथील आझाद चौक येथे भाजपाचे वसीम खोजन यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर औसा येथून साताराकडे प्रयाण करतील. ****

इयत्ता बारावी परीक्षा केंद्रांवरील बैठे पथकांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी घेतला आढावा

इयत्ता बारावी परीक्षा केंद्रांवरील बैठे पथकांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी घेतला आढावा लातूर जिल्ह्यातील 101 परीक्षा केंद्रांवर आजपासून इयत्ता बारावी परीक्षा सुरू झाली आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर तीन अधिकारी, कर्मचारी यांचे बैठे पथक तैनात करण्यात आले असून या पथकामार्फत परीक्षा केंद्रांवर निगराणी ठेवण्यात येत आहे. आज पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी जिल्हा परिषदेत इयत्ता बारावी परीक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व बैठे पथकांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बैठे पथकांतील सदस्यांकडून परीक्षा केंद्रांवरील उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे परीक्षा केंद्र परिसराची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून...

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन लातूर दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांच्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर हे यावेळी महसूल विषयक, कौटुंबिक वादविवाद संदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी, त्यावर योग्य ते कायदेविषयक मार्गदर्शन व आवश्यक ती मदत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित यांनी लातूर जिल्हा सैनिक कार्यालय येथे आवश्यक त्या कागदपत्रासोबत उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. *****

सुरक्षित इंटरनेट दिन विशेष... ऑनलाईन सुरक्षिततेसाठी घ्या खबरदारी !

सुरक्षित इंटरनेट दिन विशेष... ऑनलाईन सुरक्षिततेसाठी घ्या खबरदारी ! सुरक्षित इंटरनेट दिन हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो. या दिनाचा उद्देश विशेषतः मुले व तरुणांमध्ये इंटरनेटचा सुरक्षित, जबाबदार आणि सकारात्मक वापर करण्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. तसेच, दरवर्षी उद्भवणाऱ्या नवीन ऑनलाईन समस्या व सध्याच्या सायबर सुरक्षेशी संबंधित आव्हानांबाबत समाजामध्ये जागरूकता वाढविणे हा देखील या दिनाचा महत्त्वाचा हेतू आहे. शासकीय कामकाजात सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व लक्षात घेता, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी), जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या वतीने “सिक्युअर युवर अकाऊन्टस” ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश सर्व शासकीय कार्यालये, बँका, खाजगी संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या ऑनलाईन खात्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करणे हा आहे. सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स : १) इंटरनेट सुरक्षेसाठी टिप्स : केवळ विश्वसनीय व अधिकृत संकेतस्थळेच वापरा; कोणताही दुवा (Link) उघडण्यापूर्वी त्याची खात्री करा. HTTPS अ...

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; मतमोजणीला सकाळी दहापासून होणार सुरुवात

Image
 _लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६_ लातूर , दि. ०८ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ झालेल्या मतदानात लातूर जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार २३५ मतदारांनी म्हणजेच ६३.७९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ उमेदवार, तर दहा पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्येक तालुकास्तरावर सकाळी १० पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.   जिल्ह्यात मतदान यंत्रावरील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी १४२ टेबल लावण्यात आले आहेत. लातूर येथे २०, अहमदपूरमध्ये १४, उदगीर येथे १४, निलंगा येथे २०, औसा येथे १८, रेणापूर येथे १६, देवणी येथे १२, शिरूर अनंतपाळ येथे ८, चाकूर येथे १० आणि जळकोट येथे १० टेबलवर ईव्हीएम मतमोजणी होईल. यासोबतच टपाली मतपत्रिका मोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यात १ हजार २९१ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.   ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण · मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश · जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात · मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण · मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश · जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात · मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका लातूर, दि. ०६ : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व मतदान पथके आज संबंधित तालुका स्तरावरून रवाना झाली. तसेच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने आवश्यक सज्जता केली आहे. जिल्ह्यात एकूण ५९ जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी २४२ उमेदवार निवडणू...