Posts

Image
प्रासंगिक लेख / महात्मा फुले जयंती /11 एप्रिल 2026 सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्य...

एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे धडे मिळणार; १५ एप्रिल रोजी ‘डिजिटल शेती शाळा’ उपक्रमाचे आयोजन

एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे धडे मिळणार; १५ एप्रिल रोजी ‘डिजिटल शेती शाळा’ उपक्रमाचे आयोजन लातूर, दि. १० : हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जात शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग महाराष्ट्र राज्य, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता ‘डिजिटल शेती शाळा भाग-३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात प्रामुख्याने ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार असून, यामध्ये सापळा पिकांची लागवड, जैविक व नैसर्गिक कीड व्यवस्थापन, शेतात पक्षी थांबे उभारणे, चिकट सापळ्यांचा वापर आणि मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीत योग्य वापर कसा करावा, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याने सर्व शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, एफपीओ आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आपल्या भागातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृ...

संकटात सापडलेल्या महिलांचा हक्काचा आधार : 'सखी' वन स्टॉप सेंटर

Image
विशेष लेख संकटात सापडलेल्या महिलांचा हक्काचा आधार : 'सखी' वन स्टॉप सेंटर अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ जेव्हा संपतं, तेव्हा मदतीचा एक हातही खूप मोलाचा ठरतो. महिलांच्या आयुष्यातील असाच एक हक्काचा आणि विश्वासाचा हात म्हणजे लातूर येथे कार्यरत असलेले 'सखी' वन स्टॉप सेंटर. घरगुती हिंसाचार असो वा सामाजिक अन्याय, कोणत्याही संकटात सापडलेल्या महिलेला 'एकाच छताखाली सर्व मदत' देणारे हे केंद्र आज लातूर जिल्ह्यातील शेकडो महिलांसाठी खऱ्या अर्थाने 'सखी' ठरले आहे. भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांना आदराचे स्थान असले तरी, आजही काही महिलांना घराच्या उंबरठ्याआड किंवा सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो. अशा वेळी ‘कुणाकडे दाद मागावी?’ हा प्रश्न पीडितेसमोर डोंगरासारखा उभा असतो. याच प्रश्नाचे उत्तर म्हणून भारत सरकारने 'वन स्टॉप सेंटर' अर्थात 'सखी केंद्र' ही संकल्पना अंमलात आणली. लातूर येथे २० जून २०२० रोजी सखी केंद्राची स्थापना झाली आणि अवघ्या काही वर्षांतच हे केंद्र अन्यायग्रस्त महिलांच्या जीवनातील अंधार दूर करणारे दीपस्तंभ ...

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण लातूर, दि. १० : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU) द्वारे सुरू असलेल्या १७५ पदांच्या भरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांकडून भरती प्रक्रियेबाबत विचारणा होत आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, विद्यापीठाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार ही भरती प्रक्रिया निरंतर सुरू आहे. या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार विद्यापीठाला ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याची अनुमती दिली आहे. न्यायालयाच्या अंतरिम निर्देशानुसार, केवळ १४ याचिकाकर्ते ज्या पदांवर सध्या कार्यरत आहेत, ती पदे वगळून उर्वरित सर्व पदांची भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. या प्रकरणातील तांत्रिक बाबी स्पष्ट करताना विद्यापीठाने नमूद केले की, संबंधित याचिकाकर्ते हे बाह्य कंत्राटदारामार्फत प...

लातूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा

लातूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा लातूर, दि. ०९ : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) दैदिप्यमान इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ९ एप्रिल हा शौर्य दिन आज लातूर येथील सीआरपीएफ कँम्पमध्ये मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात आला. ९ एप्रिल १९६५ रोजी पाकिस्तानी सैन्याने गुजरातच्या कच्छ रणातील भारतीय चौक्यांवर कब्जा मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन डेजर्ट हॉक’ सुरू केले होते. यावेळी सीमेवरील ‘सरदार’ आणि ‘टाक’ या चौक्यांच्या रक्षणाची जबाबदारी सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनच्या जवानांवर होती. पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या एका बलाढ्य ब्रिगेडने अचानक हल्ला चढवला, मात्र संख्येने कमी असूनही सीआरपीएफच्या जवानांनी अत्यंत धाडसाने हा हल्ला परतावून लावला. सलग १२ तास चाललेल्या या ऐतिहासिक लढाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानी लष्कराचे ३४ जवान टिपले. एका निमलष्करी दलाने लष्कराच्या मोठ्या तुकडीला रोखून धरण्याची ही जगाच्या लष्करी इतिहासातील दुर्मिळ कामगिरी ठरली. याच शौर्याचे स्मरण म्हणून आज लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

लातूर जिल्हा परिषदेत सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर

लातूर जिल्हा परिषदेत सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर लातूर, दि. ०९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने 'सामाजिक समता सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी या सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ८ ते १४ एप्रिल या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या विशेष सप्ताहाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा प्रसार आणि महापुरुषांच्या समतेच्या विचारांचा जागर संपूर्ण जिल्ह्यात केला जाणार आहे. या उद्घाटन प्रसंगी लातूर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार विजेते बालाजी धोंडीराम पवार यांचा सत्कार करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, दिव्यांग शाळा आणि शासकीय वसतिगृहांमध्ये मानवी हक्कांवर आधारित व्याख्याने,...

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी लातूर, दि. ०९ : केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना रिलायन्स इंडस्ट्रीज, एच.डी.एफ.सी. बँक आणि गेल (इंडिया) लिमिटेड यांसारख्या देशातील आघाडीच्या २००० कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना प्रतिमहा ९ हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार असून, ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या योजनेसाठी १८ ते २५ वयोगटातील इयत्ता १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर असलेले बेरोजगार तरुण पात्र आहेत. केवळ मानधनच नव्हे, तर प्रशिक्षणार्थींना ६ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणही दिले जाणार आहे. सध्या या योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला असू...