Posts

लातूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा

लातूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा लातूर, दि. ०९ : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) दैदिप्यमान इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ९ एप्रिल हा शौर्य दिन आज लातूर येथील सीआरपीएफ कँम्पमध्ये मोठ्या अभिमानाने साजरा करण्यात आला. ९ एप्रिल १९६५ रोजी पाकिस्तानी सैन्याने गुजरातच्या कच्छ रणातील भारतीय चौक्यांवर कब्जा मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन डेजर्ट हॉक’ सुरू केले होते. यावेळी सीमेवरील ‘सरदार’ आणि ‘टाक’ या चौक्यांच्या रक्षणाची जबाबदारी सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनच्या जवानांवर होती. पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या एका बलाढ्य ब्रिगेडने अचानक हल्ला चढवला, मात्र संख्येने कमी असूनही सीआरपीएफच्या जवानांनी अत्यंत धाडसाने हा हल्ला परतावून लावला. सलग १२ तास चाललेल्या या ऐतिहासिक लढाईत भारतीय जवानांनी पाकिस्तानी लष्कराचे ३४ जवान टिपले. एका निमलष्करी दलाने लष्कराच्या मोठ्या तुकडीला रोखून धरण्याची ही जगाच्या लष्करी इतिहासातील दुर्मिळ कामगिरी ठरली. याच शौर्याचे स्मरण म्हणून आज लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

लातूर जिल्हा परिषदेत सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर

लातूर जिल्हा परिषदेत सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर लातूर, दि. ०९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने 'सामाजिक समता सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी या सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ८ ते १४ एप्रिल या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या विशेष सप्ताहाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा प्रसार आणि महापुरुषांच्या समतेच्या विचारांचा जागर संपूर्ण जिल्ह्यात केला जाणार आहे. या उद्घाटन प्रसंगी लातूर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार विजेते बालाजी धोंडीराम पवार यांचा सत्कार करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, दिव्यांग शाळा आणि शासकीय वसतिगृहांमध्ये मानवी हक्कांवर आधारित व्याख्याने,...

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी लातूर, दि. ०९ : केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना रिलायन्स इंडस्ट्रीज, एच.डी.एफ.सी. बँक आणि गेल (इंडिया) लिमिटेड यांसारख्या देशातील आघाडीच्या २००० कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना प्रतिमहा ९ हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार असून, ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या योजनेसाठी १८ ते २५ वयोगटातील इयत्ता १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर असलेले बेरोजगार तरुण पात्र आहेत. केवळ मानधनच नव्हे, तर प्रशिक्षणार्थींना ६ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणही दिले जाणार आहे. सध्या या योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला असू...

लातूर येथे १० एप्रिल रोजी 'मार्जिन मनी' योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

लातूर येथे १० एप्रिल रोजी 'मार्जिन मनी' योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन लातूर, दि. ०८ : केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या 'मार्जिन मनी' योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी लातूरमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून ही कार्यशाळा १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील सभागृहात होईल. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्जिन मनी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ९ डिसेंबर २०२० रोजी मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या असून, अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शासन निर्णयाचे अवलोकन करू शकतात. मार्जिन मनी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून आपले प्रस्ताव ३० एप्रिल २०२६ पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल...

लातूर येथे ९ एप्रिल रोजी 'जागेवरच निवड संधी' रोजगार मेळाव्याचे आयोजन

लातूर येथे ९ एप्रिल रोजी 'जागेवरच निवड संधी' रोजगार मेळाव्याचे आयोजन लातूर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय 'जागेवरच निवड संधी' (प्लेसमेंट ड्राईव्ह) मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाच्या परिसरात होईल. या मेळाव्यामध्ये नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असून १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आय.टी.आय. आणि डिप्लोमाधारक उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम आणि पासपोर्ट फोटोच्या तीन प्रतींसह जिल्हा क्रीडा संकुल समोरील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले ...

अमृत संस्थेमार्फत ८ ते २५ एप्रिल दरम्यान लक्षित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण

अमृत संस्थेमार्फत ८ ते २५ एप्रिल दरम्यान लक्षित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण लातूर, दि. ७ (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी 'अमृत परिवार सर्वेक्षण अभियान' राबविण्यात येत आहे. लातूरसह महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकातील युवक-युवती व उमेदवारांच्या प्रगतीसाठी 'अमृत' कार्यरत आहे. या संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व प्रगत कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन आणि वैयक्तिक व्याज परतावा योजना (उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी) यांसारख्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सध्या अमृतच्या लक्षित गटामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळ...

लातूर जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

लातूर जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. ६ (जिमाका): हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार लातूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रियेला आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एम. व्ही. वाजपेयी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. लातूर जिल्ह्यात चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया १ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणीचा कालावधी वाढवून आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत केला आहे. शासनाने दिलेल्या विहित कालावधीतच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. ही नोंदणी प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून, कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. लातूर जिल्ह्यातील ज्य...