Posts

शेती सुधारणा आणि शेतघरासाठी गौण खनिजांच्या वापरावर आता रॉयल्टी आणि दंडाची कारवाई नाही!

Image
* विशेष वृत्त : 449* शेती सुधारणा आणि शेतघरासाठी गौण खनिजांच्या वापरावर आता रॉयल्टी आणि दंडाची कारवाई नाही! लातूर, दि. ०२ : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता नैसर्गिकरीत्या टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेती सुधारणा, शेतरस्त्यांची दुरुस्ती, विहीर किंवा शेतघर आणि जनावरांचा गोठा बांधण्यासाठी लागणाऱ्या गाळ, माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांच्या वापरावर आकारले जाणारे स्वामित्वधन (रॉयल्टी) पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, या कामांसाठी गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर किंवा बैलगाड्यांवर यापुढे कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने आज निर्गमित केला आहे. मात्र, माती किंवा मुरुमाचा वापर जर व्यावसायिक किंवा वाणिज्यिक उद्देशासाठी केला जात असेल, तर त्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई सुरूच राहील. गेल्या काही वर्षांत सततचा दुष्काळ, हवामान बदल आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीची सुपीकता खालावत चालली आहे. दुसरीकडे, जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील गावतळी, शेततळी, प...

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' पात्र थकीत कर्जखात्यांवर व्याज न आकारण्याचे जिल्हा बँकांना आदेश

Image
विशेष वृत्त 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' पात्र थकीत कर्जखात्यांवर व्याज न आकारण्याचे जिल्हा बँकांना आदेश लातूर, दि. ०२ : राज्य शासनाच्या सहकार विभागाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६' अंतर्गत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्ज खात्यांवर ०१ एप्रिल २०२६ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीसाठी व्याज आकारणी करू नये, असे आदेश शासनाने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत. राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत ३० जून २०२५ रोजी थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पात्र पीककर्जे या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात आली आहेत. अशा पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर एकवेळ समजोता योजनेच...

दुष्टचक्रातून कायमची सुटका... अन् पतपात्र शेतकरी ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Image
विशेष लेख -2 दिनांक 02.07.2026 दुष्टचक्रातून कायमची सुटका... अन् पतपात्र शेतकरी ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सहकार विभाग, बँका यांच्या समन्वयातून अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून कायमची सुटका करण्यासाठी, त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर अशा तरतुदी शासनाने या योजनेत केल्या आहेत. यापूर्वीच्या लेखात आपण दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा, योजनेला दिलेले विचारपूर्वक असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव, शासनाचा या योजनेमागील दूरदृष्टीकोन पाहिला. आज या योजनेतील अभ्यासपूर्ण अशा तरतुदी पाहुयात. शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी कल्याणाचा ३०० वर्षांपूर्वीचा आदर्श या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. संपूर्ण कर्जमुक्ती, एकवेळ समझोता आणि नियमित परतफेड करणाऱ्यास प्रोत्साहनपर लाभ ही योजनेची तीन मुख्य स्तंभ आहेत. तब्बल ३६ हजार ५८५ कोटींची राज्यातील ५६ लाख...

अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा -२०२६ उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य

अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा -२०२६ उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य लातूर, दि. २ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी, इत्यादी) उमेदवारांना संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य (सन २०२६-२७) योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ मध्ये (युपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२६ उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबंधितांनी https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज सादर करण्यापूर...

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची विशेष शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची विशेष शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना लातूर, दि. २ : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने तृतीयपंथीय व्यक्तींच्या कल्याणासाठी 'SMILE' (Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise) या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत विशेष उपयोजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना केंद्र शासनाच्या https://transgender.dosje.gov.in/ या राष्ट्रीय पोर्टलवरून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शासनमान्य किंवा खासगी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये इयत्ता नववी ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या व भारताचे नागरिक असलेल्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १३ हजार ५०० रुपये इतकी मॅट्रिकपूर्व (प्रि-मॅट्रिक) व मॅट्रिकोत्तर (पोस्ट-मॅट्रिक) शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याकडे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी केलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असणे आणि त्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. ही शिष्यवृत्ती मर्यादित स्वरूपात असल्या...

पुनर्रचित फळपिक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

वृत्त क्र. : 442 पुनर्रचित फळपिक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. २ : मृग बहार २०२६-२७ मध्ये लातूर जिल्ह्यात डाळींब, लिंबू, पेरू, सिताफळ आणि चिकू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविली जाणार आहे. ही योजना बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पुणे यांच्यामार्फत कार्यान्वित होईल. शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत हवामान केंद्रांवर नोंदविलेल्या माहितीनुसार सहभागी शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई मिळेल. अधिसूचित फळपिके आणि महसूल मंडळे डाळींब: किनगाव, अहमदपूर, खंडाळी, नागलगाव, हेर, औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकुंड, भादा, चाकूर, नळेगाव, वडवळ ना., निलंगा, औराद शहाजानी, कारेपूर, पानगाव. चिकू: अहमदपूर. पेरू : अहमदपूर, खंडाळी, शिरूर ताजबंद, हाडोळती, मातोळा, उजनी, बेलकुंड, लामजना, किल्लारी, घोणसी, जळकोट, मुरुड बु. लिंबू : हेर. सिताफळ: शिरूर ताजबंद, उजनी, बेलकुंड, आष्टा, औराद शहाजानी, रेणापूर, पळशी, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर, हरंगूळ बु., कन्हेरी, मुरुड बु. वि...

हरंगुळ बु. येथे ४ जुलै रोजी संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिव्यांगासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा

वृत्त क्र. : 441 हरंगुळ बु. येथे ४ जुलै रोजी संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिव्यांगासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा लातूर, दि. २ (जिमाका): लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि हरंगुळ (बु.) येथील संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मी नगर, बरड वस्ती, हरंगुळ (बु.), ता. जि. लातूर येथील संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. या रोजगार मेळाव्यात लातूर येथील साईबाबा जनता सहकारी बँक लि., ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर प्रा. लि., सुजया एंटरप्रायझेस (जया ह्युंदाई), अजय फार्म मेकॅनायझेशन, राजयोग बजाज, राजयोग ऑटो प्रा. लि., राजयोग मोटर्स एलएलपी, राजर्षी फाउंडेशन, जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. आणि बघिरा गारमेंट या नामांकित आस्थापना प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. या विविध आस्था...