Posts

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी

  उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर ; १८ जून रोजी मतदान , तर २२ जूनला होणार मतमोजणी   लातूर, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ पर्यंत असून उमेदवारी अर्जांची छाननी २ जून २०२६ रोजी केली जाईल , तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.   यानंतर गुरुवार , १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोमवार , २२ जून २०२६ रोजी मतमोजणी केली जाईल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचे...

रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे

  औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद ;   रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे ' अन्न व औषध प्रशासन ' विभागाचे आवाहन   लातूर , दि. १८ : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आगामी बुधवार , २० मे २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून , या बंदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील रुग्णांची व नागरिकांची औषधांविना गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खबरदारीचे आवाहन केले आहे . लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पत्रान्वये या संपामध्ये संघटनेच्या सभासदांनी सहभागी होऊ नये , अशी विनंती प्रशासनामार्फत १४ मे २०२६ रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे . मात्र , खबरदारीचा उपाय म्हणून ज्या रुग्णांना नियमित औषधोपचारांची आवश्यकता आहे , अशा रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी बंदच्या कालावधीत होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवावीत , असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड यांनी केले आहे .   या बंदच्या कालावधीत जर एखाद्या गरजू रुग्णाला तातडीने औषध उपलब्ध झाले नाह...

खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधुमित्र पुरस्कार लातूरच्या ज्ञानेश्वर मलीले यांना जाहीर

  छत्रपती संभाजीनगर येथे   20   मे   2026   रोजी होणार पुरस्कारांचे वितरण लातूर ,   दि.   18 :   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिले जाणारे   2026   सालचे   ‘ मधुमित्र ’   व   ‘ मधु-सखी ’   पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलीले ,   छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल ,   बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहिर झाले आहे त.   याशिवाय निवड समितीने ठाण्याचे चंद्रकांत तरे ,   पुण्याचे संजय मारणे ,   कोल्हापूरचे दयावान पाटील आणि जळगावचे विद्यानंद आहिरे यांची विशेष सन्मानासाठी निवड केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी दिली.   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या   ‘ मधाचे गाव ’   तसेच जागतिक मधमाशी दिनाच्या   निमित्ताने योजलेला   ‘ मधु मित्र   –   मधु सखी पुरस्कार ’   तसेच मंडळाच्या विविध कार्याविषयीची सभापती साठे यांनी द...

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद; रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे 'अन्न व औषध प्रशासन' विभागाचे आवाहन

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद; रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे 'अन्न व औषध प्रशासन' विभागाचे आवाहन लातूर, दि. १८ : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आगामी बुधवार, २० मे २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून, या बंदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील रुग्णांची व नागरिकांची औषधांविना गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खबरदारीचे आवाहन केले आहे. लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पत्रान्वये या संपामध्ये संघटनेच्या सभासदांनी सहभागी होऊ नये, अशी विनंती प्रशासनामार्फत १४ मे २०२६ रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ज्या रुग्णांना नियमित औषधोपचारांची आवश्यकता आहे, अशा रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी बंदच्या कालावधीत होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड यांनी केले आहे. या बंदच्या कालावधीत जर एखाद्या गरजू रुग्णाला तातडीने औषध उपलब्ध झाले नाही किंवा अत्यावश्यक औषधांची गरज भासली, तर नागर...

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी ‘अमृत’ संस्थेतर्फे मोफत ड्रोन प्रशिक्षण

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी ‘अमृत’ संस्थेतर्फे मोफत ड्रोन प्रशिक्षण · प्रशिक्षणानंतर अधिकृत 'ड्रोन पायलट परवाना'ही मिळणार लातूर, दि. १८ (जिमाका): आजच्या आधुनिक काळात शेती, फोटोग्राफी, सर्वेक्षण, सुरक्षा यांसह अनेक तांत्रिक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सामान्यतः ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अधिकृत 'ड्रोन पायलट परवाना' देखील दिला जाणार आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. याच अंतर्गत संस्थेने ‘अमृत ड्रोन मिशन’ हा उपक्रम हाती घेतला असून, त्याद्वारे हे ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण सुरू करण्यात आल...

२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे दोन दिवसांत निकाली

Image
२६ वर्षांपासून प्रलंबित सातबारा दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे दोन दिवसांत निकाली लातूर, दि. १५ : एका तलाठ्याच्या चुकीमुळे सातबारा उताऱ्यावर २६ वर्षांपूर्वी झालेली चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्धाला लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या संवेदनशीलतेमुळे अखेर न्याय मिळाला आहे. वयोवृद्ध शेतकरी प्रभाकर प्रयाग यांचा काही वर्षांपासून रेंगाळलेला सातबारा दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ दोन दिवसांत मार्गी लावला. लातूर येथील रहिवासी प्रभाकर विनायकराव प्रयाग (वय ८५) यांची खोपेगाव शिवारात वडिलोपार्जित जमीन आहे. २६ वर्षांपूर्वी वासनगाव तलावाच्या कालव्यासाठी या परिसरातील जमीन संपादित करण्यात आली होती. हा कालवा वास्तविक प्रभाकर प्रयाग यांच्या भावाच्या शेतातून गेला होता. मात्र, तत्कालीन तलाठ्याच्या नजरचुकीमुळे श्री. प्रयाग यांच्याही सातबाऱ्यावर '६ आर' जमीन संपादित झाल्याची नोंद करण्यात आली. ही चुकीची नोंद काढण्यासाठी श्री. प्रयाग मागील काही वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागत होते, मात्र हा तांत्रिक पेच सुटत नव्हता. य...

रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा;रासायनिक खतांसाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन

रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा;रासायनिक खतांसाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. १५ : पश्चिम आशियाई देशांतील सद्यस्थिती आणि जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र व राज्य शासनाने कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. त्यानुसार रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक, जैविक आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनानुसार, राज्य शासनाने कृषी विभागामार्फत विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असून, जागतिक बाजारपेठेतील खतांच्या उपलब्धतेवरही परिणाम होत आहे. ही परिस्थिती विचारात घेता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. यामुळे केवळ जमिनीची सुपीकता टिकणार नाही, तर उत्पादन खर्च कमी होऊन विषमुक्त अन्ननिर्मितीला चालना मिळेल. ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन भ...