Posts

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी; लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा रविवारी; लातूर शहरातील ९ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार, ३१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आयोजित करण्यात आली असून, या परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लातूर शहरातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये शहरातील ९ परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये पार पडणार असून हे आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ०८.०० वाजेपासून ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी परीक्षार्थीं व्यतिरिक्त ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीं...

आचारसंहितेमुळे १ जून रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित

आचारसंहितेमुळे १ जून रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित लातूर, ३० मे (जिमाका): लातूर जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे आगामी सोमवार, १ जून २०२६ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती लातूरचे प्रभारी उपजिल्हाधिकारी (सामान्य) गणेश पवार यांनी दिली आहे. ****

बकरी ईदनिमित्त २८ मे रोजी शासकीय रुग्णालयांची 'ओपीडी' बंद

बकरी ईदनिमित्त २८ मे रोजी शासकीय रुग्णालयांची 'ओपीडी' बंद लातूर, दि. २६ : काही दिनदर्शिकांमध्ये बुधवार, २७ मे २०२६ रोजी बकरी ईदची सुट्टी दर्शवण्यात आली असली, तरी महाराष्ट्र शासनाने बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी गुरुवार, २८ मे २०२६ रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग गुरुवार, २८ मे २०२६ रोजी बंद राहील. शासकीय रुग्णालयांचा बाह्यरुग्ण विभाग बुधवार, २७ मे २०२६ रोजी नियमित वेळेप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहील, तर गुरुवार, २८ मे रोजी सुट्टी असल्याकारणाने पूर्णपणे बंद राहणार आहे. शासकीय रुग्णालयातील ओपीडी विभाग गुरुवारी बंद असला, तरी रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी कळविले आहे. ****

लातूर येथे निवृत्तीवेतनधारक आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी पेन्शन अदालत, कार्यशाळा उत्साहात

लातूर येथे निवृत्तीवेतनधारक आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी पेन्शन अदालत, कार्यशाळा उत्साहात महालेखाकार नागपूर व जिल्हा कोषागार कार्यालय लातूरचा संयुक्त उपक्रम लातूर, दि. २५ (जिमाका): जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महालेखाकार आणि लातूर जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डीपीडीसी हॉलमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नागपूर महालेखापाल कार्यालयाचे वरिष्ठ लेखाधिकारी मैथिली जगन्नाथन, सहायक लेखाधिकारी चेतनकुमार गुप्ता आणि लेखापाल समिर मीना यांनी उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांना निवृत्ती वेतन प्रकरणे (पेंशन पेपर्स) अत्यंत अचूकपणे कसे सादर करावेत, याबाबत सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच निवृत्तीवेतनधारकांना येणाऱ्या विविध अडचणी व समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांचे जागेवरच निराकरण केले. या बैठकीला लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिल्हा कोषागार अधिक...

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण

लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना; लातूर जिल्ह्यात २ टँकर, ७५ खाजगी विहिरींचे अधिग्रहण लातूर, दि. २३ : जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जळकोट तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जळकोट तालुक्यातील २ गावे आणि १ वाडी अशा एकूण ३ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवले जात असल्यामुळे सुमारे ३,३१० नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी शासनाचे २ टँकर कार्यरत असून त्यांच्या दररोज एकूण ४ फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. प्रामुख्याने जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा - वाघमारी तांडा आणि गव्हाण येथे टँकर मंजूर करण्यात आले आहेत. टँकर व्यतिरिक्त जिल्ह्या...

युवक-युवतींनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

युवक-युवतींनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन लातूर, दि. २३ (जिमाका): राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-२०१९ अंतर्गत राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सृजनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुक्ष्म व लघु उपक्रमांना विशेष चालना दिली जात आहे. या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडून बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर अर्जदाराच्या जात प्रवर्ग आणि उद्योग क्षेत्रानुसार १५ ते ३५ टक्के अनुदान दिले जाते, ज्यामध्ये सेवा उद्योग, उत्पादन उद्योग तसेच कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, एकाच नाममुद्रेवर (ब्रँड) आधारित संघटित साखळी विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र, कुक्कुट ...

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 11 जून रोजी प्रस्तावित; नव उद्योजकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 11 जून रोजी प्रस्तावित; नव उद्योजकांनी नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. 23 (जिमाका): उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी 11 जून २०२6 रोजी लातूर येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी नव उद्योजकांनी लातूर जिल्हा उद्योग केंद्र लातूर येथे आपल्या नव उद्योग तथा व्यवसायाची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी केले आहे. या परिषदेचा उद्देश जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवणे, नवउद्योजकांना आकर्षित करणे आणि गुंतवणूकदार-व्यवसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि लातूर जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू बनवून जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देणे हा आहे. या परिषदेमध्ये नव उद्योजकांसोबत सामंजस्य करार होऊन त्यांना एमआययू वितरित केले जाणार आहेत. *****