Posts

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

Image
मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्त...

विशेष लेख: भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा

  विशेष लेख:   भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा -           ब्रिजेश सिंह ,  प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय   भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच ,  १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिले आणि एक प्रतिज्ञा केली सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची. तो क्षण म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा पहिला मोठा जागर ;  आपल्या सभ्यतेच्या स्वाभिमानाच्या सार्वजनिक पुनर्प्राप्तीचा क्षण होता.   आणि आता ,  ११ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापित तेजात सहभाग घेतला ,  तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्याने प्रज्वलित झाल्यासारखी वाटते. विशेष महापूजा ,  कुंभाभिषेक ,  ध्वजारोहण आणि लाखो भाविकांची उपस्थिती — हे सर्व मिळून भग्नावस्थेतून पुनर्निर्माणाकडे आणि पुनरु...

खरीप हंगाम २०२६-२७ करिता बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

लातूर, दि. १२ : सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) , राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान , तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.   गळीतधान्य , अन्नधान्य , तृणधान्य , भरडधान्य आणि कडधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर ही पावले उचलली जात आहेत. खरीप हंगामातील तूर , मूग , उडीद , मका , ज्वारी आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांसाठी १० वर्षांखालील आणि १० वर्षांवरील वाणांचे बियाणे वितरित केले जाणार आहे. यासोबतच पीक प्रात्यक्षिकांसाठी देखील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.   कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे संच (मिनीकीट) वितरणाची प्रक्रिया ' प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ' या तत्त्वावर राबविली जाणार आहे. यासाठी १० एप्रिल २०२६ पासून ...

डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा आता घरबसल्या उपलब्ध; नागरिकांनी एजंटांपासून सावध राहण्याचे लातूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

लातूर , दि. १२ : जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या जमिनीचे महसुली अभिलेख सुलभ , पारदर्शक आणि अत्यंत जलद गतीने उपलब्ध व्हावेत, यासाठी महसूल विभागातर्फे ‘डिजिटल सातबारा’ ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . अलीकडच्या काळात सातबारा उतारा मिळवण्यासाठी काही मध्यस्थ किंवा एजंट नागरिकांकडून अवाजवी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आणि बातम्या समोर येत आहेत . मात्र, नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा प्राप्त करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि माफक दरात उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही एजंटांच्या प्रलोभनांना बळी पडू नये , असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.   भूमी अभिलेख विभागाच्या https://bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांना स्वतःच्या जमिनीची माहिती पाहायची अथवा नोंदी तपासण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे . या पोर्टलवर नागरिक आपला जिल्हा , तालुका आणि गाव निवडून सातबारा , आठ-अ आणि मालमत्ता पत्रक कोणत्याही शुल्काशिवाय पाहू शकतात , मात्र ही प्रत केवळ माहितीसाठी असून ती कायदेशीर कामासाठी वापरता ...

लातूर येथे १५ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बँकिंग व फायनान्स क्षेत्रात नोकरीची संधी

    लातूर, दि. १२ : जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योगकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार , १५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बँकिंग , फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आयोजित हा मेळावा लातूर जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या येथे होणार आहे. या मेळाव्यामध्ये क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. (लातूर) , श्रीराम फायनान्स लिमिटेड (लातूर) , नीट लि. (पुणे) आणि पेटीएम (लातूर) यांसारख्या नामवंत आस्थापना सहभागी होणार असून त्या पुणे व लातूर येथील रिक्त पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी १० वी , १२ वी उत्तीर्ण तसेच कोणत्याही शाखेचे पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत. याव्यतिरिक्त , तरुणांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी मेळाव्यात ' प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ' चा स्वतंत्र स्टॉल देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी १५ मे रोजी सकाळी १० वाजता स्वखर्चाने ...

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Image
सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष भक्तिपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, दि. ११ : “सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आजही दिमाखात उभे आहे, हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. गुजरात येथील सोमनाथ मंदिरांच्या पुनर्बांधणीस ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ मे रोजी प्रभास पाटण येथे विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचा जागर घडवणारा सांस्कृतिक सोहळा ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्ष या विशेष भक्तिपूर्ण कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत श्री धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते. यावेळी इलेक्ट्रानिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तथा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यपाल यांचे सचिव डॉ.प्रशांत ...

लातूर जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; २० मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. ११ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या सहा शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी गरजू विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये लातूर एमआयडीसी , लामजना (ता. औसा) , तोंडारपाटी (ता. उदगीर) आणि मरशिवणी (ता. अहमदपूर) येथे मुलांच्या शाळा , तर जाऊ (ता. निलंगा) आणि बावची (ता. रेणापूर) येथे मुलींच्या निवासी शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गासाठी मुख्यत्वे प्रवेश दिले जाणार असून , सातवी ते दहावीच्या वर्गांमधील रिक्त जागांवरही प्रवर्गानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्रवेशासाठी शासनाचे आरक्षणाचे नियम लागू असून , त्यात अनुसूचित जातीसाठी ८० टक्के , अनुसूचित जमाती १० टक्के , विमुक्त भटक्या जमाती ३ टक्के , विशेष मागास प्रवर्ग २ टक्के आणि दिव्यांग प्रवर्गासाठी ५ टक्के जागा राखीव आहेत. प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता ४० विद्यार्थी इतकी असू...