Posts

लातूर येथे १० एप्रिल रोजी 'मार्जिन मनी' योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

लातूर येथे १० एप्रिल रोजी 'मार्जिन मनी' योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन लातूर, दि. ०८ : केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या 'मार्जिन मनी' योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी लातूरमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून ही कार्यशाळा १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील सभागृहात होईल. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्जिन मनी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ९ डिसेंबर २०२० रोजी मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या असून, अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शासन निर्णयाचे अवलोकन करू शकतात. मार्जिन मनी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून आपले प्रस्ताव ३० एप्रिल २०२६ पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल...

लातूर येथे ९ एप्रिल रोजी 'जागेवरच निवड संधी' रोजगार मेळाव्याचे आयोजन

लातूर येथे ९ एप्रिल रोजी 'जागेवरच निवड संधी' रोजगार मेळाव्याचे आयोजन लातूर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय 'जागेवरच निवड संधी' (प्लेसमेंट ड्राईव्ह) मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाच्या परिसरात होईल. या मेळाव्यामध्ये नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असून १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आय.टी.आय. आणि डिप्लोमाधारक उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम आणि पासपोर्ट फोटोच्या तीन प्रतींसह जिल्हा क्रीडा संकुल समोरील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले ...

अमृत संस्थेमार्फत ८ ते २५ एप्रिल दरम्यान लक्षित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण

अमृत संस्थेमार्फत ८ ते २५ एप्रिल दरम्यान लक्षित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण लातूर, दि. ७ (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी 'अमृत परिवार सर्वेक्षण अभियान' राबविण्यात येत आहे. लातूरसह महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकातील युवक-युवती व उमेदवारांच्या प्रगतीसाठी 'अमृत' कार्यरत आहे. या संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व प्रगत कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन आणि वैयक्तिक व्याज परतावा योजना (उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी) यांसारख्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सध्या अमृतच्या लक्षित गटामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळ...

लातूर जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

लातूर जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. ६ (जिमाका): हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार लातूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रियेला आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एम. व्ही. वाजपेयी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. लातूर जिल्ह्यात चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया १ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणीचा कालावधी वाढवून आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत केला आहे. शासनाने दिलेल्या विहित कालावधीतच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. ही नोंदणी प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून, कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. लातूर जिल्ह्यातील ज्य...

येत्या ८ एप्रिल रोजी 'डिजिटल शेती शाळा' भाग-२; जैविक व नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे मिळणार धडे

येत्या ८ एप्रिल रोजी 'डिजिटल शेती शाळा' भाग-२; जैविक व नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे मिळणार धडे लातूर, दि. ६ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता 'डिजिटल शेती शाळा' भाग-२ चे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्राला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, आता दुसऱ्या सत्रामध्ये 'जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन' या विषयावर विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. या सत्रात शेतकरी बांधवांना घरच्या घरी बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क यांसारख्या उपयुक्त निविष्ठा तयार करण्याचे प्रगत तंत्रज्ञान शिकायला मिळणार असून, या निविष्ठांचे फायदे आणि वापराबाबतही सखोल माहिती दिली जाणार आहे. हवामान बदलाला सामोरे जात आपली शेती अधिक शाश्वत आणि समृद्ध करण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही डिजिटल शेती शाळा नानाजी...

िनगाव येथील मेंदूविकार तपासणी शिबिरात ७६ जणांवर उपचार; ३ महिन्यांच्या औषधांचे मोफत वितरण

किनगाव येथील मेंदूविकार तपासणी शिबिरात ७६ जणांवर उपचार; ३ महिन्यांच्या औषधांचे मोफत वितरण लातूर, दि. ६ (जिमाका): जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे दिव्यांगजनांसाठी विशेष मेंदूविकार आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ७६ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करून त्यांना पुढील ३ महिन्यांसाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय संचलित 'संवेदना प्रकल्प' (हरंगुळ बु.) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. देवाशिष रुईकर, माजी जिल्हा परिषद सदस्य त्रिंबकअप्पा गुट्टे आणि किनगावचे प्रभारी सरपंच विठ्ठलराव बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जाधव, डॉ. विठ्ठल घुगे आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक बसवराज पैके यांची प्रमुख उपस्थिती होती. ११० रुग्णां...

दिशा अभियानात लातूर जिल्ह्यातील चार शाळांचा राज्यस्तरावर गौरव

Image
दिशा अभियानात लातूर जिल्ह्यातील चार शाळांचा राज्यस्तरावर गौरव लातूर, दि. ६ (जिमाका): दिशा अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लातूर जिल्ह्यातील चार शाळांची राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते संबंधित मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आले. या अभियानाअंतर्गत लातूर येथील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, जीवन विकास प्रतिष्ठान मतिमंद विद्यालय, पांडूरंग निवासी मतिमंद विद्यालय आणि चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील संत गाडगेबाबा निवासी मतिमंद विद्यालय या शाळांचा समावेश आहे. वर्षभरात अभ्यासक्रम व अध्यापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्याध्यापक अण्णासाहेब कदम, भरत देवकते, शिवप्रसाद भंडारे आणि पंडित लव्हरे यांना राहुलकुमार मीना यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हे यश मिळवताना या शाळांनी विविध निकष पूर्ण केले आहेत, ज्यामध्ये शालेय वेळापत्रकाचे पालन, शिक्षक व विद्यार्थी पुस्तिकांचा प्रभावी वापर, शैक्षणिक साहित्याचा विनियोग आणि शिकवण्याची बहुउद्देशीय पद्धत यांस...