Posts

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची लातूर जिल्ह्यात विशेष अंमलबजावणी; अर्ज करण्याचे आवाहन

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची लातूर जिल्ह्यात विशेष अंमलबजावणी; अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. ०६ : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी लातूर जिल्ह्यात १९ जून २०२६ ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही योजना ऑगस्ट २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आली असून, याद्वारे पीक काढणीनंतरची कृषी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या २ कोटींपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत, तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्...

लातूर तालुक्यात 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम सुरू; मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन

लातूर तालुक्यात 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम सुरू; मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन लातूर, दि. ०६ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारयादी अद्ययावत करण्याची मोहीम लातूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत सन २००२ च्या मतदार यादीशी सर्व मतदारांचे मॅपिंग म्हणजेच पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग होणार नाही, त्यांना पुढील काळात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमोर सुनावणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. ही संभाव्य प्रक्रिया टाळण्यासाठी मतदारांनी तातडीने आपले मतदार मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या मोहिमेसाठी लातूर तालुक्यातील सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व पर्यवेक्षक यांना मतदारांचे मॅपिंग करणे, अस्पष्ट फोटो गोळा करून ते अद्ययावत करणे आणि डीएसई नोंदींची पडताळणी करणे या कामांसाठी ०१ जुलै २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. हे अधिकार...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ४४ हजार ६९९ कर्जखात्यांची माहिती अपलोड

Image
लातूर, दि. ०४  : थकीत कर्जदार शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही योजना जाहीर केली आहे. लातूर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी आणि गतीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून पात्र कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही संबंधित बँकांमार्फत सुरु आहे. या अंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ४४ हजार ६९९ कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.                                                 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जाणार आहे. यापूर्वीच्या 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'चे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची थकबाकी २ लाख रु...

सबळ शेतकरी, समृद्ध महाराष्ट्र !

Image
विशेष लेख -3 दिनांक 03.07.2026 सबळ शेतकरी, समृद्ध महाराष्ट्र ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात व्यापक, तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशी योजना आहे. थकीत कर्जाचा डोंगर उपसल्यामुळे ५६ लाख शेतकरी पुन्हा एकदा बँकिंग प्रवाहाशी जोडले जातील, ज्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि बी-बियाणांसाठी पतपुरवठा उपलब्ध होईल. संपूर्ण कर्जमुक्ती, एकवेळ समझोता आणि नियमित परतफेड करणाऱ्यास प्रोत्साहनपर लाभांबाबत आपण यापूर्वीच्या लेखात समजून घेतलं. आज आपण या योजनेसाठी अपात्रताधारक कोण असतील, याबाबतही चर्चा करू. ही योजना केवळ एक कर्जमाफीची वा कर्जमुक्तीची घोषणा नाही, तर तंत्रज्ञानाची अचूक जोड देऊन राबवली जाणारी एक ऐतिहासिक मोहीम आहे. या पारदर्शक पद्धतीमुळे मध्यस्थांचा सुळसुळाट थांबेल आणि आर्थिक मदत थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल. आता गरज आहे ती फक्त एकाच गोष्टीची-शेतकऱ्यांनी जागरूक राहून आपले डिजिटल प्रमाणीकरण वेळेवर पूर्ण करण्याची ! तरच या ऐतिहा...

सी.आय.एस.एफ. मध्ये 'पॅरा मेडिकल स्टाफ'ची भरती; लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

सी.आय.एस.एफ. मध्ये 'पॅरा मेडिकल स्टाफ'ची भरती; लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन लातूर, दि. ०३ : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 'पॅरा मेडिकल स्टाफ' या तात्पुरत्या पदांच्या भरतीसाठी पात्र पुरुष आणि महिला भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत ए.एस.आय. (औषध विक्रेता) ची १८ पदे, ए.एस.आय. (एक्स-रे टेक्निशियन) चे १ पद आणि ए.एस.आय. (लॅब टेक्निशियन) च्या ५ पदांसह एकूण २४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या एकूण २४ पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी १५, ई.डब्लू.एस. साठी १, ओ.बी.सी. साठी ५, एस.सी. साठी २ आणि एस.टी. प्रवर्गासाठी १ पद राखीव असून, औषध विक्रेता पदांमध्ये २ जागा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही भरती सर्व पुरुष व महिला उमेदवारांसाठी खुली असून पात्र उमेदवारांना केवळ एकाच पदासाठी अर्ज करता येईल. लातूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आणि माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ७ जुलै २०२६ रो...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे मिळणार ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी

Image
शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज हे केवळ एक आर्थिक सहाय्य नसून, ते शेतीच्या संपूर्ण उत्पादन चक्राला गती देणारे एक महत्त्वाचे साधन आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसह इतरही कारणांमुळे अनेकदा शेतकरी कर्जबाजारीपणाच्या चक्रात अडकतात. एकदा पीक कर्ज थकीत झाले की, त्या शेतकऱ्यांची पतक्षमता कमी होते आणि पुढील हंगामासाठी नवीन कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शेतीच्या अर्थकारणाची गती मंदावते. हीच बाब लक्षात घेऊन, राज्य शासनाने थकीत कर्जदार शेतकऱ्यांना पुन्हा बँकिंग व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकरी बांधवांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. पीक कर्ज थकीत झाल्यानंतर संबंधित कर्जखाते बँकिंग नियमांनुसार अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्ज मिळणे शक्य न झाल्याने, त्यांना नाईलाजास्तव खासगी सावकारांच्या दारात उभे राहावे लागते. या पार्श्वभूमीवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकर...

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर, दि. 3 (जिमाका) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 4 जुलै, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 18 जुलै, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यत...