Posts

विशेष लेख: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !

Image
  भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्यांना उपजीविका देण्याचे काम हा महत्वपूर्ण घटक करतो. म्हणूनच शेती हा घटक अन्न सुरक्षा , रोजगार आणि ग्रामीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतो.     मात्र गेल्या काही वर्षांपासून सतत होणारे हवामान बदल ,   जमीन आणि पाण्याची टंचाई ,   बियाणे आणि खतांवरील वाढता खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करत असते जसे की ,   शेतीचे उत्पादन वाढविणे ,   हवामान बदलास अनुकूल आणि शाश्वत शेतीला चालना देणे ,   सिंचन व्यवस्था आणि जलसंधारणात सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. याशिवाय शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे ,   शेतकरी गटांना बळकट करणे आणि बाजारपेठ उपलब्धतेत सुधारणा आणणे यासारखेही प्रयत्न केले जात आहेत.   मात्र आपल्या...
Image
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
वृत्त क्र. : 427 जिल्हा वार्षिक योजनेची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर, दि. २६ : सर्व शासकीय यंत्रणांनी विहित कालावधीमध्येच प्रशासकीय मंजुरीची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. प्रत्येक काम चांगल्या दर्जाचे, टिकाऊ व गुणवत्तापूर्ण होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पालकमंत्री श्री. भोसले बोलत होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यावेळी उपस्थ...

लातूरमध्ये सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित समता दिंडी, संविधान जनजागृती प्रभातफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  लातूर , दि. २६ (जिमाका): राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर येथे समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी व संविधान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला लातूर शहरातील नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच हिरवी झेंडी दाखवून या प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली.   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.   राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते आणि समाजातील दुर्लक्षित , मागासवर्गीय , दिव्यांग , वृद्ध , निराधार व दुर्बल घटकांच्या प्रती त्यांचा दृष्टिकोन विशेष सहानुभूतीचा व सुधारणावादी होता. त्यांनी या घटकांच्या कल्याणा...

सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालतीसाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची तयारी बैठक

Image
  लातूर , दि. २५ : सर्वोच्च न्यायालय , नवी दिल्ली आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने ' समाधान समारोह ' या उपक्रमांतर्गत आगामी २१ ते २३ ऑगस्ट , २०२६ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये लातूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांमध्ये सौहार्दपूर्ण तडजोड घडवून आणण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांची एक महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक गुरुवारी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात झाली. ही बैठक लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली होती.   बैठकीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्यंकटेश गिरवलकर यांनी उपस्थित सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना या विशेष लोकअदालतीचे महत्त्व सांगून प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.   या प्रकारची प्रकरणे असणार तडजोडीसाठी   लातूर जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालय येथे दाखल करण्यात आलेली सर्व प्रकारची प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी व दिवाणी प्रकरणे या विशेष ल...

विशेष लेख : महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
Image
वृत्त क्र. : 426 सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा कार्यक्रम लातूर, दि. २५ (जिमाका): राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सहकार मंत्री श्री. पाटील यांचे २६ जून रोजी सकाळी ६.४५ वाजता लातूर येथे आगमन होईल व शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथून चाकूर तालुक्यातील वडगाव एक्कीकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता वडगाव एक्की येथील कै. शिवराज दिगंबर पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. सकाळी ११.१५ वाजता चाकूरकडे प्रयाण करतील. सकाळी ११.४५ वाजता चाकूर शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी १२ वाजता चाकूर येथे श्री तौफिक शेख यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी १२.१५ वाजता चाकूर येथून लातूरकडे प्रयाण करतील. दुपारी १ वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर लातूर येथून शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी आगमन होईल व राखीव.