Posts

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले • वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन लातूर, दि. २३ : जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचमाने तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिल्या. त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्याकडून दूरध्वनीद्वारे जिल्ह्यातील नुकसानीची माहिती घेतली. रेणापूर, अहमदपूरसह इतरही तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यासोबतच घरांची पडझड झालेल्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. आगामी काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे पालकमंत...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत

Image
  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #दिलखुलास कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त’ नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी व रूपरेषा या विषयाच्या अनुषंगाने हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. दि. २५ व २६ फेब्रुवारी २०२६ सकाळी : ७.२५ वाजता ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल. #हिंददीचादर #गुरूतेगबहादुर

जय महाराष्ट्र कार्यक्रमात रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत

Image
  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त’ नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी व रूपरेषा या विषयाच्या अनुषंगाने हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत मंगळवार दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर व महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होणार आहे. प्रसारित होणार आहे. #हिंददीचादर #गुरूतेगबहादुर

गुन्हेगारांची गय नको; अवैध मद्यविक्री, अंमली पदार्थ विक्री रोखा - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Image
सुधारित पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा ! गुन्हेगारांची गय नको; अवैध मद्यविक्री, अंमली पदार्थ विक्री रोखा - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पोलिसांसोबतच राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना अंमली पदार्थांची विक्री आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार लातूर, दि. 20 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. सराईत गुन्हेगार, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर कठोर कार्यवाही करावी. शहरातील ट्युशन एरियासह शाळा, महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणाऱ्या, दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध आवश्यक कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिल्या. लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ...

इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी श्री केशवराज विद्यालय येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती यांच्यासह केंद्र संचालक व अधिकारी उपस्थित होते.

इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी श्री केशवराज विद्यालय येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती यांच्यासह केंद्र संचालक व अधिकारी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर अचानकपणे भेट देण्यासाठी भरारी पथकाची व कायमस्वरूपी बैठे पथकाची व्यवस्था करण्यात आली असून, कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक दक्षता घेतली आहे. जिल्ह्यातील १५२ परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीची परीक्षा होत असून ३९ हजार २४२ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. प्रत्येक विषयाच्या पेपरसाठी १५२ केंद्रासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि इतर विभागांच्या समन्वयातून १५२ त्रिसदस्यीय बैठी पथके गठीत करण्यात आली आहेत, ती रोटेशन पद्धतीने कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. ही पथके पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मु...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण लातूर, दि. १९ : शिवजयंतीनिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. **

इयत्ता दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाकडून उपाययोजना

इयत्ता दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाकडून उपाययोजना लातूर, दि. १९ : जिल्ह्यात आजपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेस प्रारंभ होत असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर अचानकपणे भेट देण्यासाठी भरारी पथकाची व कायमस्वरूपी बैठे पथकाची व्यवस्था करण्यात आली असून, कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक दक्षता घेतली आहे. जिल्ह्यातील १५२ परीक्षा केंद्रावर २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या काळात इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. लातूर जिल्ह्यातून ३९ हजार २४२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रत्येक विषयाच्या पेपरसाठी १५२ केंद्रासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि इतर विभागांच्या समन्वयातून १५२ त्रिसदस्यीय बैठी पथके गठीत करण्यात आली आहेत, ती रोटेशन पद्धतीने कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. ही पथके पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मागर्दर्शनाखाली तयार करण्यात आलेली महसूल ...