जलसंधारणाच्याकामांना निधी कमी पडू देणार नाही-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड•औसा तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी लातूर, दि. 6 (जिमाका) : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीतजिरण्यासाठी राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारअभियान राबविले जात आहे. या अंतर्गत औसा तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील जलसंधारणाच्याकामांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडयांनी सांगितले. त्यांनी आज औसा तालुक्यातील फत्तेपूर, दावतपूर, तांबरवाडी, राजेवाडीयेथील जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार दिनकरमाने, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, औसा पंचायत समिती सभापतीगंगाबाई कोदळीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रशेखर सोनवणे, जिल्हा जलसंधारणअधिकारी जावेद पटेल, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेबशेलार, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार, टाटा मोटर्स फाऊंडशनचे जिल्हासमन्वयक प्रमाद घायाळ यांच्यासह अधिक...