Posts

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
  राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ‘ ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे , अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था , सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रण , अमली पदार्थांविरोधातील कारवाई , पोलीस आधुनिकीकरण , जलसंपदा , कृषी आणि विविध विकासकामांबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहात दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , राष्ट्रीयकृत , व्यापारी , खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लो...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ शेतकऱ्यांना दिलासा आणि आर्थिक सक्षमतेसाठी बळ !

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ शेतकऱ्यांना दिलासा आणि आर्थिक सक्षमतेसाठी बळ ! बदलते हवामान, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांना नव्याने उभे करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेकडे नेणारी ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीचा, आत्मविश्वास वृद्धीचा आणि शेती व्यवसायाला अधिक सक्षम करण्याचा हा एक व्यापक प्रयत्न आहे. ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५६ लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याच्या इतिहासातील मोठ्या कर्जमुक्ती उपक्रमांपैकी ही एक योजना मानली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या दोन लाख रुप...

अहमदपूर येथे १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

अहमदपूर येथे १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा लातूर, दि. १० (जिमाका) : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर आणि अहमदपूर येथील शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदपूर येथील नांदेड रोडवर असलेल्या शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा मेळावा पार पडणार असून यामध्ये अनेक नामांकित आस्थापना आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. या रोजगार मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, कोणत्याही शाखेचे पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आय.टी.आय. तसेच डिप्लोमा धारक उमेदवारांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असणार आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांन...

इतर मागासवर्गीय समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी विविध कर्ज योजना; ऑनलाईन अर्जांचे आवाहन

इतर मागासवर्गीय समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी विविध कर्ज योजना; ऑनलाईन अर्जांचे आवाहन लातूर, दि. १० (जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व त्याअंतर्गत कार्यरत असलेल्या १४ महामंडळांच्या वतीने इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत १ लाखांपर्यंतची थेट कर्ज योजना, २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र उमेदवारांना घेता येणार आहे. या सर्व कर्ज योजना पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाच्या असून, इतर मागास प्रवर्गातील इच्छुक व पात्र अर्जदारांनी नाव नोंदणीसाठी आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्यासाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे अनिवार्य आहे. या योजनांबाबत अधिक सविस्तर माहिती आणि मार्गदर्शनासाठी इच्छुक नागरिकांनी महाराष्ट्र राज्य इ...

विशेष लेख : शेतकऱ्यांना दिलासा आणि आर्थिक सक्षमतेसाठी बळ !

Image
‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ बदलते हवामान , अवकाळी पाऊस , अतिवृष्टी , दुष्काळ , नैसर्गिक आपत्ती , वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांना नव्याने उभे करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेकडे नेणारी ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीचा , आत्मविश्वास वृद्धीचा आणि शेती व्यवसायाला अधिक सक्षम करण्याचा हा एक व्यापक प्रयत्न आहे. ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ५६ लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याच्या इतिहासातील मोठ्या कर्जमुक्ती उपक्रमांपैकी ही एक योजना मानली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाला कर्ज...

लातूर जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी खरेदीसाठी दि.17 जुलै 2026 पर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

*वृत्त क्र. : 468* *दिनांक : 10 जुलै,2026* लातूर जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी खरेदीसाठी दि.17 जुलै 2026 पर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन लातूर :- जिल्हा माहिती कार्यालय, येथील वृत्तपत्रांची व मासिकांची रद्दी विक्री करण्यात येणार आहे.यासाठी नोंदणीकृत रद्दी खरेदीदारांनी आपली दरपत्रके दि. 17 जुलै 2026 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छूक रद्दी खरेदीदारांनी आपले दरपत्रके बंद लिफाफ्यात जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालयात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तर बाजू, लातूर या पत्यावर 17 जुलै 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सादर करावीत, कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. रद्दी खरेदीदाराकडे इलेक्ट्रॉनिंक वजन काटा असणे आवश्यक आहे. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयात पाहता येतील, दरपत्रकात वृत्तपत्र रद्दी, मासिके रद्दी व पेपर गोळा यांचे स्वतंत्र्य दर नमूद करावेत, रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे, तसेच संपुर्ण रद्दी विक्री प्रक्रीया रद्द करण्याचे सर्व अधिकारी ज...

लातूर येथे सहकार संकुलाचे शनिवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

लातूर येथे सहकार संकुलाचे शनिवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन लातूर, दि. १० : येथील महात्मा फुले भाजी मार्केटच्या मागे सहकार संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या अधिपत्याखालील लातूर शहरातील ११ क्षेत्रीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी हे सहकार संकुल उभारले जात आहे. या नवीन इमारतीमुळे शासकीय कामकाज अधिक कार्यक्षम होईल. तसेच नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध होतील. त्यामध्ये आधुनिक कार्यालयीन सुविधा, स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी कक्ष, बैठक व्यवस्था, अभिलेख कक्ष, संगणकीकृत कामकाजासाठी आवश्यक सुविधा, नागरिकांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे तसेच दिव्यांग...