Posts

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर 2022’ स्पर्धा

  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर 2022’ स्पर्धा कालावधी 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022         *लातूर,दि.28(जिमाका):-* महाराष्ट्राला लोककलांची आणि लोकगीतांची समृद्ध परंपरा आहे. निसर्गाशी संवाद साधणारी, श्रमपरिहारासाठी गायली जाणारी शेतकरी गीते,आदिवासी गीते, कोळीगीते, जात्यावरील ओव्या इ. लोकगीते जशी आहेत, तशी पोवाड्यासारखे शौर्यगीत, लावणीसारखे शृंगारंगीत यांसारखी लोकगीतेही आहेत. तसेच भारुडासारखे आध्यात्मिक प्रबोधनपर गीतही आहे. भोंडला-हादगा, मंगळागौर, फुगडी, झिम्मा यांसारखी गाणी त्यांच्या लय-तालबद्धतेमुळे आताही स्त्रिया गातात. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या प्रांतांनुसार स्थानिक लोकगीतेही विपुल प्रमाणात आढळतात.           लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 'लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे,...

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर यांच्या मार्फत सेवा पंधरवाडा अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृध्द दिवस साजरा करण्याचे आवाहन

  समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर यांच्या मार्फत सेवा पंधरवाडा अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृध्द दिवस साजरा करण्याचे आवाहन           *लातूर,दि.28(जिमाका):-* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्ताने दि. 1 ऑक्टोबर, 2022   रोजी जागतिक वृध्द दिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने सेवा पंधरवाडा निमित्त लातूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार व उचित सन्मान करणेसाठी तालूका स्तरावर व ग्राम पंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे . शहरी भागातील व ग्रामीण भागातील जेष्ठ नागरीकांचे शासकीय दवाखाणे , ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये मोफत तपासणी जसे की , रक्तदाब , मधुमेह व मोती बिंदू इ . तपासणी केली जाणार आहे . गाव पातळीवर जेष्ठ नागरीकांसाठी अत्यावश्यक वस्तूचे वाटप करण्याच्या सू चना गट विकास अधिकारी यांना दिलेल्या आहेत. तसेच जागतिक वृध्द दिनानिमित्त गट स्तरावर जेष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे . पंचायत समितीमार्फत ग्रा...

1 ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त शहरी व ग्रामीण भागामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

  1 ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त शहरी व ग्रामीण भागामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन   *लातूर,दि.28(जिमाका):-* जेष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा. समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक, मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळाच्या त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी   राज्य शासनाने राज्याचे सर्वसमावेशक धोरण, 2013 जाहिर केलेले आहे. तसेच दरवर्षी दि. 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. 1 ऑक्टोबर 2022 रोजी आंतराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त लातूर जिल्ह्यामध्ये   शहरी व ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे बाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार ग्रामपातळीवर जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीरे, गावातील रुग्णालयामध्ये जेष्ठांचे आरोग्य तपासणे, गावामध्ये विरंगुळा केंद्र स्थापन करून त्याचे उद्घाटन करणे, आनंद मे...
Image
  लातूर विभागाच्या माहिती उपसंचालक म्हणून डॉ. सुरेखा मुळे सोमवारी रुजू   लातूर दि.26 ( जिमाका )   येथील माहिती व जनसंपर्क महासंचालनालाच्या अधिनस्त लातूर विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती)   डॉ. सुरेखा मुळे यांनी आज पदभार स्विकारला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रकाशित केलेली" वैभवशाली लातूर जिल्हा पर्यटन पुस्तिका " व पुष्पगुच्छ देवून डॉ. सुरेखा मुळे यांचा सत्कार केला. यावेळी विभागीय माहिती कार्यालयातील अशोक माळगे, श्रीमती विशाखा शेंडगे, श्रीमती मनिषा कुरुलकर,जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी विवेक डावरे, दिलीप वाठोरे, सिध्देश्वर कोंपले, अशोक बोर्डे, व्यंकट बनसोडे यासोबतच विभागीय माहिती कार्यालयातील रामकिशन तोकले, प्रवीण बीदरकर, बालाजी केंद्रे, शेख कलीम आदिंची यावेळी उपस्थित होते. उपसंचालक (माहिती)   डॉ. सुरेखा मुळे यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकारी, अर्थमंत्री   यांच्या जनसंपर्क अधिकारी यासोबतच विविध विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे तसेच अनेक दैनिकाच्या स्त...
Image
  *जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप श्री.महात्मा* *बसवेश्वर महाविद्यालयात संपन्न*   *हैद्राबाद संस्थांन मुक्तीचा लढा हा जनतेचा,* *शेतकऱ्यांचा आणि मानव मुक्तीचा लढा होता*                                                                             *-प्रा. डॉ. प्रशांत देशमुख*   §   *जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस* *अधिक्षक निखिल पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती.*   * लातूर दि.26 ( जिमाका ) * हैद्राबाद संस्थान मुक्तीचा लढा हा कोणत्याही दोन समुदायात नव्हता. तो लढा होता, निजाम य...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष व्याख्यानमाला समारोप महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात सोमवारी समारोपीय व्याख्यान मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रशांत देशमुख गुंफणार

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष व्याख्यानमाला समारोप महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात सोमवारी   समारोपीय व्याख्यान मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रशांत देशमुख गुंफणार   लातूर दि.24 ( जिमाका)  मराठवाडा मुक्ती संग्रामाचे दि. १७ सप्टेंबर २०२२ पासून अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत आहे. युवकांना मराठवाडा मुक्ती संग्रामाची ओळख व्हावी, मागच्या पिढ्याचा या स्वातंत्र्यासाठीचे बलिदान, त्याग,  समर्पण कळावे म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या संकल्पनेतून सोमवार दि. १९ सप्टेंबर २०२२ पासून २६  सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.           या व्याख्यानमालेचा उदघाटन समारंभ सोमवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दयानंद कला महाविद्यालयात येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि ज्येष्ठ लेखक, अभ्यासक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, ज्येष्ठ लेखक,विचार शलाकाचे संपादक प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या प्र...

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला पुष्प सहावे, महात्मा गांधी महाविद्यालय,अहमदपूर येथे संपन्न लढ्याचे मोल कळल्याशिवाय लोकशाहीचे महत्व अधोरेखित होत नाही - साहित्यिक प्रा. जयप्रद जाधव

Image
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला पुष्प सहावे , महात्मा गांधी महाविद्यालय,अहमदपूर येथे संपन्न लढ्याचे मोल कळल्याशिवाय लोकशाहीचे महत्व अधोरेखित होत नाही                                                  - साहित्यिक प्रा. जयप्रद जाधव लातूर दि.23 ( जिमाका ) लढ्याचे मोल कळल्याशिवाय लोकशाहीचे महत्व अधोरेखित होत नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा भारतीय स्वातंत्र्य लढ्या एवढाच अनमोल आहे.तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला की मौखिक माध्यमातून तो सर्वदूर समाजा पर्यंत पोहचतो. त्यामुळे अशा व्याख्यानमाला महत्वाचे भूमिका बजावतात असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष, साहित्यिक प्रा. जयप्रद जाधव यांनी केले.    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमा...