Posts

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी बँकांची सकारात्मक भूमिका आवश्यक - नरेंद्र पाटील

Image
  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी बँकांची सकारात्मक भूमिका आवश्यक -          नरेंद्र पाटील ·         जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 682 प्रकरणांना मंजुरी ·         11 कोटी 90 लाख रुपयांचा व्याज परतावा प्रदान लातूर , दि. 2 8 , ( जिमाका): मराठा समाजातील युवकांना उद्योग, व्यवसायासाठी सहाय्य करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसोबतच शासनाच्या इतरही योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांची सकारात्मक भूमिका आवश्यक असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे, अरविं...

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून आता 75 टक्के अनुदानावर मिळणार शेततळे

Image
·        लातूर जिल्ह्यासाठी 375 शेततळ्यांचे उद्दिष्ट लातूर , दि. 27 (जिमाका) : पावसावर विसंबून असलेल्या कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी 75 टक्के म्हणजेच सुमारे 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेतून लातूर जिल्ह्याला 375 शेततळ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून इच्छुक शेतकऱ्यांना महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेतून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ दिला जात होता. या योजनेतून जास्तीत जास्त 50 हजार रुपयापर्यंत अनुदान देय होते. आता मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 75 हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारण कमाल मार्यादा नाही. शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या...

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

Image
  माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी.   बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन   ▪ महिला बचत गटाच्या कायम स्वरूपी विक्री केंद्रासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार ▪ महिला बचत गटाच्या 88 स्टॉल मधून 12 लाख रुपयांची विक्री   लातूर दि.27 ( जिमाका ) महिलांनो तुमच्यात मोठी गुणवत्ता आहे. काम करण्याची तयारी आहे त्यासाठी स्वप्न मोठी पहा आणि ते तेवढ्याच जिद्दीने पूर्ण करा असे आवाहन जिल्हाधिकारी पी.   बी. पृथ्वीराज यांनी महिला बचत गटांच्या महिलांना केले.                महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय लातूर यांच्या वतीने दि 24 ते 26 मार्च 2023 या कालावधीमध्ये कल्पतरू मंगल कार्यालय, दत्त मंदिर जवळ औसा रोड, लातूर येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे जिल्हा स्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री “ नवतेजस्विनी महोत्सव ” चे आयोजन करण्यात आले होते.   त्या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.   ...

‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरु राहणार

  ‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरु राहणार लातूर , दि.27 ( जिमाका ) : राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" संचाचे वितरण २२ मार्च २०२३ पासून सुरु झाले असून पुढील एक महिनाभर सुरु राहणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणांनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर खाद्यतेल या ४ शिधा जिन्नसांचा समावेश असलेला "आनंदाचा शिधा" संच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार काही जिल्ह्यांत वितरण सुरू झाले आहे. यापूर्वी सन २०२२ मधील दिवाळी सणानिमित्त माहे ऑक्टोबर २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सर्व पात...
Image
  ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यात 3 लाख 73 हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी ·         दरडोई किमान 55 लिटर पाणी पुरविणार ·         2024 पर्यंत सर्व कुटुंबांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट ·         सुमारे 572 कोटी 27 लाखांच्या 899 योजनांना मंजुरी लातूर , दि. 25 (जिमाका) : ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन स्वच्छ पाणी पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 2023-24 साठी 20 हजार कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून लातूर जिल्ह्यातील 572 कोटी 27 लाख रुपयांच्या 899 पाणी पुरवठा योजना 935 गावात मंजूर करण्यात आल्या आहेत. सर्व   कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून आतापर्यंत 64 कामे पूर्ण झाली आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत प...

समाज कल्याण विभागाच्या योजनांची ग्रामीण भागात होणार जनजागृती

Image
  समाज कल्याण विभागाच्या योजनांची ग्रामीण भागात होणार जनजागृती ·         एलईडी व्हॅनद्वारे दाखविण्यात येणार माहितीपट, चित्रफिती ·         अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालायचा उपक्रम ·         जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ लातूर , दि. 25 (जिमाका) : समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती जिह्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत अनुसूचित जाती उपयोजना 2022-23 अंतर्गत एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात समाज कल्याण विभागाच्या योजनांवर आधारित माहितीपट, चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते एलईडी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुसिंग, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा नागरी प्रशासन अधिकारी श्री. कोकरे, जिल्हा माह...

माविमच्या महिला बचत गटाच्या वस्तू प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उदघाटन

Image
  माविमच्या महिला बचत गटाच्या वस्तू प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उदघाटन   जिल्ह्यात महिला बचत गट आर्थिक उन्नतीची मोठी चळवळ; बँकांची परत फेड करण्यात महिला अग्रेसर - जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल ▪ ️माविमचे जिल्ह्यात 4,500 महिला बचत गट ▪ ️बचत गटात एकूण 48 हजार महिला सहभागी ▪ ️या महिलांची 32 कोटी 66 लाखाची बचत ▪ ️या प्रदर्शन व विक्री महोत्सवात 75 महिला बचत गटाचे स्टॉल लातूर दि.24 ( जिमाका ) लातूर जिल्ह्यात महिला बचत गटाची मोठी चळवळ आहे, यातून हजारो महिलांनी आपले कुटुंबं आर्थिकदृष्ट्या स्वालंबी केले असून कर्ज परतावा खात्रीशीर आहे. त्यामुळे बँकापुढे येऊन कर्ज देतात. जिल्ह्यातील महिला बचत गटानी आता उद्योजक म्हणून पुढे यावं त्यांना पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ मिळू शकतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.      कल्पतरु मंगल कार्यालय, दत्त मंदिर, औसा रोड, लातूर येथे महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील महिला बचत गटाकडून उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री नवते...