पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार , जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको ; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई , दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी , आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळा प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी , असे निर्देश बँका ना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , शेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ , डाळी व आवश्यक वस्तूं चा संच वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे , शेतजमीन खरडून जाणे , यावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन , झालेल्या नुकसानीवरही राज्य ...