नागरिकांना मिळणार महसूल विभागाशी थेट संपर्क साधण्याची संधी ! · सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महसूल जनसंवादाची पंचसूत्री’चे आयोजन

नागरिकांना मिळणार महसूल विभागाशी थेट संवाद साधण्याची संधी ! · सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महसूल जनसंवादाची पंचसूत्री’चे आयोजन · जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून विशेष उपक्रम · क्यूआर कोड स्कॅन करा, आपली तक्रार नोंदवा लातूर, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस, १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यात महसूल विभागामार्फत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘महसूल जनसंवादाची पंचसूत्री’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या विशेष उपक्रमात नागरिकांना आपली तक्रार, माहिती नोंदविण्यासाठी क्यूआर कोड प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होवून आपल्या तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या विशेष उपक्रमामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाशी थेट संवाद साधता येणार असून, त्यांच्या तक्रारी, अडचणी व मागण्या सहजरीत्या नोंदवण्याची संधी मिळणार आहे. या तक्रारींची नोंदणी करण्यासाठी क्यू आर कोड प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मवर आपली माहिती व तक्रारी नोंदवता येतील. तक्रारींच्या नोंदीनंतर त्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांच्या अडचणींचे वेळेत निराकरण व्हावे आणि जनतेशी प्रशासनाचा संवाद अधिक परिणामकारक व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. आपले प्रश्न व अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्याची ही एक संधी आहे. त्यानुसार २८ सप्टेंबर रोजी जमीन हक्क विषयक, २९ सप्टेंबर रोजी पुरवठा विभाग, ३० सप्टेंबर रोजी सामाजिक अर्थसहाय्य योजना, १ ऑक्टोबर रोजी रस्ते आणि २ ऑक्टोबर रोजी इतर विषयांच्या अनुषंगाने महसूल जनसंवाद आयोजित केला जाणार आहे. नागरिकांनी नोंदविलेल्या तक्रारीचे निराकरण या दिवशी संबंधित तहसील कार्यालयात केले जाणार आहे. तरी नागरिकांनी या दिवशी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन