जल व्यवस्थापनाविषयी जनजागृती ही काळाची गरज - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 सुधारित

लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याला प्रारंभ

जल व्यवस्थापनाविषयी जनजागृती ही काळाची गरज

- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

• प्रत्येक अधिकारीकर्मचारी यांनी कृतीशील योगदान द्यावे
• 
शासनाने निश्चित केलेल्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

लातूरदि. १५ (जिमाका): जल व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी लातूर जिल्ह्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज पाण्याची उपलब्धता आणि त्याचा योग्य वापर याबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. तसेचजलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. या पंधरवड्याच्या कालावधीत प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी कृतीशील योगदान द्यावेअसे आवाहनही त्यांनी केले.

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जलपूजनाने या पंधरवड्याचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळलातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक श्रीमती आर. डी. ठोंबरेउपअधीक्षक अभियंता श्रीमती एम. व्ही. तोरणाळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधवलातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगतापअमर पाटीलएम. आर. काळेएम. एम. महाजन यांच्यासह उपविभागीय अभियंताशाखा अभियंता आणि सिंचन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांना जलप्रतिज्ञा देण्यात आली.

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत गावोगावी चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवली. तसेचलातूर पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोटारसायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले.

पंधरवड्याच्या कालावधीत लातूर पाटबंधारे विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश पोहोचवावा. तसेचपाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांची आणि कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन हा पंधरवडा यशस्वी करावाअसे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत आयोजित उपक्रम

  • १६ एप्रिलजलसंपदा अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे.
  • १७ एप्रिल: ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम आणि जल पुनर्भरण (पावसाचे पाणी साठवणे).
  • १८ एप्रिलशेतकरी आणि पाणी वापर संस्थांशी संवाद.
  • १९ एप्रिलभूसंपादनपुनर्वसन यासंबंधी अडचणींचे निराकरण आणि कालवा संयुक्त पाहणी.
  • २० एप्रिलकालवा स्वच्छता अभियान.
  • २१ एप्रिलउपसा सिंचनाच्या पाणी परवानगीसाठी तक्रारींचे निराकरण.
  • २२ एप्रिलअनधिकृतपणे वाणिज्य आणि औद्योगिक पाणी उपसा प्रकरणांचा शोध घेऊन कारवाई.
  • २३ एप्रिलजलसंपदा आणि कृषी विभागामार्फत पीक पद्धतीउत्पादकता वाढ आणि पाण्याचे नियोजन याबाबत संयुक्त बैठक व कार्यशाळा.
  • २४ एप्रिलसिंचन ई-प्रणालीपाणी दरपाणीपट्टी आकारणीवसुली आणि थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा.
  • २५ एप्रिलविद्यापीठकृषी विज्ञान केंद्र आणि सेवाभावी संस्थांशी संवाद व कृती कार्यक्रम.
  • २६ एप्रिलमहानगरपालिकानगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणी वापराचा जललेखा तपासणीतसेच धरणे आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याच्या प्रकरणांचा शोध.
  • २७ एप्रिलआपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन (पूर आणि मालमत्तेचे संरक्षण).
  • २८ एप्रिलमहसूल विभागाच्या समन्वयाने महामंडळाच्या नावे संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांवर नोंदी घेणे आणि ३१ मेपूर्वी अतिक्रमण काढणे.
  • २९ एप्रिलपाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र आणि कार्यशाळा.
  • ३० एप्रिलपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळामहिला मेळावानाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार आणि पंधरवड्याचा समारोप.

*****


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन