पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत
शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
लातूर, दि. ८ (जिमाका): १२ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवली जात आहे. मृग बहार २०२४ साठी डाळींब, चिकू, पेरू, सिताफळ आणि लिंबू या पाच फळपिकांसाठी, तर आंबिया बहार २०२४-२५ साठी डाळींब, द्राक्ष, आंबा, पपई आणि केळी या पाच फळपिकांसाठी ही योजना लागू आहे.
या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे, परंतु डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाइल ॲपद्वारे ई-पीक पाहणी केलेली नाही, त्यांनी २५ एप्रिल २०२५ पर्यंत ती पूर्ण करावी. अन्यथा, शासन निर्णयानुसार, सातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द होतील आणि विम्याचा लाभ मिळणार नाही. अधिक माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी कळवले आहे.
*****
Comments
Post a Comment