Posts

Showing posts from July, 2025

लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल विभागाचे आणखी एक पाऊल ! महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान लातूर जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल विभागाचे आणखी एक पाऊल ! महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान लातूर जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन लातूर, दि. ३१ (जिमाका): महसूल दिनानिमित्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे. महसूल व वन विभागाच्या २९ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, या सप्ताहात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. या माध्यमातून महसूल विभागाच्या योजना आणि कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांचे जीवन सुखकर आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा ते सात महिन्यांत महसूल विभागाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये नवीन वाळू धोरण २०२५ लागू करून स्थानिक गृहनिर्माण लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध करणे, महाखनिज पोर्टलद्वारे पारदर्शक वाहतूक परवाने, तसेच पर्यावरणपूरक एम- सँ...

लातूर येथे पत्रकारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा

लातूर येथे पत्रकारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा लातूर, दि. ३० (जिमाका): माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर शहरातील डॉ. भालचंद्र रक्तपेढी सभागृहात सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होईल. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर लातूरचे प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता’ या विषयावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे मार्गदर्शन करतील, तर ‘वृत्त संकलन आणि संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व’ या विषयावर परभणी येथील मराठी भाषा तज्ज्ञ प्रा. दीपक रंगारी मार्गदर्शन करतील. तसेच, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके हे अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार...

लातूर येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे महिला सुरक्षा रक्षक भरती

लातूर येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे महिला सुरक्षा रक्षक भरती लातूर, दि. 28 (जिमाका): येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे महिला सुरक्षा रक्षकाची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत ही भरती होणार आहे. इच्छुक माजी सैनिक, पत्नी, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक पाल्यांनी आपला मुळ अर्ज व मूळ कागदपत्रांसह 5 ऑगस्ट, 2025 रोजी मुलाखतीसाठी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपस्थित रहावे, निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी कळविले आहे. ****

लातूर जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक

लातूर जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी कळविले आहे. खत विक्रीच्या नोंदी तात्काळ आणि अचूकपणे आयएफएमएस प्रणालीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. ई-पॉस प्रणालीवरील खत साठा आणि प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठा यामध्ये कोणतीही तफावत आढळू नये. यासाठी विक्रीची नोंद रियल टाइममध्ये घेणे बंधनकारक असून, याबाबत क्षेत्रीय खत निरीक्षकांमार्फत नियमित तपासणी केली जाणार आहे. साठ्यात तफावत आढळल्यास संबंधित अहवाल तात्काळ लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे पाठवावेत. तसेच, ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन एल-1 सिक्युरिटी ई-पॉस मशिन प्राप्त केले नाही, त्यांनी 10 ऑगस्ट 2025 पूर्वी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांच्याशी संपर्क साधून मशिन प्राप्त करावे आणि कार्यान्वित करावे, असे आवाहन श्री. लाडके यांनी केले आहे. *****

लातूर तालुक्यातील चिंचोली ब येथे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन मोजणी पूर्ण

लातूर तालुक्यातील चिंचोली ब येथे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन मोजणी पूर्ण लातूर, दि. 29 (जिमाका): लातूर तालुक्यातील 13 गावांमधून जाणाऱ्या पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी चिंचोली ब येथे संयुक्त मोजणी व सीमांकनाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. लातूर उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी श्रीमती रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या सूचनेनुसार 28 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता चिंचोली ब येथील गट क्रमांक 282 आणि 283 मधील 3.2652 हेक्टर क्षेत्राचे सीमांकन व संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली. या कार्यवाहीसाठी नायब तहसीलदार सतिश कांबळे, सहायक महसूल अधिकारी श्री. मलीशे, भूकरमापक पवन कातकडे, मोनार्च कंपनीचे प्रतिनिधी गजानन सावंत आणि पोलीस प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोजणीस्थळी बाधित शेतकरी आणि परिसरातील अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती लातूर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. *****

माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना

माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना लातूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि वीरपत्नी यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये ड्रोन पायलट, शेळीपालन, कॉम्प्युटर व मोबाइल दुरुस्ती, फायर फायटिंग, सुरक्षा रक्षक, मोटार दुरुस्ती, डेरी फार्मिंग, किरकोळ व्यवस्थापन, लेखापाल आणि मल्टिमीडिया आदी प्रशिक्षणांचा समावेश आहे. इच्छुक माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, आणि वीरपत्नी यांनी आपली नावे लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे नोंदवावीत. नाव नोंदणीसाठी दूरध्वनी क्रमांक 02382-228544 किंवा 9892809202 यावर संपर्क साधून 1 ऑगस्ट 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. *****

लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लातूर, दि. 28 (जिमाका): सन 2024-2025 मध्ये इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेत 60 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या, तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, बी.एस.सी., बी.ए., बी.सी.ए., बी.बी.ए., बी. फार्म, बी.एड., एल.एल.बी. आणि एम. फार्म या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी नवीन व जुन्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी आहे. इच्छुकांनी आपले अर्ज 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक फॉर्म आणि इतर माहिती कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी दिली आहे. *****

माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन

माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 29 (जिमाका): राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त, तसेच साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोड, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांचा विशेष गौरव पुरस्कार देवून गौरव करणायत येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी एकरकमी रुपये 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी एकरकमी 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच इयत्ता दहावीमध्ये 90 टक्के व बारावी मध्ये 85 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवूण उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांचाही गौरव करण्यात येणार असून यासाठी 15 सप्टेंबर, 2025 पर्यंत लातूर जिल्हा सैनिक कलयाण कार्यालय येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक ...

निवृत्ती वेतनधारकांनी आधारकार्डव पॅनकार्डसंलग्न करण्याचे आवाहन

निवृत्ती वेतनधारकांनी आधारकार्डव पॅनकार्डसंलग्न करण्याचे आवाहन लातूर, दि. 28 (जिमाका):   जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक व कुंटूंब निवृत्तीवेतनधारकयांनी भारत सरकारच्या आयकर विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रक क्रमांक09/2025 नुसार आपले आधारकार्ड सोबत पॅनकार्ड दि. 30 सप्टेंबर, 2025 पूर्वी संलग्न(लिंक) करावे.विहीतमुदतीत आधारकार्ड व पॅनकार्ड संलग्न न केल्यास ऑक्टोबर 2025 च्या निवृत्तीवेतनातूनव कुंटूंब निवृत्तीवेतनातून आयकर कायद्यान्वये जास्तीचा आयकर कपात करण्यात येईल, असेजिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला पाटील व अप्पर कोषागार अधिकारी के.एन. खोजे यांनीकळविले आहे. **** 

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर लातूर, दि. २५ (जिमाका): जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला असून आतापर्यंत चार तालुक्यातील १२ गावांमध्ये एकूण ४७ बाधित गोवर्गीय जनावरांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने तातडीने सज्जता दाखवत शीघ्र कृती दल स्थापन केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व १३२ पशु चिकित्सालये व तीन फिरते पशु चिकित्सालय आदी पशुवैद्यकीय संस्थांना शासनाच्या मानक कार्यपद्धतीनुसार विलगीकरण, औषधोपचार, बाह्यपरोपजीवी नियंत्रण आणि डिसइन्फेक्शनबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित गावे आणि बाधित जनावरांची स्थिती अहमदपूर तालुका: वरवंटी, धसवाडी, कोंडगाव, ब्रम्हपुरी, शिंदगी – या ५ गावांत प्रादुर्भाव. २६ जनावरांपैकी ५ बरे, १९ वर उपचार सुरू, २ मृत्यू. लातूर तालुका: बोरवटी,खुलगापूर, सलगरा ही तीन गावे ३ रुग्णांपैकी २ बरे, १ वर उपचार सुरू. उदगीर तालुका: हेर, डोंगरशेळकी, देवर्जन – या ३ गावांत प्रादुर्भाव. ७ बाधित जनावरांपैकी ३ बरे, ४ वर उपचार सुरू. देवणी तालुका: अंबान...

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी ३.२ मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी ३.२ मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. २५ (जिमाका): जिल्ह्यात २५ जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक ११.२ मिलीमीटर, तर औसा तालुक्यात सर्वात कमी १.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- २.०, औसा- १.२, अहमदपूर- २.०, निलंगा- २.६, उदगीर- ४.२, चाकूर- ३.५, रेणापूर- २.२, देवणी- ८.६, शिरूर अनंतपाळ- ११.२ आणि जळकोट- ४.७ मिलीमीटर. *****

शून्य रक्कमेत जनधन खाते, अन् विमायोजनांची होणार जागृती 

शून्य रक्कमेत जनधन खाते, अन् विमायोजनांची होणार जागृती  लातूर, दि. 24 (जिमाका):  जिल्हा प्रशासन आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनेकेंद्र सरकारची आर्थिक समावेशकता मोहिम जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राबविण्यातयेत आहे. या मोहिमेत शून्य रक्कमेवर जनधन खाते उघडण्यासह केंद्र सरकारच्या बँकांमार्फेतराबवण्यात येणाऱ्या विमा व पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ ग्राहकांना देण्यातयेणार आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल आठवले यांनी दिली.हीमोहिम केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसारआणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली  राबविण्यातयेत आहे.  मोहिमेचा मुख्य उद्देश जनसुरक्षायोजनांद्वारे लाभार्थीना सुरक्षित करणे हा आहे. मोहिमेत शून्य बॅलेन्स जन धन खाते उघडणे,प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करणे, अटलपेन्शन योजनेचे सदस्यत्व देणे तसेच दहा किंवा त्याहून अधिक वर्षापूर्वी उघडलेल्या बचतवा जन धन खात्यांसाठी तसेच निष्क्रिय खात्यांसा...

लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी 14.3 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी 14.3 मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात 24 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 14.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये देवणी तालुक्यात सर्वाधिक 20.3 मिलीमीटर, तर लातूर तालुक्यात सर्वात कमी 3.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- 3.7, औसा- 16.9, अहमदपूर- 7.4, निलंगा- 18.7, उदगीर- 18.6, चाकूर- 18.8, रेणापूर- 13.3, देवणी- 20.3, शिरूर अनंतपाळ - 10.7 आणि जळकोट- 15.7 मिलीमीटर. *****

शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे; 31 जुलैपर्यंत विमा हप्ता भरता येणार

शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे; 31 जुलैपर्यंत विमा हप्ता भरता येणार लातूर, दि. 23 : नैसर्गिक आपत्तींपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जात आहे. लातूर जिल्ह्यात आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना कार्यान्वित केली जात आहे. खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांसाठी शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 असून, शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सीएससी (CSC) केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रतिशेतकरी 40 रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेले शुल्क संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी केंद्रांना दिले जाते. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई-पिक पाहणी बंधनकारक आहे. शेतकरी सीएससी केंद्र, आपले सरकार सुविधा केंद्...

निवृत्तीवेतनाबाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आवाहन

*निवृत्तीवेतनाबाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आवाहन* लातूर दि.22:- सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्या आपल्या कार्यालयाच्या सेवार्थ प्रणालीच्या लॉगिनमध्ये सर्वप्रथम सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी दर्शविली जाते. या प्रकरणांमध्ये संबंधित कार्यालयाकडून वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 24 ऑगस्ट, 2023 अन्वये निवृत्तीवेतन सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले नमुना अ, ब, क व म.को. नि. -42 अ नमुने हे कोषागारात सेवार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन स्वरुपात अपलोड करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष (ऑफलाईन) स्वरुपात सादर करावीत. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर संबंधित निवृत्तीवेतनधारकास निवृत्तीवेतन, अंशराशिकरण व सेवा उपदानाची रक्कम विहीत कालावधीत अदा करण्याची कार्यवाही करणे कोषागारास शक्य होते. बऱ्याच आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडून निवृत्तीवेतन प्रकरणातील कागदपत्रे अद्याप या कोषागारात प्राप्त न झाल्यामुळे संबंधित निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्तीधारक हे निवृत्तीविषयक लाभापासून वंचित राहत आहेत. तसेच कागदपत्रे विलंबाने प्राप्त झाल्यास त्याअनुषंगिक लाभ देण्यात येणाऱ्या दिरंग...

कारगिल विजय दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रम

कारगिल विजय दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रम लातूर दि.22 :- शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. यंदाही 26 जुलै, 2025 रोजी सकाळी 9 वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद स्मारक येथे शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी व 26 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे. ****

लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ३०.५ मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ३०.५ मिलीमीटर पावसाची नोंद लातूर, दि. २२ (जिमाका): जिल्ह्यात २२ जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ३०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक ६२.३ मिलीमीटर, तर जळकोट तालुक्यात सर्वात कमी १२.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- ३२.६, औसा- ३५.६, अहमदपूर- १२.६, निलंगा- ३१.९, उदगीर- ३०.९, चाकूर- ३०.३, रेणापूर- ३४.४, देवणी- २५.६, शिरूर अनंतपाळ- ६२.३ आणि जळकोट- १२.५ मिलीमीटर. *****

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत लातूर विभागातील चार बसस्थानकांची उत्कृष्ट कामगिरी

वृत्त विशेष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत लातूर विभागातील चार बसस्थानकांची उत्कृष्ट कामगिरी लातूर, दि. १८ (जिमाका) : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धा राबविली जात आहे. या अभियानांतर्गत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या पहिल्या सर्वेक्षणात लातूर विभागातील चार बसस्थानकांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २३ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविले जात आहे. या अभियानातील पहिले सर्वेक्षण जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान झाले. यात छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक स्तरावर लातूर विभागातील अ, ब आणि क गटातील एकूण चार बसस्थानके पहिल्या सर्वेक्षणात आघाडीवर राहिली आहेत.औसा नवीन बसस्थानकाने १०० पैकी ९४ गुण मिळवून अ गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुरुड बसस्थानकाने ८८ गुणांसह अ गटात तृतीय क्रमांक मिळवला आहे. लातूर बसस्थानक क्र. २ (जुना रेणापूर नाका) याने ब ग...

लातूर येथे २२ जुलै रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूर येथे २२ जुलै रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा लातूर, दि. १८ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, मॉडेल करिअर सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा मेळावा लातूर येथील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे होणार आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित आस्थापना आणि उद्योजक सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई., बी.टेक आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल. इच्छुक उमेदवारांनी २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथील बार्शी रोडवरील शासकीय निवसी महिला तंत्रनिकेतन येथे स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे. त्यांनी मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा, रेझ्युम आणि पासपोर्ट आकाराचे फोटो (पाच प्रती) सोबत आणावेत. लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि नोकरीइच्छुक उमेदवारांनी या...

लातूर तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे २१ जुलैला आयोजन

लातूर तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे २१ जुलैला आयोजन लातूर, दि. १८ (जिमाका) : २६ सप्टेंबर २०१२ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार लातूर तालुक्याचा लोकशाही दिन २१ जुलै २०२५ रोजी लातूर तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. या लोकशाही दिनास तालुकास्तरीय सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. लातूर तालुक्यातील नागरिकांनी शासकीय कामांसंदर्भात अर्ज सादर करायचे असल्यास, विहित नमुन्यातील अर्ज दोन प्रतींमध्ये सकाळी ११ ते १२ या वेळेत तहसील कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे. *****

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा लातूर दौरा कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा लातूर दौरा कार्यक्रम लातूर, दि. १८ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या रविवार, २० जुलै २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. श्रीमती चाकणकर यांचे २० जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ५ वाजता त्या लातूर येथील ‘वन स्टॉप सेंटर’ येथे भेट देतील व आढाव बैठक घेतील. रात्री ८.३० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथून धाराशिवकडे प्रयाण करतील. *****

लातूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील बॅच क्रमांक ३३ चा पासिंग आउट परेड व शपथविधी समारंभ उत्साहात

Image
लातूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील बॅच क्रमांक ३३ चा पासिंग आउट परेड व शपथविधी समारंभ उत्साहात लातूर, दि. १८ (जिमाका) : क्रीडा कोट्यातून भरती झालेल्या बॅच क्रमांक ३३ चा पासिंग आउट परेड आणि शपथविधी समारंभ लातूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात पार पडला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या रंगरूट प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा पोलिस उपमहानिरीक्षक अमीरुल हसन अंसारी यांनी उत्तीर्ण जवानांचे अभिनंदन केले आणि त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाची गौरवशाली परंपरा शिस्तबद्धपणे पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन केले. या परेडमध्ये २१ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले, ज्यामध्ये नौकाविहार, तायक्वांदो, ज्युडो, वुशू, जलतरण, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक, आर्चरी आणि आइस स्केटिंग यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश होता. या नवीन जवानांना १६ आठवड्यांच्या मूलभूत प्रशिक्षणादरम्यान कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्यात आले. यात ड्रिल, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, फायरिंग यासारख्या सैनिकी कौशल्यांचा समावेश होता. यावेळी कमांडंट, मुख्य प्रशिक्षण अधिकारी पारस...

सर्व शासकीय, खासगी आस्थापनांनी ३१ जुलैपर्यंत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे

सर्व शासकीय, खासगी आस्थापनांनी ३१ जुलैपर्यंत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे लातूर, दि. १८ : सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांनी कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ईआर-१) प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा अधिनियम, १९५९ आणि त्याअंतर्गत नियमावली, १९६० नुसार, सर्व आस्थापनांनी हे विवरणपत्र तातडीने सादर करावे, असे देण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य शासन, अंगीकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना ईआर-१ विवरणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. या विवरणपत्रासाठी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नियोक्ता लॉगइनद्वारे प्रवेश करावा. यासाठी 'एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब)' पर्यायावर क्लिक करून, युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगइन करावे. त्यानंतर डॅशबोर्डवरील 'ईआर-१' पर्याय निवडून 'एंटर ईआर-१' वर क्लिक करावे. यानुसार, त्रैमासिक व...

सार्वजनिक आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी केले लातूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

सार्वजनिक आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी केले लातूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन • दोन वर्षांत १९ आरोग्य संस्थांना मिळाले राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन • राज्यात प्रथमच ग्रामीण रुग्णालयाला एनक्यूएएस मानांकन लातूर, दि. १७ : लातूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांनी गेल्या दोन वर्षांत कायाकल्प पुरस्कार आणि राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (एनक्यूएएस) प्राप्त करून आपले नाव उज्ज्वल केले आहे. विशेषतः राज्यात प्रथमच ग्रामीण रुग्णालय श्रेणीत मुरुड ग्रामीण रुग्णालयाने एनक्यूएएस मानांकन मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह जिल्हा आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सन २०२४ मध्ये जिल्ह्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ८ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय पातळीवरील आणि शासनाच्या आरोग्य विभागात सर्वोच्च समजले जाणारे राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (एनक्यूएएस) मिळाले आहे. सन २०२५ मध्ये ८ आरोग्यवर्धि...

अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन

अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन लातूर, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे. *****

लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 10.7 मि.मी. पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 10.7 मि.मी. पावसाची नोंद लातूर दि.17 (जि.मा.का.):- जिल्ह्यात आज दिनांक 17 जुलै 2025 रोजी सकाळी 8 पर्यंत सरासरी 10.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 48.4 मिलीमीटर पावसाची नोंद रेणापूर तालुक्यात झाली आहे. तालुका निहाय पर्जन्यमान पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी 1 जून 2025 ते आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. लातूर-16.8 (82.6) , औसा-12.4, (125.3) , अहमदपूर - 1.4 (112), निलंगा-8.1 (118), उदगीर-0.8 (114.1), चाकूर- 1.5, (121.5), रेणापूर 48.4, (130.8) , देवणी- 2.5. (110.8), शिरुर अनंतपाळ- 4.7 (107.9), जळकोट- निरंक (95.5). जिल्ह्यात 1 जून, 2025 पासून आजपर्यंत झालेला पाऊस 113.1 मि.मी. इतका असून वार्षिक सरासरीच्या 47.5 टक्के आहे. ****

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठीप्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ 

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठीप्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ  लातूर, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  दि. 31 जानेवारी, 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. 19 जुलै, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov....

जिल्हा कोषागार कार्यालयामार्फतशिवणी (बु) येथे वृक्षारोपण

Image
जिल्हा कोषागार कार्यालयामार्फतशिवणी (बु) येथे वृक्षारोपण लातूर, दि. 11 (जिमाका):   लातूर येथील जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या कार्यालयामार्फतशिवणी (बु) ता. औसा. जि. लातूरयेथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील यांच्याउपस्थितीत 905 वृक्ष लागवड करुन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळीअप्पर कोषागार अधिकारी नागेश बुध्दीवंत, श्री. खोजे, मारुती गुट्टे, उपकोषागार अधिकारीअ.दि.मोरे यांच्यासमवेत तालुका व जिल्हास्तरावरील उपकोषागार कार्यालयचे अधिकारी, कर्मचारीतसेच शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तरव विद्यार्थी - विद्यार्थींनीची यावेळी उपस्थिती होती. ****

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संचासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संचासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत लातूर, दि. ११ (जिमाका) : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा, यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजना सन २०२५-२६ मध्ये राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे. अल्प व अत्यल्प भूधारक (२ हेक्टरपर्यंत क्षेत्र) तसेच बहुभूधारक (२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र) असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून पूरक अनुदान २५ टक्के आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती स्वावलंबन योजना अथवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पूरक अनुदान १० टक्के असे एकूण ९० टक्के अनुदान मिळेल. बहुभूधारक शेतकऱ्यांना राष्ट्र...

उदगीर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात १०३ उमेदवारांची प्राथमिक निवड

Image
उदगीर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात १०३ उमेदवारांची प्राथमिक निवड लातूर, दि. ११ (जिमाका) : जिल्ह्यातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर आणि उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात १०३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर ६५ उमेदवारांची अंतिम निवड पूर्ण झाली. या रोजगार मेळाव्यात हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि लातूर जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांचे उद्योजक उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष मुलाखतींद्वारे उमेदवारांची निवड केली. मेळाव्याच्या प्रारंभी कौशल्य विकास सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. युवकांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. के. ...

खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यातंर्गत पीक स्पर्धेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यातंर्गत पीक स्पर्धेकरिता अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 9 (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यातंर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगामन सन 2025 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफुल या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मूग व उडीद पिकांसाठ...

'विकसित महाराष्ट्र २०४७' साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदविण्याचे आवाहन

'विकसित महाराष्ट्र २०४७' साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदविण्याचे आवाहन लातूर, दि. ९ : 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोड लिंकवर नागरिकांनी आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही. https://wa.link/o93s9m या लिंकवर आपले मत नोंदवावे, असे आवाहन लातूर जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत -भारत@२०४७ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्राचा ठसा...

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी ११ जुलै रोजी आरक्षण सोडत लातूर, दि. ०९ : जिल्हाधिकारी यांच्या आदेशनुसार सन २०२५ ते २०३० या कालावधीतील गठीत होणाऱ्या लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत लातूर उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही सोडत होणार आहे. लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायातींपैकी २३ ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव राहणार असून यापैकी ११ पदे अनुसूचित जातीमधील महिलांसाठी राखीव राहतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ सरपंच पदे राखीव असतील, यापैकी १ पद अनुसूचित जमातीमधील महिलेसाठी राखीव राहील. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३० पदे राखीव ठेवण्यात येणार असून यापैकी १५ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच राहतील, यापैकी २८ सरपंच पदे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहतील. लातूर तालुक्यातील ...

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठीप्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ  

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठीप्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ   मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  दि. 31 जानेवारी, 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. 19 जुलै, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov....

महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्ती अर्ज, रिअप्लाय अर्ज भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्ती अर्ज, रिअप्लाय अर्ज भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. 3 : जिल्ह्यातील सर्व शासकीय मान्यताप्राप्त, अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमधील विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल 30 जून 2025 पासून सुरू झाले आहे. सर्व प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज अचूकपणे भरून खालील वेळापत्रकानुसार महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन मंजुरीसाठी कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालय अभ्यासक्रम (उदा. इ. 11वी, 12वी (सर्व शाखा), MCVC, ITI):- नवीन अर्ज: प्राप्त अर्ज ऑनलाइन अग्रेषित करण्याची प्रस्तावित मुदत (प्राचार्यांसाठी)- 15 जून 2025 ते 15 ऑगस्ट 2025, सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयासाठी अर्ज मंजुरीची मुदत- 15 जून 2025 त...

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 6 जुलैपर्यंत मुदतवाढ

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 6 जुलैपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. 3 (जिमाका): पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजने अंतर्गत मृग बहार 2025 साठी पेरू, लिंबू आणि चिकू या फळपिकांसाठी नोंदणीची अंतिम मुदत 30 जून 2025 होती. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 6 जुलै 2025 पर्यंत वाढवली आहे. शेतकरी या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर 6 जुलै 2025 पर्यंत नोंदणी करू शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन मुदतवाढीचा लाभ घेत फळपिकांचे विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन लातूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे. *****

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, दि. ०१ : आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत. ऊन, वारा पाऊस याची तमा न बळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात यंदा स्वखर्चाने सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे. या निमित्ताने माणसातील " विठुराया" ची सेवा करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबविणार असल्याचेही मंत्री श्री. सर...

सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत

सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत लातूर, दि. 1 : शासनाने सन 2025-26 पासून खरीप हंगामासाठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पिक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे. ही योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित मंडळांमधील अधिसूचित पिकांसाठी लागू असून, कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी विमा हप्ता दर 2 टक्के आणि नगदी पिकांसाठी, विशेषतः कापसासाठी 3 टक्के निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 58,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना 1,160 रुपये हप्ता भरावा लागेल. तूर पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 41,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 820 रुपये हप्ता आहे. मूग आणि उडीद पिकांसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर प्रत्येकी 25,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 500 रुपये ...

लातूर येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन

लातूर येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन लातूर, दि. 01: जिल्हास्तर आणि महानगरपालिकास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन लातूर येथील वर्ल्ड पीस स्कूल, साई रोड येथे करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा 08 ते 09 जुलै 2025 रोजी, तर महानगरपालिकास्तरीय स्पर्धा 10 ते 11 जुलै 2025 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धा 15 वर्षांखालील मुले आणि 17 वर्षांखालील मुले-मुली या वयोगटांसाठी खेळवल्या जाणार आहेत. 15 वर्षांखालील मुलांची जन्मतारीख 01 जानेवारी 2011 किंवा त्यानंतरची, तर 17 वर्षांखालील मुले-मुलींची जन्मतारीख 01 जानेवारी 2009 किंवा त्यानंतरची असावी. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व संघांनी www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच, प्रत्येक संघाने याच संकेतस्थळावर 2,000/- रुपये प्रवेश शुल्क भरावे. यानंतर, https://dsolatur.com या संकेतस्थळावर 07 जुलै 2025 पर्यंत संघाची प्रवेशिका सादर करणे अनिवार्य आहे.