Posts

Showing posts from June, 2023

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यर्थ्यांना ‘महाज्योती’तर्फे 50 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य!

  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यर्थ्यांना ‘महाज्योती’तर्फे 50 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य! लातूर, दि. 28 (जिमाका) : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्थेमार्फत इतर मागास वर्ग , विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य योजनेसाठी ‘महाज्योती’तर्फे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.   या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय , भटक्या जाती , विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. विद्यार्थी हा 15 जून 2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा. केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा. ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी इतर संस्था किंवा ‘सारथी’ कडून अर

जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास ‘महाज्योती’मार्फत मुदतवाढ

  जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास ‘महाज्योती’मार्फत मुदतवाढ लातूर, दि. 28 (जिमाका): महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) मार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण इयत्ता दहावीनंतर देण्यात येते. हे प्रशिक्षण दोन वर्षांसाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज सहा जीबी डेटा देण्यात येतो. इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना ‘महाज्योती’च्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ दिला जातो. या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास ‘महाज्योती’ने 5 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.   या   योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा , विद्यार्थी हा इतर मागास वर्ग , विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती ‘महाज्योती’च्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावरील सूचना फलकात जाऊन प्रशिक्षणा

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी लातूर , दि.28 ( जिमाका): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था , सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 1 जूलै 2023 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 15 जूलै 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.       या आदेशान्वये शस्त्रे , सोटे , तलवारी , भाले , दंडे , बंदुका , सुरे , काठ्या , लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल , अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेत , आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा , गाणे म्हणणे , वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा , अंत्ययात्रा , विवाह , अधिकारी , कर्मचारी य

युवा उत्सव 2023 अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

  युवा उत्सव 2023 अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन लातूर , दि . 28 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत लातूर येथे 30 जून 2023 रोजी ‘युवा उत्सव’चे आयोजन करण्यात येत आहे. या युवा उत्सवात युवा कलाकार चित्रकला स्पर्धा, युवा लेखक कविता स्पर्धा , मोबाइल फोटोग्राफी स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन लातूर नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी केले आहे.   लातूर नेहरू युवा केंद्र आणि लातूर कृषि महाविदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन 30 जून 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लातूर येथील नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. या अंतर्गत आयोजित स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवा-युवतींना भाग घेता येईल. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन

विशेष लेख : विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!

Image
  राज्यातील मराठा , कुणबी , मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक , शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती , उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती , केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण , संशोधनासाठी फेलोशिप , रोजगार व स्वयं-रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण , शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि व कृषिपूरक कौशल्य विकास प्रशिक्षण व मार्गदर्शन इत्यादी प्रकारचे विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम सारथी संस्थेमार्फत केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्वप्नांना बळ मिळत आहे... ' शाहू विचारांना देऊया गती , साधूया सर्वांगीण प्रगती ’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या ‘ सारथी ’ चे मुख्य कार्यालय पुणे येथे असून कोल्हापूर येथे उपकेंद्र आहे. संस्थेचे काम अधिक गतीने , सुलभरित्या होण्यासाठी कोल्हापूर उपकेंद्र , अमरावती , औरंगाबाद , नागपूर , पुणे , नाशिक , मुंबई (खारघर

लातूर येथे मराठवाड्यातील पहिली कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

Image
  लातूर येथे मराठवाड्यातील पहिली कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी ! ·          लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली शस्त्रक्रिया लातूर , दि . 27 (जिमाका) : हेलन केलर यांच्या जयंतीदिनी 27 जून रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मराठवाड्यातील पहिली कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. औसा तालुक्यातील याकतपूर येथील दिव्यांग मुलावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया सुरु करण्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला होता. तसेच यासाठी विविध विभागांचा समन्वय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जन्मतःच श्रवण क्षमतेचा अभाव असलेल्या याकतपूर येथील मुलाच्या पालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे इतर मुलांप्रमाणे आपल्याही मुलाला ऐकायला यावे, यासाठी हे पालक प्रयत्न करीत होते. मात्र, याकरिता कराव्या लागणाऱ्या कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च खूप होता आणि या शस्त्रक्रिय

शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जूनपूर्वी करावे -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

  शेतकऱ्यांनी   पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जूनपूर्वी करावे -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.   लातूर,दि.27 (जिमाका) :-   खरीप पीक कर्ज वाटपाचे   उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, नवीन पीक कर्ज वाटप करणे,   तसेच विद्यमान पीक कर्ज वाढीसह नूतनीकरण करणे   आवश्यक आहे.   कर्ज नूतनीकरणासाठी   सर्व बँका गावागावात   शिबिरे   आयोजित करून पीक कर्ज वाटपाचे   उद्दिष्ट   साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना घरोघरी   भेटून   आवाहन करीत आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी   पीक कर्जाचे नूतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.   रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक   सूचनांनुसार   अल्प मुदतीच्या पीक कर्जाची परतफेड 365 दिवसांच्या आत किंवा दरवर्षी 30 जून रोजी किंवा त्यापूर्वी केली पाहिजे. पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यानंतर, शेतकरी    कर्जाच्या   रकमेत   वाढीसाठी   पात्र होतात.   जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख योजना आणि केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत प्रत्येकी 3 टक्के व्याज सवलत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज मिळते. पीक कर्जाचे वेळेवर नूतनीक

राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर ,   दि .   26   (जिमाका) :   राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार आणि सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राजर्षि छत्रपती शाहू महाराज चौकातून समता दिंडीला सुरुवात झाली. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर समता दिंडीचा समारोप झाला. समाज कल्याण विभागातील अधिकारी , कर्मचारी यांच्यासह नागरिक या समता दिंडीत सहभागी झाले होते. सामाजिक न्याय भवन येथे राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन             राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक नय्य भवन येथे आयोजित कार्यक्रमात समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुल