खरीप - 2022 हंगामासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना

 

खरीप - 2022 हंगामासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना

 

*लातूर, दि.17:- (जिमाका ):-* सद्यस्थितीला निर्माण झालेल्या परस्थितीत खत, बियाणे, कीटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी तसेच गुणवत्ते संदर्भात तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या नियंत्रण कक्षामध्ये सकाळी 8-00 ते सायंकाळी 8-00 या वेळेत शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दीद्वारे कळविले आहे.

बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व कीटकनाशके विक्रते यांना क्षेत्रीयस्तरावर  वेगवेगळ्या अडचणी आल्याचे निर्दशनात येत आहेत. खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी  व बियाणे, खते व कीटकनाशके विक्रते यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे  गरजेचे आहे. त्याचबरोबर खते व कीटकनाशक विक्रते यांच्या अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळेनिर्माण झालेल्या खत टंचाईच्या अनुषंगाने निविष्ठा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्याचे विक्री नियंत्रण करणे आवश्यक आहे.

बियाणे, खते व कीटकनाशक यांच्या गुणवत्ता व पाठपुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर  नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सकाळी ८-०० ते सायंकाळी ८-०० या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी- ९४०५६५३०४६ असेल. सोबतच अडचण किंवा तक्रार dsaolatur@rediffmail.com या इ-मेल आयडीवर सुद्धा मेलद्वारे पाठवता / नोंदवता येईल, असेही प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

*****  

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु