कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी.....

जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने
21 व 22 मार्च रोजी बंद ठेवण्याचे आदेश

लातूर,दि.20:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी दि.  21 व 22 मार्च 2020 रोजी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी आज व्हीसी व्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणुला रोखण्यासाठी जनतेने स्वयस्फुर्तीने बंद पाळणे आवश्यक आहे.  दि. 21 व 22 मार्च रोजी जनतेने घराबाहेर पडू नये, अशी  सूचना त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर  जिल्हयांतील  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश  दिले आहेत.
       या दोन दिवसांच्या बंदमधून पुढील आस्थापनांना वगळण्यात आले आहे. यामध्ये शासकीय/निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने व औषधे दुकाने, विदयुत पुरवठा, ऑईल व पेट्रॉलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमं, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना यांना वगळून जिल्हयांतील सर्व आस्थापना व दुकाने दि. 21 व 22 मार्च 2020 रोजी बंद ठेवावेत, असे  आदेश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले आहेत.
*****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु