जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री अमित देशमुख
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री अमित देशमुख *पूर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल सादर करावा * पिक विमा संदर्भातील अर्ज गावपातळीवर स्वीकारली जाणार लातूर,दि.30 (जिमाका) जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा अमित देशमुख यांनी केले. निलंगा तालुक्यातील गौर येथे मांजरा नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान पाहणी वेळी ते बोलत होते.या प्रसंगी अशोक पाटील निलंगेकर, अभय साळुंके, जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,उपविभागीय अधिकारी शोभा जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र कदम,जिल्हा कृषि अधिक्षक दत्तात्रय गावसाने,तहसीलदार गणेश जाधव उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात