औसा-तुळजापूर चार पदरी मार्ग उजनी जवळील तेरणा नदीच्या पुलाचे पाणी वाढत असल्यामुळे बंद

 

 

औसा-तुळजापूर चार पदरी मार्ग उजनी जवळील

तेरणा नदीच्या पुलाचे पाणी वाढत असल्यामुळे बंद

 

लातूर दि.28 ( जि.मा.का ):-  महाराष्ट्रासह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊसामुळे तेरणा नदी उजनी औसा जि. लातूर जवळच्या पुलावर एचएफल 0.5 मीटर किंवा त्याहून अधिक वर वाहत आहे. नदीच्या पुलावरील पाण्याची पातळी आणखीन वाढत असल्याने सद्याच्या पुलावर महामार्गावर वाहतूक चालविणे असुरक्षित आहे. त्यामुळे रस्ता वापरकर्त्याच्या सुरक्षिततेचा विचार करुन पातळी एचएफएलच्या खाली येईपर्यंत पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येत आहे.

त्यामुळे औसा - तुळजापूर हा चार पदरी मार्ग उजनी जवळील तेरणा नदीच्या पुलाचे पाणी वाढत असल्यामुळे बंद करण्यात येत असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नांदेड यांनी कळविले आहे.

0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु