Posts

Showing posts from October, 2023

लातूरची शांततेची परंपरा कायम राखून प्रशासनाला सहकार्य करा -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
  • मराठा संघटनांच्या प्रतिनिधींना पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठकीत आवाहन   लातूर ,   दि. 31   (जिमाका) : लातूर जिल्ह्याला शांततेची पूर्वापार परंपरा आहे. तीच परंपरा यापुढेही कायम राहावी, यासाठी मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि मराठा बांधवांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असे कृत्य कोणीही करू नये, यासाठी मराठा समाज प्रतिनिधींनी त्यांचे प्रबोधन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.   जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी रात्री झालेल्या मराठा समाज प्रतिनिधींची बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.   सकल मराठा समाजाने आजवर शांततेने आंदोलन केले असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने यापुढेही या आंदोलनाला गालबोट लागणार नाही, यासाठी मराठा समाज प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी. तसेच या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच बाजूला करून त्यांचे प्रबोधन

जिल्हा परिषद अतंर्गत गट-क परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

  जिल्हा परिषद अतंर्गत गट-क परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू   लातूर ,   दि. 31   (जिमाका) : जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 परीक्षा 1 व 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून या सहाही परीक्षा   परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात 1 व 2 नोव्हेंबर, 2023 या काळात सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. जिल्हा परिषद अंतर्गत गट - क परीक्षा लातूर येथील नेटीझन्स डिजीटल , कॉस इंस्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन , गुरु ऑनलाईन एक्झाम सेंटर , स्वामी विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटेक्निक , ओम साई इन्फोटेक आणि निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशामुळे या सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही , कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्र परिसरात परीक्षा

लातूर येथे आयोजित राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  लातूर येथे आयोजित राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद                  लातूर,दि.31  (जिमाका)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  आणि  जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनेच्या संयुक्त वि द्यमाने  31 ऑक्टोंबर, 2023  रोजी  भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल  यांच्या जयंतीदिनी आयोजित राष्ट्रीय एकता दौडला नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वतंत्र चळवळीने व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा , यासाठी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.             सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे  पूजन करण्यात आले. तसेच  राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ  घेण्यात आली.  उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी एकता दौडला  हिरवी झेंडी दाखविली. रेणापूरचे  तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे  यांच्यासह  खेळाडू व नागरीक  यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाडीबीटी पोर्टलवर सन 2023-24 शैक्षणिक वर्षाचे शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

  *महाडीबीटी पोर्टलवर सन 2023-24 शैक्षणिक वर्षाचे शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यास सुरुवात* *लातूर, दि. 30 (जिमाका) :* महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2023-24 या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (फ्रीशिप), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्य ​ वृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे अर्ज भरण्यासाठी 11 ऑक्टोबर 2023 पासून महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. 8 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार संबंधित महाविद्यालयांत राबविण्यात येणारे अभ्यासक्रमाची शिक्षण शुल्कांची मंजूरी, विद्यापिठांमार्फत दिली जाणारी इतर शुल्काची मंजूरी व शैक्षणिक विभाग, शासकीय यंत्रणा यांचेकडून घेण्यात येणारी मंजूरी या सर्व बाबींची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित लिपीक कर्मचारी यांची असल्याने या कामकाजास प्राधान्य देण्यात यावे. महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. त्यामा

जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमध्ये 31 टक्केच पाणीसाठा; नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन

  • सर्व प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव; अन्य प्रयोजनासाठी वापरल्यास कारवाई लातूर ,   दि. 30   (जिमाका) : जलसंपदा विभागाच्या एकूण 171 प्रकल्पामध्ये सध्या केवळ 31.86 टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. भविष्यातील निर्माण होणारी पाणी टंचाईची लक्षात घेता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याच्या प्रयोजनासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पातील पाण्याचा उपयोग हा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी करणे अत्यावश्यक असून इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर करून नये. तसेच नागरिकांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा , असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. पिण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर होत असल्यास तात्काळ दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन , वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 व 2 चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. पाणी पुरवठ्याशी संबंधित सर्वच

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

  महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर ,   दि. 30   (जिमाका) : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023 परीक्षा 25 ऑक्टोबर 2023 ते 3 नोव्हेंबर , 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून या सहाही परीक्षा   परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2023 या काळात सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट - क परीक्षा लातूर येथील नेटीझन्स डिजीटल , कॉस इंस्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन , गुरु ऑनलाईन एक्झाम सेंटर , स्वामी विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटेक्निक , ओम साई इन्फोटेक आणि निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशामुळे या सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही , कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा क

जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमध्ये 31 टक्केच पाणीसाठा; नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन • सर्व प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव; अन्य प्रयोजनासाठी वापरल्यास कारवाई

  जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमध्ये 31 टक्केच पाणीसाठा; नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन • सर्व प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव; अन्य प्रयोजनासाठी वापरल्यास कारवाई लातूर ,   दि. 30   (जिमाका) : जलसंपदा विभागाच्या एकूण 171 प्रकल्पामध्ये सध्या केवळ 31.86 टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. भविष्यातील निर्माण होणारी पाणी टंचाईची लक्षात घेता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याच्या प्रयोजनासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पातील पाण्याचा उपयोग हा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी करणे अत्यावश्यक असून इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर करून नये. तसेच नागरिकांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा , असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. पिण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर होत असल्यास तात्काळ दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन , वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे , असे आव

लातूर येथे मंगळवारी होणारे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अंतर्गत एक दिवसीय शिबीर पुढे ढकलले

  लातूर येथे मंगळवारी होणारे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अंतर्गत एक दिवसीय शिबीर पुढे ढकलले लातूर ,   दि. 30    (जिमाका) :  दिव्यांग बांधवांसाठी लातूर येथे मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 रोजी आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत  ‘ दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी ’  अभियान अंतर्गत एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आले असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी कळविले आहे. ******

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे 31 ऑक्टोबर रोजी लातूर येथे आयोजन · आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणण्याचे आवाहन

Image
  ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे 31 ऑक्टोबर रोजी लातूर येथे आयोजन ·          आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणण्याचे आवाहन लातूर ,   दि. 2 7   (जिमाका) :  दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता राज्य शासनाने  ‘ दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी ’  हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. लातूर येथील औसा रोडवरील थोरमोटे लॉन्समध्ये  31  ऑक्टोबर  2023  रोजी अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हे शिबीर होणार आहे. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा यासाठी समन्व्यक नेमून त्या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी घेतली.    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर ,  महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे ,  उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक ,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे ,  नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त रामदास कोकरे ,  जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते. दिव

गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना...!!- युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Image
  गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना...!! भारतीय ग्राम व्यवस्थेत खेडी स्वयंपूर्ण होती. कारण गावातल्या गरजा गावातच भागविल्या जात होत्या. त्यासाठी गावकारागीर असतं त्याला बारा बलुतेदार म्हणून ओळखले जात होते. काळानुरूप मोठे बदल झाले गावातली ही कारागीर मंडळी मागे पडली , मोठया प्रमाणात व्यवसायात तांत्रिकता आली. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त देशवासीयांना मोठी भेट दिली. त्यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे.नेमकी ही योजना काय आहे यावर टाकलेला हा प्रकाश...!!        पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. लोहार , सोनार , कुंभार , सुतार आणि मोची यांसारखी पारंपारिक कौशल्ये असलेल्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल. अशा 18 पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तीन लाखांचे कर्ज मिळेल जर व्यक्तीकडे पारंपारिक कौशल्य असेल तर पीएम विश्वकर्

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता नववी, अकरावी प्रवेश परीक्षेसाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन · 10 फेब्रुवारी 2024 रोजी परीक्षेचे आयोजन

      जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता नववी, अकरावी प्रवेश परीक्षेसाठी   31   ऑक्टोबर   2023   पर्यं त अर्ज करण्याचे आवाहन ·           10 फेब्रुवारी 2024 रोजी परीक्षेचे आयोजन लातूर ,   दि. 27 (जिमाका) :   येथील पी. एम. श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी व आकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. हा प्रवेश शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी असून इयत्ता नववी व आकरावी वर्गाच्या लॅटरल एन्ट्री प्रवेशासाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रवेश परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश परीक्षा 10 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असू नसदर प्रवेश प्रक्रियाची सर्व माहिती   https://navodaya.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष   2023-24   मध्ये लातूर जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता आठवीत शिकत असणारे विदयार्थीच इयत्ता नववी प्रवेश चाचणी परीक्षेसाठी पात्र राहतील. प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2009 पूर्वी व 31 जुलै 2011 नंतर झालेला नसावा. ही अट सर्व राखीव गटासाठी सुध

‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठीअर्ज करण्याचे आवाहन

  ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठीअर्ज करण्याचे आवाहन              लातूर, दि.27 (जिमाका): मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना नोव्हेंबर 2022 पासून राज्यात कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेतून आतापर्यंत 42 शेततळे पूर्ण झाले असून सध्याच्या मोठ्या पावसाच्या खंड काळात शेततळ्यामध्ये जमा झालेल्या पाण्याचा खरीप पिके तसेच फळबागाच्या संरक्षित सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सध्याची टंचाईची परिस्थिती पाहता भविष्यात फळबाग वाचवण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विहीर व बोअरवेलचे तसेच परतीच्यापावसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेऊन वाचविणे गरजेचे आहे. या योजनेतून अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत व अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळते.    काम पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा करण्यात येते. यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सीएससी   केंद