ना. उदय सामंत, ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते ‘माझी माती, माझा देश’ अभियान अमृत कलशांचे पूजन

                                          ना. उदय सामंतना. संजय बनसोडे यांच्या हस्ते

माझी मातीमाझा देश’ अभियान अमृत कलशांचे पूजन


लातूर
, दि. 13 (जिमाका) : मेरी माटीमेरा देश-माझी मातीमाझा देश’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील माती दिल्ली येथे अमृत वाटिका निर्मितीसाठी जाणार आहे. जिल्ह्यातील 10 पंचायत समितीमधून आलेल्या कलशांचे पूजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्योगमंत्री उदय सामंतक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार विक्रम काळेजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरसहायक जिल्हाधिकारी नमन गोयलमाजी आमदार गोविंद केंद्रे यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून प्रत्येक पंचायत समितीमधून एक असे 10जिल्ह्यातील 9  नगरपालिका व नगरपरिषदेतून एक आणि महानगरपालिकेचा एक अमृत कलश असे एकूण 12 अमृत कलश मुंबई येथे रवाना होतील. दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेसाठी या कलशातील माती वापरली जाणार आहे.

*****



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु