Posts

Showing posts from October, 2021

उदगीर, जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी - राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे बांधकाम विभागाला निर्देश

Image
  उदगीर, जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी * राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे बांधकाम विभागाला निर्देश   लातूर दि.31 ( जिमाका ) मागील पावसाळ्यात   उदगीर जळकोट   ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले असुन ते तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम ,पर्यावरण पाणी पुरवठा,   राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज दिले.     उदगीर जळकोट   तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, विभागातील विविध विकास कामा संदर्भात लातूर येथील विश्रांमग्रहात बैठक घेतली.त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.       याबैठकीला सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता एम एम पाटील, उप अभियंता एल डी देवकर , जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता लवटे (मुख्यमंत्री सडक योजने) प्रधान मंत्री गाव सडक योजनाचे कार्यकारी अभियंता श्री मुकादम जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभिंयता श्री. माह्त्रे    कार्यकारी अभियंता रोहित जगताप   यासोबतच उदगीर पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजी मुळे ,उदगीरचे नगरसेवक ताहेरभाई   सय्यद मंजुर्खा पठाण   ,इत्यादी उपस्थित होते.             यावेळी उदगीर

लातूर शहरात 12 केंद्रावर 6 हजार 498 परिक्षार्थी परीक्षा देणार

  लातूर शहरात 12 केंद्रावर 6 हजार 498 परिक्षार्थी परीक्षा देणार   §   सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट -ड पदभरती* §   रविवार दि. 31 ऑक्टोबर, 2021 दुपारी 2 ते 4 वेळेत परीक्षा होणार §   दिव्यांग उमेदवारांनी सोबत मुळ दिव्यांग प्रमाणपत्र ठेवणे   लातूर,दि.30 (जिमाका) :- शासनाच्या परवानगीनुसार गट - ड वर्ग- 4 ( 50 ) रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक   05 ऑगस्ट, 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द केली होती. या बाबतची परिक्षा मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. यांच्यामार्फत रविवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 रोजी घेण्यात येणार आहे.   लातुर शहरात भरती परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परिक्षेसाठी 6 हजार 498 उमेदवार असुन त्यासाठी 12 केंद्रांवर दुपारी 2 ते 4 या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. या संवर्गातील कर्मचा-यांचे नियुक्ती प्राधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक लातुर हे आहेत. परीक्षा केंद्राचे नांव परिक्षार्थीची संख्या पुढील प्रमाणे आहे.              राजर्षी   शाहू महाविद्यालय (स्वायत्त) चंद्र नगर लातूर - 1200, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सरस्वती कॉलनी, जु

शहरातील अंतर्गत रस्ते, नाल्या, विविध प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत जळकोट येथे आढावा बैठक संपन्न

Image
  शहरातील अंतर्गत रस्ते, नाल्या, विविध प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश   *राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत जळकोट येथे आढावा बैठक संपन्न   लातूर,दि.29 (जिमाका) नगर पंचायत जळकोट येथे जळकोट नगर पंचायत कार्यालय अंतर्गत विविध योजनेंतर्गत चालू असलेच्या विकास कामासंबंधी तसेच प्रलंबित कामे या विषयावर नगर पंचायत कार्यालय जळकोट येथे राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे   यांच्या अध्यक्षतेखाली   नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट शहरासाठी वैशिष्यपूर्ण योजने अंतर्गत मंजूर लिंगायत भवन, बौध्द विहार, अण्णाभाऊ साठे सभागृह याबाबत कामाची सद्यस्थिती जागा उपलब्धते बाबत आढावा घेतला. त्याचप्रमाणे नवीन नगर पंचायत हाय्य योजना अंतर्गत शादिखाना, शिवाजी महाराज सभागृह याविषयी राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी आढावा घेतला. तसेच नगर पंचायत जळकोट पा.पुरवठा विभाग, शहरातील अंतर्गत रस्ते, नाल्या, विविध प्रलंबित विकास कामे लवकरात

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

  जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी   लातूर,दि.29 (जिमाका) राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 व आपत्ती निवारण कायदा, 2005   अंमलबजावणी सुरु आहे.ज्याअर्थि, कोविड-19 प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये रुग्ण्‍ संख्या आटोक्यात येत असतांना अर्थचक्रास चालना देण्यासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, शारीरिक अंतर पाळणे व मास्कचा वापर करण्यामध्ये नागरिकांकडूकन शिथिलता व निष्काळजीपणा झाल्याने राज्याला कोविड-19 बाधेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे आता शासकीय, निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे बंधन कारक केले आहे.त्या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आज काढले आहेत. राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण तातडीने पूर्ण करण्याबाबत शासन आदेश प्राप्त झाले आहेत.याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचारधीन

मौजे साखरा, ममदापूर,साई, तांदुळवाडी,आर्वी,तांदुळजा येथे भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न

  मौजे साखरा, ममदापूर,साई, तांदुळवाडी,आर्वी,तांदुळजा येथे भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न   लातूर,दि.29 (जिमाका) मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र   राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कायद्यायाची जनजागृती करण्यासाठी मौजे साखरा,ममदापूर,साई,तांदुळवाडी, आर्वी व तांदुळजा येथे नुकतेच भव्य कायदेविषयक शिबीर घेण्यात आले.या कार्यक्रमास साखरा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे उपरसपंच तुकाराम ज्ञानदेव गोडसे हे आवर्जुन उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून व मार्गदर्शक म्हणुन विधी शाखेचे विद्यार्थी प्रतिक्षा तरकसे,राहुल चेबळै,आशिष बालाजी कुटवाडे,बळीराम कानवटे हे होते. प्रतिक्षा तरकसे यांनी वैकल्पिक वाद निवारण या विषयावर मार्गदर्शन उपस्थित केले. राहुल चेबळे यांनी   विधी सेवा प्राधिकरण याबद्दल माहिती दिली. तसेच आशिष बालाजी कुटवाडे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा याविषयी सविस्तर असे विवेचन

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त मौजे कातपुर, मळवटी, भडी, भातांगळी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

  आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त मौजे कातपुर, मळवटी, भडी, भातांगळी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न                  लातूर,दि.29(जिमाका):- मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र   राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.          कायद्याची जनजागृती करण्यासाठी आज मौजे कातपुर, मळवटी, भडी, भातांगळी येथे भव्य कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमास कातपुर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच विष्णु बालासाहेब देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर देशमुख होते, तर मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनल अॅड. आर. के. चव्हाण व अॅड. अशोक जोंधळे हे होते. अॅड. आर. के. चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांचा कायदा व कौटुंबिक हिंसाचार याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन उपस्थित गावकऱ्यांना दिली.         तसेच अॅड. अशोक जोंधळे यांनी बालकांच्या शिक्षणाचा अधिकार व ज

जिल्ह्यातील नागरिकांनी जमिन खरेदी विक्री व्यवहार करतांना संकेस्थळावर जाऊन आदेशाची पडताळणी करुन घ्यावी --- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

  जिल्ह्यातील नागरिकांनी जमिन खरेदी विक्री व्यवहार करतांना संकेस्थळावर जाऊन आदेशाची पडताळणी करुन घ्यावी                                                                       --- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन             लातूर दि.28(जिमाका) :- महाराष्ट्र जीवन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 व कलम 44 अन्वये जमीनीच्या वापराचे एका प्रयोजनातुन दुसऱ्या प्रयोजनात रुपांतर करण्याबाबत कार्यपध्दती नमुद आहे. त्यानुसार लातूर जिल्हयात तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडून अकृषिक आदेश पारीत केले जातात. सदर आदेशात खडाखोड करुन चुकीच्या पध्दतीने यापूर्वी वापर केल्याचे निदर्शनास आल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली असून जमिनीचे व्यवहार करताना laturnaorders.in या संकेत स्थळावर जावून खात्री करुनच व्यवहार करावेत असे आवाहन जिल्हयातील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.               तसेच अकृषिक आदेश पारीत केल्यानंतर सदर आदेशांची नोंद घेण्याबाबत कार्यपध्दती नमुद आहे. त्यानुसार ले-आऊट मधील रस्ते व खुली जागा नियोजन प्राधिकणास हस्तांतरीत करण

शासकीय वसाहतीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत जागतिक व्यवसाय उपचार चिकित्सा दिवस साजरा

Image
  शासकीय वसाहतीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत      जागतिक व्यवसाय उपचार चिकित्सा दिवस साजरा        लातूर,दि.28 (जिमाका) :- स्वमग्नता, मनोविकलांग, सेरेबल पॉलसी, मानसिक आजार, बहुविकलांग इतर दिव्यांगांना दिव्यांगावर मात करण्यासाठी उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम अँन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर कडून चांगले काम केले जात असून त्यामुळे पालकांचे मनोबल वाढत असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर व उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम अँन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे, शासकीय वसाहत, जिल्हा परिषद शाळा, लातूर येथील केंद्रामध्ये नुकताच जागतिक व्यवसाय उपचार चिकित्सा दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक निखील पिंगळे,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, सिध्दीविनायक प्रतिष्ठाण लातूरचे सचिव किरण उटगे उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून जिल्हयातील ऑटीझम (स्वमंग्न

निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन - जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर

  निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन -          जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर        लातूर,दि.27 (जिमाका):- लातूर जिल्ह्यातील कोषागार कार्यालय, लातूर यांच्या कार्यालयातून बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी 1 नोव्हेंबर 2021 रोजी हयात असले बाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.        जिल्हयातील सर्व बँकेच्या शाखेत हयात प्रमाणपत्राची यादी पाठविण्यात आली आहे. प्रत्येक निवृत्तीवेतन धारकांनी त्या यादीवर बँक अधिकाऱ्यासमोर स्वाक्षरी करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांनी केले आहे.                                                                                   ***

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या मार्फत जिल्हा कारागृह, लातूर येथे बंद्यासाठी भव्य योगासन व प्राणायाम प्रशिक्षण शिबीर संपन्न

  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या मार्फत जिल्हा कारागृह, लातूर येथे बंद्यासाठी भव्य योगासन व प्राणायाम प्रशिक्षण शिबीर संपन्न   लातूर,दि.27 (जिमाका) मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र   राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त नुकतेच लातूर जिल्हा कारागृहात बंद्यांना योगासन प्राणायाम प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.   निरोगी राहण्यासाठी योगासन अत्यंत गरजेचे आहे. योगासन व प्राणायामचे आपल्या जिवनात अनन्य साधारण महत्व आहे. यासाठी बंद्यायाचे जिवन सुध्दा निरोगी रहावे या निमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर यांच्या मार्फत जिल्हा कारागृहात योगासन शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमास सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे श्रीमती. एस.डी.अवसेकर आवर्जुन उपस्थित होत्या. त्यांनी योगासन शिबीरात बंद्यांना योगासनाचे महत्व पटवुन दिले. यामध्ये बोलत असताना त्यांनी माणसाला जसे जिवंत राहण्यासाठी हवा, पाणी, अन्न हे गरजेचे आहे तसेच आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठ

मौजे गातेगाव, गोंदेगाव, भातखेडा, खंडापुर, पेठ येथे कायदेविशयक शिबीर संपन्न

  मौजे गातेगाव, गोंदेगाव, भातखेडा, खंडापुर, पेठ येथे      कायदेविशयक शिबीर संपन्न लातूर,दि.27 (जिमाका) :- मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र   राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.               मौजे गातेगाव, गोंदेगाव, भातखेडा, खंडापुर, पेठ येथे आज भव्य कायदेविषयक शिबीर पार पडले. गातेगाव येथील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच नागनाथ अंगद बनसोडे होते. प्रमुख पाहुणे श्री घारगे, पोलिस उपनिरिक्षक, पोलिस स्टेशन, गातेगाव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनल अॅड. बिना कांबळे, अॅड. उमाकांत राऊत हे उपस्थित होते. या कायदेविशयक शिबीरात मागदर्शन करताना अॅड. उमाकांत राऊत यांनी लोक न्यायालय, वैकल्पिक वाद, जेष्ठ नागरिक, माता-पिता कल्याण कायदा, महाराष्ट्र   महसुल कायदा, 1966 या विषयांवर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन ग्रामस्थांना केले.   अॅड. बिना कांबळे यांनी महिलांचे कायदे जसे की, महिलांचा

ऑफिसला या... नको चहा.. आता गुळ - पाणी प्या....!!

Image
  ऑफिसला या... नको चहा.. आता गुळ - पाणी प्या....!!   लातूर दि.27 (जिमाका):- बदलत्या जीवन शैलीत आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले... जंक फूडच्या जमान्यात... शरीरात मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक जात असल्यामुळे वाढते पित्तदोष   हे आजच्या धावपळीच्या जीवनात वारंवार होणारा विकार होऊन बसला आहे. यात चहाचे वाढते सेवन हे या विकाराला बळ देत आहे. हे लक्षात घेऊन आज पासून जिल्हा माहिती कार्यालयात " नको चहा.. आता गुळ पाणी प्या " असा पाहुणचार होणार आहे.              जिल्हा माहिती कार्यालय हे प्रसार माध्यमातील लोकांचा राबता असलेलं शासकीय कार्यालय....प्रसार माध्यमं हे ओपिनियन लीडर आहेत... आज पर्यंतच्या बदलाचे सर्वात मोठे हक्कदार माध्यम आहेत... त्यामुळे नवीन सुरुवात गुळ पाणी सुरु करत आहोत.                वारंवार शरीरात कॅफीन घालून पित्तदोष ( एका कपात 10 मिली ग्रॅम एवढे कॅफीन असते ) वाढविण्यापेक्षा आता शरीराला पोषक असलेला सेंद्रिय गुळ, तांब्याच्या भांड्यातले वाळे घातलेले पिण्याचे पाणी हा जुन्या काळातला नवा पाहुणचार या कार्यालयात सुरु करत आहोत.              जुन्या काळात पिण्याचे पाणी फक्त

उदगीर रिंग रोड, सीमा भागातील राष्ट्रीय महामार्गाला लवकरच मिळणार मंजूरी,केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतली भेट

Image
  उदगीर रिंग रोड, सीमा भागातील राष्ट्रीय महामार्गाला लवकरच मिळणार मंजूरी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतली भेट लातूर,दि.27 (जिमाका):- नुकतीच दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन उदगीर - जळकोट मतदार संघातील विविध रस्ते चौपदरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली मागील आठवड्यात या संदर्भात मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन   गडकरी   यांनी संबंधित विभागाला याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. उदगीर येथून जाणारे   प्रामुख्याने आष्टा मोड ते देगलूर रस्ता, वडगाव काटी ते तेलंगणा बॉर्डरपर्यंत   जाणारा रस्ता मंजूर करुन त्याच बरोबर दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा उदगीर ते शिरूर रस्त्यासाठी निधी मंजूर करण्या सोबतच उदगीर शहराचा सर

दिल्ली येथील विविध शाळांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली भेट

Image
  दिल्ली येथील विविध शाळांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली भेट    लातूर,दि.27 (जिमाका):- राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी शाळेंना भेटी दिल्या व दिल्ली   राज्य शासनाने शिक्षणाच्या बाबतीत केलेल्या कामाचे स्वरूप समजून घेतले. यावेळी त्यांच्या सोबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व स्थानिक अधिकारी उपस्थित यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, शिक्षणांची गंगा ही सामान्य माणसापर्यंत पोहचवली गेली पाहिजे. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आधुनिक काळानुसार शिक्षण दिले गेले पाहिजे. समाजाचा कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने कार्य करावे. यासंदर्भात दिल्ली राज्य शासनाने केलेले कार्य अंत्यत स्तुत्य असून यामुळे समाजातील प्रत्येक घटकांना आधुनिक दर्जाचे शिक्षण मिळेल. दिल्ली राज्य शासनाच्या सरकारी शाळेचे रुप बदलेले आहे. व   त्याचा फायदा येथील सामान्य जनतेला होत आहे. समाजातील शिक्षणाची दरी कमी करून प्रत्येकाला योग्य शिक्षण देण्यात ये