मौजे गातेगाव, गोंदेगाव, भातखेडा, खंडापुर, पेठ येथे कायदेविशयक शिबीर संपन्न

 

मौजे गातेगाव, गोंदेगाव, भातखेडा, खंडापुर, पेठ येथे

     कायदेविशयक शिबीर संपन्न

लातूर,दि.27 (जिमाका) :- मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र  राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

            मौजे गातेगाव, गोंदेगाव, भातखेडा, खंडापुर, पेठ येथे आज भव्य कायदेविषयक शिबीर पार पडले. गातेगाव येथील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच नागनाथ अंगद बनसोडे होते. प्रमुख पाहुणे श्री घारगे, पोलिस उपनिरिक्षक, पोलिस स्टेशन, गातेगाव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनल अॅड. बिना कांबळे, अॅड. उमाकांत राऊत हे उपस्थित होते.

या कायदेविशयक शिबीरात मागदर्शन करताना अॅड. उमाकांत राऊत यांनी लोक न्यायालय, वैकल्पिक वाद, जेष्ठ नागरिक, माता-पिता कल्याण कायदा, महाराष्ट्र  महसुल कायदा, 1966 या विषयांवर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन ग्रामस्थांना केले.  

अॅड. बिना कांबळे यांनी महिलांचे कायदे जसे की, महिलांचा कौटुबिंक हिंसाचार कायदा 2005, कार्यालयीन ठिकाणी लैंगिक अत्याचार बाबत सरंक्षण, मनाई व निवारण 2013 या कायद्याविषयी अत्यंत सखोल असे विवेचन केले. तसेच विधी सेवा प्राधिकरण मार्फत मोफत विधी सेवेचा लाभ कोणाला घेता येतो याविशयी माहिती दिली. गातेगाव पोलिस स्टेशनचे  पोलिस उपनिरिक्षक श्री. घारगे  यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, भा.द.वी. कायदा या विषयी मार्गदर्शन केले.

तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असताना राजकुमार भोसले यांनी अनेक कायद्याविषयीचे  उदाहरणे  जसे की कामगार कायदा, औद्योगिक कायदा, ग्राहक मंच, इ. जनतेला दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपसरपंच ज्ञानेश्वर जुगल यांनी केले. यावेळी या शिबीरास ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, आशा कार्यकर्त्या, सोसायटीचे चेअरमन, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका व गावातील जेश्ठ नागरिक व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

            गोंदेगाव येथील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन मा. न्यायाधीश व्ही. एस. शिं  दे, 3 रे   सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर लातूर हे होते. यांनी महिलांचे अधिकार, बालकांचे अधिकार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या विषयावर अतिशय सविस्तर असे विवेचन नागरिकांना केले. तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूरचे पॅनल अॅड. एस. व्ही. सलगरे हे होते. यांनी मार्गदर्शन करताना जेष्ठ नागरिकांचे अधिकार जनतेला पटवून देताना जेष्ठांचे महत्त्व व त्यांचे हक्क याविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन जनतेला केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ  बलसुरकर, ग्रामसेवक यांनी केले व आभार प्रदर्शन सरपंच, सौ. तनुजा पांडुरंग देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला गावचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य व गावातील गावकरी, महीला, जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

            भातखेडा येथील शिबीरास अध्यक्षस्थानी म्हणुन मा. पी. डी. कोळेकर, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, लातूर हे होते. यावेळी यांनी अध्यक्षीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा प्राधिकरण या अत्यंत महत्त्वाच्या प्राधिकरण विषयी मार्गदर्शन केले. विधी सेवा प्राधिकरण कायदा - 1987 कायद्यामध्ये असलेल्या सर्व तरतुदी बाबत मार्गदर्शन केले तसेच कायदेविषयक शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, याचे महत्त्व पटवुन दिले. कायदेविषयक सर्व अधिकाराबाबत तरतुदीचा आढावा घेतला व मा. न्या. पी.डी. कोळेकर सर यांची प्रशंसनिय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. प्रमुख पाहुणे अॅड. तृप्ती नारायण इटकरी यांनी जेष्ठ नागरिकासंबंधीत पोटगी व कल्याणकारी कायदा , 2007 या विशेष अधिनियम अंतर्गतजेष्ठ   नागरिकांच्या अधिकार   या अत्यंत जिव्हाळयाच्या व महत्त्वाच्या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा तंतोतंत प्रयत्न करण्यात आला. जेष्ठ नागरिकांच्या अधिकाराबाबत जागरुक राहा व सर्तक राहा असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खाजा मेहमुद्दीन शेख यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. चैतन्य नारायण ईटकरी यांनी केले. कार्यक्रमास गावातील गावकरी, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक,  ग्रामपंचायतीचे सदस्य व गावातील गावकरी, महीला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक मोठया संख्येने आवर्जुन उपस्थित होते.

       खंडापूर येथे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच कुमार पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन विधी स्वयंसेवक बालाजी बाबुराव भोसले,अक्षयकुमार बनसोडे, शिवराज चौधरी हे होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे विधी स्वंयसेवक बालाजी भोसले यांनी बालअधिकार याविषयावर उपस्थित ग्रामस्थांना सविस्तर असे मार्गदर्शन व आपल्या मुलांना उद्याचे सुजान नागरिक घडवण्यासाठी पालाकांचा किती मोठा वाटा असतो व आजचे बालक उद्याचे आपल्या देशाचे भवितव्य आहे हे महत्त्व  गावातील नागरिकांना यावेळी पटवुन दिले. अक्षयकुमार बनसोडे, विधी स्वयंसेवक यांनी महिलांचे अधिकार याविषयी माहीती दिली व शिवराज चौधरी, विधी स्वयंसेवक यांनी ग्राहक संरक्षण हक्क यावर विषेश मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप पाटील, खंडापुरकर यांनी केले तर सुत्रसंचालन अक्षयकुमार बनसोडे यांनी केले व आभार प्रदर्शन शिवराज चौधरी यांनी केले. कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गावकरी व महिला अवर्जुन उपस्थित होत्या. कार्यक्रमास गावातील गावकरी,सरपंच,उपसरपंच नागरिक मोठया संख्येने आवर्जुन उपस्थित होते.

        सदर कार्यक्रमास पेठ येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गावचे सरपंच श्रीमती सावित्रीबाई विजयकुमार लाळे हया होत्या. प्रमुख वक्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक गायकवाड सुनिल दत्तात्रय यांनी विधी सेवा प्राधिकरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थित जनतेला केले. विधी स्वयंसेवक शुभम बिराजदार यांनी लोकअदालत याविषयावर मार्गदर्शन केले. तौफिक तांबोळी, प्रियंका देशपांडे, निकीता चव्हाण यांनी महिलांचे अधिकार, मध्यस्थी, लोकअदालत या विशयांवर विषेश मार्गदर्शन  केले. येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक, कांबळे डी. सी. यांनी केले तर  सुत्रसंचालन अॅड. वाडकर शैलेष यांनी केले व आभार प्रदर्शन गोपाळ गणपती राजुळे यांनी केले. या कार्यक्रमास गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे सदस्य व गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

        तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी व दयानंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच उपरोक्त गावातील ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच,ग्रामसेवक यांनी विषेश परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु