क्षयरुग्णांना मिळणार सामुदायिक सहाय्य

 

क्षयरुग्णांना मिळणार सामुदायिक सहाय्य

 लातूर,दि.11(जिमाका)- क्षयरुग्णांचे उपचार यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी उपचाराखालील रुग्णांना अतिरिक्त मदत करण्याच्या अनुषंगाने केंद्रीय क्षयरोग ’क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य हा उपक्रम सुरु केला आहे. लातूर जिल्ह्यात या उपक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली असुन, या संदर्भात 3 ऑगष्ट रोजी जिल्हा क्षयरोग केंद्राने आढवा घेतला.

  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने समाजातील विविध स्तरावर काम करणा-या संस्था आणि व्यक्तीसोबत समन्वय साधण्यात येत आहे. याच अनुषंगाने केंद्रीय क्षयरोग विभागाने ’क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्यहा उपक्रम सुरु केला आहे. क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दिष्टपूर्तीकरण्यासाठी सामाजिक सहभाग वाढविणे, कंपन्यांच्या व सार्वजनिक क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून उपचाराखालील रुग्णांना अतिरिक्त मदत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे क्षयरोग दुरिकरणाच्या प्रयत्नांमध्ये व्यक्ती / सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्ह्यात जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.

एका वर्षासाठी रुग्ण्‍ घेतला जाईल दत्तक

   या उप्रकांमर्गत उपचाराखालील क्षयरुग्णांना पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येईल. तसेच गैरसरकारी संस्था, व्यक्ती, संस्था, (सार्वजनिक आणि खासगी दोन्ही) उद्योग संघटना कॉर्पेरिट्स आणि भागीदार यांच्यासोबत ’क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयातर्फे यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. या यंत्रणेव्दारे तालुका जिल्हा अंतर्गत उपचाराखालील क्षयरुग्णांना किमान एक वर्षासाठी दत्तक घेऊन रुग्णांना पोषण सहाय्य, व्यावसायिक समर्थन, निदानात्मक सहाय्याव्दारे मदत प्रदान करणे अपेक्षित आहे.असे जिल्हा क्षयरोग अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                         000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु