कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
कृषि विभागाच्या
विविध पुरस्कारांसाठी
10 सप्टेंबरपर्यंत
अर्ज सादर करण्याचे आवाहन
लातूर दि. 31 (जिमाका)
: कृषि विभागामार्फत सन २०२२ या
वर्षामध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्था यांना पुरस्कारांनी गौरविण्यात येणार
आहे. या कृषि पुरस्कारांसाठी शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांनी आपले प्रस्ताव
नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे १० सप्टेंबर २०२३ पर्यंत सादर करावेत,
असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे. तसेच
विविध कृषी पुरस्कार विषयक अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी
कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कृषि विभागामार्फत
राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य
करणाऱ्या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतकऱ्यांचा तसेच
कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना डॉ.
पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय
शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ
शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न
पुरस्कार देण्यात येतो.
****
Comments
Post a Comment