लातूर जिल्ह्याच्या विकासाचा वारसा कायम सुरु राहील - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
लातूर जिल्ह्यात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
· शेतकरी, मागासवर्गीय व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील
·
उत्कृष्ट
कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान
·
जिल्ह्याच्या
शाश्वत विकासासाठी आराखडा तयार होणार
चांगल्या
आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी प्रयत्न
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेची प्रतिवर्ष
प्रतिकुटुंब उपचाराची संरक्षण मर्यादा दीड लाखावरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय
शासनाने घेतला आहे. तसेच सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना ही योजना लागू
करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. निलंगा
तालुक्यातील औराद शहाजनी आणि शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालये लवकरच
कार्यान्वित होणार आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या
आवारात 50 खाटांचा कार्डियाक केअर ब्लॉक मंजूर झाले आहे. त्याचे बांधकाम लवकरच
सुरु करण्यात येणार आहे. हृद्ययाचे विकार असलेल्या गरीब रुग्णांना यामुळे उपचार मिळण्यास
मदत होईल, असा विश्वास ना. बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीयांसाठी विविध
महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी
केली जात आहे. विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतून 79
कोटी 75 लक्ष रुपये शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिका
क्षेत्रात महाविद्यालयात शिकत असलेल्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित
जातीच्या एक हजार 560 विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेतून 6 कोटी 22 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे, असे ना. बनसोडे यावेळी
म्हणाले. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण समाज कल्याण विभागामार्फत
करण्यात येत आहे. आतापर्यंत 3 हजार 183 ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वितरीत करण्यात आल्याची
माहिती त्यांनी यावेळी दिली.
महिला
सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला सन्मान योजनेतून महिलांना सर्व प्रकारच्या एस. टी. बस
प्रवास भाड्यात शासनाने 50 टक्के सवलत लागू केली आहे. 17 मार्चपासून जिल्ह्यातील
73 लाख 96 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवी वर्षानिमित्त अमृत ज्येष्ठ नागरिक योजना राबविली जात आहे. 75 वर्षांवरील
नागरिकांना एस. टी. बस प्रवास भाड्यात 100 टक्के सवलत देण्यात आली आहे.
गतवर्षीच्या 26 ऑगस्ट पासून 1 कोटी 35 लाख 6 हजार 430 व्यक्तींनी या योजनेचा लाभ
घेतला आहे, असे ना. बनसोडे यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या
सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा तयार करणार
रोजगार निर्मितीसाठी
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबविली
जात आहे. या योजनेतून 86 लाभार्थ्यांना 1 कोटी 65 लाख रुपये अनुदान वितरीत करण्यात
आल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. तसेच शाश्वत विकासाच्या ध्येयांबाबत जिल्हा
विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामध्ये जिल्ह्यातील
संभाव्य संधी ओळखून, त्यामध्ये अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे साध्य ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी
सांगितले.
क्रीडा
क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणार
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी
क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार
असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जिल्ह्यात गतवर्षी विविध चार खेळांच्या
राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही राष्ट्रीय
तलवारबाजी स्पर्धा, राष्ट्रीय डॉटबॉल स्पर्धा आणि
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनेक
खेळाडूंनी राज्यस्तरावर,
राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी
केली आहे. बेसबॉल, सॉफ्टबॉल आणि जिम्नॅस्टिक्स या
स्पर्धेत जिल्ह्यातील तीन खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व
करीत असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासन
लोकाभिमुक्त करण्यासाठी विविध उपक्रम
यावर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह’
आयोजित करून शासकीय योजनांच्या लाभाचे
वितरण करण्यात आले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी
प्रयत्न करण्यात येत असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. कायदा व सुव्यवस्था कायम
राखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलाला 24 दुचाकी वाहनांसाठी निधी
उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
15 अद्ययावत चारचाकी वाहने पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडा
मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी
मोठ्या उत्साहात साजरे झाले. अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘माझी माती,
माझा देश’ ‘हर घर
तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. यामध्ये नागरिकांनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सध्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष
आपण साजरे करीत आहोत. यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात
आले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी
जिल्ह्यात 75 व्याख्यानांच्या मालिकेसह विविध उपक्रम राबविले जात आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे
आवाहन ना. बनसोडे यांनी यावेळी केले.
Comments
Post a Comment