Posts

पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींची बचाव / सुटका करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती

  पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींची बचाव / सुटका करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती    *रेणापूर व लातूर तालुक्यातील पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुखरुप सुटका             लातूर दि.28-(जि.मा.का) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर यांच्याकडून पुरात अडकेल्या व्यक्तींची सुटका/ बचाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर 3 पथकांची नेमणूक करण्यात आली असल्यचे जिल्हा प्रशासनने कळविले आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशिनसह इतर पुरांसबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. या मध्ये पथक क्रमांक 1 गावाचे नाव सारसा, देवळा, ता. रेणापूर. पथक प्रमुख व संपर्क क्र. श्री. कासले 9975719929, पथक क्र. 2 गावाचे नाव घणसरगाव ता. रेणापूर   पथक प्रमुख व संपर्क श्री राठोड 8459482287, पथक क्र.   3 गावाचे नाव डिगोळ देशमुख ता. रेणापूर पथक प्रमुख व संपर्क श्री शिंदे 9975143101 / 9011032433 यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मौजे डिगोळ देशमुख ता. रेणापूर जि. लातूर येथील पुरात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुट...

जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमधील 1 हजार 794 प्रकरणे तडजोडीने निकाली

  जिल्हयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमधील 1 हजार 794 प्रकरणे तडजोडीने निकाली      लातूर दि.28-(जि.मा.का.) जिल्हयात दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित रार्ष्टीय लोकअदालतमध्ये 1 हजार 794 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती एस.डी.अवसेंकर यांनी दिली आहे. या लोकअदालतीला पक्षकारांचा चांगला प्रतिसादर मिळाला असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या   आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर व जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे प्रलंबित व वादपुर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन न्या.मंगला ज.धोटे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, कौटुंबिक, भुसंपादन व तडजोड युक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.तसेच वादपुर्व प्रकर...

अन्न व्यवसाईकांसाठी परवाना / नोंदणी प्रमाणपत्र घेण्याकरिता विशेष मोहिम

  अन्न व्यवसाईकांसाठी परवाना / नोंदणी प्रमाणपत्र घेण्याकरिता विशेष मोहिम       लातूर दि.28-(जि.मा.का.) अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत दि. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत अन्न व्यवसाईकांना परवाना / नोंदणी प्रमाणपत्र   घेण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात येत असल्याचे परवाना प्राधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2011 पासुन संपूर्ण देशभरात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 ची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. या कायद्याच्या कलम 31 नुसार व्यावसाईकांनी (जसे अन्न पदार्थ उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल रेस्टॉरंन्ट, हातगाडी अन्न विक्रेते, भाजी व फळे विक्रेते,ज्यूस सेंन्टर,चिकन ,मटन व अंडी विक्रेते, मिठाई विक्रेते,बेकरी इ.) त्यांचा व्यवसाय सुरु करण्यापुर्वी परवाना / नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.सदर कायदयानुसार विनापरवाना व्यवसाय करणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असुन सदर गून्हयामध्ये सहा महिने शिक्षा व रुपये पाच लाखापर्यंत दंड होऊ शक...

जिल्ह्यात आता पर्यंत 906.9 मि. मी एवढा पाऊस, गेल्या चोवीस तासात 66.9 मि.मी. पावसाची नोंद

  जिल्ह्यात आता पर्यंत 906.9 मि. मी एवढा पाऊस, गेल्या चोवीस तासात 66.9   मि.मी. पावसाची नोंद          लातूर दि.28-(जि.मा.का.) जिल्ह्यात आज दिनांक 28 सप्टेंबर   2021 रोजी सकाळी   8 पर्यंत सरासरी 66.9 मिमी पावसाची नोंद झाली असून आज पर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या 109 टक्के झाला असल्याची माहिती   जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.           जिल्हयात   दिनांक 28 सप्टेंबर   2021   रोजी झालेले   तालुका निहाय   पर्जन्यमान तसेच 1 जून ते 28 सप्टेंबर   2021   पर्यंत   झालेले एकूण   पर्जन्यमान (तालुकानिहाय ) पुढील प्रमाणे आहे. (आकडेवारी मि.मी.मध्ये ) लातूर-82.7 (920.8) , औसा-64.4, (852.4) , रेणापूर 63.3, (985.5) ,अहमदपूर - 82.7 (1057.3) , चाकूर- 72. 0, (911.8), उदगीर-69.7 (972.9), जळकोट- 75.7 (1041.4),निलंगा-48.8 (779.2), देवणी- 45.0. (820.3)   व    शिरुर अनंतपाळ- 57.9 (820.3) मि.मी. पावसाची नोंद झाली आह...

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आढावा

Image
  अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आढावा   §   युध्द पातळीवर मदत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित §   नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन लातूर,दि.२८ (जिमाका) लातूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री   अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाकडून आढावा घेतला असून मदत कार्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा सज्ज करून कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, अतिवृष्टीचे सावट दूर होईपर्यंत नागरिकांनीही घराबाहेर पडू नये सुरक्षितस्थळी थांबावे असे आवाहन केले आहे.   मागच्या दोन दिवसात झालेली अतिवृष्टी, धरणातून सोडलेले पाणी यामुळे नदीकाठी निर्माण झालेली   पूर परिस्थिती या पार्श्वतभूमीवर नदीकाठची गावे, वस्त्या तसेच पाण्याने वेढलेल्या सखल भागातील अडकलेल्या नागरिकांनाही मदत पथकाद्वारे बाहेर काढण्याच्या सूचना पालकमंत्री   देशमुख यांनी दिल्या आहेत. आपदग्रस्थासा...

लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे... पाण्यात उतरू नयें... तुमच्या वाहून गेलेल्या पिकाचे पंचनामे करु..पूरपरिस्थिती बाबत मदत लागली तर 223 002 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

  लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे... पाण्यात उतरू नयें... तुमच्या वाहून गेलेल्या पिकाचे पंचनामे करु..पूरपरिस्थिती बाबत मदत लागली तर 223 002 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यात 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संक्रमण पडताळणी सर्व्हेक्षण मोहिम

  लातूर जिल्ह्यात 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संक्रमण पडताळणी सर्व्हेक्षण मोहिम               लातूर दि.27 ( जिमाका ):-  जिल्ह्यात सोमवार, दिनांक 27 सप्टेंबर, 2021 पासून Community TAS (संक्रमण पडताळणी सर्व्हेक्षण) राबविण्यात येणार आहे. सन 2004 पासून राज्यातील एकूण 18 जिल्ह्यामध्ये सामुदायिक औषधोपचार मोहिम (MDA) राबविण्यात येत होती. सन -2030 पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे हे आपले राष्ट्रीय उद्दिष्ट असून त्यासाठी राज्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहिम (MDA) सुरु करण्यात आली आहे.             ज्या जिल्हयात मागील तीन वर्षापासून एम एफ दर सातत्याने व सर्व ठिकाणी एक टक्क्यापेक्षा कमी आढळला आहे, अशा जिल्ह्यातील सार्वत्रिक औषधोपचार मोहिम (MDA) बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला आहे. मात्र, ही मोहिम बंद करण्यापूर्वी संबंधित जिल्ह्यात अतिरिक्त एम एफ सर्व्हेक्षण करुन निवड करण्यात आलेल्या सर्व ( Random Spot) रॅन्डम स्पॉटमध्ये ...