Posts

Showing posts from February, 2022

लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर प्रादेशिक परिवहनच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित

Image
  लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर प्रादेशिक परिवहनच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित   §   उदगीर शहरातील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी   वाहतूक मार्गात बदल     लातूर दि.28 ( जिमाका ):-    लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर आज प्रादेशिक परिवहनच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. सदरची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणचे गजानन निरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, वाहन निरीक्षक अशोक जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर पुढीलप्रमाणे :- मारुती व्हॅन (25 कि.मी. अथवा दोन तासाकरिता) भाडे रुपये 520/- प्रती कि.मी. रुपये 13 प्रमाणे,   टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश कंपन

लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमध्ये स्टार मानांकन योजना

  लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमध्ये स्टार मानांकन योजना             लातूर दि.28(जिमाका):- लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्टार मानांकन योजना प्रोत्साहितपणे राबविण्यासाठी   तसेच शासनाने पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारीत "माझी वंसुधरा अभियान-2.0 ’’ हे अभियान जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती मध्ये राबविण्यासाठी   जिल्हा   प्रशासनाने तयारी केली असून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी याबाबत आज सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, नगर अभियंता यांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमध्ये स्टार मानांकन योजना राबविण्यांबाबत तातडीचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. दिले आहेत.      या   बैठकीत लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती मध्ये स्टार मानांकन योजना राबविण्याबाबत आढावा घेवून   याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. स्टार मानांकन योजनामध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टीचा (ऑनलाईन पध्‍दतीने) भरणा करणे, ओला व सुका कचरा वे

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय पाकगृहाला पंचतारांकित मानांकन

  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय पाकगृहाला पंचतारांकित मानांकन पंचतारांकित मानांकनात राज्यातील लातूरचे वैद्यकीय महाविद्यालय ठरले पहिले …   राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून अभिनंदन        लातूर दि.28(जिमाका):- केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाअंतर्गत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (fssai) तर्फे 'इट राईट कॅम्पस' हा उपक्रम राबविला जातो. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख    यांच्या नेतृत्वाखाली   अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनातून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय    व रूग्णालय पाकगृहाने या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. यामध्ये खाद्यपदार्थांचा दर्जा, पाकगृहाची स्वच्छता, कर्मचारी वर्गाचे आरोग्य, पोषक आहाराबाबत जागरूकता या निकषांवरून मानांकन दिले जाते. या निकषांवरून पात्र ठरत    विलासराव देशमुख     शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाने पंचतारांकित   मानांकन मिळवले असून असा दर्जा मिळवणारे   राज्यातील हे पहिलेच    वैद्यकीय महाविद

तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना येत्या 2 मार्च रोजी मोफत ऑनलाईन नोंदणी

  तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना येत्या 2 मार्च रोजी मोफत ऑनलाईन नोंदणी लातूर दि.28(जिमाका):- राज्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच तक्रारी संदर्भात तक्रार निवारण समितीची स्थापना शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी यांच्या तक्रार निवारण व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी https://transgender.dosje.gov.in/ या संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर या कार्यालयाकडून बुधवार दिनांक 02 मार्च 2022 रोजी मुलांचे शासकीय वसतिगृह,सोमनाथपूर ता.उदगीर जि. लातूर येथे https://transgender.dosje.gov.in/ या संकेतस्थळावर मोफत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कँम्प आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींनी सर्व कागदपत्रासह कॅम्पच्या ठिकाणी उपस्थित राहून ऑ

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवा,डोस पासून एकही पालक वंचित राहू नये याची दक्षता घ्या - राजमंत्री संजय बनसोडे

  राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवा,डोस पासून एकही  बालक  वंचित राहू नये याची दक्षता घ्या                                        - राजमंत्री संजय बनसोडे लातूर दि.27 ( जिमाका ):- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवून एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संजय बनसोडे यांनी केले. लातूर येथील स्त्री रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेप्रसंगी ते बोलत होते. देश पोलिओ मुक्त होत आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून जनजागृती करावी. बालकांना पल्स पोलिओ लस दिली जाते,   त्याचप्रमाणे नागरिकांनी   कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा पहिला व दुसरा आणि बूस्टर डोस घ्यावा. व कोविड-19 पासून बचाव होणार आहे. तसेच येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा द्यावी. पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील शंभर टक्के पोलिओ लसीद्वारे संरक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे, असेही राजमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., महानगरपालिकेचे मनपा आयुक्त अमन मित्तल, उपायुक्त श्रीम

निरोगी व निकोप मन ,शरीर स्वास्थ्यसाठी खेळाच्या अशा स्पर्धा आवश्यक - राज्यमंत्री संजय बनसोडे

Image
  निरोगी व निकोप मन ,शरीर   स्वास्थ्यसाठी खेळाच्या अशा स्पर्धा आवश्यक                                                 - राज्यमंत्री संजय बनसोडे लातूर दि.27 ( जिमाका ):- आधुनिक जीवन शौली मुळे जीवनात ताणतणाव वाढले आहेत शरीर व मन निकोप व निरोगी राहण्यासाठी अशा खेळांची आवश्यकता असते यातून जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळत असतो   असे मत राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या वतीने जिल्ह्यातील डॉक्टर साठी विविध खेळाच्या   स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. आधुनिक जीवन शैलीमुळे शारिरीक व मानसिक आरोग्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. मागील दोन वर्षापासुन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला. कोरोना काळात डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण होता. यामुळे अशा खेळाच्या स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करित असतात इंडियन मेडिकल कॉन्सिल, लातूर शाखेच्या वतीने लातूर येथील ऑफिसर क्लब येथे डॉक्टर साठी विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. . यावेळी इंडियन मेडिकल कॉन्सिलचे लातूर शाखेचे

“मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात संपन्न माणसाचे जीवन समृध्द करण्यासाठी मातृभाषा महत्वाची, मातृभाषेची जोपासना आणि वृध्दी करुया - प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे

Image
 “ मराठी भाषा गौरव दिन ” उत्साहात संपन्न माणसाचे जीवन समृध्द करण्यासाठी मातृभाषा महत्वाची, मातृभाषेची जोपासना आणि वृध्दी करुया                                              -  प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे   §   संत ज्ञानोबा, तुकडोबांच्या संत साहित्याचा मौल्यवान वारसा मराठी भाषेला लाभला §   आपल्या भावना, कल्पना आणि विचार व्यक्त करण्याचे मातृभाषा हे प्रभावी साधन §   जे ज्ञान मातृभाषेतून प्राप्त होते, त्या ज्ञानाला संस्कृतिचा सुगंध असतो लातूर दि.27 ( जिमाका ):-  माणसाचे जीवन समृध्द करण्यासाठी मातृभाषा ही खुप महत्वाची गोष्ट आहे. जगभरातल्या भाषा शिका पण अभिव्यक्त होण्यासाठी मातृ भाषेऐवढी सशक्त भाषा कोणतीच नाही. माणसाला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्कानी मिळतात, त्याची जोपासना आणि वृध्दी करणे आपले कर्तव्य आहे, अशी भावना प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी “ मराठी भाषा गौरव दिना ” निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. जिल्हा माहिती कार्यालय, लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने “ मराठी भाषा गौरव दिन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते दूरदृष्य

जिल्हा माहिती कार्यालय व दयानंद कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिना दूरदृष्य प्रणालीव्दारे आयोजन

  जिल्हा माहिती कार्यालय व दयानंद कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने   येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिना दूरदृष्य प्रणालीव्दारे आयोजन       लातूर दि.25 ( जिमाका ):- मराठी भाषा गौरव दिन दिनानिमित्त   जिल्हा माहिती कार्यालय, लातूर व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त   विद्यमाने “ मराठी भाषा गौरव दिन ”   येत्या दिनांक 27 फेब्रुवारी, 2022 रोजी दयानंद कला महाविद्यालयातील दयानंद सभागृह, लातूर येथे 11-00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे रमेश बियाणी, उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., प्राचार्य यशवंत पाटणेसातारा हे प्रमुख वक्ते म्हणून दूरदृष्य प्रणालीव्दारे बोलणार आहेत. तसेच लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, प्रा. डॉ. सुनिता सांगोले, प्रा. डॉ. अंकुशकुमार चव्हाण, प्रा. डॉ. सुभाष कदम, उपप्राचार्य अनिलकुमार माळी , पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे आदि विविध प्रमुख मान्यवरांची यावेळी

अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणीसाठी येत्या सोमवारी हत्तेनगर येथे नोंदणी मार्गदर्शन विशेष कॅम्प

  अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणीसाठी येत्या सोमवारी हत्तेनगर येथे नोंदणी मार्गदर्शन विशेष कॅम्प   लातूर दि.25(जिमाका):- अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियमन 2011 हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दिनांक 5 ऑगस्ट, 2011 पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुन देणे हा आहे. त्याअंतर्गत अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणी घेणे आवश्कय आहे. सोमवार, दिनांक 28 फेब्रुवारी, 2022 रोजी 11-00 ते 2-00 या वेळेत कृष्णा एजन्सीज, हत्ते नगर, लातूर येथे परवाना व नोंदणीबाबत विशेष कँम्प आयोजित करण्यात आलेला आहे असे सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन म.राज्य, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.     0000    

जिल्ह्यातील बँकानी पीक कर्ज प्रकरणी सकारात्मक काम करावे, विविध योजनांच्या कर्ज प्रकरणांचा जलद निपटारा करावा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

  जिल्ह्यातील बँकानी पीक कर्ज प्रकरणी सकारात्मक काम करावे, विविध योजनांच्या कर्ज प्रकरणांचा जलद निपटारा करावा                                         -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. लातूर दि.25 ( जिमाका ):- जिल्ह्यातील बँकांनी शासनाच्या विविध योजना, पीककर्ज प्रकरणा बाबतीत सकारात्मक काम करावे, काही बँकांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीक कर्ज आणि योजनांचे कर्ज प्रकरणे मंजूरी यात दिरंगाई दिसून येत आहे, ही नकारात्मकता थांबवून कर्ज प्रकरणांचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले. नुकतीच तिमाही जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीमध्ये सर्व शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला व जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.   यांनी जिल्ह्यातील सर्व बँकाना मार्गदर्शन केले व शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अनंत कसबे, आरबीआयचे पियुष गोयल, विभा

जिल्ह्यात 27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करा- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

  जिल्ह्यात 27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.   लातूर,दि.25 (जिमाका):- जगातून पोलिओचे निर्मुलन करणेसाठी सन 1995 पासून पल्स पोलिओ मोहिम राबविली जाते. यात नियमित लसीकरण, पोलिओ संक्षयीत   रुग्णांची तपासणी करणे व पल्स पोलिओ   मोहिम यशस्वीपणे राबविणे आवश्यक आहे.याच अनुषंगाने 27 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात सर्वत्र पल्स   पोलिओ मोहिम राबविली जाणार आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयाल यांनी पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. लातूर जिल्ह्यात 2 लाख 72 हजार 569 हे 0-5 वर्षे वयोगटातील लाभार्थी असून एकूण 2 हजार 128 बूथचे नियोजन केले आहे. यात 9 हजार 661 कर्मचारी यांची नियुक्ती केली असून 430 पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. तालुकानिहाय जिल्हास्तरीय अधिकारी यांची नेमणूक करुन संनियंत्राची जबाबदारी दिली आहे.या मोहिमेत एकही लाभार्थी वंचीत राहू नये यासाठी नियोजन करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आहे. लातूर जिल्ह्यातील उसतोड ठिकाणी, विटभट्टया, स्थलांतरीत समुह, बांधका

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा

  युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा लातूर,दि.25 (जिमाका):- सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून युक्रेन या देशात भारतीय नागरीक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अशा नागरीकांच्या मदतीसाठी पूढील प्रमाणे हेल्पलाईन्स नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत. केद्रीय राराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, फोन –टोल फ्री 1800118797 फोन- 011-23012113/ 23014105/ 23017905, फक्स- 011-23088124, ई-मेल- situationroom@mea.gov.in असा आहे. जर औरंगाबाद विभागातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास पूढील प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियंत्रण कक्षास संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. जिल्हा, जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नाव व दुरध्वनी क्रमांक पूढील प्रमाणे आहे.- औरंगाबाद -0240-2331077, श्री.अजय चौधरी 9970977452, जाल

लातूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी

    लातूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन -          एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी लातूर,दि.25 (जिमाका):- भुमीहीन दारिद्रयरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील भूमीहीन आदिवासी कुटुंबाना चार एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा दोन एकर (ओलीताखालील) जमीन देण्याबाबत प्रस्तावीत आहे. सदर योजना आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक. 28 जुलै 2021 या शासन निर्णयान्वये शंभर टक्के अनुदानित आहे. या योजनेंतर्गत निवडावयाच्या लाभार्थ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येणारे घटक खालीलप्रमाणे दारिद्रयरेषेखालील भूमीहीन आदिवासी परितक्त्या स्त्रिया, दारिद्रयरेषेखालील भूमीहीन आदिवासी विधवा स्त्रिया, भूमिहीन कुमारी माता, भूमीहीन आदिम जमाती   व भूमीहीन पारधी. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पूढील प्रमाणे आहे :- लाभार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचे दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र (ग्रामसेवकाचे), लाभार्थ्याचे किमान वय 18 व कमाल 60 इतके असावे, लाभार्थी त्या गावचा रहिवासी असावा (ग्रामसेवक व सरपंच एकत्रित दाखला), दारि

युक्रेन येथे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक तिथे अडकले असल्यास त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे आवाहन

  युक्रेन येथे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक तिथे अडकले असल्यास त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी   -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे आवाहन लातूर,दि.24 (जिमाका):- युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भारतातून युक्रेनमध्ये कामासाठी किंवा शिक्षणासाठी गेलेल्या व सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्याच्या जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सुचना केल्या आहेत. तरी आपल्या तालुक्यातून / पोलीस स्टेशन हद्दीतून / लातूर शहर महानगरपालीका क्षेत्रातून युक्रेनला गेलेल्या व्यक्तींची माहिती पोलीस स्टेशन / पर्यटकाचे नातेवाईक / तलाठी / मंडळ अधिकारी / ग्रामसेवक यांच्याकडून संकलित करून विहित नमुन्यात या कार्यालयास यथाशीघ्र ई-मेल ddmolatur@gmail.com या ई-मेल पत्यावर पाठविण्यात यावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आवाहनही केले आहे.   0000

जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभागांच्या संख्या निश्चीत करण्यासाठी कार्यक्रम घोषीत

  जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभागांच्या संख्या निश्चीत करण्यासाठी कार्यक्रम घोषीत           लातूर,दि.24 (जिमाका):-   राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक 27 जानेवारी 2022 अन्वये माहे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या लातूर जिल्ह्यातील पूढील 361 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभांगांच्या सीमा निश्चीत करण्यासाठी कार्यक्रम घोषीत केलेला आहे.           तालुका व ग्रामपंचायत संख्या पूढील प्रमाणे आहे.- लातूर तालुक्यातील -44, रेणापूर तालुक्यातील -37, औसा तालुक्यातील -60, निलंगा तालुक्यातील -68, शिरुर अनंतपाळ-15, देवणी तालुक्यातील-9, उदगीर तालुक्यातील-26, जळकोट तालुक्यातील-13, अहमदपूर तालुक्यातील-43 व चाकुर तालुक्यातील-46 असे एकूण 361 ग्रामपंचायतींची संख्या आहे.            प्रभाग रचना कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचनेला (नमुना-ब) संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांचेमार्फत दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिध्दी देवून हरकती मागविण्यात येणार आहेत. या 361 ग्रामपंचायतींच्या प्रारुप प्रभाग रचनेस हरकती दिनांक 25 फेब्रुवारी

लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी मार्गदर्शन करावे - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

Image
  लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी मार्गदर्शन करावे                                       - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख मुंबई, दि. २४ फेब्रु.- "लता मंगेशकर यांचे गायन आणि त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच अलौकिक असे होते. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक राज्य शासनातर्फे उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली. देशमुख यांनी मंगेशकर कुटुंबियांची घरी जाऊन सांत्वना भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लता दीदींच्या धाकट्या भगिनी उषा मंगेशकर आणि बंधू हृदयनाथ मंगेशकर, माजी आमदार उल्हासदादा पवार, संगीतकार मयुरेश पै यावेळी उपस्थित होते.   सुमारे ४० वर्षांपूर्वी लातूरमध्ये प्रथमच एका महाविद्यालयाला दिनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्याची लातूरकरांची विनंती दीदींनी मान्य केली होती, अशी आठवण सांगत देशमुख   यांनी   लता दीदींच्या लातूरशी निगडित आठवणी जागवल्या. दिवंगत विलासराव देशमुख आणि दीदींना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या जिव्हाळ्याबद्दलच्या आठ