लातूर जिल्हा गुंतवणूक परिषदेत सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार
लातूर जिल्हा गुंतवणूक परिषदेत सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार उद्योगांना जलद मंजुरीसह पायाभूत सुविधा पुरवण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर, दि. २४ : लातूर जिल्ह्यातील उद्योगांची संख्या आणि गुंतवणूक सातत्याने वाढत असून त्याद्वारे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. जिल्ह्यात उद्योगांची उभारणी होत असून अनेक तरुण नवनवीन संकल्पना घेऊन उद्योग क्षेत्रात पदार्पण करत आहेत. अशा नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदतीसाठी मैत्री कक्ष आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केले जाईल. तसेच उद्योगांसाठी आवश्यक परवानगी देण्यात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिली. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि नवउद्योजकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जुनी एमआयडीसी येथील 'एनरायज बाय सयाजी हॉटेल' येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या गुंतवणूक परिषदेस छत्रपती संभाजीनगर येथील सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) संजय भुरेवाल,...