Posts

Showing posts from July, 2022

सोयाबीन टोबण पद्दत ठरते आहे परिणामकारक ; लातूर जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन टोबण पद्दतीने

Image
  सोयाबीन टोबण पद्दत ठरते आहे परिणामकारक ; लातूर जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन टोबण पद्दतीने   लातूर दि.29 (जिमाका ) लातूर जिल्ह्यात या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र विक्रमी वाढले असून या वर्षी 4 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे. हे प्रमाण गेल्या वर्षी 4 लाख 59 हजार हेक्टर एवढे होते. कृषी विभागाने सोयाबीनचा वाढता पेरा लक्षात घेऊन अधिक उतारा यावा म्हणून वाफ्यावर टोबण करण्याचा प्रचार आणि प्रसार केला त्यामुळे यातील 20 हजार हेक्टरवर टोबण पद्दतीने किंवा बी बी एफ पद्दतीने लागवड झाली आहे. त्याचा गेल्यावर्षी उत्तम परिणाम दिसून आल्यामुळे यावर्षी याकडे लोकांचा ओढा वाढला असल्याची माहिती जिल्ह्याचे कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. शिवार फेरीवर असताना ते बोलत होते. लातूर जिल्हा देशातील सोयाबीन उत्पादनाचे हब असल्यामुळे देशातील सोयाबीनचे भाव लातूरचा कृषी बाजार ठरवतो. लातूरला सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग असल्यामुळे सोयाबीनला सर्वाधिक उठाव लातूर मध्ये आहे. यावर्षी लातूर जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्र पाच लाख 71 हजार हेक्टर आहे. त्यातले तब्बल 4 लाख 77

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबु लागवड व वृक्ष लागवड या घटकांकरिता अर्ज करण्यासाठी शेवटची संधी

  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबु लागवड   व वृक्ष लागवड या घटकांकरिता अर्ज करण्यासाठी शेवटची संधी           *लातूर, दि.29,(जिमाका),:-* कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहा य्यि त नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करणे, शेतक-यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने जिल्ह्यातील   282 गावांमध्ये सन 2018-19 पासून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड, वृक्ष लागवड या घटकाची सन 2022-23 मधील लागवडीसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत राहील. तदनंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.             सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत एकूण प्राप्त अर्जावर निकषानुसार पुर्वसंमती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे व सदर विषयी संबंधीत शेतक-याने हमीपत्र लिहुन देणे गरजेचे आहे.               प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे अनुदान व कर्जाकरीता अर्ज करावे

  साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे अनुदान व कर्जाकरीता अर्ज करावे           *लातूर,दि.29,(जिमाका),:-* साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मातंग समाजातील मांग, मातंग व 12 पोट जातीतील सुशिक्षित बेरोजगार, महिला व पुरुषांनी महामंडळाकडे अनुदान व कर्ज मिळणे करीता अर्ज करावेत.          सन 2022-23 या आर्थिक वर्षात शासनाकडून उद्दिष्ट अनुदान योजने अंतर्गत 150 व 20 टक्के बीजभांडवल योजने अंतर्गत 50 उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत.जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकाना उद्दिष्ट वितरण जिल्हा अग्रणी बँकेकडून व महामंडळाकडून वितरण झालेले आहे.          सन 2022-23 मधील सर्व मातंग समाजातील अर्ज केल्यानंतर जेष्ठतेनुसार त्या-त्या दतक बँकेला अर्ज मंजुरी करिता पाठविण्यात येईल बँकेने अर्ज मंजुर केल्यानुसार महामंडळकाडून अनुदान व कर्ज लगेच वितरण करण्यात येईल.       या करीता पात्र अर्जदारांनी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेट समोर, लातूर येथे अर्ज करावेत व अर्ज विनामुल्य राहील असे जिल्हा व्यवस्थापक

जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध तिरंगा ध्वज विक्री केंद्राचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध तिरंगा ध्वज विक्री केंद्राचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते उद्घाटन   लातूर,दि.29(जिमाका):-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित दिनांक 8   ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, 2022 दरम्यान स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 रोजी हर घर झेंडा हा उपक्रम हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व घरे, दुकाने सरकारी व सहकारी आस्थापना यावर तिरंगा झेंडा फडकविण्यात येणार आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे 3.75 लक्ष ध्वजांची आवश्यकता भासणार आहे. सदर ध्वज हे ग्रामपंचायती, बचत गट यांनी खरेदी करावी. तसेच प्रती ध्वज रुपये 30/- या दरात विक्री करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहे. या विक्री केंद्राचे उद्घाटन आमदार अभिमन्य पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आदि विविध

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 449.5 मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2.1 मि.मी.

  लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 449.5 मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2.1 मि.मी.   लातूर, दि.29 (जिमाका)   : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 449.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात आज दिनांक 29 जुलै, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. लातूर -0.7 (448.8) मि.मी., औसा- 0.5 (339.1) मि.मी., अहमदपूर- 1.3 (568.7) मि.मी., निलंगा -2.9 (361.6) मि.मी, उदगीर- 1.8 (532.6) मि.मी, चाकूर-1.7 (511.6), रेणापूर-0.0 (403.0), देवणी – 0.0 (415.6), शिरुर अनंतपाळ -11.0 (468.6), जळकोट-11.6   (605.4), पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 449.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. ****            

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर कराव्यात

  जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर कराव्यात   लातूर   दि. 28:- (जिमाका) राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 284 पंचायत समितीत्यांचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी टप्पा सुरु करण्याचा, संपविण्याचा दिनांक 28 जुलै, 2022 रोजी. सोडतीनंतर निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारुप अधिसूचना प्रसिध्द करण्याचा टप्पा सुरु करण्याचा, संपविण्याचा दिनांक 29 जुलै, 2022. निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा दिनांक 29 जुलै, 2022 ते दिनांक 2 ऑगस्ट, 2022 मागविण्याचा दिनांक असणार आहे. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करुन निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण विहीत नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द टप्पा सुरु करण्याचा / संपविण्याचा दिनांक 5 ऑगस्ट, 2022 रोजी असणार आहे.     **

लातूर जिल्ह्यातील 66 जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत जाहीर

Image
  लातूर जिल्ह्यातील 66   जिल्हा परिषद   गटाचे आरक्षण सोडत जाहीर   *लातूर (जिमाका) दि.28:-* लातूर जिल्ह्यातील 66 जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये जाहिर करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार सर्वसाधारण महेश परंडेकर   यांची उपस्थिती होती. अहमदपूर तालुक्यातील 1- खंडाळी- अनुसूचित जाती, 2- हाडोळती- नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला), 3- शिरुर ताजबंद -सर्वसाधारण महिला, 4- अंधोरी-अनुसूचित जाती महिला, 5-किनगाव -सर्वसाधारण (महिला), 6-सावरगाव रोकडा - अनुसूचित जाती, 7- कुमठा बु. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला). जळकोट तालुक्यातील 8- वाजंरावाडा - सर्वसाधारण, 9- माळहिप्परगा – सर्वसाधारण (महिला). उदगीर तालुक्यातील 10-घोणसी - सर्वसाधारण, 11- हंडरगुळी - नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 12-वाढवणा (बु) - सर्वसाधारण, 13-नळगीर - सर्वसाधारण महिला, 14-नागलगांव- नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 15- मलकापूर - सर्वसाधारण ,16- लोहारा - नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 17-देवर्जन नागरिकांच्या माग

जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वराज्य महोत्सव म्हणून 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत साजरा करणार

Image
  *जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वराज्य महोत्सव म्हणून* *8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत साजरा करणार*   §   राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून या अभियानात, §   आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवूया, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सामील होऊ या...!                                                                 -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. §   घरोघरी तिरंगा अभियान : ग्रामस्थ,स्वंयसेवा संस्था यांनी हरघर तिरंगा ही मोहिम उत्स्फूर्तपणे लोकसहभागातून यशस्वी करावी §   दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान घरोघरी तिरंगा या अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, व आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. §   आपल्या राष्ट्रध्वजाची मागणी, ग्रामपंचायत,वार्ड ऑफिस यांच्याकडेही नोंदवू शकता किंवा इतर ठिकाणावरुनही राष्ट्रध्वज खरेदी करु शकता §   जिल्ह्यात 3 लाख 88 हजार 400 घरावर मोठ्या अभिमानाने फडकणार तिरंगा          लातूर (जिमाका) दि. 28 :- लातूर जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार असून या महोत्सवा अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑग

अभय योजना- 2022 अंतर्गत मुद्रांक शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या दंडाचा लाभ 31 जूलै 2022 पर्यंत घेण्यात यावा

  अभय योजना- 2022 अंतर्गत मुद्रांक शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या दंडाचा लाभ 31 जूलै 2022 पर्यंत घेण्यात यावा   *लातूर,दि.27(जिमाका):-*   1 एप्रिल 2022 पासून सूरु झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा दिनांक 01 जुलै 2022 रोजी संपत आहे. तरी थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती या संबंधी पक्षकारांना दिनांक 31 मार्च 2022 पुर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील व त्यांनी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर त्या संबंधीत पक्षकारांनी तात्काळ या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ध.ज.माईनकर, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी लातूर यांनी केले आहे. संबंधीत पक्षकारांनी दि.31 जूलै 2022 रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सदर सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजेच थकीत शास्तीवरील 90% सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकीत शास्तीवर 50%दंड भरावा लागेल. योजनेचे संक्षिप्त स्वरूप :- महाराष्ट्र   मुद्रांक अधिनियम 31, 32 अ, 33, 33 अ , 46, 53 (1अ), व 53 अ अन्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात दिना

केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

  केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन                  *लातूर,दि.27(जिमाका):-*   असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचे कवच मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाने ई-श्रम संकेत स्थळाचे अनावरण केले आहे. श्रमिकामधील अत्यंत वंचित घटकाला ई-श्रम संकेत स्थळाच्या माध्यमातून ओळख आणि संघटित रूप मिळवता येणार आहे. केंद्र सरकारने देशभरातील विविध क्षेत्रातील 38.00 कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.   केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या https://register.eshram.gov.in/#/user/self या पोर्टलवर राज्य सरकार, कामगार संघटना आणि सामाईक सेवा केंद्र (CSC-Setu) यांच्या मदतीने मत्स्यकामगारांची नोंदणी केली जाणार आहे. मत्स्यव्यवसायाशी संबंधित कामगारांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बँक खात्याचा तपशील इत्यादी माहितीसह नोंदणी करता येईल. पात्रता :          भारताचा नागरिक असावा. मत्स्यव्यवसाय, मत्स्यशेती   क्षेत्रातील मच्छीमार
Image
                                औसा तालुक्यातील भुसणी येथील अवैध मद्य निर्मिती विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.... 51 लाख 63 हजाराचा 550 रुपयांचा मुद्येमाल जप्त           *लातूर,दि.27(जिमाका):-* राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशानुसार व विभागीय उप-आयुक्त प्रदिप एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील अधीक्षक अभिजित देशमुख यांनी भरारी पथक, उस्मानाबाद / लातूर यांच्या स्टाफ व लातूर स्टाफ समवेत यांनी कृष्णार्जुन ॲग्रो इंडिस्ट्रिज अँड वेअर हाऊस, भुसणी शिवार, हासेगांव रोड, भुसणी, ता. औसा, जि. लातूर या   ठिकाणी दिनांक 26 जूलै, 2022 रोजी छापा टाकला असता सदर ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना बनावट देशी मद्याचे निर्मिती व त्यासाठी लागणारे स्पिरीट (मद्यसार) ची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्येशाने बाळगून असतांना मिळून आला.              सदर गुन्ह़यामध्ये 200 ली. क्षमतेचे 39 प्लॅस्टीक बॅरल ज्यात 7800 ली. स्पिरीट   फेलवर (इसेंस) , 20 बॉक्स टोपण (बुचे) एकबॉटलींग (सिलींग व पॅकींग) मशीन, पाणी फिल्टर मशीन, ब्लेंड

जिल्ह्यातील दिव्यांगानी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  जिल्ह्यातील दिव्यांगानी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन             *लातूर,दि.26 (जिमाका):-*   केंद्र शासनाच्या योजनेच्या अनुषंघाने दिव्यांग व्यक्तींना सन २०२१-२२ च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येता आहेत.या साठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांर्तगत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या संकेत स्थळावर दिव्यांग व्यक्तीकरिता राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन व अर्ज मागविण्याकरिता दिनांक 15 जूलै 2022 ते 28 ऑगस्ट 2022 या करिता संकेतस्थळ उघडण्यात आले आहे.याची सविस्तर कार्यप्रणाली खलील प्रमाणे                अर्ज / नामांकन www.awards.gov.in या संकेतस्थळावरून भरण्यात यावे व दिनांक २८/०८/२२ पूर्वी राष्ट्रीय पुरस्कार २०२१ व २०२२ करिता प्राप्त सर्व अर्ज / नामांकने विचारात घेण्यात येतील.सन २०२१ आणि २०२२ करिता स्वतंत्ररित्या अर्ज   / नामांकने केवळ ग्रहमंत्रालयाने तयार केलेल्या (URL. www.awards.gov.in ) या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावेत.या पोर्टलवर उपलब्ध्‍ असणाऱ्या विशिष्ठ नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनी