लातूर जिल्ह्यात आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

*लातूर जिल्ह्यात 13 ऑगस्ट रोजी*

*राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन*

 

          *लातूर,(जिमाका),दि.12:-* महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी लातूर मुख्यालयी तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होवून न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर व सचिव श्रीमती एस.डी. अवसेकर यांनी केले आहे.

      राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व व प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. लातूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, 138 एन.आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे,इलेक्ट्रीसिटी ॲक्ट समजोता प्रकरणे,भू-संपादन, कामगार,सहकार न्यायालय, वीज व पाणी बिल प्रकरणे,पगार व भत्ते प्रकरणे आणि सेवानिवृत्ती विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे,दूरध्वनी / मोबाईल कंपन्यांची प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे अशा सर्व प्रकारची तडजोडयोग्य प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असून पक्षकारांनी आपसी समजोत्याकरिता ठेवून ती सामजस्याने सोडवावीत. तसेच ज्या नागरिकाकंनी आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन ही आयोजकांनी केले आहे.

                                                        000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु