भारतीय डाक विभागातर्फे राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर “ढाई आखर” पत्र लेखन स्पर्धा

 

भारतीय डाक विभागातर्फे राज्य  स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर

 ढाई आखर पत्र लेखन स्पर्धा

 

             * लातूर, (जिमाका),दि.20:-* भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर पत्र लेखन स्पर्धा  ढाई आखर  या शीर्षकाखाली आयोजित केली आहे.

       पत्राचा विषय Vision for India 2047 या विषयावर लिहावयाचे असून पत्र कोणत्याही भाषेमधून लिहिता येते. ही पत्र लेखन स्पर्धा वय वर्षे 18 पर्यंत एक गट व वय वर्षें 18 च्या वर दुसरा गट अशा दोन गटात विभागलेली आहे. म्हणून स्पर्धकानी दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी  माझे वय 18 पेक्षा कमी / जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख करावा.तसेच आपले नाव पत्ता व वयाचा उल्लेख असावा.

       सदरचे पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई  जी पी ओ, मुंबई-400001 यांच्या नावाने लिहून डाकघरामार्फत लावलेल्या विशेष टपाल पेटील टाकावयाचे आहे. पाकिटातून पत्र पाठवण्याची शब्द मर्यादा 1000  व अंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्दाची आहे. पत्र पाठविण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 ही आहे. दिनांक 31 ऑक्टोबर 2022 च्या नंतर पाठवलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेमध्ये समावेश करण्यात येणार नाही.

          राज्य स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे रुपये 25 हजार, रुपये 10 हजार  रुपये 5 हजार राज्य स्तरावर निवडलेल्या प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्राला राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येईल व राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे रुपये 50 हजार  रुपये 25 हजार रुपये 10 हजार चे पारितोषक देण्यात येईल.

         तरी जास्तीत जास्त संख्येने जनतेने आपला सहभाग नोंद्वावा असे आवाहन डाक अधिक्षक, उस्मानाबाद  विभाग मुख्यालय लातूर डॉ. बी. एच. नागरगोजे  यांनी केले आहे. आधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02382-249954 वर संपर्क साधावा असे असे डाकघर अधिक्षक, उस्मानाबाद विभाग, मुख्यालय लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                  0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु