Posts

Showing posts from January, 2022

जलसंधारणातून समृद्धी--शंकरराव गडाख मंत्री, मृद् व जलसंधारण

  जलसंधारणातून समृद्धी     गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, जलसंधारण योजनांचे पुनरुज्जीवन, जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती इत्यादी कामांना प्राधान्य दिले जात आहे. राज्यातील जलसंचय वाढीबरोबरच जमिनीची धूप थांबवण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येत आहे.       *शंकरराव गडाख* *मंत्री, मृद् व जलसंधारण*       मृद् व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, तसेच भूजल पातळी वाढावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध प्रकल्पांची दुरुस्ती करून मूळ पाणी साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपर्यंत विभागामार्फत 306 कोटी रुपयांच्या 1 हजार 405 योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.   *लोकसहभागातून जलसंधारण* उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास आणि तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन म्हणजे जलसंधारण होय. उपलब्ध पाण्याचे प्रमाण स्थिर असल्यामुळे वापरल्या जाणार्‍या पाण्याचे दरडोई प्रमाण सार

गुंतवणुकीस चालना---सुभाष देसाई मंत्री, उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

  गुंतवणुकीस चालना     कोरोनाच्या कठीण कालावधीमध्ये सक्षम आणि आर्थिक विकासाचा विचार करून जीव आणि जीवन दोन्ही वाचवण्याचे लक्ष्य होते. देशातील मोठ्या व प्रमुख उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेतले. यामुळे राज्याचे अर्थचक्र सुरळीत ठेवण्यात यश मिळाले. याच कालावधीत राज्यात सुमारे 3 लाख कोटी रुपयांच्यावर गुंतवणुकीस चालना देण्यात आली.       *सुभाष देसाई* *मंत्री, उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा*       राज्याच्या उद्योग विभागाने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 उपक्रमांतर्गत जून, नोव्हेंबर, डिसेंबर 2020 व जून सप्टेंबर, ऑक्टोबर 2021 मध्ये 1,67,762 कोटी रुपये रकमेचे एकूण 59 सामंजस्य करार केले. तसेच ऑक्टोबर 2019 ते मार्च 2021 या कालावधीत राज्यामध्ये 1,71,807 कोटी रुपये रकमेची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात आली. या शिवाय गतवर्षी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील उद्योग क्षेत्रात 22,142 कोटी रुपयांची नियमित गुंतवणूक करण्यात आली. अशा प्रकारे सुमारे 3 लाख कोटी रुपयांच्यावर गुंतवणुकीस चालना देण्यात आली. या सामंजस्य करारातून 3 लाख इतका रोजगार निर्माण होणे अपेक्षि

लातूर शहरातील प्रत्येक नागरिकाला अदययावत आरोग्य सोयीसुविधा पुरवण्यासाठी महत्वांकाक्षी योजना राबविणार -- पालकमंत्री अमित देशमुख

Image
  लातूर शहरातील प्रत्येक नागरिकाला अदययावत आरोग्य सोयीसुविधा पुरवण्यासाठी महत्वांकाक्षी योजना राबविणार --   पालकमंत्री   अमित देशमुख   ·          कबाले वाटपातील अडचणी दूर करण्यासाठी राजस्व अभियान राबवावे . ·          मनपाच्या सौरउर्जा प्रकल्पाची त्वरीत उभारणी करावी ·          नवीन वस्तीमध्ये विज जोडणीसाठी महावितरणने मोहिम राबवावी ·          घरावरून जाणाऱ्या धोकादायक विज वाहीन्या त्वरीत हटवाव्यात ·          शहर वाहतुक बस महिलांना मोफत प्रवास योजना त्वरीत सुरू करावी ·          शहरातील सर्व सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करावी ·          ट्रव्हल्स व भाडयाने चालणाऱ्या वाहनासाठी स्वतंत्र वाहनतळ उभारावेत ·          बांधकाम परवाने देतांना पार्कीग व्यवस्था अनिवार्य करावी ·          रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करून वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावावी लातूर दि.31 (जिमाका ) :- लातूर शहरातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्याच बरोबर त्यांना गरत पडल्यास अदययावत यंत्रणेव्दारे सर्व प्रकारच्या वैदयकीय सोयीसुविधा आणि उपचार मिळावेत यादृष्टीने महापालिका, विलासराव देशमुख वैदयकी

ग्रामीण अर्थचक्राला चालना---संजय बनसोडे राज्यमंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्ये

  दिनांक :-29 जानेवारी 2022   ग्रामीण अर्थचक्राला चालना   ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्यात येत आहे. मराठवाड्यातील दुष्काळावर तोडगा काढण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता मिळाली आहे, तर वातावरणीय बदलांमुळे निर्माण होणार्‍या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. संजय बनसोडे राज्यमंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्ये राज्याच्या ग्रामीण विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून त्यादृष्टीने अनेक योजना राबवण्यात येत आहेत. शरद पवार ग्राम समृद्धी योजना राज्यात रोजगार हमी योजनेमार्फत शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे, तर मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून शेतकर्‍यांना शेतापर्यंत शेतमाल ने-आण करणे सोपे होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्राम

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी- संदीपान भुमरे मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन

  दिनांक :- 29 जानेवारी 2022   शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी   राज्यातील शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभागांतर्गत अनेक योजना राबवल्या. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना, नवीन सिंचन विहिरी, फळबाग पुनर्लागवड, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, शरद पवार ग्रामसमृद्धी योजना आदी योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली आहे. संदीपान भुमरे मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन राज्यातील शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जमिनीचा विकास, पाण्याची उपलब्धता, सेंद्रिय, पुनर्भरणाद्वारे जमिनीचा पोत सुधारणे अशा अनेक बाबींच्या माध्यमातून शेतकरी शाश्वत विकासाचे स्वप्न साकारत आहेत. राज्य शासनाने दोन वर्षात या योजनेंतर्गत ग्रामीण भाग आणि त्या भागातील जनतेच्या विकासासाठी विविध निर्णय घेतले आहेत. मातोश्री ग्राम समृद्धी योजना राज्यातील गावागावांत शेतरस्ते, पाणंदरस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजन

लातूर महानगरपालिका नजिकच्या २७ गावांचे एकात्मिक विकास आराखडे तयार करावेत अंमलबजावणीसाठी पाठपुरावा यंत्रणा उभारावी - पालकमंत्री अमित देशमुख

Image
  लातूर महानगरपालिका नजिकच्या २७ गावांचे एकात्मिक विकास आराखडे तयार करावेत अंमलबजावणीसाठी पाठपुरावा यंत्रणा उभारावी -          पालकमंत्री अमित देशमुख   §      नवीन योजनांचे तातडीने प्रस्ताव तयार करून सादर कारावेत §      शहराच्या झालर क्षेत्रात येणाऱ्या वस्त्यामध्ये मनपाकडून मुलभुत सुविधा पुरवाव्यात §      नकाशावर असलेले शेतरस्ते प्राधान्याने खुले करून त्याचे मजबुतीकरण करावे §      काही गावात शहराच्या धर्तीवर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत §      प्रत्येक गावात संरक्षक भिंत व शेडसह स्मशानभूमी उभारावी §      दलित वस्ती आणि तांडा वस्ती विकासाच्या योजना एकात्मिक पद्धतीने राबवाव्यात §      प्रत्येक गावात शुद्ध पाणी पुरवठा योजना राबवावी §      शाळामधील स्वच्छतागृहाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी §      ग्रामपंचायतीसाठी प्राधान्याने सौर प्रकल्प उभारावेत   लातूर, (जिमाका) 28:-  लातूर महानगरानजिकच्या  २७ गावांचे स्वतंत्र विकास आराखडे तयार करावेत. तसेच विविध योजनांचे प्रस्ताव तयार करून त्यांची मंजुरी व अंमलबजावणीसाठी पाठपुरावा