बाल हक्क सर्वेक्षण आयोगाच्यावतीने जिल्ह्यात सर्वेक्षण मोहीम रस्त्यावर राहणाऱ्या 59 मुलांचे सर्वेक्षण
बाल हक्क
सर्वेक्षण आयोगाच्यावतीने जिल्ह्यात सर्वेक्षण मोहीम
रस्त्यावर राहणाऱ्या 59 मुलांचे सर्वेक्षण
“ रस्त्यावर राहणा-या बालकाचे सर्वे करून मा. सर्वोच्च न्यायालयाला एकत्रीत अहवाल सादर करण्यात येईल या सर्वे नुसार बालकाची बाल मजुरी बालभिक्षेकरी बाल गुन्हेगारी कडे वळतात या बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा कृती दल समिती व जिल्हा प्रशासनाच्या
वतीने तातडीने उपाय योजना करण्यात येईल ” --- जिल्हा महला व बालविकास अधिकारी वर्षा पवार
लातूर
दि.13 (जिमाका) कोविड काळामध्ये अनेक कुटूंबातील बालकांचे आई व वडिलांना कोविडचा संसर्ग झाल्यामुळे
अनेक बालकांचे पालक मयत झाले तसेच कुटूंबावर उपासमारीची वेळ आली याचा परिणाम बालकांवर झाला या कारणामुळे अनेक बालके रस्त्यावर आली व भीक मागू लागले. त्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पालन पोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याने ही मुले बालमजुरी किंवा बाल गुन्हेगारीकडे वळतात त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या बालकांचा सर्वे करून बालकांचे पुर्नवसन करण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि राष्ट्रीय बाल हक्क सर्वेक्षण आयोगाच्यावतीने लातूर जिल्ह्यात सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली.
यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा कृती दल समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधिक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी वर्षा पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने प्राथमिक (शिक्षणाधिकारी) माध्यमीक (शिक्षणाधिकारी), जिल्हा शल्य चिकीत्सक, सहाय्य आयुक्त समाज कल्याण, महानगरपालिका / नगरपालिका, चाईल्ड लाईन लातुर, वन स्टॅाप सेंटर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे प्रतिनीधी, इत्यादी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील मुले,
रस्त्याच्या कडेवरील झोपडपट्टीतील मुले, भीक मागणारे मुले अशा मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच एका दिवसामध्ये लातुर जिल्ह्यातील 59
बालकांचे सर्वेक्षण करून त्यांची सविस्तर माहिती घेतली व माहीतीसह नोंदणी करण्यात आली.
सर्वेक्षणा नंतर या मुलांच्या पुर्नवसनासाठी जिल्हा प्रशासन तातडीने उपाय योजना राबविणार आसुन मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिला व बाल विकास विभागातर्फे अनाथ बेघर दिवसभर रसत्यावर राहुन जवळच्या झोपडपटटीत राहणा-या आणि कुटूंबासमावेत रस्त्यावर जे बालके राहतात त्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सदर बालके काळजी व संरक्षाणची गरज असल्या कारणाने मा. बाल कल्याण समिती लातुर यांच्या आदेशाने योग्य ते पुर्नवसन करण्यात येईल.
000
Comments
Post a Comment