निम्न तेरणा प्रकल्पलाभ क्षेत्रातील उन्हाळी हंगाम पाणी पाळयाचे नियोजन

 

निम्न तेरणा प्रकल्पलाभ क्षेत्रातील

उन्हाळी हंगाम पाणी पाळयाचे नियोजन

*पाणी अर्ज 31 मार्च पूर्वी सादर करावेत

लातूर, दि.24 (जिमाका):-निम्न तेरणा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरण प्रणाली, अधिसुचित नदी नाल्यावरील व कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी, निम्न तेरणा प्रकल्पात या वर्षी 87.88 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असुन त्यानुसार उन्हाळी हंगामात 5 (पाचवी पाणीपाळी राखीव) पाणी पाळया देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1- लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 उन्हाळी हंगामाच्या नियोजनाबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्यमंत्री  तथा पालकमंत्री, अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दि.18 मार्च 2022 रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने  उन्हाळी हंगामातील इतर उभी पिके कालावधी (01 मार्च 2022 ते 30 जून 2022) या पिकासाठी कालव्याचे प्रवाही/ कालव्यावरील उपसा, नदिनाल्यावरील मंजुर उपसा सिंचन योजनाद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना न.7, 7-अ मध्ये भरुन दिनांक 31 मार्च 2022 पुर्वी संबधीत शाखा कार्यालयास सादर करावेत.

पुर्व नियोजित पाणीपाळयाच्या अनुषंगाने लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांनी  सिंचनासाठी पाणी पाळी मिळाल्यास तदनंतर मिळणा-या पाण्याचा कालावधी हा साधारणत: 12 ते 15 दिवसापेक्षा जास्त असु शकतो त्यामुळे सदर कालावधीत तग धरुन राहु शकतील अशीच हंगामी पिके घेण्यात यावीत. निव्वळ कालव्याच्या पाण्यावर विसंबुन न राहता विहिर व बोरचा आधार असल्यासच जास्त पाण्याची गरज असणारे पिके (उदा: भुईमुग) घेण्यात यावे. अन्यथा होणा-या संभाव्य नुकसानीस  जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही याची नोंद घेवुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे.

उन्हाळी हंगाम 2022 मधील कालव्याद्वारे पाणी आवर्तन नियोजनाचा तपशिल पूढील प्रमाणे. उन्हाळी हंगाम 2021-2022 पाणी पाळी -1 दि. 20 मार्च 2022 ते 26 मार्च 2022, पाणी पाळी -2 दि. 11 एप्रिल 2022 ते 14 एप्रिल 2022 पाणी पाळी-3 दि. 2 मे 2022 ते 8 मे 2022 पाणी पाळी -4 दि. 24 मे 2022 ते 30 मे 2022 व पाणी पाळी 5- दि. 15 जून 2022 ते 21 जून 2022 उन्हाळी हंगामातील पाणीपाळया चालू होण्याचा संभाव्य दिनांक या प्रमाणे राहील. तथापि पाऊस, कालवाफुटी व इतर अपरीहार्य कारणांमुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतो.

सदयस्थितित  लातूर पाटबंधारे विभाग क्रं.1 लातूर अंतर्गत अत्यंत कमी प्रमाणात कर्मचारी असुन प्रत्येक शाखा कार्यालयात केवळ 1 ते 2 कर्मचारी  कार्यरत आहेत. सबब लाभधारकांनी  स्वत: पुढाकार घेवून शाखेत येवून सिंचनासाठी पाणी मागणी करावी. तसेच ज्या ज्या ठिकाणी शक्य असल्यास शाखेतील कर्मचारी यांचेकडुन ग्रामपंचायत कार्यलयात प्रत्याक्षात येवुन पाणी मागणी अर्ज उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अटी  व शर्ती पूढील प्रमाणे   

ज्या जमिणीसाठी पाणी मागणी  करावयाची आहे त्या जमिणीचा मालक असला पाहिजे. पाणी अर्जासोबत 7/12 उतारा सादर करावा. पाणी अर्जासोबत मागिल थकबाकी पुर्ण भरावी व रितसर पावती घ्यावी. पाणी मागणी क्षेत्र 0. 20 आर च्या पटीत( कमित कमी 0.20 आर  क्षेत्र) असावे ,तसेच अर्जासोबत थकबाकी, पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी  अर्ज मंजुर करण्यात येईल. पाणी अर्ज मंजुर झाल्यानंतर पिकास पाणी घ्यावे. आपआपल्या हद्दीतिल शेतचारया दुरुस्तीची जबाबदारी संबधित बागायतदाराची राहील.  शेतचारी नादुरुस्त असल्यास मंजुरी दिली जाणार नाही. व पाणी दिले जाणार नाही. मंजुरीपेक्षा जास्त क्षेत्र सिंचीत  केल्यास हंगांमी दराच्या  दिड्पट दराने आकारणी केली जाईल.

पाणी अर्ज न देता पाणी घेतल्यास बिनअर्जी क्षेत्राचे पंचनामे करुन दंडनीय दराने आकारणी करण्यात येईल.  कालव्यावरील उपसा सिचन परवाना धारकाने त्यांचे मंजुर क्षेत्रास ठरवुन दिलेल्या तारखेस पाणी कालव्याच्या शेवटपासुन ते सुरवात (Tail to Head)  या प्रमाणे घ्यावे.सिंचन नियोजन असल्यास मंजुर कालावधी सोडुन मॊटारी चालु ठेवल्यास सिंचन अधिनियम 1976 चे कलम 97 नुसार विद्युत पुरवठा खंडीत करणे,विद्युत मोटारी जप्त करणे,पाणीपरवाना रद्द करणे,व बिगर पाळी पंचनामा करणे अनिवार्य ठरेल याची नोंद  घ्यावी. शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध  केलेल्या प्रचलीत पाणीपट्टीच्या दराने आकारणी करण्यात येईल व त्यावर 20 टक्के  स्थानीक कर आकारला जाईल. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा काही अपरिहार्य कारणामुळे अथवा तांत्रिक कारनास्तव पाणीपुरवठा शक्य न  झाल्यास व त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही. तसेच कांही अपरिहार्य कारणास्तव / तांत्रीक अडचणी उदभ्वल्यास सदर जाहीर निवेदनाव्दारे देण्यात आलेल्या पाणी पाळीच्या नियोजनामध्ये  बदल करण्याचे हक्क सदर निम्ण स्वाक्षरीतांनी राखून ठेवलेले आहेत. उपसा सिंचन परवाना धारकांनी इतरांना पाणी दिल्यास व दिलेला सिंचन परवान्यावर  विद्युत मोटार 5 एच पी पेक्षा जास्त विदुत मोटार एच पी आढळल्यास सिंचन परवाना  रद्द करण्यात येईल.

जबरदस्तीने अथवा विनापरवानगी गेट उघडल्यास, कालवा फोडुन पाणी घेतल्यास पाटबंधारे अधिनियम  1976 चे खंड क  पोटकलम क व ख अन्वये  दंडात्मक कायदेशीर कार्यवाही  करण्यात येईल. पाटबंधारे विभागामार्फत जाहीर आवाहन करण्यात येते की, कालव्यावरील उपसा व ठिबक सिंचन पाणी परवाना धारकांचे पाणी अर्ज प्रथम प्राधाण्याने  मंजुर करुण एकपट दरानेच अकारणी करण्यात येईल. तसेच ज्या लाभधारकांचे पाणी परवाने उपलब्ध नाहीत, त्या लाभधारकांस विना परवाना व अनाधिकृत पाणी उपसा समजून संबधितास दिडपट दराने अकारणी करण्यात येईल. त्यामुळे कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त लाभधारकांनी पाणी परवाने घेवुनच सिंचनासाठी पाणी  घ्यावे  व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे ही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.                                                                                                                  

                                                    0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु