पिण्यासाठी वापरासाठी प्राधान्याने आरक्षित केलेला पाणीसाठा वगळता उर्वरीत पाणीसाठा सिंचनासाठी वापरला जाईल

 

पिण्यासाठी वापरासाठी प्राधान्याने आरक्षित केलेला पाणीसाठा वगळता  उर्वरीत पाणीसाठा सिंचनासाठी वापरला जाईल

 

लातूर,दि.7,(जिमाका):- लातुर पाटबंधारे विभाग क्रं 1 लातुर  या विभागाअंतर्गत मोठे प्रकल्प  (1)मांजरा प्रकल्प ,2) तेरणा प्रकल्प) एकुण-02) मध्यम प्रकल्प  (1) तावरजा प्रकल्प 2) मसलगा  प्रकल्प) एकुण-02 व तसेच लघु प्रकल्प ,साठवण तलाव व बॅरेजेस (या विभागाच्या कार्यक्षेत्रातील लाभक्षेत्रातील) सिंचन लाभधारकांना आवाहन करण्यात येते की,  संबधित प्रकल्पातील पाणीसाठा उपलब्धतेनुसार,प्रकल्पीय पीक रचनेनुसार पाणी देण्याचे नियोजन आहे. संबधित प्रकल्पातील पाणीसाठा व प्रकल्पीय पिकरचना व प्रकल्पनिहाय देण्यात येणाऱ्या पाणीपाळी ची माहिती संबधीत शाखा  कार्यालयास पाहावयास मिळेल.

 उपलब्ध पाणी साठयापैकी पिण्यासाठी वापरासाठी प्राधान्याने आरक्षित केलेला पाणीसाठा वगळता  उर्वरीत पाणीसाठा सिंचनासाठी वापरला जाईल. अशी माहिती लातूर पाटबंधारे विभागाने परिपत्रकाव्दारे दिली आहे. सर्व लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना 7 व 7 अ, शासनाने सुधारित केलेल्या नमुन्यात संबधित शाखा अधिकारी यांच्या कार्यालयास दि 15 मार्च 2022 पर्यंत पाणी अर्ज भरुण शाखा कार्यालय किंवा बिट प्रमुखाकडे सादर करावेत तसेच,कमी पाण्यात येणारे  उन्हाळी हंगामी ज्वारी व उभी पिके व लाभक्षेत्रातील प्रवाही वरील उभा  उस  (हंगामी मंजुर) कालावधी  01 मार्च 2022 ते 30 जून 2022 हा राहील.

तसेच केवळ कालव्याच्या पाण्यावर विसंबुन न राहता विहीर व बोरचा आधार असल्यासच जास्त पाण्याची गरज असणारी पिके ( उदा. भुईमुग )घेण्यात यावे. अन्यथा होणा-या संभाव्य नुकसाणीस जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही याची नोंद घेवुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे. असेही या परिपत्रकात नमुद केले आहे.

तसेच सद्यस्थितित  लातुर पाटबंधारे विभाग क्रं.1 लातुर अंतर्गत अत्यंत कमी प्रमाणात कर्मचारी असुन प्रत्येक शाखा कार्यालयात केवळ  एक  ते दोन कर्मचारी  कार्यरत आहेत. सबब लाभधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी स्वत: पुढाकार घेवून शाखेत येवून  सिंचनासाठी पाणी मागणी करावी  तसेच ज्या ज्या ठिकाणी शक्य असल्यास शाखेतील कर्मचारी यांच्याकडून ग्रामपंचायत  कार्यलयात प्रत्यक्षात येवुन पाणी मागणी अर्ज उपलब्ध् करुन देण्याचे  नियोजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्याबाबतच्या अटी  व शर्ती :- ज्या जमिनीसाठी पाणी मागणी  करावयाची आहे, त्या जमिनीचा मालक असला पाहिजे. पाणी अर्जासोबत सातबारा उतारा सादर करावा. पाणी अर्जासोबत मागील थकबाकी पुर्ण भरावी व रितसर पावती घ्यावी. पाणी मागणी क्षेत्र 0. 20 आर च्या पटीत( कमीत कमी 0.20 आर  क्षेत्र) असावे. तसेच अर्जासोबत थकबाकी पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी  अर्ज मंजुर करण्यात येईल. पाणी अर्ज मंजुर झाल्यानंतर पिकास पाणी घ्यावे. आपआपल्या हद्दीतील शेतचारया दुरुस्तीची जबाबदारी संबधित बागायतदाराची राहील. शेतचारी नादुरुस्त असल्यास मंजूरी दिली जाणार नाही. व पाणी दिले जाणार नाही.

मंजूरीपेक्षा जास्त क्षेत्र सिंचीत  केल्यास हंगांमी दराच्या  दिड्पट दराने आकारणी केली जाईल.     पाणी अर्ज न देता पाणी घेतल्यास बिनअर्जी क्षेत्राचे पंचनामे करुन दंडनीय दराने आकारणी करण्यात येईल . कालव्यावरील उपसा सिचन परवाना धारकाने त्यांचे मंजूर क्षेत्रास ठरवून दिलेल्या तारखेस पाणी कालव्याच्या शेवटपासून ते सुरवात (Tail to Head)  या प्रमाणे घ्यावे.सिंचन नियोजन असल्यास मंजूर कालावधी सोडून मॊटारी चालू ठेवल्यास सिंचन अधिनियम 1976 चे कलम 97 नुसार विद्युत पुरवठा खंडीत करणे,विद्युत मोटारी जप्त करणे,पाणीपरवाना रद्द करणे,व बिगर पाळी पंचनामा करणे अनिवार्य ठरेल याची नोंद  घ्यावी. तसेच शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध  केलेल्या प्रचलीत पाणीपट्टीच्या दराने आकारणी करण्यात येईल व त्यावर 20 टक्के  स्थानिक कर आकारला जाईल.

  नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा काही अपरिहार्य कारणामुळे अथवा तांत्रिक कारनास्तव पाणीपुरवठा शक्य न  झाल्यास व त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही. तसेच  कांही अपरिहार्य कारणास्तव / तांत्रीक अडचणी   उदभवल्यास  या जाहीर निवेदनाव्दारे देण्यात आलेल्या  पाणी पाळीच्या नियोजनामध्ये  बदल करण्याचे हक्क सदर उपकार्यकारी अभियंता कार्यालयाकडे  राखून ठेवलेले आहेत. उपसा सिंचन परवाना धारकांनी इतरांना पाणी दिल्यास व दिलेला सिंचन परवान्यावर  विदुत मोटार पाच एच पी पेक्षा जास्त विद्युत मोटार एच पी आढळल्यास सिंचन परवाना  रद्द करण्यात येईल.

जबरदस्तीने अथवा विनापरवानगी गेट उघडल्यास,कालवा फोडुन पाणी घेतल्यास  पाटबंधारे अधिनियम 1976 चे खंड क  पोटकलम क व ख अन्वये  दंडात्मक कायदेशीर कार्यवाही  करण्यात येईल. पाटबंधारे विभागामार्फत  जाहीर आवाहन करण्यात येते की, कालव्यावरील उपसा व ठिबक  सिंचन  पाणी  परवानाधारकांचे पाणी अर्ज  प्रथम प्राधान्याने  मंजुर करुन एकपट दरानेच अकारणी करण्यात येईल तसेच  ज्या लाभधारकांचे पाणी परवाने उपलब्ध नाहीत. त्या लाभधारकांस विना परवाना व अनाधिकृत पाणी उपसा  समजून संबधितास दिडपट दराने अकारणी करण्यात येईल.त्यामुळे  कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त लाभधारकांनी पाणी परवाने घेवुनच सिंचनासाठी पाणी  घ्यावे,  व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे. असे आवाहन या परिपत्रकात केले आहे.

                                                         0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु