प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी स्वयंघोषणापत्र भरताना बॉन्डची आवश्यकता नाही
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी स्वयंघोषणापत्र भरताना बॉन्डची आवश्यकता नाही
लातूर, दि. 02 (जिमाका) : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024 करिता विमा प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी पीक विमा पोर्टलवर 15 जुलै, 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या योजनेसाठी स्वयंघोषणापत्र देताना बॉन्डची आवश्यकता नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी कळविले आहे.
पीक विमा प्रस्ताव ऑनलाईन सादर करताना आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल, तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरुन घ्यावा. तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांच्या नावामधील दुरुस्त करुन घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णत: बदल असल्यास अशा शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरुन घेवू नये. कारण विमा भरपाई मिळतांना शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी जे बँक खाते लिंक आहे, अशा बँक खात्यावररच जमा होणार आहे. त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील, आधारकार्डवरील व सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे.
सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबूक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल, तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरीत भरुन घेवून शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांच्या नावात दुरुस्त करुन घ्यावी. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच किरकोळ नावात दुरुस्तीसाठी स्वंयघोषणापत्र हे बॉन्डवर देण्याची आवश्यकता नाही. यासाठी शेतकऱ्यांनी साध्या कागदावर स्वयंघोषणापत्राचा नमुना तयार करुन सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. जाधव यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment