बालविवाह निर्मुलनासाठी जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये होणार जनजागृती
बालविवाह निर्मुलनासाठी जिल्ह्यातील
निवडक शाळांमध्ये होणार जनजागृती
लातूर, दि. 09 (जिमाका) : उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे नुकतीच झाली. जिल्ह्यातील निवडक 125 शाळांमध्ये इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीचे विद्यार्थी आणि पालकांमध्ये बालविवाह निर्मूलनविषयक जनजागृती सत्र आयोजित करण्याचे नियोजन यामध्ये करण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, शिक्षण विभागाचे डी. के. हैबतपुरे, एम. जे. ढमाले, बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही. एच. निपाणीकर, परीविक्षा अधिकारी धनंजय जावळगे, आयसीडीएस पर्यवेक्षक ए. बी. सूर्यवंशी, अॅड. छाया माळवडे आणि अॅड. छाया आकाटे (बाल न्याय मंडळ), वरिष्ठ प्रकल्प समन्वयक श्री. कांबळे, सिद्धराम गायकवाड आणि सहाय्यक प्रकल्प समन्वयक श्रुती वाघमोडे यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्ह्यातील निवडक 125 शाळांमध्ये इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी आणि पालकांमध्ये बालविवाह निर्मूलनविषयक जनजागृती सत्र महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने, युनिसेफ आणि सेंट्रल फॉर सोशल ॲन्ड बिहेव्हीअर कम्युनिकेशन (एसबीसी-3) यांच्या आर्थिक सहकार्याने कलापंढरी संस्थेने नियुक्त केलेल्या 40 स्वयंसेविका यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. जिल्हा समन्वयक चाइल्ड हेल्प लाईनचे बापू सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*****
Comments
Post a Comment